Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुल्ये जपणारी पिढीच संपूर्ण जग बदलू शकते मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Date:

पुणे : “ नैतिक मूल्यांशिवाय असणारे शिक्षण हे केवळ माहिती असते, पण मूल्यांना धरून शिकविले जाणारे शिक्षण हे ज्ञान बनते. त्याचमूळे केवळ मुल्ये जपणारी पिढीच संपूर्ण जग बदलू शकते. ” असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटी’ (एमआयटीडब्ल्यूपीयू) च्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड उपस्थित होते.
यावेळी डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, साधू वासवानी मिशनचे दादा जे. पी. वासवानी, कुलगुरू डॉ. जय गोरे, नालंदा विश्‍वविद्यालयाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर, पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, तालमणी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर, नानिक रुपानी, डॉ. अरूण निगवेकर, राजु मंथना, श्रीकांत भारतीय, रोशनलाल रैना, हरिभाई शहा, माईर्स एमआयटीचे कुलसचिव नाना कुलकर्णी, एमआयटी चे अध्यक्ष डॉ. सुरेश घैसास, माईर्स एमआयटी चे सचिव डॉ.मंगेश तु.कराड, माईर्स एमआयटीचे विश्‍वस्त प्रा, प्रकाश जोशी, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, डॉ. चंद्रकांत पांडव, डॉ. सुचित्रा नांगरे – कराड, सौ. ज्योती कराड – ढाकणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ माणसाला भावना असतात तशा त्या यंत्राना असत नाहीत आणि त्याचमुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो. माणूस हा नेहमीच स्वत:च्या आस्तित्वाचा शोध घेत असतो. अशा विद्यापीठांमुळे नक्कीच हा शोध सुखावह ठरेल. तसेच हे विश्‍वशांतीचा ध्यास असणारे विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात असल्याचा मला अभिमान आहे. ”
“ आज आपण मोबाईल, संगणक आदी तंत्रज्ञानाचा चांगला आणि वाईटही वापर करतो. मात्र ज्याला नैतिक अधिष्ठान आहे, नैतिक मूल्यांची बैठक ज्या व्यक्तीस आहे. ती व्यक्ती नक्कीच त्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि चांगलाच वापर करेल. आज आपण अशांती, हिंसा, भ्रष्टाचाररुपी अंधारात चाचपडत असताना मूल्यरूपी प्रकाशच आपल्याला त्यातून बाहेर काढू शकतो.”
डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, “ आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला विश्‍वशांतीचा संदेश देण्यात हे विद्यापीठ अग्रेसर असेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान अणि विश्‍वशांतीचा समन्वय साधणार आहोत. ”
डॉ. विजय भटकर म्हणाले, “ या विद्यापीठाच्या निमित्ताने संपूर्ण भारताला एक असे विद्यापीठ मिळाले आहे, जेथून आदर्श नागरिक बाहेर पडतील. जो विद्यार्थी विज्ञान व तंत्रज्ञानासोबतच शांतीचा, विश्‍वशांतीचा संदेश समाजाला देण्यासाठी सज्ज असेल. विशेषकरून जेव्हा एखादे विद्यापीठच असा संदेश देत असेल, तेव्हा नक्कीच समाजातही याच स्वरूपाचा आदर्श उभा राहील.”
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “ विज्ञान व तंत्रज्ञानावर भर देणारी अनेक विद्यापीठे आज जगात पाहावयास मिळतात. पण, विश्‍वशांतीचा व्यापक संदेश देणारे हे एकमेव विद्यापीठ संपूर्ण जगात असेल. आज ज्या काही समस्या समाजासमोर आहेत, त्यातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच हे विद्यापीठ महत्वपूर्ण भूमिका बजावेल.”
साधू वासवानी म्हणाले, “ राजकारणामुळे कधीच आपला देश बदलला जाणार नाही. हा समाज आपल्यालाच बदलायचा आहे. यासाठी सर्वांना एकच करावे लागेल, ते म्हणजे आपल्याला आपल्या हृदयाची दारे उघडावी लागतील. तरच आपण समाजात शांती प्रस्थापित करू शकतो. ”
प्रास्ताविकात प्रा. राहुल कराड म्हणाले, “ एमआयटी हा एक मैलाचा दगड आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून शिक्षण देणाच्या कार्याची सुरूवात येथूनच झाली. येथे विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले जातात. त्यातून शारिरीक आणि मानसिक आरोग्य विकसीत होते. त्यामूळे स्टार्ट अप इंडिया आणि डिजीटल इंडियासाठी हे एक केंद्र ठरेल. ”
मायकेल नोबेल म्हणाले, “ खरे तर आज संपूर्ण जगातून शांती जणू हरवली आहे. आज त्याच शांतीच्या शोधाची गरज आहे. ती हरवलेली शांती पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी हे विद्यापीठ नक्कीच महत्वपूर्ण ठरेल. कारण जर जगात शांतीच नसेल तर आपण सगळे जगूच शकणार नाही. ”
यावेळी नानिक रुपानी व डॉ. जय गोरे यांनीही विद्यापीठासंबंधीचे आपले विचार मांडले.
सूत्रसंचालन प्रा. गौतम बापट यांनी केले. प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका निवडणुकीचा बिगुल सोमवार नंतर …

मुंबई- राज्यातील २९ महापालिकेत प्रशासक राज आहे. मात्र,...

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...