दिल्ली पोलीस राहुल गांधींच्या दारी :बलात्कार पीडितांवर केलेल्या वक्तव्यावर उत्तर द्या म्हणाले –
दिल्ली पोलीस कि हे गल्ली पोलीस
नवी दिल्ली- भारत जोडो यात्रे दरम्यान केलेल्या महिलांचा छळ होत असल्याच्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलीस थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.या कृतीमुळे या पोलिसांवरील विश्वासाला देशभर तडा जातो आहे. दिल्ली पोलीस कि गल्ली पोलीस अशी संभावना होऊ लागली आहे. दरम्यान सावरकर समझा क्या… नाम- राहुल गांधी है.. या कॉंग्रेसच्या ट्वीट ने या गोंधळात आता आणखी भर टाकून भाजप च्या भोवती टीकेचे जाळे अलगद फेकले आहे.
दरम्यान राहुल यांनी सुमारे 2 तासांनंतर स्पेशल सीपी (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांची भेट घेतली. स्पेशल सीपी यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधींकडून त्यांच्या वक्तव्याबाबत माहिती मागवली आहे. राहुल गांधींनी थोडा वेळ मागितला असून माहिती देऊ असे सांगितले आहे.स्पेशल सीपी हुड्डा म्हणाले- राहुल म्हणाले की भारत जोडो यात्रेदरम्यान ते अनेक लोकांना भेटले. सर्व दुवे जोडण्यासाठी थोडा वेळ लागेल. गरज पडल्यास राहुल गांधींची आणखी चौकशी केली जाईल.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता. त्याची माहिती घेण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या नोटीसच्या संदर्भात दिल्ली पोलीस काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. राहुल यांनी काश्मीरमधील आपल्या भाषणात बलात्कार झालेल्या काही महिलांचा उल्लेख केला होता. आम्ही त्यांना या महिलांचा तपशील मागवणारी नोटीस पाठवली होती आणि आता त्याबद्दल त्यांची चौकशी करू, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी दैनिकाशी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये माध्यमांना संबोधित करताना गांधी म्हणाले होते की, “जेव्हा मी चालत होतो, तेव्हा खूप स्त्रिया रडत होत्या… त्यांच्यापैकी अनेक होत्या ज्यांनी मला सांगितले की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचा विनयभंग झाला आहे. काहींनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा विनयभंग केला आहे. जेव्हा मी त्यांना विचारले की, मी पोलिसांना सांगायला हवे, त्यांनी मला नको असे सांगितले. त्या म्हणाल्या त्यांना मला माहिती द्यायची होती, परंतु त्यांनी दिलेली माहिती मी पोलिसांना सांगू नये, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याल म्हणाल्या की, त्यांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे हेच आपल्या देशाचे वास्तव आहे.