पुणे- पुण्यात आमदार ८,अपघातात मरण पावलेल्या कुटुंबावर आलेली वेळ अन्य कुणावर येऊ नये म्हणून भांडायला आला एकच धंगेकर अशी जाहिरातबाजी होत असताना दुसरीकडे,पोलिसांनी पैसे घेतले आणि एवढे पैसे घेतल्याशिवाय गुहेगाराला व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही, असे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आणि या प्रकरणी कलम 304 का लावण्यात आले नाही? असा आक्षेपही त्यांनी घेतला होता. यावर आता भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार पलटवार केला आहे.पोलिसांनी प्रथमपासून ३०४ कलम लावलेले आहे उगीच ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांना फटकारले आहे.
या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले असे सांगत या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना उत्तर दिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच ! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.’
https://x.com/DhangekarINC/status/1793180761379791002
धंगेकर यांनी काय म्हटले होते ते पहा ..
काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का…? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. २) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी – मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल.
त्यास प्रत्युत्तर दिले आहे आज मोहोळ यांनी ते काय ते पहा …
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच ! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.
https://x.com/mohol_murlidhar/status/1793201186742673766?s=46&t=Wygi9VA5IL9W_9JCFzDSiQ