राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन:6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, तर मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Date:

मुंबई- राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखता राज्यातील सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये पावसामुळे उद्या (दि. 2 जुलै) सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दुसरीकडे, राजधानी मुंबईलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले असून पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहता शहरासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. हंगामातील पहिल्याच जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. आता सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबईकरांनी कामानिमित्त घराबाहेर पडताना योग्य ती काळजी आणि विशेष खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहता विविध जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या अंदाजानुसार, आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पालघर जिल्ह्याला 2 जुलै, रायगड जिल्ह्याला 3 व 4 जुलै, तर ठाणे जिल्ह्याला 4 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक राहील. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी 2, 3 आणि 4 जुलै तर सातारा जिल्ह्यातील घाट परिसरासाठी 5 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून या काळात नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा- वंदना कोचुरे

पुणे, दि. १: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारित्र्यरेषेखालील...

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची !

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे...

राममंदिरातील चोरी- आरोपी अविनाशच्या घरी मंदिराची पेटी सापडली:लिहिले होते- रामराज्य निधी, QR कोड देखील चिकटवलेला

अयोध्येतील राम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि अर्पण केलेल्या रकमेतील...

माळीण गावाच्या चिखलात गाडल्या गेलेल्या त्या असंख्य किंकाळ्यांची हाक आता जगासमोर येणार! ‘एक होतं माळीण’

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 'माळीण' गावावर कोसळलेल्या निसर्गाच्या भीषण...