पुणे- महापालिकेच्या प्रशासकीय काळात पुण्यातील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या हजाराच्या आकड्यात असलेल्या सदनिका अज्ञातांनी बळकावल्याची खात्री लायक माहिती असून महापालिकेकडे मात्र कोणतीही माहिती नसल्याचे प्रशासकीय सूत्रे सांगत असताना आता महाप्लीकेचा तब्बल ५ हजार चौरस फुटाचा बहुउद्देशीय हॉल परस्पर ताब्यात घेऊन तो भाड्याने देऊन अगर त्याचा वापर करून बक्कळ कमाई करणाऱ्या तोतया मालकाच्या तथा व्यवस्थापकाच्या शोधात कोंढवा पोलीस आहेत . आरोपी कोण आहेत हे माहिती असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही असे येथील सूत्रांनी सांगितले आहे .पोलिसांनी २ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान याप्रकरणी विवेकानंद बडे (वय ४४ , रा. सांगवी ) या महापालिका कनिष्ठ अभियंता असलेल्या अधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रार देखील मोठी कसरतपूर्ण वाटावी अशीच आहे. तक्रारीत असे म्हटले आहे कि , प्रभाग क्रमांक २७ ,साईबाबा नगर ,सर्वे नंबर ४६ (पार्ट ) कोंढवा येथे हा ५००० चौरस फुटाचा इमाम आझम (अबू हनिफा ) बहुउद्देशीय हॉल आहे. सादर हॉल चे बांधकाम मार्च २२ ला पूर्ण झाले आहे.तेव्हाच महापालिकेच्या भवन रचना विभागाने तो मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतरित केला आणि तेव्हापासून तो कुलूप बंद आहे .अज्ञातांनी ते कुलूप तोडून तो ताब्यात घेऊन अतिक्रमण केले .हि घटना गेल्या ३ मार्च २०२३ ते ६ मार्च २०२३ या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल्याने हि तक्रारच मोठ्या कसरतीची वाटते आहे.
महापालिकेची मालमत्ता जर येथे वर्षभर पडून आहे तर तिथे महापालिकेचा सुरक्षा रक्षक होता काय ?सीसी टीव्हि होते काय ? वर्षभर हि मालमत्ता विनावापर सुरक्षित होती काय ? या वशात ती कोणीच कशासाठी ही वापरलेली नाही काय ? तक्रार दाखल करताना हि मालमत्ता ३ मार्च पासूनच अज्ञातांनी वापरली हे कसे समजले ? अशा अनेक प्रश्नांची उकल पोलीस करणार काय ? असा हि प्रश्न उपस्थित होतो आहे.
अनेक बांधकाम प्रकल्पातून महापालिकेला सुमारे ३ ते ५ हजार सदनिका प्राप्त झालेल्या असून यातील ६० ते ८० टक्के सदनिकांचा वापर परस्पर करून बक्कळ कमाई केली जाते आहे असे आरोप अनेकदा झाले आहेत ,पण प्रशासक याव मुग गिळू बसण्यातच संतोष मानत आले आहे. महापालिकेच्या ताब्यात एकूण अशा किती सदनिका आल्या आहेत त्यापैकी किती सदनिकांचे कशा पद्धतीने वाटप कोणा कोणाला कसे केले आहे . उर्वरित किती सदनिका महापालिकेच्या ताब्यात आहेत ? आणि त्या पडून आहेत काय ? कधी पासून ? त्यावर सुरक्षा रक्षक अगर कोणाची जबाबदारी आहे ? अशा प्रश्नांची उत्तरे आजवर प्रशासकांनी दिलेली नाहीत .