पुणे (दि १८जुन) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यनगरीत कसबा विधानसभा मतदारसंघात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखींचा मुक्काम ३० जून आणि १ जुलै २०२४ रोजी असणार आहे. या दोन्ही दिवशी विश्रामबाग आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी मुक्कामास असतात. या वारकऱ्यांना आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुणे महानगरपालिका जनरल सहायक आयुक्त रविंद्र बिनवडे यांना निवेदन दिले.
पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कसबा विधानसभा मतदारसंघात आवश्यक पायाभूत सोयी-सुविधा, पाणी पुरवठा, दिवसभर वैद्यकीय सुविधा, फिरते शौचालय आणि मंडप व्यवस्था विविध भागांमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी हेमंत रासने यांनी केली आहे.
यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, “पालखी सोहळा हा सर्वांसाठी आनंद देणारा आहे. दरवर्षी लाखो वारकरी पायी वारी करून पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. यानिमित्ताने पुण्यनगरीत येणाऱ्या वारकरी संप्रदायासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत. याचबरोबर वारकऱ्यांना पाणी पुरवठा, वैद्यकीय सहाय्यता, फिरते शौचालय आणि आवश्यक मंडप व्यवस्था मिळवून देण्यासाठी आज आम्ही पुणे महानगरपालिका जनरल सहायक आयुक्त रविंद्र बिनवडे आणि पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी निवेदन दिले आहे”.
यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, माजी नगरसेवक योगेश समेळ, राजेश येनपुरे,दिलीप काळोखे, तेजेंद्र कोंढरे,मनिषा लडकत, गायत्रीताई खडके, उदय लेले, राजू परदेशी, छगन बुलाखे, विष्णूआप्पा हरिहर, विजयालक्ष्मी हरिहर, अर्चना पाटील, सुनील खंडागळे तसेच कसबा मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, चंद्रकांत पोटे, उमेश चव्हाण, कसबा मतदारसंघाच्या महिलामोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार तसेच कसबा मतदारसंघातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.