Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही,भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे :राहुल गांधी

Date:

मोदी-अदानींचे नाते काय? मी प्रश्न विचारत राहणार; माझा आवाज बंद करू शकत नाही

अदानी यांच्या कंपनीत 20 हजार कोटी कोणाचे?

नवी दिल्ली – ‘भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे.मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही पण भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ‘संसदेत मंत्र्यांनी मी परकीय सैन्याकडून सहकार्य घेत असल्याचा खोटा आरोप केला. यावर मी अध्यक्षांना विचारले असता ते हसून म्हणाले – मी काही करू शकत नाही.संसद सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पक्ष कार्यालयात त्यांच्यासोबत प्रियंका गांधी यांच्यासोबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, ‘भारतात लोकशाहीवर हल्ला होत असल्याचे मी तुम्हाला अनेकदा सांगितले आहे. याची रोज नवनवीन उदाहरणे मिळतात. मी फक्त एकच प्रश्न विचारला की अदानींच्या शेल कंपन्या आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले. हा अदानींचा पैसा नाही. त्यांचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय आहे. पैसा दुसऱ्याचा आहे.’

राहुल गांधी म्हणाले की, ‘प्रश्न असा आहे की, हे 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? मी संसदेत पुरावे दिले जे मी मीडिया रिपोर्टमधून काढले आहेत. मी अदानी आणि मोदी यांच्यातील संबंधांबद्दल बोललो. त्यांचे नाते नवीन नसून जुनेच आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचे नाते आहे. मी विमानाचा फोटो दाखवला. ज्यात नरेंद्र मोदी त्यांच्या मित्रासोबत अगदी आरामात बसले होते. हा फोटो मी संसदेत फोटो दाखवला.’

राहुल म्हणाले की, ‘अदानीच्या घोटाळ्याबाबत मी संसदेला पत्र लिहिले, पण काहीही झाले नाही. काही नेत्यांनी सांगितले की, मी विदेशी शक्तींची मदत घेतली, असे काही नाही. मी बरीच पत्रे लिहिली पण उत्तर मिळाले नाही. मला बोलू दिले जात नाही, असे मी लोकसभा अध्यक्षांनाही सांगितले. मी काहीही करू शकत नाही, असे अध्यक्ष म्हणाले. मी भविष्यात मोदींना विचारणार आहे की, 20 हजार रुपये कोणाचे आहेत. मला तुरुंगात जाण्याची भीती वाटत नाही.’ असेही ते म्हणाले.

आता पुढची भूमिका काय असेल, याबद्दल बोलताना ते म्हणाले,” त्यांनी खासदारकी रद्द करो, मला मारो, काहीही असेल तरीही मी फक्त सत्य पाहतो. मला इतर कोणत्याही गोष्टीत रस नाही. हे माझ्या रक्तात आहे.मी कोणताही दुसरा मार्ग शोधणार नाही. ही माझी तपस्या आहे, माझ्या जीवनातली तपस्या आहे. मला हाणा, मारा काहीही करा. या देशाने मला सगळं काही दिलं आहे, प्रेम, सन्मान दिला आहे, म्हणून मी हे करत आहे, असंही राहुल गांधी पुढे म्हणाले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?

नवा ‘फडणवीस वीमा पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांना विमा...

बारावीचा निकाल 13 मे ला लागणार:दहावीचा निकालही 15-16 मे रोजी अपेक्षित

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर ‘वर्षा’ बंगल्यावर:अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त साधत केला गृहप्रवेश

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अखेर अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त...