निर्जंतुकीकरणाद्वारे दुकाने सुरू करण्यासाठी सराफ सज्ज आहेत. सर्व कारागीर सध्या गावी गेले आहेत. त्यामुळे स्थानिकांना संधी आहेच.’ मुंबई आणि परिसरातील बांधकाम व्यवसायातदेखील परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत. मुंबई शहर आणि परिसरात या क्षेत्रात ७५ हजार बांधकाम मजूर नोंदणीकृत आहेत. तर ठाणे व नवी मुंबई परिसरातील हा आकडा ३५ हजार आहे. क्रेडाईशी संबंधित बांधकाम व्यावसायिकांनुसा, यापैकी ८० टक्के मजूर हे परप्रांतीय आहेत. त्यामुळे बांधकाम सुरू होताच या क्षेत्रात किमान १ लाख रोजगार असेल. बुडाल्याने परराज्यांतील लाखो कामगारांनी स्वराज्यांमध्ये परतण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हीच महाराष्ट्रातील तरुणांसाठी संधी ठरणार आहे. मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध झाले आहेत.
मुंबईत विविध क्षेत्रांत ८ लाख नोकऱ्या; स्थानिक संधीचा लाभ घेणार ?
मुंबई- लॉकडाउनमुळे मुंबईसह देशभरातील लाखो नागरिकांनी रोजीरोटी गमावली आहे. परराज्यांतील लाखो कामगारांनी परतण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हीच महाराष्ट्रातील तरुणांसाठी संधी ठरणार आहे. मुंबईत विविध क्षेत्रांमध्ये आठ लाख रोजगार स्थानिकांसाठी उपलब्ध झाले आहेत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वांत मोठे बंदरही मुंबईजवळच आहे. यामुळेच येथील सोने-चांदीचा व्यवसाय हा देशातील सर्वांत मोठ्या व्यवसायांपैकी आहे. देशातील ६५ टक्के व्यवसाय मुंबईत आहे. याच सराफा क्षेत्रात पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील लाखो कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा आकडा १० लाखांच्या घरात आहे. या १० लाखांपैकी ८० टक्के कारागीर पगारी आहेत. उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करणारे आहेत. पगारदारांपैकी ७० टक्के अर्थात सुमारे ५.४० लाख कामगार परप्रांतीय आहेत. हे सर्व आता जवळपास गावी परतले आहेत. त्याजागी आता स्थानिक तरुणांना कामाची संधी आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता रोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वांत मोठे बंदरही मुंबईजवळच आहे. यामुळेच येथील सोने-चांदीचा व्यवसाय हा देशातील सर्वांत मोठ्या व्यवसायांपैकी आहे. देशातील ६५ टक्के व्यवसाय मुंबईत आहे. याच सराफा क्षेत्रात पश्चिम बंगाल, ओरिसा व उत्तर प्रदेशातील लाखो कारागीर कार्यरत आहेत. त्यांचा आकडा १० लाखांच्या घरात आहे. या १० लाखांपैकी ८० टक्के कारागीर पगारी आहेत. उर्वरित कारागीर गरजेनुसार काम करणारे आहेत. पगारदारांपैकी ७० टक्के अर्थात सुमारे ५.४० लाख कामगार परप्रांतीय आहेत. हे सर्व आता जवळपास गावी परतले आहेत. त्याजागी आता स्थानिक तरुणांना कामाची संधी आहे. त्यामुळे स्थानिकांनी आता रोजगारासाठी पुढे यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले होते.