आम्हाला सीमावासीयांबाबत शिकवण्याची गरज नाही:उद्या ठराव आणू
नवी दिल्ली-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन भुखंड प्रकरणात आरोप होत आहे. त्यांच्या प्रकरणाची माहीती घेऊ. त्यासोबतच विरोधी पक्षनेत्यांच्या प्रकरणांचीही माहीती घेऊ. विरोधकांचीही माहीती घेऊ आणि सत्ताधारी लोकांचीही माहीती घेऊ.महाराष्ट्र, कर्नाटक सीमाआंदोलनात मी स्वतः जेल भोगली. त्यामुळे इतर लोकांनी आम्हाला याबाबत शिकवण्याची गरज नाही. आम्ही सरकार म्हणून पूर्णपणे सीमावासीयांच्या पाठीशी खंबीर आहोत. सीमावासीयांबाबतचा ठराव उद्या विधीमंडळात घेणार आहोत अशी स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. ते नवी दिल्लीत आज बोलत होते. सध्या ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यांचा ताफा बिर्ला यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी पोहचले आहेत.
मला केंद्राचे निमंत्रण होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज दिल्लीत वीर बालदिवस होता. गुरु गोविंदसिंग यांची दोन मुलांनी सहा आणि नऊ वर्षांच्या वयात बलीदान दिले. गुरुगोविंदसिंग यांचे महाराष्ट्र व पंजाबचे नाते आहे. त्यामुळेच मला केंद्र सरकारच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बोलणाऱ्यांना माहीती घ्यायला हवी होती की, कुठल्या कार्यक्रमासाठी मी दिल्लीत आलो,. स्वतःच्या प्राणांचे बलीदान दिले, पण त्या मुलांनी स्वाभीमान जाऊ दिला नाही. शौर्याची गाथा व एक आदर्श पुढच्या पिढीला या मुलांनी घालुन दिला. ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी मला घरी बोलावले होते.
साठ वर्षे जूना विषय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सीमावादाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पहिल्यांदाच हस्तक्षेप केला व दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावले. सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना कुठलीही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये याबाबत त्यांनी सूचना दिल्या. हा विषय साठ वर्षे जूना आहे.
मी स्वतः जेल भोगली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असताना प्रकरणावर व निकालावर कुठलाही परिणाम घडू नये. कर्नाटक असो की, महाराष्ट्र सर्वांनी याची काळजी घ्यायला हवी. जे बोलत आहे त्यांनी योजना बंद केला. आम्ही सर्व योजना सुरू केल्या. सीमाआंदोलनात मी स्वतः जेल भोगली. त्यामुळे इतर लोकांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आम्ही पूर्णपणे सीमावासीयांच्या पाठीशी सरकार म्हणून खंबीर आहे. त्याबाबतचा ठराव उद्या विधीमंडळात करणार आहोत.