पुणे -कसब्यातील टेम्पररी आमदार धंगेकर म्हणजे एक हवा भरलेला फुगा आहे,ज्या मुंगेरीलालला आता लोकसभेचीही स्वप्ने पडू लागली आहेत,त्यांनी कायम महापालिकेच्या निधीवर तसेच राज्याच्या निधीवर केवळ आपल्याभोवताल च्या ठेकेदारांसाठी डल्ला मारण्याचे कृत्ये केली,अधिकाऱ्यांना मारहाण केली त्यांना कोथरूड गुन्हेगारीग्रस्त असून भय मुक्त करा असे म्हणण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसून पोलीस आणि भाजपा ने कोथरूड मध्ये सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या चांगले वातावरण ठेवण्याचा सातत्याने यशस्वी प्रयत्न केला आहे.असे येथे भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी म्हटले आहे.
भयमुक्त कोथरूड’ बनवा,अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्तालयात केली होती यावेळी पुण्याचे पोलिस आयुक्त यांची भेट घेत त्यांच्याकडेही वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करणारे निवेदन सोमवारी (ता. ८) दिले.यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धंगेकर म्हणाले,गेल्या काही वर्षांत या भागात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे कोथरूड अशांत बनले आहे.गुंडांच्या टोळ्या या भागात कार्यरत आहेत.त्यांच्यातील गँगवॉर याआधी पुणेकरांनी अनुभवलेले आहे.त्यातच गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला आहे.त्यामुळे सामान्य जनता चिंतेत आहे.असा आरोप केला होता त्यावर घाटे यांनी तीव्र ताशेरे ओढले.
काँग्रेसचे हे टेम्पररी आमदार यांच्या भोवती जनता कधी नसते तर हे कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे आहेत ज्यांनी आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या वर टीका केली. मुळामध्ये जे स्वतः अधिकाऱ्यांना मारहाण करतात त्यांना आमच्या नेत्यावर बोलायचा नैतिक अधिकार नाही’ अशी प्रतिक्रिया भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत घाटे बोलताना पुढे म्हणाले की ‘धंगेकर यांच्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही गुन्हेगारी मुक्त भयमुक्त वातावरण या साठी महायुतीचे सरकार वचनबद्ध आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना गुन्हेगारी मुक्त करण्याचे कठोर आदेश दिले आहेत गृह खाते मोहोळ यांच्याविषयात योग्य ती कारवाई नक्कीच करेल परंतु धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने सातत्याने करत असतात ते हवे ने भरलेला फुगा आहेत आणि हा फुगा लवकरच फुटेल त्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पडत आहेत ज्यांनी आमच्या दिवंगत आमदार मुक्ताताई टिळक यांचा १० कोटींच्या कामाचा विरोध केला दुर्दैवाने तो निधी इतर ठिकाणी वळविला गेला ज्यांना स्वतःच्या मातदारसंघातल्या जनतेची काळजी नाही त्यांनी कोथरूड ची काळजी करावी हे खरोखर हास्यास्पद आहे स्वतःची उमेदवारी जाहीर करून मोकळे झाले असे असले तरी आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा फाजील आत्मविश्वास हा नडणार आहे. चंद्रकांतदादा हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळ यांना भेटले देखील नाहीत असे असताना धंगेकर यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही’ या पत्रकार परिषदेला सरचिटणीस रवींद्र साळेगावकर,पुनीत जोशी वर्षा तापकीर संजय मयेकर पुष्कर तुळजापूरकर हेमंत लेले आदी उपस्थित होते.

