पुणे- पुण्याच्या निसर्ग संपदेची ..सोंदर्य खाण ऐतिहासिक पाण्याची मुबलकता अशी विशेषणे ज्या दक्षिण पुण्याला लावली जातात त्या दक्षिण पुण्याला लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी कायम फसवत ठेवून बकाल बनवले असा आरोप करत आज येथील सामाजिक कार्यकर्ते नमेश बाबर यांनी पुन्हा आपले उपोषण आंदोलन सुरु केले. दक्षिण पुण्यातल्या वाढत्या समस्यांवर मला वारंवार आंदोलन करावे लागते , माझ्यावर वारंवार सरकारी कामात अडथळे आणल्याचे गुन्हे दाखल करतात मग दक्षिण पुण्याला बकाल करणारे आणि वारंवार फसवी आश्वासने देणाऱ्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत असा सवाल बाबर यांनी केला आहे.
एकेकाळी मुबलक पाण्याचे सौख्य लाभलेले आणि मुबलक निसर्ग संपदा लाभलेले पुण्याचे दक्षिण द्वार आज बकाल कोणी बनवले आहे, इथली वाहतूक कोंडी, जीवघेणे अपघात ,पिण्याच्या पाण्याची हि कमतरता, वाढती बेरोजगारी , तरुणाइमध्ये वाढलेली नैराश्याची भावना आणि वाढत चाललेली गुन्हेगारी याला जबाबदार कोण आहे? असा सवाल यानिमित्ताने त्यांनी केला आहे.
कात्रज मधून जाणाऱ्या उड्डाणपुलांच्या बाबत काही मागण्या नोंदवीत त्यांनी आता उपोषणाचे हत्यार पुन्हा एकदा उपसले आहे.