सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुर

Date:

नवी दिल्‍ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 करण्यासाठी(सरन्यायाधीश वगळून), सर्वोच्च न्यायालय( न्यायाधीशांची संख्या) कायदा 1956 मध्ये सुधारणा करण्याकरिता संसदेत सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक 2026, सादर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

ठळक बाबी :

सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) सुधारणा विधेयक 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या चारने वाढवून 33 वरून 37 (सरन्यायाधीश वगळून) करण्याबाबतची तरतूद  आहे.

मुख्य परिणाम:

न्यायाधीशांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला अधिक कार्यक्षमपणे आणि प्रभावीपणे काम करणे शक्य होऊन जलद न्याय मिळणे सुनिश्चित होईल.

खर्च:

न्यायाधीशांचे वेतन, सहाय्यक कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर सुविधांवरील खर्च भारताच्या एकत्रित निधीमधून केला जाईल.

पार्श्वभूमी:

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासाठी,  1956 मध्ये सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) कायदा 1956,  करण्यात आला होता.  या कायद्याच्या कलम 2 मध्ये न्यायाधीशांची कमाल संख्या (सरन्यायाधीश वगळून) 10 असेल, अशी तरतूद करण्यात आली होती.

मूळ कायद्यात आणखी सुधारणा करून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्येत शेवटची वाढ, सर्वोच्च न्यायालय(न्यायाधीशांची संख्या)सुधारणा कायदा 2019 द्वारे 30 वरून 33 (सरन्यायाधीश वगळून) करण्यात आली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तीन दिवसांत चार महाकाय होर्डिंग उखडले: खेड शिवापूर परिसरात कारवाईचे सत्र सुरू

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपल्या...

वाहतुकीला अडथळा ठरलेले औंध मधील हेरिटेज स्ट्रक्चर हलविणार-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे: वाहतूक सुरळीत करण्यासाठी औंध बॉडी गेट चौकी येथील...

पर्वती पायथा अत्याचाराचा प्रयत्न: संतप्त महिलांचे आंदोलन

पुणे- पर्वती पायथा परिसरात एका अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर...