पुणे :
भाजपच्या उमेदवारांनी मोठा गाजावाजा करत सोमवारी सुराज्याची शपथ घेतली. नरवीर तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने पावन झालेल्या सिंहगडावर हा कार्यक्रम झाला. मात्र, विरोधाभास असा की, या कार्यक्रमासाठी आलेल्या एकाही नेत्याने आणि कार्यकर्त्याने गडावर जाण्यासाठी असलेल्या वनसंरक्षण समितीच्या प्रवेशद्वारावर प्रवेश शुल्क भरले नाही. त्यामुळे निवडून येण्यापूर्वीच नियमांची पायमल्ली करणारे हे नेते शिवरायांसारखा कारभार कसा बरे करणार. हे काय सुशासन करणार? असा सवाल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि शहर प्रवक्ते अशोक राठी यांनी केला.