पुणे-शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनतर्फे यंदाचा शिवसह्याद्री गौरव पुरस्काराने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेस ,वाचन संस्कृती चळवळीसाठी योगदान देणारे ज्ञान कि लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे , प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांना भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . यामध्ये भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड , प्रदीप लोखंडे यांची कन्या युगांतीं प्रदीप लोखंडे व वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आला . भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल कैलास जाधव , सुनील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला . यावेळी दीड कोटी रुपयांचे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले .
बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमास शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे , शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविणदादा गायकवाड , लागीर झालं जी या मालिकेतील मराठी अभिनेता निखिल चव्हाण , व्यंकटराव गायकवाड , अंकुश आसबे , सुनील कुशीरे , शांताराम कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , आजच्या काळात नोकऱ्या करण्याचे दिवस संपले असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून युवकांनी पुढे गेलॆ पाहिजे . त्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे . तरुणांनी कोठून आलो आहोत , कुठे आहोत , कुठे जायचे हे कधीही विसरू नये , भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत आणि बेभान होऊन त्या वापरल्या पाहिजेत . भारती विद्यापीठ सुरु करताना आम्हालां अनेक अडचणींचा सामना करावा लागला , परंतु आम्ही डगमगलो नाही , यश अपयश पचवून उभे राहिलो , त्यामुळे भारती विद्यापीठाने दिल्लीमध्ये आपली शिक्षण संस्था उभारू शकली . राजेंद्र कोंढरे हे देखील जिद्दीने अनेक सामाजिक संस्थांमध्ये कौतुकास्पद कार्य करीत आहे .
यावेळी वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांनी सांगितले कि ,आपल्याकडे २० टक्के नागरिक भारतात राहतात तर ८० टक्के नागरिक इंडियात राहतात . हा देश मूठभर लोकांच्या हातात चालला आहे . आजच्या तरुणाला लगेच राजकीय आखाड्यात उतरण्याचे वेध लागतात . त्यामुळे आपल्याकडे आय ए एस अधिकारी दिसून येत नाही , पंतगराव कदम व हणमंतराव गायकवाड यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीत देखील आपले विश्व् निर्माण केले . आज कार्पोरेट कंपन्यांमध्ये व सरकारी खात्यामध्ये आपल्या युवकांना नोकऱ्या नाहीत . त्यामुळे येथील युवकांनी करायचे काय ? त्यामुळे युवकांनी नुसत्या राजकारणापेक्षा एखाद्या उद्योगात आपण काय करू शकतो का ? हे पाहिले पाहिजे . शिक्षणाशिवाय तुम्ही कोणत्याही आरक्षणाशिवाय जीवनात पुढे जाऊ शकता .
यावेळी भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले कि , लढाई हि प्रत्येकाच्या आयुष्यात आहे . फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे . त्यामुळे आयुष्यात वेगळे करून दाखवा , तुमचा आत्मविश्वास प्रबळ असला पाहिजे . नवनवीनकल्पना आपल्या व्यवसायात राबवा , त्याच तुम्हाला पुढे नेऊ शकतील . काम करीत असताना तुमच्या बरोबरच्या लोकांना मोठे करा तेंव्हा भारत देश हा मोठा होणार आहे . आपण आज प्रतिकूल परिस्थितीमधूनच पुढे आलो आहे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले तर सूत्रसंचालन अभिषेक मोहोळ यांनी केले तर आभार नितीन साळुंके यांनी मानले .