नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आज रात्री 12 पासून देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, निष्काळजीपणा केल्यास भारताला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. ही किती मोठी किंमत असेल त्याचा अदाजही लावता येणार नाही. देशात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना गांभीर्याने घ्यायला हवे. आरोग्य क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता, देशात महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठीच आज रात्री 12 वाजल्यापासून देशभर लॉकडाउन जारी केला जात आहे.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2974683519264942/
कोरोनाविरुद्ध निर्णायक लढ्यासाठी निर्णय आवश्यक होता…
हिंदुस्थानाला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला वाचवण्यासाठी आज रात्रीपासून घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावली जात आहे. राज्य, केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, गाव, वस्ती आणि गल्लीत सुद्धा लॉकडाउन केले जात आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यू आहे. जनता कर्फ्यूपेक्षा अधिक सक्तीचा. कोरोनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्यासाठी हे पाउल उचलणे आवश्यक आहे.
मोदींनी सांगितल्याप्रमाणे, निश्चितच लॉकडाउनचा आर्थिक फटका देखील बसेल. पण, एक-एक भारतीयाच्या आयुष्य, तमचे परिवार वाचवणे हेच माझे, भारत सरकारचे आणि राज्य सरकारचे सर्वात पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे, माझी तुम्हाला विनंती आहे. हात जोडून प्रार्थना आहे, की तुम्ही सध्या देशात जेथे आहात. तेथेच राहा. सध्याची परिस्थिती पाहता, देशात लॉकडाउन 21 दिवसांचा राहील. तीन आठवड्यांचा. यापूर्वी तुमच्याशी बोललो होतो. त्यावेळी मी म्हटलो होतो, की तुमच्याकडे काही आठवडे मागण्यासाठी आलो आहे. आगामी 21 दिवस प्रत्येक नागरिक, प्रत्येक परिवारासाठी खूप महत्वाचे आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवसांचा काळ खूप महत्वाचा आहे. येत्या 21 दिवसांत परिस्थिती आटोक्यात नाही तर देशा आणि आपले कुटुंब 21 वर्षे मागे जाईल. अनेक कुटुंब नेहमीसाठी बर्बाद होतील. ही गोष्ट एक पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून सांगतो. बाहेर पडणे काय असते हे 21 दिवसांसाठी विसरूनच जा. घरात राहा आणि तेथेच काम करा.
कोरोनाशी लढताना एकमेव पर्याय आहे सोशल डिस्टंसिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सगळेच पाहू शकता की जगभरातील सामर्थ्यशाली देश सुद्धा या रोगाशी लढण्यात असमर्थ ठरत आहेत. असेही नाही की देश प्रयत्न करत नाही, किंवा त्यांच्याकडे आवश्यक साधन सामुग्री नाही. पण, कोरोना व्हायरस इतक्या झपाट्याने वाढत आहे की सर्वच पूर्व तयाऱ्या फौल ठरत आहेत. या सर्वच देशांच्या अभ्यासातून एक गोष्ट समोर आली आहे. तज्ज्ञांचे सुद्धा यावर दुमत नाही, की कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सोशल डिस्टंसिंग एकमेव पर्याय आहे.
२१ दिवसांचा लॉकडाऊन हा मोठा काळ आहे. मात्र, तुमच्या सुरक्षेसाठी, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे. हाच एकमेव मार्ग आहे
>> घरात राहून त्या लोकांबद्दल विचार करा जे सध्या आपला जीव धोक्यात घालून एक एक जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र रुग्णालयात काम करत आहेत
>> जान हैं, तो जहाँ है… धैर्य आणि अनुशासनाची हीच वेळ… देशात लॉकडाऊनची स्थिती असेपर्यंत आपला संकल्प पूर्ण करायचा आहे
>> घरात राहा, घरात राहा आणि एकच काम करा ते म्हणजे केवळ घरात राहणं… आजच्या निर्णयानं देशव्यापी लॉकडाऊननं तुमच्या घराच्या दरवाज्यावर एक लक्ष्मण रेखा आखलीय
>> आपल्याला काहीही झालं तरी घरातून बाहेर पडायचं नाही… सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे
>> घराची लक्ष्मणरेखा पार केली नाही तरच करोनाचं संक्रमण थोपवता येईल
>> करोना संक्रमित व्यक्ती सुरुवातीला स्वस्थ असल्याचं दिसतं, तो संक्रमित आहे हे समजतदेखील नाही. त्यामुळे सावधानता बाळगा आणि आपल्या घरातच राहा
>> पुढचे २१ दिवस घरातून बाहेर पडण्याचं विसरून जा… घरात राहा… आज रात्री १२.०० वाजल्यापासून घरातून बाहेर पडणं पूर्णत: बंद होणार
>> आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, करोना व्हायरसचं जाळं तोडण्यासाठी २१ दिवसांचा काळ महत्त्वाचा आहे