Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महापालिकेच्या विभाजनाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील- चंद्रकांत पाटील

Date:

पुणे-दोन महापालिकेच्या प्रस्तावाच्या बाबत अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री हेच करणार आहेत .आम्ही १५ जानेवारीला या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागत आहोत .३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही एशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे.त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे. आणि म्हणून दोन महानगरपालिका केले पाहिजे आणि हे आम्ही मुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहोत असे आज येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सुशासन दिनानिमित्त सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला.यावेळी त्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांचा सन्मान केला आणि त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली.यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केले.स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो. पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात. उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून, मेट्रोने प्रवास देखील करत आहोत.६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरु आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकार तर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणे शहरात दोन महापालिकेच्या प्रस्तावाच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की ,याच अंतिम निर्णय हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे करणार आहे.देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहराच्या सर्वच प्रश्न माहीत आहे.पण आम्ही १५ जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागत आहोत आणि याच्या एका आठवड्याच्या आधी पुण्याचे प्रश्न त्यांना देणार आहोत.३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही एशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे.त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे. आणि म्हणून दोन महानगरपालिका केले पाहिजे आणि हे आम्ही मुख्यमंत्री यांच्या समोर मांडणार आहोत असे यावेळी पाटील म्हणाले.

यावेळी पाटील यांना पुरंदर विमानतळ येथील प्रश्नाच्या बाबत विचारलं असता ते म्हणाले की, पुरंदर विमानतळाच परवानग्या सगळ्या झाल्या असून जमीन भूसंपादन बाबत गती पकडावी लागणार आहे आणि याला २ ते ३ वर्ष हे लागणार आहे.

पुण्याचे पालकमंत्री पदाच्या बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, या विषयात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय करतात.तसेच त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील.तसेच आमच्या पालकमंत्री पदाच्या बाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला असल्याचं यावेळी पाटील म्हणाले.विधानसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की , पक्ष प्रदेशाध्यक्ष बदलणे, न बदलणे हा केंद्राचा विषय आहे.पण साधारणतः दर तीन वर्षांनी आमची सगळी कार्यकारणी ही बदलत असते आणि ही लोकशाही प्रक्रिया आता आमच्याकडे सुरू आहे. पक्ष सदस्यता मग, सक्रिय सदस्यता आणि लोकशाही मार्गाने सर्व स्तरावर निवडणुका होत होत ही प्रक्रिया चालत असते असे यावेळी पाटील म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सव आता महाराष्ट्र महोत्सव:पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज...

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १० : पुणे-नाशिक...

‘बालभारती’ची नवीन सुसज्ज इमारत लवकरच:शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि.१० : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे...

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.१०- पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण,...