Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रसिकशेठ म्हणजे ‘अपूर्व राजयोगी’! रसिकलाल धारिवाल यांना मान्यवरांची श्रद्धांजली

Date:

पुणे : रसिकलाल धारिवाल यांनी आपल्या कार्याने अपूर्व व्यावसायिक यश मिळवले. तसेच, सामाजिक बांधिलकी जपून समाज आणि देशासाठी योगदानही दिले. अशा या दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तीला त्यांच्या मित्रपरिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘आरएमडी अपूर्व राजयोगी’ या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

जीतोच्या वतीने रसिकलाल धारिवाल यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील कार्याचे चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विविध कला, राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य चित्र स्वरूपात मांडण्यात आले होते. याप्रसंगी अँटी टेर्रोरिस्ट वर्ल्डचे मिठासिंग, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आचार्य चंद्रजी म.सा., श्रीमती शोभा धारिवाल, प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल, जान्हवी धारिवाल, जीतो पुणेचे अध्यक्ष विजय भंडारी, महावीर प्रतिष्ठाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, शर्मिला ओसवाल, राजेश सांकला, अचल जैन, अजित सेठिया, अमित लुंकड, सचिन जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वतःसाठी जगणारे सगळेच असतात पण समाजासाठी जगणारा माणूस लाखात एक असतो. तसेच समाजासाठी जगणारे रसिकलाल धारिवाल होते. त्यांनी धर्म, समाज, राष्ट्रासाठी अमूल्य योगदान दिले. धारिवाल सारखे व्यक्ती असतील तर राष्ट्र कधीही मागे राहू शकत नाही, असे मिठासिंग म्हणाले.

रसिकलाल धारिवाल हे नाव फक्त पुणे किंवा भारत देशपुरते मर्यादित नाही. जगात त्यांची किर्ती आहे. ते तत्वनिष्ठ व्यक्ती होते. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

कृष्णकुमार गोयल म्हणाले की, त्यांची मनाची श्रीमंती देखील अगणित होती. त्यांचा स्वभाव व त्यांची बुद्धी उचस्तरावर होती. नावाप्रमाणेच त्यांचे जीवन रसिकमय होते.

रसिकलाल धारिवाल यांच्या निधनाचे जैन समाजातील प्रत्येकाला खूप दुःख झाले आहे. रसिकशेठ प्रत्येक काम खूप विचारपूर्वक निर्णय घेऊन यशस्वी केले. जितोची खरी सुरुवात पुण्यामध्ये झाली ज्यामध्ये रसिकशेठ यांचा मोलाचा वाटा होता. जितो नेहमीच रसिकशेठ यांनी दाखविलेल्या मार्गावर चालेल, असे विजय भंडारी म्हणाले.

रसिकशेठ जैन समाजाची मोठी संपत्ती होते. त्यांच्या जाण्याने जैन समाजाची झालेली हानी भरुन काढणे शक्य नाही, अशा शब्दांत विजयकांत कोठारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पोपटलाल ओस्तवाल म्हणाले की, कोणत्याही संकटांना तोंड देणाची इच्छाशक्ती रसिकलाल धारिवाल यांच्यामध्ये होती. त्यांनी शून्यातून आयुष्याची सुरुवात केली आणि आपले आयुष्य यशस्वी केले. त्यांच्या जाण्याने जैन समाज पोरका झाला.

यावेळी रसिकलाल धारिवाल यांच्या जीवनावर आधारित ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अचल जैन यांनी केले. आभार अजित सेठिया यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...