सरकार गोंधळलेले ,घाबरलेले कि बिथरलेले ?
पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची अवघ्या काही महिन्यातच बदली करण्यात आली आहे. पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार हे नवीन महापालिका आयुक्त असणार आहे.शेखर गायकवाड यांना पुणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार स्वीकारून अवघे काही महिनेच उलटले होते. त्यांनी सौरभ राव यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा गायकवाड हे साखर आयुक्त म्हणून काम पाहणार आहे.
शेखर गायकवाड यांनी लॉक डाऊन ला विरोध केला होता ?
आपली जीवन शैली आपल्याला बदलावी लागेल ,जोपर्यंत औषध येत नाही तोवर कोरोना सोबत जगावे लागेल आणि त्यासाठी मुकाबला म्हणून जीवन शैली बदलणे अपरिहार्य राहील असे गायकवाड वारंवार सांगत होते. एवढेच नव्हे तर लॉक डाऊन ला त्यांनी याच शब्दांनी विरोध केल्याचे जाणवत होते . एक मराठी आणि अल्पावधीत जनतेसह अधिकारी वर्गात लोकप्रिय झालेले अधिकारी , सर्वांच्याच समस्या आणि म्हणणे शांतपणे ऐकून घेत प्रत्येकाला जबाबदारीने प्रतिसाद देणारे अधिकारी म्हणून लौकिक त्यांनी मिळविताच त्यांच्या बदलीने अनेकांना धक्का बसला
दरम्यान शेखर गायकवाड यांची ऐन कोरोनाच्या महामारीत बदली होण्यामागे ‘कोरोना ‘ वरील यश अपयशाचाच पाढा वाचला जाणार असून ,विविध क्षेत्रात सरकारकडून वाढत्या महामारीच्या काळात होणाऱ्या बदल्यांच्या राजकारणाने महाविकास आघाडी सरकार गोंधळलेले , घाबरलेले कि बिथरलेले आहे असा सवाल आता निर्माण होणार आहे. नव्या अधिकाऱ्यांनी सूत्रे घेऊन पुन्हा नव्याने महामारीशी सामना कसा करणार हा सवाल अनेकांना सतावतो आहे.