चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून ते अत्यंत धोकादायक बनले आहे. ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने ताशी 90 किमी वेगाने पुढे सरकत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. बिपरजॉय कच्छपासून 80KM दूर आहे, जे गुरुवारी रात्री 6 ते 8 पर्यंत कच्छच्या जाखाऊ बंदरात पोहोचू शकते. या काळात परिस्थिती खूप वाईट होऊ शकते.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुजरात व्यतिरिक्त या वादळाचा प्रभाव इतर 10 राज्यांमध्ये दिसत आहे. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय यांचा समावेश आहे. येथील अनेक भागांत जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.दक्षिण अरबी समुद्रात वादळाची उत्पत्ती झाल्यानंतर, गुजरात किनारपट्टीजवळ येईपर्यंत त्याचा मार्ग अनेक वेळा बदलला. यामुळे ते कमकुवत झाले आहे, परंतु काही वेळा ते धोकादायक बनले. गुजरातमधील 8 प्रभावित जिल्ह्यांमधून 75 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार त्याचा परिणाम गुजरात आणि महाराष्ट्रासह कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि पश्चिम राजस्थानमध्ये दिसत आहे. येथील अनेक भागात जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.
IMD गुजरातचे शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी संध्याकाळी 5 वाजता सांगितले की, चक्रीवादळ बिपरजॉय जखाऊपासून 100KM अंतरावर आहे. ईशान्येकडे जाताना कच्छ, सौराष्ट्र ओलांडणार आहे. मग त्याचा वेग ताशी 115-125KM असेल. यानंतर संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल सुरू राहील.
कमांडर तटरक्षक क्षेत्र-उत्तर पश्चिम विभागाचे महानिरीक्षक ए.के. हरबोला म्हणाले- आम्ही गुजरातमध्ये 15 जहाजे आणि 7 विमाने तयार ठेवली आहेत. संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान धडकेच्या शक्यतेमुळे NDRFच्या 27 तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
दुपारी 2:30च्या अपडेटनुसार, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, चक्रीवादळ बिपरजॉय जखाऊपासून सुमारे 140 किमी आणि द्वारकापासून 190 किमी अंतरावर आहे. ताशी 125-135 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
IMD नुसार, गुजरातमधील द्वारका, जामनगर, पोरबंदर, मोरबी, राजकोट, जुनागढ, अमरेली, भावनगर गिर सोमनाथ आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये 5-15 मिमी/तास वेगाने पाऊस आणि वाऱ्याचा वेग ताशी 40 किमी अपेक्षित आहे.
बिपरजॉय हे गेल्या 25 वर्षांतील जून महिन्यात गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणारे पहिले वादळ असेल. यापूर्वी 9 जून 1998 रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर वादळ आले होते. त्यानंतर पोरबंदरजवळ 166 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते.
गेल्या 58 वर्षांचा विचार केला तर 1965 ते 2022 दरम्यान अरबी समुद्रात 13 चक्रीवादळे निर्माण झाली. यातील दोन गुजरातच्या किनारपट्टीला धडकले. एक महाराष्ट्र, एक पाकिस्तान, तीन ओमान-येमेन आणि सहा समुद्रावर कमकुवत झाले.