:बारामती मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे-केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात विकास कामात समन्वय असावा लागतो. आज दुष्काळ असून सरकार काम करत आहे. महायुती घटक सोबत घेऊन एकत्रित काम करावयाचे आहे. ही निवडणूक मोदी विरोधात राहुल गांधी अशी आहे. काहीजण मुद्दाम कौटुंबिक गोष्टी पुढे आणत आहे. हलक्या कानाचे कोणी राहु नये तर बनाबनवी यास बळी न पडता विकास कामांना साथ द्या. बारामती मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवणार असून सर्व तालुक्यांना हक्काचे पाणी देणार आहे. त्यासाठी पैसा मोठा लागणार असून आपल्या विचाराचे सरकार असेल पाहिजे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार , आर पी आय अध्यक्ष रामदास आठवले, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर , माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, खासदार मेधा कुलकर्णी, माजी खासदार प्रदीप रावत ,मुरलीधर मोहोळ, दीपक मानकर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे , दत्ता भरणे, पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, उद्याची निवडणूक ही गावकीची नाही तर देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. जागतिक पातळीवर देश भक्कम करण्याचे काम नरेंद्र मोदी आक्रमकपणे करत आहे. अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आणत आहे. सुनेत्रा पवार यांची निवडणुकीत कमी वेळेत अधिक कामे करावे लागणार आहे. आम्ही आधी महायुती विरोधात लढत होतो पण एकत्र बसून चर्चा करून विरोध कमी केला आहे. नेत्यांचे आग्रहास पोषक वातावरण निर्माण झाले आहे आता मताधिक्य कसे वाढेल याचा प्रयत्न करावा. रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होतील पण मतदारांना आपल्याकडे वळवणे काम करावे लागणार आहे.प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकांनी मला वेगळ्या भूमिकेत आधी पहिले होते. अजित पवार आणि मी एकत्रित संसद काम 1991 मध्ये सुरू केले. एका वटवृक्ष छायेखाली आम्ही काम केले. मागील 30 ते 40 वर्षापासून बारामती मधील जनमानसाची कामे अजित पवार करत आहे. त्यांचा विकासकामात मोठा वाटा आहे. एका रात्रीत आम्ही निर्णय घेतला नाही. अनेकवेळा आमची भूमिका पुढे मागे होत होती त्यामुळे राज्यात संभ्रम निर्माण झाले. बदलत्या भूमिकेने पक्षाचे नुकसान झाले आहे.मोदी यांचे नेतृत्व देशाने आणि जगाने स्वीकारले आहे. विकासाचे वाटचाल प्रवाह सोबत जाणे महत्त्वाचे आहे.रामदास आठवलेंची शायरी-अजित पवारांनी गाठला आहे विकासाचा पल्ला..:..त्यामुळे शरद पवारांना देतो मोदींच्या सोबत येण्याचा सल्ला- रामदास आठवलेअजित पवार हे महायुती सोबत आले ज्या कारणामुळे ते कारण आहे सुप्रिया सुळे. अजित दादा आता नाही राहिले खुळे त्यामुळे हरणार आहे सुप्रिया सुळे. कोणी किती केला कल्ला, तरी सुनेत्रा पवार जिंकणार आहे बारामतीचा किल्ला. अजित पवारांनी गाठला आहे विकासाचा पल्ला त्यामुळे मी शरद पवारांना देतो मोदी यांच्या सोबत येणाचा सल्लारामदास आठवले म्हणाले की, शरद पवार हे मोदी यांच्या सोबत आले असते तर अजित पवार इकडे असे आले नसते. शरद पवार यांनी समान मुद्देवर एकत्र येणे गरजेचे होतें . पवार साहेब घड्याळ सोडून गावोगावी वाजवतात तुतारी. ज्या घड्याळ साठी आतापर्यंत काम केले त्याचे महत्व जाणून घेतले पाहिजे. राज्यात महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळणार आहे.महायुतीच्या पाठीशी सगळेजण उभे राहिले आहेत.बारामती मध्ये सुनेत्रा पवार उभ्या आहेत,अजित पवार याची ताकद मतदारसंघात मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करत आहे. मोदी ना पाडण्यासाठी काँग्रेससह इतर जण एकत्रित आले आहेत.मोदी ना हरवणे वेडे गबळ्याचे काम नाही.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, संकटात मदतीसाठी धावून जाणारे हे सरकार आहे. अनेक ऐतिहासिक कामे सरकारने केली आहे. मराठा आरक्षण बाबत सरकारने अभ्यास करून काम केले आहे. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाल्यावर अनेक टीका टिप्पणी होते. यशस्वी पुरुष मागे महिला असते पण अजित दादा यांनी सुनेत्रा ताई यांना काम करण्याची संधी दिली आहे. सुनबाईना पाठवा दिल्लीत आणि लेकीला पाठवा गल्लीत अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली.