शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतरच्या काळातील मराठी सरदारांचे तळपते कर्त्तृत्व संशोधन, लेखनासाठी प्रवृत्त करणारे ठरले- माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील

Date:

  • प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – “छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर मराठी स्वराज्य बलाढ्य औरंगझेबाविरुद्ध किती पराक्रमाने लढले, या लढ्याचा इतिहास रोमहर्षक आहे. या लढ्याची सूत्रे स्वीकारली ती महापराक्रमी संताजी घोरपडे आणि त्यांच्या शूर सहकार्यांनी. सरदार संताजी घोरपडे या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या तळपत्या पराक्रमाच्या गाथेने मला साद घातली. त्याची परिणती ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाच्या लेखनात झाली”, असे मनोगत प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक आणि माजी पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (IPS) यांनी मंगळवारी व्यक्त केले. ११ मार्च १६८९ या दिवशी औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर हत्या केली होती. मंगळवारी धर्मवीर शंभूराजांच्या स्मृती जागवणाऱ्या दिवसाचे औचित्य साधून डॉ. शेखर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराजांच्या हत्येनंतरच्या काळातील मराठा सरदार, औरंगजेब, त्यांच्या लढाया विशेतः संताजी घोरपडे याविषयी डॉ. शेखर पाटील यांचा विशेष अभ्यास आहे.

डॉ. शेखर पाटील म्हणाले, “१६८३ ते १६९४ पर्यंतच्या काळात मराठी सैन्य संताजींच्या नेतृत्वाखाली औरंगझेबाशी लढत राहिले, हा इतिहास आहे. छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर वेढ्यात असतानाही, मराठी स्वराज्याचे सर्व अर्थांनी रक्षण आणि बलाढ्य शत्रूशी दोन हात अशी कामगिरी करणारे संताजी घोरपडे हे व्यक्तिमत्व मला सदैव साद घालत राहिले. त्यातूनच या काळाविषयीच्या माझ्या संशोधनाला चालना मिळाली, आणि ‘शूर सरसेनापती संताजी’ या पुस्तकाचे लेखन घडले. आता लवकरच या पुस्तकावर आधारित रणधुरंधर संताजी हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफी साठी प्रसिद्ध असलेले व विविध राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी असलेले दिग्दर्शक अमोल गोळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत”, अशी माहितीही त्यांनी दिली. याप्रसंगी दिग्दर्शक अमोल गोळे, डॉ. अनिरुद्ध आंबेकर, करणसिंग बांदल, एकनाथ दुधे, आदित्य शेखर पाटील, निवृत्ती नवले तसेच घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे व मानसिंग घोरपडे तसेच अन्य घोरपडे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी चित्रपटाच्या पहिला पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

डॉ. शेखर पाटील पुढे म्हणाले, “शिवरायांचे जन्मस्थान असणार्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माझे लहानपण गेले. तेव्हापासून इतिहासाची गोडी लागली. अभ्यास सुरू झाला. अवघ्या २३ व्या वर्षी संभाजी महाराज छत्रपती झाले. त्यानंतरची ९ वर्षे त्यांनी औरंगझेबाशी अशा लढाया केल्या, की औरंगझेबाने विचार बदलून आधी निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही संपविण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण काळाचे संशोधन हा माझ्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. सलग ५ वर्षे संशोधन, सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास, लढायांची माहिती. या काळाशी संबंधित प्रत्येक स्थळाला भेट देऊन, मी लेखन केले आहे. सर्व उपलब्ध कागदपत्रांचा मी अभ्यास केला आहे. सुमारे ८ वर्षे स्वराज्याचे सेनापती या नात्याने संताजी घोरपडे यांनी स्वराज्य जपले, राखले, आणि औरंगजेबाला हैराण केले. संताजींच्या महापराक्रमी कर्तृत्वाला आदरांजली म्हणून माझा लेखनप्रपंच आहे, त्या लेखनाचे चित्रपटरूपही लवकरच रसिकांसमोर येईल. या विशिष्ट काळातील इतिहास, आणि मराठी सरदारांचे महान कर्तृत्व सर्वांसमोर यावे, हाच उद्देश आहे”.

दिग्दर्शक अमोल गोळे म्हणाले, “ऐतिहासिक चित्रपट करताना वातावरणनिर्मिती, पेहराव, तत्कालीन वास्तू, वस्तू यांना सर्वाधिक महत्त्व असते, हे मी मंगल पांडे, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटांसाठी काम करताना शिकलो आहे. ‘रणधुरंदर संताजी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करताना हा अनुभव उपयोगी ठरेल. सुमारे वर्षभराच्या काळात हा चित्रपट रसिकांसमोर येईल, असा आमचा प्रयत्न राहील”.

घोरपडे घराण्याचे वंशज चंद्रहार घोरपडे म्हणाले, “संताजी घोरपडे हा घराण्याचा अभिमान आहे. संताजींचे वडील मालोजी घोरपडे हे छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होते. या पितापुत्रांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले, त्याचे दर्शन यातून घडेल”, याचा विश्वास आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहाटे 3.28 वाजता सुनीता विल्यम्स सुखरूप परतल्या…

सुनीता विल्यम्सच्या वडिलांच्या गावी मिरवणूक, दिवाळीसारखा आनंदोत्सव वाशिंग्टन-तब्बल नऊ महिने...

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...