आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात; बसस्थानकेही होणार स्वच्छ, सुंदर

Date:

मुंबई दि. १ : एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठिशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. सध्या मुंबई–ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपली एसटी देखील अमृत महोत्सवी वाटचाल करतेय ही अभिमानाची गोष्ट आहे. पूर्वी कच्च्या रस्त्यांवर पण एसटी पोहचायची. आता सगळ्या ठिकाणी रस्ते झाले आहेत मात्र एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी कारण एसटीला परंपरा आहे. नवीन संकल्पना, बदल घडताहेत. प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षा आहेत.

स्वच्छ सुंदर बसस्थानकाची अपेक्षा    

एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ, सुंदर बसस्थानक असावे ही प्रवाशांची अपेक्षा आहे.

एसटी जशी ग्रामीण भागाचं प्रतिनिधीत्व करते त्याचप्रमाणे नवीन सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांची ओळख देखील ग्रामीण भागापर्यंत आहे, त्यांचं सामाजिक काम देखील मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचा फायदा एसटीला होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

इलेक्ट्रिक बस सेवेमुळे प्रदूषणही कमी

आज राज्यातल्या ९७ टक्के लोकांपर्यंत एसटी पोहचली आहे. पर्यावरण, प्रदूषण याचा विचार करून एसटीने इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली आहे याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले.

आम्ही गेल्या आठ नऊ महिन्यात राज्यातील थांबलेल्या कामांना चालना दिली. अगदी पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शेतकरी, कष्टकरी यांच्या आयुष्यात बदल घडविणारे हे निर्णय आहेत. राज्यातील ७५ वर्ष पुर्ण झालेल्या ८ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ घेतला याचे समाधान आहे. महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे. दररोज १७ ते २० लाख महिला प्रवाशी याचा लाभ घेत आहेत, यामुळे एसटीकडे मोठ्या प्रमाणात प्रवाशी वळताहेत याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रारंभी व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, कोविडसारख्या काळातही एसटी महामंडळाने कामगिरी पार पाडली आहे. गेल्या एप्रिलमध्ये एसटीचे ३ लाख प्रवासी होते, आता ५४ लाख प्रवासी झाले आहेत. लाखो ज्येष्ठ नागरिक एसटीत मोफत प्रवास करतात तसेच महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येते त्यामुळे दररोज एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या १० लाख झाली आहे.

यावेळी बोलतांना सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी बालपणापासून आपण एसटीचा प्रवास करीत आलो असल्याचा उल्लेख केला तसेच एसटी प्रवासातल्या वाहक चालकांच्या आठवणी सांगितल्या. आधुनिक काळाशी जोडून घेण्याची गरज असून एसटीचा कारभार सर्वांपर्यंत पोहचेल याची जबाबदारी मी घेईल असेही ते म्हणाले.

यावेळी हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या लोगोचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एक मिनिट स्वच्छतेसाठी … एक मिनिट महाराष्ट्रासाठी या दृकश्राव्य संदेशाचे तसेच एसटीच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या लघुपटाचे प्रसारण करण्यात आले.

या कार्यक्रमास परिवहन व बंदरे प्रधान सचिव पराग जैन, राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आकांक्षा रंजनच्या ‘इक्का’ची झलक; कोर्टरूम थ्रिलरमध्ये दिसणार नव्या अंदाजात

मुंबई | अभिनेत्री आकांक्षा रंजन आपल्या प्रत्येक नव्या भूमिकेत वेगळेपणा...

‘मसाला किंग’ धनंजय दातार यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला शाहरुख खान, सोनू निगम यांची उपस्थिती

मुंबई | प्रतिनिधी 'मसाला किंग' म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती धनंजय...

युवा महिला कुस्तीपटूंना आलिया भट्टची भेट

ऐल्फा  च्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्टने पुण्यातील जोग महाराज व्यायामशाळेला...

लॉरिट्झ नुडसेनने 50 GW सौर क्षमता सक्षम असल्याचे सिद्ध केले.

जागतिक स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये आपल्या भूमिकेचे केले समर्थन युटिलिटी स्केल सोलर फार्म्सपासून घरांना प्रकाश देणाऱ्या रूफटॉप सिस्टीम्सपर्यंत लॉरिट्झ नूडसेन सौर घटक उत्पादन संयंत्रांना केटरिंगसह, ऊर्जा पायाभूत सुविधांसाठी आपला सात दशकांचा वारसा - स्वच्छ ऊर्जेचा लाभ बाजारपेठेतील समुदायांपर्यंत पोहोचविण्यास मदत करत आहे मुंबई, : आपल्या इलेक्ट्रिकल आणि डिजिटल तंत्रज्ञानाने संपूर्ण भारत आणि जागतिक बाजारपेठेत 50 GW पेक्षा जास्त सौरऊर्जेची क्षमता निर्माण केल्याचे भारतातील इलेक्ट्रिकल आणि ऑटोमेशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या लॉरिट्झ नूडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनने आज जाहीर केले आहे. केवळ सौरऊर्जा क्षमता निर्मिती नाही तर त्या पलीकडे जाऊन अर्थपूर्ण, व्यापक उपलब्धता, कारखाने, शेत, घरे आणि सेवा उपलब्ध न होणाऱ्या समुदायांपर्यंत पोहोचणे, राष्ट्रीय ऊर्जा संक्रमणाच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक विस्ताराला समर्थन देण्यासाठी सौर ऊर्जा सक्षम करण्यावर हा महत्त्वाचा टप्पा स्पष्टरित्या लक्ष केंद्रित करतो. भारताचा सौर प्रवास आता मोठ्या युटिलिटी पार्कपुरता मर्यादित राहिलेला नाही. पीएम-कुसूमद्वारे सिंचनाची उर्जा, पीएम सूर्य घर अंतर्गत कुटुंबांना सक्षम करणे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत - पारंपारिक ग्रीडच्या आवाक्याबाहेरील समाजापर्यंत खात्रीशीर वीज पर्याय उपलब्ध करून देणे, हे देखील दिसत आहे. हे परिवर्तन अत्यंत वेगाने झाले आहे. भारताने सातत्याने सौर ऊर्जा क्षमतेत वाढ केली असून, सध्या स्थापित अक्षय्य ऊर्जा क्षमतेमध्ये सौर ऊर्जेचा वाटा जवळपास ५५% इतका आहे आणि ही क्षमता 154 गिगावॅटच्या पुढे गेली आहे. दोन समांतर मार्गांनी हा विस्तार होतो आहे: एक म्हणजे मोठ्या प्रमाणावरील युटिलिटी प्रकल्प, जे ग्रीडची क्षमता वाढवून जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करतात; आणि दुसरे म्हणजे डिस्ट्रिब्युटेड प्रकल्प, ज्यांचा थेट आर्थिक आणि सामाजिक प्रभाव पडतो. लॉरिट्झ नुडसेन ही कंपनी युटिलिटी-स्केल पॉवर प्लांट्स, कमर्शियल अँड इंडस्ट्रिज आणि निवासी क्षेत्र अशा तीन विभागांमध्ये कार्यरत आहे. प्रगत AC सोल्युशन्स, DC स्विचगिअर, स्मार्ट मीटरिंग आणि क्लाउड-आधारित रिमोट मॉनिटरिंग सोल्युशन्स कंपनी पुरवते, ज्यामुळे सौर ऊर्जा यंत्रणा सुरक्षित, विश्वसनीय आणि दीर्घकालीन कामगिरीसाठी सक्षम राहतात.या क्षमतेचा पाया भारतातील विद्युत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात असलेल्या सात दशकांहून अधिक काळातील अनुभवावर आधारलेला आहे. कंपनीने 2,350 हून अधिक सौर ऊर्जा प्रकल्पांना सहकार्य केले आहे, 350 हून अधिक EPC कंपन्या व 300 ​​हून अधिक डेव्हलपर्ससोबत भागीदारी केली आहे, तर 300 हून अधिक सिस्टम इंटिग्रेटर्सना प्रशिक्षण दिले आहे; अशा प्रकारे या क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असलेली स्थानिक क्षमता निर्माण केली आहे. लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नरेश कुमार म्हणाले: “जेव्हा एखादा शेतकरी डिझेलवर आधारित सिंचनाचा वापर सोडून देतो किंवा एखाद्या कुटुंबाला विजेचा खात्रीशीर पुरवठा मिळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ऊर्जा संक्रमण सुरू होते. 50 गिगावॅटच्या टप्प्याचे महत्त्व केवळ त्याच्या विस्तारामध्येच नाही, तर त्याचे फायदे किती व्यापकपणे जाणवतात यातही आहे. सौर पायाभूत सुविधा विश्वसनीय, सहज उपलब्ध आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सेवेसाठी तयार केल्या जातील, हे सुनिश्चित करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.” भारताची सौर परिसंस्था जसजशी विस्तारली आहे, तसतशी तिची तांत्रिक गुंतागुंतही वाढली आहे. उच्च क्षमता, बदलती ग्रिड गतिशीलता आणि विकेंद्रित वीज निर्मिती मॉडेलच्या वाढीमुळे अधिक प्रगत, विशिष्ट वापरासाठीच्या विद्युत उपायांची गरज वाढत आहे. वीज निर्मितीपासून ते वहन आणि ग्रीडमधील एकत्रीकरणापर्यंतच्या संपूर्ण सौर मूल्य साखळीला लॉरिट्झ नुडसेन समर्थन देते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये हा बदल दिसून येतो, ज्यात मध्यम-व्होल्टेज सोल्यूशन्स, एसी आणि डीसी स्विचगियर सोल्यूशन्स, सॉफ्टवेअर आणि सेवांसह नवीकरणीय ऊर्जेशी संबंधित उत्पादनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नवीकरणीय ऊर्जेतील ही वाढ देशांतर्गत उत्पादनाचे प्रमाण देखील वाढवते आहे. आर्थिक वर्ष 2025 ते 2026 या काळात भारताच्या सौर उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ झाली, ज्यामुळे देशाचे आत्मनिर्भरत्व अधिक मजबूत झाले. गरजांनुसार तयार केलेल्या मजबूत, भविष्यासाठी सज्ज विद्युत प्रणालींनी उत्पादन सुविधा सुसज्ज करून लॉरिट्झ नुडसेनने या उत्क्रांतीला पाठिंबा दिला आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट जीवाश्म-इंधन-विरहित क्षमतेचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, आता संक्रमणाच्या प्रमाणावरून गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जेणेकरून ऊर्जेची उपलब्धता केवळ विस्तारितच नव्हे, तर तिचे समान वितरणही सुनिश्चित होईल. या प्रवासात लॉरिट्झ नुडसेनची भूमिका त्यांच्या मूळ उद्देशाशी ठामपणे जोडलेली आहे: अशी एक विद्युत पायाभूत रचना उभारणे, ज्यामुळे सौर ऊर्जा विश्वसनीय आणि सहज विस्तारण्यायोग्य बनेल, तसेच भारताच्या विकासाच्या प्रवासातील प्रत्येक स्तरावर ती सुलभतेने उपलब्ध होईल.