पुणे-दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन हे मानवमुक्तीचे संमेलन आहे . अलीकडच्या काळात समाजक्रांतीकारकांना जातवार विभागून घेण्याची पध्दत पडू लागली आहे . त्याला हे संम्मेलन अपवाद आहे . असे मत दलित युवक आंदोलन आयोजित दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ लेखिका विचारवंत डॉ गेल ऑमवेट यांनी मांडले .
सदाशिव पेठमध्ये उद्यानप्रसाद कार्यालयात दलित युवक आंदोलन आयोजित दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनात ते अध्यक्षस्थानी बोलत होते . यावेळी संमेलनाचे उदघाटन संविधानाचे पूजन नामवंत लेखिका पत्रकार प्रतिमा जोशी यांच्याहस्ते करण्यात आले . तसेच जातिव्यवस्थेची गुलामगिरीची साखळी तोडून संमेलनाचे उदघाटन केले .
दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ लेखिका विचारवंत डॉ गेल ऑमवेट यांनी सांगितले कि , आजचे साहित्य दोन प्रकारचे आहे . एक प्रकार सरळ सरळ प्रस्थापित साहित्याचा आहे . दुसरा प्रकार जग बदलण्याची स्वप्ने पाहणारा , जग बदलण्यासाठी चाललेल्या अनेक जणांच्या जीवनातल्या सुख दुःखाचा , नवनिर्मितीच्या सुंदरतेचा बाबतीत साहित्य निर्माण करणारा आहे . आजच्या काळात हा दुसरा प्रवाह निराशावादी पध्दतीने लिहिताना दिसतो . दुखातहि काही सुख मिळवली जाऊ शकतात . आनंदाचे प्रसंग असतात . दुःख संपविण्याची जिद्द असते . नवे जीवन मिळविण्याचा संघर्ष असतो . या सर्व जीवनाविषयी साहित्य आले पाहिजे . शोषित जनतेची नवनिर्माणाची आस कायम जिवंत असते , ती आली पाहिजे . साहित्यासाठी आजचा काळ कठीण आहे . या काळाला सामोरे गेले पाहिजे . स्वातंत्र्य , समता , मैत्री , करुणा यांच्या पायावर स्वयंप्रकाशित होऊन ठाम उभे राहिले पाहिजे . अंधारलेल्या काळात अंधाराची कविताही लिहिली जाऊ शकते . पण त्याबरोबर नव्या पहाटेची सुध्दा कविता लिहिली पाहिजे . नव्या युगाचे साहित्य लिहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
या दुसरे मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाचे प्रास्तविक दलित युवक आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी केले तर स्वागतध्यक्ष शशिकांत घोडे यांनी सर्वांचे स्वागत केले . संमेलनास अन्य मान्यवर उपस्थित होते .