मुंबई दिनांक १० फेब्रुवारी २०२४
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून मुंबई भाजपच्या वतीने मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘घर चलो’ अभियानाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
‘घर चलो’ अभियानांतर्गत खा. मनोज कोटक यांनी मुलुंड, भांडुप, पवई येथील कार्यक्रमात सहभाग घेतला. खा. गोपाळ शेट्टी यांनी बोरीवली परिसरातील नागरिकांची भेट घेतली. खा. पूनम महाजन यांनी वांद्रे येथील नागरिकांना भेटून मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. आ. कॅप्टन तमिल सेलवन यांनी सायन कोळीवाडा परिसरात घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचे माहितीपत्रक वाटले. आ. राम कदम यांनीही अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आ. विलेपार्ले विधानसभेत १५० हून अधिक घरातील सदस्यांची भेट घेतली. आ. अमित साटम यांनी पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते यांची भेट घेतली. आ. भारती लवेकर यांनी वर्सोवा विधानसभेत घर चलो अभियान यशस्वी केले. आ. विद्या ठाकूर यांनी गोरेगाव विधानसभेतील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेवून मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली. आ. योगेश सागर यांनी कांदिवलीतील नागरिकांची भेट घेतली. आ. मनीषा चौधरी आणि दहिसर विधानसभेत ‘घर चलो’ अभियान राबवले. आ. सुनील राणे यांनी बोरिवलीतील नागरिकांच्या घरी जावून मोदी सरकारच्या कामाची माहिती दिली. आ. प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वात मागाठाणे परिसरात अभियान राबविण्यात आले. आ. प्रसाद लाड यांनी सायन सर्कल परिसरातील अभियानात सहभाग घेतला. आ. पराग शाह यांनी घाटकोपर परिसरातील नागरिकांची भेट घेवून मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. मुंबई भाजपा आघाडी, मोर्चा, सेलच्या वतीने घर चलो अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेण्यात येत आहे.