संविधानाचा सर्वाधिक सन्मान पंतप्रधान मोदी यांनीच केला – अमर साबळे

Date:

पिंपरी, दि. 10 मे – लोकशाही धोक्यात आहे, मोदी राज्यघटना बदलणार, असा कांगावा करणाऱ्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांना आलेला राज्यघटनेचा पुळका म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’ आहे, अशी जोरदार टीका भाजपचे माजी खासदार अमर साबळे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीमध्ये वारंवार करण्यात येत असलेल्या आरोपांना साबळे यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तरे दिली तसेच विरोधकांवर पलटवारही केले. त्यावेळी भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर तसेच धनराज बिर्दा, संजय मंगोडेकर, मनोज तोरडमल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्या, निवडणुकीत पराभव करणाऱ्या काँग्रेसनेच राज्यघटनेत सर्वाधिक दुरुस्त्या करून राज्यघटनेची पायमल्ली केली आहे. काँग्रेसने राज्यघटनेच्या चौकटीस धोका निर्माण झाला होता, असा आरोपही साबळे यांनी केला.

साबळे म्हणाले की, संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी यांची लाट आहे. त्यामुळे विरोधकांची धाबे दणाणले आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे गोबेल्स नीतीचा वापर करून ते समाजात खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणताही आधार नसलेले, दिशाभूल करणारे खोडसाळ आरोप करणाऱ्यांचा मी जाहीर निषेध करतो.

डॉ. आंबेडकर व संविधान याविषयी विरोधकांना आलेला पुळका म्हणजे ‘पुतना मावशीचे प्रेम’च म्हणावे लागेल, अशी टिप्पणी साबळे यांनी केली. डॉ. आंबेडकर यांना दोनदा पराभूत करण्याचे पाप काँग्रेसने केले होते. संसदेत घटनेच्या शिल्पकाराचे साधे तैलचित्र लावण्याचे सौजन्य देखील कधी काँग्रेसने दाखवले नव्हते किंवा डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न देण्याचा यावेळी त्यांच्या मनाला शिवला नव्हता. भाजपच्या पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले व त्यांचे तैलचित्रही संसद भवनात समारंभपूर्वक लावण्यात आले, अशी माहिती साबळे यांनी दिली.

काँग्रेसने अनेक वेळा घटनादुरुस्त्या करून राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीची मोडतोड केली आहे, असा आरोप करून साबळे म्हणाले की, 42 व्या घटनादुरुस्तीने आणीबाणी लागू करण्याची तरतूद करण्यात आली. 43 व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत बदल करून धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्द घुसडण्यात आले. संविधान बदलण्याचे पाप काँग्रेसनेच केले आहे. संविधानाबद्दलचे त्यांचे प्रेम हे नाटकी आहे. त्यांच्या विषारी प्रचारापासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे.

पंतप्रधान मोदी यांनी संविधानाचा सर्वाधिक सन्मान केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हत्तीवर अंबारीत संविधान ठेवून त्याची मिरवणूक काढली होती. मोदी सरकारच्या पुढाकारानेच संविधान दिन देखील साजरा करण्यास सुरुवात झाली. केवळ डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे चहा विकणारा साधा माणूस आज देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. स्वतः राज्यघटनेचे लाभार्थी असल्यामुळे मोदी यांच्या मनात संविधानाविषयी नितांत श्रद्धा आहे. डॉ. आंबेडकर यांनी दुसरा जन्म घेतला तरी त्यांनाही राज्यघटना बदलणे शक्य नाही.

‘संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे, संविधान हेच आमच्यासाठी गीता, कुरण व बायबल आहे’, ‘मनुस्मृतीच्या नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर देशाचा कारभार चालेल’, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यांचा साबळे यांनी संदर्भ दिला. संविधानापुढे नतमस्तक होणारे मोदी कधीही संविधान बदलू शकत नाहीत. जगभरातून मान्यता व प्रेम मिळालेले पंतप्रधान पोटतिडकीने ही गोष्ट वारंवार सांगत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी काँग्रेसच्या भंपक अपप्रचारावर विश्वास ठेवणार का, असा सवाल साबळे यांनी केला.

भारताला हिंदुराष्ट्र बनवणे, ही भाजपची भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. आंबेडकर यांची वास्तव्य असलेल्या वास्तू आणि त्यांची कार्यालय तसेच त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांची ठिकाणे स्मारकांमध्ये रूपांतरीत करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकार करत आहे. आंबडवे हे बाबासाहेबांचे जन्मगाव खासदार असताना आपण दत्तक घेतले. त्या ठिकाणी देखील त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...

जीबीएसग्रस्त १२ गावांच्या ८९० कोटींच्या पाणीप्रकल्पासाठी ‘ईएसआयए’ अहवाल; डिलॉईटची सल्लागार म्हणून निवड

पुणे : जीबीएस (गिलियन-बॅरे सिंड्रोम) आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट...