Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

” शिवसह्याद्री गौरव पुरस्कार ” ने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) संस्था , ज्ञान कि लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे, प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे सन्मानित

Date:

पुणे-शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनतर्फे यंदाचा शिवसह्याद्री गौरव पुरस्काराने भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेस  ,वाचन संस्कृती चळवळीसाठी योगदान देणारे ज्ञान कि लायब्ररी प्रकल्पाचे संस्थापक प्रदीप लोखंडे , प्रसिध्द वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांना भारती  विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . यामध्ये भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड , प्रदीप लोखंडे यांची कन्या युगांतीं प्रदीप लोखंडे व  वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देण्यात आला . भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल कैलास जाधव , सुनील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला . यावेळी दीड कोटी रुपयांचे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले .

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये झालेल्या या कार्यक्रमास शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे , शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविणदादा गायकवाड , लागीर झालं जी या मालिकेतील मराठी अभिनेता निखिल चव्हाण ,  व्यंकटराव गायकवाड , अंकुश आसबे , सुनील कुशीरे , शांताराम कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी भारती  विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि , आजच्या काळात नोकऱ्या करण्याचे दिवस संपले असून नवनवीन तंत्रज्ञान वापरून युवकांनी पुढे गेलॆ पाहिजे . त्यासाठी नियोजन असणे आवश्यक आहे . तरुणांनी कोठून आलो आहोत , कुठे आहोत , कुठे जायचे हे कधीही विसरू नये , भान ठेवून योजना आखल्या पाहिजेत आणि बेभान होऊन त्या वापरल्या पाहिजेत . भारती विद्यापीठ सुरु करताना आम्हालां अनेक अडचणींचा सामना करावा लागला , परंतु आम्ही डगमगलो नाही , यश अपयश पचवून उभे राहिलो , त्यामुळे भारती विद्यापीठाने दिल्लीमध्ये आपली शिक्षण संस्था उभारू शकली . राजेंद्र कोंढरे हे देखील जिद्दीने अनेक सामाजिक संस्थांमध्ये कौतुकास्पद कार्य करीत आहे .

यावेळी  वात्रटिकाकार व माजी आमदार रामदास फुटाणे  यांनी सांगितले कि ,आपल्याकडे  २० टक्के नागरिक भारतात राहतात तर ८० टक्के नागरिक इंडियात राहतात . हा देश मूठभर लोकांच्या हातात चालला आहे . आजच्या तरुणाला लगेच राजकीय आखाड्यात उतरण्याचे वेध लागतात . त्यामुळे आपल्याकडे आय ए एस अधिकारी दिसून येत नाही , पंतगराव कदम व हणमंतराव गायकवाड यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीत देखील आपले विश्व् निर्माण केले . आज कार्पोरेट कंपन्यांमध्ये व सरकारी खात्यामध्ये आपल्या युवकांना नोकऱ्या नाहीत . त्यामुळे येथील युवकांनी करायचे काय ? त्यामुळे युवकांनी नुसत्या राजकारणापेक्षा एखाद्या उद्योगात आपण काय करू शकतो का ? हे पाहिले पाहिजे . शिक्षणाशिवाय तुम्ही कोणत्याही आरक्षणाशिवाय जीवनात पुढे जाऊ शकता  .

यावेळी  भारत विकास ग्रुप (बी. व्ही . जी.) या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले कि , लढाई हि प्रत्येकाच्या आयुष्यात आहे . फक्त त्याचे स्वरूप वेगळे आहे . त्यामुळे आयुष्यात वेगळे करून दाखवा , तुमचा आत्मविश्वास प्रबळ असला पाहिजे . नवनवीनकल्पना आपल्या व्यवसायात राबवा , त्याच तुम्हाला पुढे नेऊ शकतील . काम करीत असताना तुमच्या बरोबरच्या लोकांना मोठे करा तेंव्हा भारत देश हा मोठा होणार आहे . आपण आज प्रतिकूल परिस्थितीमधूनच पुढे आलो आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत शिवसह्याद्री चॅरिटीबेल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले तर सूत्रसंचालन अभिषेक मोहोळ यांनी केले तर आभार नितीन साळुंके यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....