सर्वसामान्यांपर्यंत विमा खाते योजना पोहोचवण्यासाठी इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सची देशातील सर्वात मोठे पीओएस प्रमाणित एजंट नेटवर्क असलेल्या ‘इन्शुरन्सनियरबाय’शी भागिदारी
मुंबई, – भारतातील सर्वात मोठे हायपरलोकल फिनटेक नेटवर्क असलेल्या पेनियरबायची विमा कंपनी इन्शुरन्सनियरबाय आणि इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (इंडिया) – प्रमोटेड बाय, बँक ऑफ बरोडा आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी ‘इन्शुरन्स खाते योजना’ (इन्शुरन्स खाता प्लॅन) सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागिदारी केली आहे. कमी उत्पन्न गटासाठी केवळ विमा देणारी नव्हे, तर अनपेक्षित मृत्यू झाल्यास कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोयीस्कर ठेव योजनाही यात उपलब्ध करून दिली जाते. ही योजना ग्राहकासाठी वारंवारता आणि कालावधीच्या बाबतीत संपूर्ण सोयीस्करपणा देणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत ग्राहकाला त्याच्या सोयीनुसार प्रीमियम भरता येतो. ही योजना एक उत्तम बचत उत्पादनही आहे, कारण योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीला संपूर्ण पैसे परत मिळतात.
भारतातील एकूण 82 टक्के कर्मचारी वर्ग असंघटित क्षेत्रात काम करत असल्यामुळे एकूण 39 कोटी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना सतत आर्थिक नुकसान होण्याच्या भीतीखाली जगावे लागते. नियमित उत्पन्नाअभावी त्यांना वार्षिक किंवा मासिक प्रीमियम भरण्यात अडथळे येतात. यामुळे त्यांचे विमा कवच अपुरे किंवा निरूपयोगी ठरते आणि यातून ते गरीबीच्या चक्रात अडकत राहातात. अशाप्रकारच्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकसंख्येच्या विमाविषयक गरजा वेगळ्या असून त्यांना त्याप्रमाणे सोयीस्कर, सहज उपलब्ध असलेले, त्यांच्या उत्पन्नाच्या अनियमिततेला फटका न बसणारे आणि विमा कवचाची सुरक्षा देणारे खास उत्पादन पुरवणे गरजेचे आहे.
इंडियाफर्स्ट लाइफची विमा खाते योजना ही नॉन- लिंक्ड, नॉ- पार्टिसिपेटिंग, प्रीमियम परत मिळण्याची खात्री देणारी योजना आहे. हे उत्पादन जीवन सुरक्षा कवचाच्या स्वरुपात आर्थिक सुरक्षा देणारे तसेच योजनेचा कालावधी संपेपर्यंत दावा न केला गेल्यास तोपर्यंत भरण्यात आलेला संपूर्ण प्रीमियम परत देण्याची सुविधा देणारे आहे.
देशातील एकूण 72 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहाणारी असून मोठ्या प्रमाणावर विम्यापासून दूर आणि पर्यायाने असुरक्षित आहे. इन्शुरन्सनियरबायच्या 45,000 पीओएस एजंट्सच्या माध्यमातून हे उत्पादन देशातील सर्वसामान्यांपर्यंत सहजपणे पोहोचवले जाईल. इन्शुरन्सनियरबाय लवकरच आपली सहकारी कंपनी पेनियरबायच्या 8.5 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत एजंट्सना संबंधित प्रशिक्षण देऊन पीओएस एजंट म्हणून त्यांती विश्वासार्हता आणखी वाढवणार आहे. शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेल्या या छोट्या रिटेल दालनांमुळे कंपनीला देशाच्या दुर्गम भागातील वंचिक ग्राहकांपर्यंत विमा पोहोचवणे शक्य होईल. यामुळे ग्राहक- विक्रेत्यांचा एक मोठा वर्ग तयार होईल जिथे, आतापर्यंत ज्यांनी कधीच विमा विक्री केलेली नाही, त्यांना ज्या लोकांनी आतापर्यंत कधीच विमा खरेदी केलेली नाही अशांना त्याची विक्री करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
या भागिदारीविषयी पेनियरबायचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद कुमार बजाज म्हणाले, ‘देशातील विम्याची व्याप्ती केवळ 3 टक्के असून भारतीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आयुष्यातील अनिश्चिततेपासून असुरक्षित आहे. आम्ही कायमच सर्वसामान्यांसाठी सुरक्षित आणि त्यांना प्रगती करण्यासाठी मदत करणारी आर्थिक उत्पादने बनवण्यावर भर दिला आहे. हे तत्व आमच्या ‘जिद सुरक्षित आगे बढने की’ या ब्रीदवाक्याशी सुसंगत आहे. इंडियाफर्स्टबरोबर करण्यात आलेल्या भागिदारीमुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना मृत्यूप्रसंगी कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करणारी तसेच त्यांची जीवन ध्येये पूर्ण करण्यासाठी बचत करण्यास मदत करणारी योजना उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. या भागिदारीनुसार काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मला खात्री आहे, की आमचे वितरण नेटवर्क आणि त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने यांच्या एकत्र येण्यातून नागरिकांसाठीच्या संरक्षक विमा कवच पुरवठ्यातील दरी सांधणे शक्य होईल. एक चांगली विमा योजना केवळ मृत्यूप्रसंगी कुटुंबाचे संरक्षण करत नाही, तर त्याचबरोबर त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निश्चित ठेवेची सोयही देते.’
या धोरणात्मक भागिदारीविषयी इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कं. लि. चे उप- मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषभ गांधी म्हणाले, ‘ही भागिदारी समविचारी आणि असामान्य कंपन्यांच्या एकत्रीकरणातून झालेली आहे. भारतातील दुर्गम भागात राहाणाऱ्या प्रत्येक ग्राहकापर्यंत वाजवी दरांत जीवन विमा कवच पोहोचवण्याच्या इंडियाफर्स्टच्या ध्येयाशी इन्शुरन्सनियरबायचे धोरण सुसंगत आहे. तंत्रज्ञान आणि लघु उत्पादनांमुळे इंडियाफर्स्ट लाइफ कंपनीला देशातील असंघटित, वंचित आणि विमा न पोहोचलेल्या प्रदेशांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. आमच्याकडे पेनियरबायचे 45,000 रिटेल प्रतिनिधी आहेत, जे इन्शुरन्सनियरबायसोबत इंडियाफर्श्टची जीवन विमा खाते योजना विकण्यासाठी पीओएस एजंट म्हणून प्रमाणित आहेत. आमच्यासाठी ही केवळ एक सुरुवात आहे. एकत्रितपणे आम्ही अशाप्रकारच्या एम्बेडेड योजना पुरवण्यासाठी उत्सुक आहोत, ज्या भारतामध्ये ‘दीर्घकालीन बचत आणि विम्या’ची संस्कृती रूजवतील.’
याप्रसंगी इन्शुन्सनियरबायचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रिन्सिपल अधिकारी मुरली अय्यर म्हणाले, ‘आम्ही कायमच संपूर्ण सर्वसमावेशकता साध्य करण्याचे ध्येय ठेवले आहे. विमा ग्राहकांच्या बदलत्या आणि विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, विशेषतः कमी उत्पन्न गटातील लोकांना मृत्यूप्रसंगी आपल्या कुटुंबाला आर्थिक झळ न बसता आयुष्य नेहमीप्रमाणे जगण्याची संधी देणारी उत्पादने तयार करण्यासाठी आम्हाला आवश्यक ज्ञान मिळवायचे आहे. इन्शुरन्स खाते योजनेमुळे आम्हाला वाजवी दरात विमा योजना उपलब्धतेमधील दरी सांधायची आहे. हे उत्पादन आमच्या इच्छित ग्राहकवर्गाच्या सुरक्षित, लवचिक ठेव योजनेतून बचतीशी संबंधित गरजाही पूर्ण करणारे आहे.’
नियरबाय इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा. लि. (इन्शुरन्सनियरबाय) विषयी
‘इन्शुरन्स इंडिया’ हे ध्येय आणि महत्त्वाकांक्षेसह काम करणाऱ्या नियरबाय इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने ‘इन्शुरन्सनियरबाय’ या ब्रँडच्या माध्यमातून वंचित घटकांपर्यंत पोहोचत खऱ्या अर्थाने आर्थिक सर्वसमावेशकता साध्य केली आहे. कंपनीद्वारे मोबाइल अप आणि वेब सेवांच्या माध्यमातून प्री- अंडररिटन सोपी विमा उत्पादने पुरवते. अत्याधुनिक, प्रोपायटरी तंत्रज्ञान कोट्यवधी भारतीयांना जलद तसेच विश्वासार्ह पद्धतीने विमा विक्री आणि सेवा पुरवते. बँकिंगपासून वंचित असलेल्या किंवा अत्यल्प बँकिंग सेवा मिळणाऱ्या वर्गाला सहाय्यक आर्थिक/बिगर- आर्थिक सेवा पुरवणाऱ्या नियरबाय टेक्नॉलॉजीज या फिनटेक कंपनीची उपकंपनी असलेल्या नियरबाय इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात विमा उत्पादने उपलब्ध केली जातात.
पूर्वी वी केयर इन्शुरन्स ब्रोकिंग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नियरबाय इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रिन्सिपल अधिकारी मुरली अय्यर जुलै 2019 पासून या पदांवर कार्यरत आहेत. तब्बल 30 वर्षांचा विमा विक्रीचा अनुभव असलेले मुरली देशाच्या विमा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती असून ते बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सची स्थापन करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत.
इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लि. विषयी
मुंबईत मुख्यालय असलेल्या इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्सचे पेड अप भांडवल 625 कोटी रुपये असून ती भारतातील सर्वात नव्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील दोन सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांनी म्हणजेच बँक ऑफ बडोदा आणि युनियन ऑफ इंडियाने प्रमोट केलेल्या या कंपनीत त्यांचा अनुक्रमे 44 आणि 30 टक्के हिस्सा आहे. कॅमल पॉइंट इन्व्हेस्टमेंट लि.ने मॉरिशसच्या कायद्याअंतर्गत कॅमल पॉइंट इन्व्हेस्टमेंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केली असून तिची मालकी प्रायव्हेट इक्विटी फंड्सचे व्यवस्थापन करणाऱ्या वॉरबर्ग पिनकस एलएलसीकडून त्यांचा इंडियाफर्स्ट लाइफमध्ये 26 टक्के हिस्सा आहे.
कंपनीचे वैशिष्ट्य तिच्या सहज, समजण्यास सोप्या उत्पादनांमध्ये आहे, ज्यांची किंमत वाजवी असते व त्यासाठी दर्जेदार सेवा दिली जाते.
अधिक माहितीसाठी भेट द्.: www.indiafirstlife.com