पुणे : पंतप्रधान कार्यालयामध्ये राष्ट्रीय सल्लागार असल्याची बतावणी करीत एका व्यावसायिकाची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. केंद्र शासनाचे मोठे कंत्राट मिळवून देतो असे आमिष त्याला दाखवण्यात आले होते. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधी दरम्यान घडला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील प्रधानमंत्री कार्यालयात (पीएमओ) राष्ट्रीय सल्लागार पदावर काम करत असल्याचे भासवून शासकीय टेंडर मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका तरुणीने तब्बल ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी काश्मीरा संदीप पवार (वय-२९,रा.काेयना साेसायटी, सातारा) व गणेश गायकवाड (रा.सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे.
याबाबत गाेरख जगन्नाथ मरळ (वय-४९,रा.गवळीवाडा ,सहकारनगरपुणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पाेलीस ठाण्यात आराेपी तरुणी व तिचा सहकारी यांचेवर भादंवि कलम ४१९, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गाेरख मरळ व आराेपी काश्मिरा पवार यांची एका मध्यस्था मार्फेत ओळख झाली हाेती. त्यानंतर काश्मिरा हिने ती प्रधानमंत्री कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार पदावर काम करत असल्याचे सांगितले. शासकीय टेंडर मिळवून देण्याचे अमिष तिने तक्रारदार यांना दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच त्यांचा विश्वास आणखी बळकट करण्यासाठी तिने त्यांना पुण्यातील विधानभवन परिसरात भेटण्यासाठी बाेलवले. त्यांना सदर ठिकाणी भेटून तुम्हाला लवकरच शासकीय टेंडर मिळवून देणार असल्याचे सांगत, तक्रारदार यांच्या माेबाईलवर व्हाॅटसअपवर शासकीय टेंडरचे बनावट कागदपत्रे देखील पाठवून दिली. त्यानुसार टेंडर मिळाल्यावर त्यातून कमी काळात चांगल्याप्रकारे पैसे मिळतील असे सांगून काश्मीरा हिने त्यांच्याकडून टेंडर मिळण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगत त्यांना विश्वास दिला. त्यानुसार काश्मीरा हिने तिचा साथीदार गणेश गायकवाड याच्या मदतीने तक्रारदार यांच्याकडून वेळाेवेळी राेख व आरटीजीएसद्वारे ५० लाख रुपये घेतले.
परंतु पैसे मिळाल्यानंतर त्यांना काेणत्याही प्रकारचे टेंडर न देता तसेच पैसे परत न करता सदर रकमेचा स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी वापर करुन संबंधित रकमेची फसवणुक करण्यात अाली. ही बाब लक्षात आल्यावर तक्रारदार यांनी आराेपी विराेधात बंडगार्डन पाेलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आराेपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला ..