आता सावरकर गौरव यात्रा काढता तेव्हा काय केले जेव्हा तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई फुलेंचा अवमान केला?
छत्रपती संभाजीनगर ––
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टीकास्त्र राज्य आणि केंद्र सरकारवर आजच्या छत्रपती संभाजीनगरातील वज्रमुठ सभेतून सोडले आहे.ते म्हणाले महापुरुषांच्या बाबत यांचा दुटप्पीपणा स्पष्ट झाला आहे. आज ते सावरकरांच्या गौरव यात्रा काढत आहेत , खरेच प्रेम आहे काय यांना सावरकरांच्या बद्दल… केंद्रात आणि राज्यात यांचेच सरकार आहे हिंमत असेल तर यांनी सावरकरांना तात्काळ भारतरत्न द्यावे , एकीकडे महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही म्हणता आणि गौरव यात्रा काढता तेव्हा का नाही काढल्या गौरव यात्रा जेव्हा सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंचा अवमान तुमच्या राज्यपालांनी केला , छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला गेला तेव्हा कुठे होता तुम्ही ? तुमचा दुटप्पीपणा लक्षात आला आहे.
अजित पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केले की महाराष्ट्र सरकार हे शक्तीहीन सरकार आहे. राज्य सरकारला जलाची नाही तर मनाची काहीलाज वाटली पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. तुमच्यात जर धमक असेल तर सावरकरांना तात्काळ भारतरत्न द्या, असेही म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, भाजप-शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्ये केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा सवाल अजित पवार यांनी केला.
अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार हे शेतकऱ्यांची थट्टा करते आहे. आम्ही प्रत्येक वंचिताच्या मागण्यासाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी काहीच निर्णय घेण्यात आला नाही. शेतकऱ्यांचया मागण्यासाठी हे सरकार नमले नाही असा आरोपही अजित पवारांनी केला आहे. अवकाळी आणि पीक विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाही. या सरकारचा पायगुण चांगला नसल्याने राज्यातहील उद्योग बाहेर जात असल्याचा आरोप ही अजित पवारांनी केला आहे.
अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सर्वच निवडणुकीत आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील. प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना नाव दिले, ते बाळासाहेब ठाकरेंनी धनुष्यबान चिन्हासह महाराष्ट्रभर पोहचविले. कायद्याचा आणि घटनेचा आदर सर्वांनी केला पाहिजे. त्यांला तिलांजली देण्याचे काम केले. आणि महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात आले. असे जर सर्व राज्यात घडले तर देशात स्थिरता येणार नाही असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे. राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. शिंदे- फडणवीस सरकारने मराठवाड्यातील जनतेचा अपमान केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी केवळ 13 मिनिटे वेळ दिला. ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या लढयात नेतृत्व केले असतील त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. मात्र, राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही.
अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरेंनी आम्हाला एकत्र आलो तेव्हाच अशी सभा घेऊ असे सांगितले. मात्र आता ही पहिली सभा छत्रपती संभाजीनगरात घेण्यात आली आहे. अशा सभा आपण संपूर्ण राज्यात घेणार आहोत.