महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा
15 कोटी 17 लाखांपेक्षा जास्त न वापरलेल्या (15,17,25,871) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक
नवी दिल्ली- गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 12,72,073 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.48% आहे. केंद्र सरकारने हि माहिती जारी केली आहे .
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 73 लाखांहून अधिक (73,03,669) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 155 कोटी 39 लाखांचा (1,55,39,81,819)टप्पा ओलांडला आहे.
देशभरात 1,65,59,387 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
गेल्या 24 तासांत 1,09,345 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून)आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,48,24,706 झाली आहे. परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 95.20% झाला आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 2,64,202 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 12,72,073 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 3.48% आहे.
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 17,87,457 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 69 कोटी 90 लाखांहून अधिक (69,90,99,084) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 11.83% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 14.78%.इतका आहे.
इतर अपडेट्स :-
केंद्र सरकारने आतापर्यंत लसींच्या 157 कोटी 50 लाखांपेक्षा जास्त (1,57,50,62,435) मात्रा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य पध्दतीने) आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. 15 कोटी 17 लाखांपेक्षा जास्त न वापरलेल्या (15,17,25,871) मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप शिल्लक आहेत.
भारतामध्ये कोविड-19 च्या पहिल्या दोन लाटांमध्ये ज्या लोकांचे मृत्यू झाले त्यांच्या प्रत्यक्ष संख्येपेक्षा खूपच कमी प्रमाणात मृत्यूंची संख्या दाखवली गेली अशा प्रकारचे आरोप करणारे आणि प्रत्यक्षात मृत्यूंची एकूण संख्या खूपच जास्त म्हणजे तीस लाखांपेक्षा जास्त असू शकेल असा दावा करणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तासंदर्भात असे स्पष्ट करण्यात येत आहे की हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे. कोणत्याही वस्तुस्थितीला ते धरून नाही आणि अतिशय खोडसाळ स्वरुपाचे आहे.
महाराष्ट्रात लसींचा तुटवडा असल्याचे सांगणारे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचबरोबर लसींच्या तुटवड्यामुळे राज्याला लसीकरणाची गती वाढवणे शक्य होत नसल्याचे देखील या वृत्तात म्हटले आहे. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आणि अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. याबाबत असे स्पष्ट करण्यात येत आहे की आज उपलब्ध झालेल्या अहवालानुसार(14 जानेवारी 2022) महाराष्ट्राकडे कोवॅक्सिन या लसीच्या न वापरलेल्या 24 लाखांपेक्षा जास्त मात्रा आहेत.