Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

उद्धव ठाकरेंना आताच CM चेहरा घोषित करा:आपच्या बड्या नेत्याची मागणी

Date:

भाजपचा पराभव हेच आम आदमी पार्टीचे एकमेव उद्दीष्ट

मुंबई- हरियाणा विधानसभा निवडणुकीतील निकालाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर महाविकास आघाडीने आत्ताच उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे बडे नेते संजय सिंह यांनी केली आहे. संजय सिंह यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मागणी केली आहे. त्यावर मविआतील इतर पक्ष काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आपसातील मतभेद विसरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात रान पेटवत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय सिंह यांनी मंगळवारी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या मुद्याला हात घातला आहे.
संजय सिंह म्हणाले, महाविकास आघाडीने आत्ताच आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव घोषित करावे. त्यांनी या प्रकरणी विलंब केला तर त्यांचेच नुकसान होईल. हरियाणात तेच झाले होते. तिथे काँग्रेसमधील गटांनी एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न केला त्यात काँग्रेसचे जबर नुकसान झाले. त्यामुळे मविआने कुणाचे आमदार जास्त येतील, या भानगडीत पडू नये. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस व मराठी स्वाभिमान या दोन्ही गोष्टी त्यांच्यासोबत जोडल्या जातात. त्यामुळे त्यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तर महाविकास आघाडीचा मोठा फायदा होईल असे मला वाटते.
भाजपचा पराभव हेच आम आदमी पार्टीचे एकमेव उद्दीष्ट आहे. त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीत जागा मिळूनही त्या घेतल्या नाही, असेही संजय सिंह यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महायुतीसोबत वाद सुरू आहे. कारण, त्यांनी त्यांच्या मुलाला हवी ती जागा सोडली नाही. त्यामुळे राज ठाकरे भाजपचे समर्थन करत असतील असे मला वाटत नाही. ते वेगवेगळी भूमिका घेत आहेत. मनसेमुळे मविआची काही मते कमी होतील, पण उद्धव ठाकरे यांच्या नावाची महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली तर मतांची हे विभाजन टाळता येईल, असे संजय सिंह म्हणाले.
भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केल्याची टीकाही संजय सिंह यांनी यावेळी केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण सर्वांनी पाहिले. भाजपने महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील अनेक योजना व प्रकल्प गुजरातला नेल्या. एका राज्याच्या विकासासाठी दुसऱ्या राज्याचे नुकसान करणे योग्य नाही. आतापर्यंत आपण दुचाकीचोर व इतर चोर पाहिले. पण भाजपने अख्खे पक्षच चोरले.
एवढेच नाही तर त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीसोबत संबंध असलेल्यांना आपल्यासोबत घेतले. त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्या गोटात वळवले हे ही सर्वश्रूत आहे.

संजय सिंह यांनी यावेळी भाजपच्या एक है तो सेफ हैच्या घोषणेचाही समाचार घेतला. पंतप्रधान 10 वर्षांनंतर एक है तो सेफ हैचा नारा देत आहेत. एकाअर्थाने ते हिंदू समाजाला घाबरवत आहेत. त्यांना अशी भाषा शोभा देते का? तुम्ही हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तु्म्ही आपल्या पदाचा राजीनामा द्या. बटेंगे तो कटेंगे हा काय नारा आहे का? एकजूट राहिलो नाही तर संविधान संकटात येईल, आरक्षण संपुष्टात येईल. त्यामुळे एकजूट राहा आणि भाजपचे काम तमाम करा, असे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...