नवी दिल्ली-केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यासह तृणमुल काॅंग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चा राष्ट्रीय दर्जा रद्द झाला आहे. या तीनही पक्षांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे.तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने या तिन्ही पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाबाबत आढावा घेतला होता त्यानंतर या पक्षाला दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात आणला. तर राष्ट्रवादीचा मुळ पाया हा महाराष्ट्रात असून काही राज्यात त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय आहेत अटी?
- तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने 2 टक्के जागा जिंकल्या पाहिजे.
- लोकसभेच्या चार जागांच्या व्यतिरिक्त एखाद्या पक्षाला लोकसभेतील किमान सहा टक्के किंवा विधानसभा निवडणुकीत चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये मिळालेल्या मतांपैकी किमान 6 टक्के मते मिळणे आवश्यक आहे.
- चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी. या अटीच्या आधारे 2019 मध्ये NPP ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. आता गुजरातच्या निकालानंतर आम आदमी पार्टीही ही अट पूर्ण करेल असा अंदाज आहे.
- यापैकी एकही अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो.
सध्या किती आहेत राष्ट्रीय पक्ष?
भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, NPP हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला 2019 मध्ये राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली.
‘आप’ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
दिल्लीच्या राजकारणातून उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाला गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. गुजरातमध्ये ‘आप’ने 5 जागा जिंकल्या होत्या. सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाला एकूण मतांपैकी 6.8 टक्के मते मिळाली आहेत. येथे आपचे 2 उमेदवार विजयी झाले होते. ऑगस्ट महिन्यातच निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार ‘आप’ गोव्यातही मान्यताप्राप्त पक्ष बनला होता.
राष्ट्रवादी काॅंग्रेसची 1999 ला स्थापना
शरद पवार यांच्या नेतृत्वात 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन झाली. सोनिया गांधी यांचा भारतीय राजकारणात प्रवेश झाल्यानंतर विदेशी जन्माचा मुद्दा समोर करून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची स्थापन करून वेगळी चूल मांडली. त्यावेळी त्यांच्यासोबत पी. ए. संगमा आणि तारेक अन्वर यांनीही काॅंग्रेस सोडून शरद पवारांना साथ दिली होती.