पुणे- मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करून मालक धार्जिणी भूमिका स्पष्ट केल्याने ,आणि सामान्य कामगाराच्या रोजी रोटी चाच प्रश्न धनिकांच्या हाती सोपविला जाणार असल्याने देशातील ७० ते ८० टक्के कामगार उद्रेकाच्या दिशेने वाटचाल करत आहे . मोदी सरकारने केलेले कायदे महाराष्ट्रात अंमलात आणू नयेत अन्यथा केंद्रा विरोधात लढता लढता महाराष्ट्राच्या सर्कार्विरोधाठी लढावे लागेल असा इशारा आज कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी ‘मायमराठी ‘ कडे आपल्या भावना व्यक्त करताना दिला. पुणे शहर आणि परिसरातील विविध कामगार संघांनी एकत्रित येऊन कृती समितीची स्थापना केली असून या कृती समितीचे अध्यक्षपद इंटक नेते कैलास कदम यांच्याकडे देण्यात आलेआहे .आज त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरा घालण्यात आला . आजच्या या लढ्यात केवळ कामगार युनियन चे पदाधिकारी यांना सहभागी करवून घेण्यात आले होते .तरीही संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाला जणू वेढा पडला होता . यावेळी पहा कामगार नेते कैलास कदम यांचे झालेले भाषण ..आणि अभ्यंकर यांच्या शी ‘माय मराठी’ ने साधलेला संवाद