राज ठाकरे म्हटले’अरे काढ रे ते कापड’ अन मतदारसंघनिहाय बोगस मतदारांची दिली आकडेवारी

Date:

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील दुबार मतदारांच्या नावांचा ढिग दाखवून बोगस मतदार याद्यांचे पुरावे दिले. महाराष्ट्रात निवडणुकीच्या नावाखाली प्रचंड गोंधळ सुरू आहे. कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाही. पण आत्ता घाई करत आहेत. अजून 1 वर्षे घेतली नाही, तर काय फरक पडतो? या लोकांचा जुन्याच मतदार यादीवर निवडणूक घेऊन यश पदरात पाडून घेण्याचा डाव आहे, असे राज ठाकरे म्हणालेत. यावेळी त्यांनी दुबार मतदारांना ठोकून काढण्याचाही इशारा दिला.

महाविकास आघाडी व मनसेने आज मुंबईत मतदार याद्यांतील घोळ व मतचोरीच्या मुद्यावरून ‘सत्याचा मोर्चा’ काढला. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, आजचा मोर्चा हा राग व ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा व समजावून सांगण्याचा मोर्चा आहे. या प्रकरणी माझ्यासकट सर्वांनीच भाष्य केले आहे. खरे तर मतदार यादीत दुबार मतदार आहेत हा फार छोटा विषय आहे. या प्रकरणी आम्ही सर्वजण बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. शेकाप, डावे व काँग्रेसही बोलत आहे. एवढेच नाही तर सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदेंचे लोकही दुबार मतदार असल्याचे बोलत आहेत.

अरे मग अडवलंय कुणी? हे लोक निवडणूक घेण्याची घाई का करत आहेत? साधी गोष्ट आहे. मतदार याद्या साफ करा. त्या पूर्ण पारदर्शक केल्यानंतर निवडणूक घ्या. त्यानंतर यश – अपयश कुणाचे ही गोष्ट मान्य. पण सध्या जे लपून – छपून चालू आहे ते कशासाठी?

राज ठाकरे यावेळी मतदार यादी दाखवत म्हणाले, मी दोन-तीन गोष्टी दाखवण्यासाठी येथे आणल्या आहेत. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड व भिवंडी येथील 4,500 मतदारांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले आहे. असे लाखो लोक महाराष्ट्रभर आहेत. या लोकांचा बोगस मतदानासाठी वापर करण्यात आला. पण त्यानंतरही सत्ताधारी लोक या प्रकरणी पुरावे दाखवण्याची मागणी करत आहेत.

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार 456 मतदार आहेत. त्यापैकी 62 हजार 370 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात 16 लाख 74 हजार 861 मतदार आहेत. त्यापैकी 60 हजार 231 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघात 15 लाख 90 हजार 710 मतदार आहेत. त्यापैकी 92,983 मतदार दुबार आहेत. मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात 16 लाख 81 हजार 48 मतदार आहेत. त्यापैकी 63 हजार 740 दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे यावेळी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदारांची आकडेवारी सादर करताना म्हणाले.

यावेळी त्यांनी या बोगस मतदारांचा पुरावा देण्यासाठी मतदार याद्यांच्या ढिगाचा पुरावाही दाखवला. ते ‘अरे काढ रे ते कापड’ म्हणताच, तिथे दुबार मतदारांच्या नावांच्या कागदपत्रांचा ढिगारा दिसला. हे सर्व दुबार मतदार आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. ते बोगस मतदार याद्यांच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवत म्हणाले, हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे फक्त मी सांगितलेल्या मतदार संघातील दुबार मतदार आहेत. यावरून महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा गोंधळ सुरू आहे दिसून येईल.

एवढे पुरावे देऊनही कोर्टाने सांगितले म्हणून जानेवारीत निवडणूक घेण्याचा हट्ट सुरू आहे. कशा घ्या? का घ्या? कुणाला आहे घाई? या लोकांनी मागील 5 वर्षांत निवडणुका घेतल्या नाहीत. अजून 1 वर्ष गेले तर काय फरक पडतो? पण जी माणसे आतमध्ये भरली आहेत त्याचे काय करायचे? मग जुन्याच मतदार यादीवर निवडणुका घ्यायच्या आणि यश पदरात पाडून घ्यायचे असा यांचा डाव आहे. याला काय निवडणुका म्हणतात? याने लोकशाही टिकेल का? पैठणच्या आमदाराचा मुलगा सांगतो की, मी 20 हजार मतदार बाहेरून आणली. यांची हिंमत बघा. सत्तेचा माज बघा, असे राज ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नवी मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेलेत. कुणीतरी सुलभ शौचालयात नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट देशभर सुरू आहे. मी 2017 पासून ओरडून सांगतो की यात (ईव्हीएम) गडबड आहे. गोंधळ आहे. अहो, 232 आमदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात ‘मातम’ असेल, सन्नाटा असेल, काहीच नसेल, मतदार गोंधळलेले असतील, सर्वांना आश्चर्य वाटत असेल तर हा गोंधळच आहे. निवडून आलेले लोक स्वतःचा चिमटा काढून पाहत होते. मी निवडून आलो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.

कारण, निवडून येण्याची सोय अगोदरच झाली होती. त्यामुळे त्याला मी निवडून येणार हे माहिती नव्हते. ही सगळी कारस्थाने, या सर्व गोष्टी निवडणूक आयोगाच्या मार्फत सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या? मला जरा सांगा. मतदार उन्हातान्हात रांगेत उभा राहून मतदान करणाऱ्या मतदारांच्या मतांचा हा अपमान नाही का? मतदारांनी मतदान करायचे, पण मॅच अगोदरच फिक्स आहे. मग त्याच्या मताला काय किंमत आहे?

मी एकच गोष्ट सांगेन की, जेव्हा केव्हा निवडणुका होतील, तेव्हा तुम्ही घरोघरी जा. मतदार याद्यांवर जोरदार काम करा. प्रत्येक मतदाराची ओळख पटवा. त्यानंतर मतदानाच्या ठिकाणी बसून मतदान करणारा तोच मतदार आहे का यावर लक्ष द्या. त्यात हे दुबार, तिबारवाले तिकडे आले तर त्यांना तिथेच फोडून काढा. बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्यायचे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. त्याशिवाय या महाराष्ट्रात सुरू असलेला कारभार वठणीवर येणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...

जीबीएसग्रस्त १२ गावांच्या ८९० कोटींच्या पाणीप्रकल्पासाठी ‘ईएसआयए’ अहवाल; डिलॉईटची सल्लागार म्हणून निवड

पुणे : जीबीएस (गिलियन-बॅरे सिंड्रोम) आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट...