पुणे-कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या सन १९६५ – ६६ / ६७ मधील बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला . वानवडीमधील केदारी गार्डनमध्ये झालेल्या या मेळाव्यास निवृत्त शिक्षिका डॉ. सुनीलिनी सत्तूर , का. बा. पारखी , के . बी . बुलबुले , चंद्रकला सुबंध पतंगे , शाळेच्या मुख्याध्यापिका मुळगावकर ,शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी पुलवामा मधील शहीद जवानांसाठी व स्वर्गीय माजी विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . त्यानंतर सुमारे ५३ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने माजी विद्यार्थ्यांनी आपली माहिती देउन आपल्या स्वतःची ओळख करून दिली . यावेळी शाळेमधील निवृत्त शिक्षकांचा शाल ,श्रीफळ देउन सन्मानित करण्यात आले . यावेळी शालेय जीवनातील आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला . यावेळी शाळेतील जुने मित्र पुन्हा भेटल्याने शाळेत आल्याचा भास सर्वाना वाटला . त्यानंतर सर्वानी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला .यावेळी सर्व विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले . त्यानंतर सर्वानी ग्रुप फोटो काढला . त्यानंतर पुन्हा एकदा सर्वानी भेटण्याचा मनोदय व्यक्त केला .
कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे सेवा व त्याग या ब्रीदवाक्यामुळे आपल्या जीवनात संकटाना सामोरे जाऊन आपण सर्वानी आपले जीवन घडविले . त्यासाठी पोलीस खात्यामध्ये माझी सेवा मी समर्प्रित केली , असे मनोगत शाळेचे माजी विद्यार्थी असलेले निवृत्त इन्स्पेक्टर जनरल एस. एम. सय्यद यांनी सांगितले .
या मेळाव्याच्या संयोजन निवृत्त इन्स्पेक्टर जनरल एस. एम. सय्यद , केदारी गार्डनचे संचालक उत्तमराव केदारी , प्रमोद भांबुरे , चंद्रकांत काळे , वसंत सावंत , दिलीप वाघ , मनोहर पालरेषा व अशोक हिरवे आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले .