मुंबई-गलवान खोऱ्यानंतर आता अरुणाचल प्रदेशातील तवांग क्षेत्रात भारत आणि चीनी सैनिकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाल्याची माहिती आहे. यावेळी उडालेल्या चकमकीत 10 ते 15 भारतीय जवानांना किरकोळ दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
डोळे मिटून का घेत आहात?
नाना पटोलेंनी म्हटले आहे की, चीनला डोळे दाखवण्याची वार्ता करणारे आज डोळे मिटून का घेत आहेत? भारतीय सीमेवर चालू असलेली चिनी माकडांची घुसखोरी कधी थांबणार? यात भारतीय जवान जखमी होत असताना मोदी सरकार शांत का?नाना पटोले यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. माहितीनुसार 9 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. चीन सैनिक या ठिकाणी तारांचे कुंपण बांधण्याच्या हेतून आले होते. भारतीय जवानांनी त्याला विरोध करताच चीनी सैनिकांनी वायरचे कटर आणि लोखंडांच्या इतर अवजारांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. मा,त्र चीनचे 50 सैनिक प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेतच माघारी फिरले. तर, 10 ते 15 भारतीय जवान जखमी झाले.