मुंबई- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यांना शिवसेनाप्रमुख , सरसेनापती अशा शब्दांनी संबोधले जायचे , ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा महारष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर इस्लामी राष्ट्रांतही होता, ज्या शिवसेनेचा वारस बाळासाहेबांनी राज ठाकरेंना न करता आपला पुत्र उद्धव ठाकरे यांना करून माझ्या उद्धवला सांभाळा अशी आर्त हाक मुंबईतूनच शिवसेना मेळाव्यातून दिली होती. ती शिवसेना म्हणजे खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची नसून एकनाथ शिंदेंची आहे असा निर्णय आज विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी दिला आहे . त्याच बरोबर शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंच्या समवेतच राहिलेले आमदार हे दोन्ही गटातील आमदार पात्र असल्याचा निकाल हि नार्वेकर यांनी दिला आहे. निकाल वाचनास सुमारे तासभर उशीर केल्यावर त्यांनी वाचलेले मुद्दे खाली प्रथम वर शेवट .. या प्रमाणे येथे देत आहोत …
उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदारही पात्र
शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा धोका टळला आहे. यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांंना विधानासभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहे.
शिंदे गटाचे 16 आमदार पात्र – नार्वेकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यास विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी नकार दिला. त्यांना अपात्र ठरवण्याचे कोणतेही वैध कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे आणि पक्षाचे खरे नेते आहेत.गोगावले यांची नियुक्ती बरोबर, त्यांचाच व्हीप लागू – नार्वेकर
निकाल वाचताना नार्वेकर म्हणाले की, भरत गोगावले यांची शिवसेनेचा व्हीप म्हणून झालेली नियुक्ती बरोबर आहे. त्यांचाच व्हीप लागू होतो. विधिमंडळ पक्ष ज्याचा त्याचाच पक्ष आहे.अध्यक्ष म्हणाले- सुनील प्रभू यांची जेव्हा चीफ व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली तेव्हा पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने या गटालाच खरी शिवसेना मानली आहे, त्यामुळे भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती योग्यच आहे. सुनील प्रभू यांना विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. असे म्हणत नार्वेकरांनी गोगावलेंना व्हीप-प्रतोद म्हणून मान्यता दिली.
शिंदे गट हीच खरी शिवसेना – नार्वेकरविधानसभा अध्यक्षांनी निरीक्षणे नोंदवत म्हटले की, शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे.एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही – नार्वेकरपक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत.
पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असं झालं तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोल शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे. शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत. शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगानं दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होतं, असंही नार्वेकर म्हणाले.
निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे – नार्वेकर
नार्वेकर म्हणाले की, 23 जानेवारी 2018 रोजी कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार शिंदे गटाची शिवसेना खरी आहे. तेच समोर ठेवलं गेलं. 21 जून 2022 ला जे झालं ते समजून घेतलं पाहिजे, त्या दिवशी शिवसेना फुटली. 2013 आणि 2018 ला शिवसेनेत अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. दोन्ही गट आपणच असली शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिलीय, ते समोर ठेवलं गेलं आहे.
खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच : नार्वेकर
नार्वेकर म्हणाले की, 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत अंतर्गत निवडणूक झाली नाही. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार आहे, खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे.
“शिवसेनेची 1999 सालची घटनाचं वैध – नार्वेकर
2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. पण, 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना असून तीच ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे, असेही नार्वेकर म्हणाले.
पक्षाचा प्रमुख कोण, एवढंच मी ठरवणार – नार्वेकर
10व्या शेड्युलनुसार मला फक्त राजकीय नेतृत्व बघायचं आहे. पक्षाचा प्रमुख कोण, एवढंच मी ठरवणार आहे. 2018 मध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही म्हणून तेव्हाची घटनादुरुस्ती चूक आहे. असेही नार्वेकर म्हणाले.
2018ची ठाकरे गटाची घटनादुरुस्ती नियमबाह्य
2018ला ठाकरे गटाने केलेली घटनादुरुस्ती नियमबाह्य आहे. 2023 ला जी घटना दिली तीच ग्राह्य धरत असल्याचेही नार्वेकर म्हणाले. ते म्हणाले की, उलटतपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचं प्रतिज्ञापत्र अमान्य करत आहे.
दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्या- नार्वेकर
खरी शिवसेना कोणती यावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी म्हटले की, “शिवसेनेची घटना काय आहे आणि त्यानुसार पक्ष कुणाचा याचा अभ्यास, निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहेत. 2018 सालची घटना ही यामध्ये महत्त्वाची मानली आहे. घटनेच्या 10व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची? अधिकृत व्हीप कुणाचा? बुहमत कुणाचं हे ठरवणं होतं, 2018 मधील घटनेच्या दुरुस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही त्यावेळी सर्वांच्या संमतीने. घटना, नेतृत्व, विधिमंडळ पक्षाचं बहुमत, हे पक्ष ठरवताना महत्वाचे घटक होते. 2018 ची घटना ग्राह्य धरणार.
“आधी पक्ष कोणाचा याचा निर्णय देणार- नार्वेकर
विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना सर्वात आधी खरी शिवसेना कोणती हे ठरवणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. यानंतरच आमदार अपात्रतेबाबत ते निर्णय देणार आहेत.