मुंबई- अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 23 एप्रिलपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली भायखळा तुरुंगात होते.30 एप्रिल रोजीच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल 2 मेपर्यंत राखून ठेवला होता. न्यायालयाने त्यांना आता सशर्त जामीन मंजूर केला आहे.दोघांनाही 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. सोमवारी वाढीव मुदतीमुळे मुंबईच्या दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांची ऑर्डर पूर्ण होऊ शकली नव्हती.
न्यायालयाच्या या आहेत अटी…
- राणा दाम्पत्याने चौकशीत सहभागी होत राहावे
- अशा प्रकारचे आणखी कोणतेही वादविवाद करू नये
- पुराव्यांशी छेडछाड करू नये
- या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही
- राणा दाम्पत्याविरुद्ध भादंविच्या कलम 15A, 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राणा दाम्पत्यावर 124A म्हणजेच देशद्रोहाचा गुन्हाही दाखल आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आवाहन केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राणा दाम्पत्याला 6 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश होता.