पुणे- पुण्याच्या खासदारांनी लॉक डाऊन या विषयाचे राजकारण करण्या पेक्षा महानगरपालिका अपयशी का झाली याच आत्मपरीक्षण करावे,पुण्यातील वाढत्या कोरोनाशी यशस्वी लढा देण्यास महापौर आणि सर्व पदाधिकारी तुमचे १०० नगरसेवकांचे बळ तुमचे, आमदारांचे बळ देखील तुमचे मग कोरोना शी लढताना हे बळ आपण कितपत वापरले ? याबाबतही आत्मपरीक्षण करावे , निव्वळ सोशल मिडिया वरून प्रसिद्धीचा डंका पिटवून,उपदेशांचे डोस पाजीत प्रसिद्धीलोलुप पणा राबवून कोरोनाला हरविता येणार आहे काय ?लॉक डाऊन हे फक्त राज्यसरकरच फेल्युअर नाही त्याला मुख्य जबाबदार मनपा प्रशासन देखील आहे. असा आरोप मनसे चे अजय शिंदे यांनी केला आहे.
खासदार बापट यांनी पुण्यात पुन्हा लॉकडाऊन च्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्यानंतर अजय शिंदे यांनी तातडीने हि प्रतिक्रिया दिली आहे …
लॉक डाऊन ला विरोधच पण…..
पुण्याच्या खासदारांनी लॉक डाऊन या विषयाचे राजकारण करण्या पेक्षा महानगरपालिका अपयशी का झाली याच आत्मपरीक्षण करावे . लॉक डाऊन हे फक्त राज्यसरकरच फेल्युअर नाही त्याला मुख्य जबाबदार मनपा प्रशासन देखील आहे शेकडो कोटी खर्च करून देखील करोना आटोक्यात आणण्याच्या उपाय योजना मनपा ला सापडल्या नाही रस्ते बंद करणे आणि पत्रे मारणे या मनपाच्या उपाययोजना असतील तर करोना वाढणारच होता साथी च्या रोगाचा फेलाव होऊ नये या साथीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना मनपा कमी पडली
रुग्ण संख्या वाढत असताना देखील खाजगी हॉस्पिटल चे बेड हेतुपुरस्सर ताब्यात घेण्यास टाळाटाळ करण्यात आली शहरी गरीब अंतर्गत रुग्ण वरचे उपचार करण्यास हॉस्पिटल मधून प्रतिबंध करण्यात आला वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्वच हॉस्पिटलचे बेड ताब्यात घेण्यात कुचराई करण्यात आली रुबी जहांगीर सारखी पंचतारांकित हॉस्पिटल हेतू पुरस्सर वगळण्यात आली आणि तेवढ्याच हेतुपुरस्सर पणे सिबॉयसीस सारखी हॉस्पिटल घुसडण्यात आली ( कारण सिबॉयसीस या संस्थेला त्यांच्या हॉस्पिटलच प्रेझन्टेशन करणं सोप्प व्हावं )नियमांना बगल देत शहरातील लहान मोठी हॉस्पिटल का ताब्यात घेण्यात आली नाही रुग्णांना बेड आणि व्हेंटिलेटर मिळत नसताना आणि नवीन रुग्णांना अक्षरशः घरीच उपचार होऊ शकतात अस सांगण्याची वेळ आलेली असताना रोज सरासरी 16 ते 20 दुर्देवी नागरिक मृत्युमुखी पडत असताना आणि सरासरी600 ते 1000 नागरीक करोना बाधीत होत असताना त कोणी च बोलत न्हवत आणि आता व्यापारी वर्ग विरोध करतोय म्हणल्यावर खासदार का बोलायला लागलेत. ए अजय शिंदे यांनी म्हटले आहे.