पुणे- काल ज्यांच्यावर अगदी हीन भाषेत टीका केली आज त्यांच्याच पक्षात जाऊन निवडणूक लढवायची हे गद्दारीचे क्वालिफिकेशन आढळराव यांचे असल्याचे शिक्कामोर्तब आज होईल . एवढेच नव्हे तर ज्यांचे बरेच काही खालच्या भाषेतील वक्तव्ये ऐकून अजितदादा कधी संतापत त्यांनाच आज पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची नामुष्की अजीत दादांवर आली आहे .या पार्श्वभूमीवर डॉक्टर , अभिनेता असूनही एक प्रामाणिक , जनहिताची कळकळ असलेला, कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला नेता म्हणूनच अमोल कोल्हेंना जनता स्वीकारेल असे पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. ते म्हणाले कि,’होय तेच शिवाजीराव आढळराव पाटील ज्यानीं अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली, राष्ट्रवादी संपवण्याची भाषा केली त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये उपलब्ध आहेत. त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याची नामुष्की अजितदादा पवार यांच्यावर आली, मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम असती तर आयात उमेदवार घेण्याची वेळच आली नसती अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी टीका केली.
अशा गद्दार आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून मतदार निवडून देणार नाहीत. तर कर्तुत्वान डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा खासदार होणार असा विश्वासही प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला, शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी आढळराव पाटलांसह अजित पवारांना देखील चिमटे काढले आहेत.