पुणे : भारत विकास संगम व महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने राष्ट्रसेवा मंथन २०२१ या विशेष राज्यस्तरीय दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक ७ आणि रविवार, ८ आॅगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील मरकळ येथील आर्ट आॅफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प.पू. श्री श्री रविशंकर आॅनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रकृती आणि त्याला अनुषंगून मानवाचा विकास कसा करता येईल, या विषयावर विविध मान्यवर बोलणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
शनिवार, दिनांक ७ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता उद््घाटन व प्रथम सत्र होणार आहे. यामध्ये प.पू. श्री श्री रविशंकर आॅनलाईन पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. तर, व्यासपीठावर भारत विकास संगमचे संस्थापक के.एन.गोविंदाचार्य हे मेरा गाव मेरा देशा मेरा जिल्हा मेरी दुनिया प्रकृती केंद्रीत विकास की और याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
मरुस्थल विकास की यशस्वी यात्रा, शाश्वत विकास की गंगोत्री भारत विकास संगम, जनसहकार एवम ज समृद्ध खेत खलीयान, शिक्षा विश्व मानव निर्माण की साधना, शिक्षण साहित्य व ज्ञानाची समान संधी, आदिवासी समाज, सेवा सत्संग और साधना का महत्व, सशक्त विकास की दिशा समाज आगे-सत्ता पिछे, गीता उपदेश, सशक्त राष्ट्र निर्मीतीसाठी निरोगी माता व सुदृढ बालक, विषमुक्त खेती अशा विविध विषयांवर मान्यवर विचार मांडणार आहेत.
राज्यसभेचे माजी खासदार बसवराज पाटील, संजय पटेल, शिवगंगा प्रकल्प झाबुवाचे पद्मश्री महेश शर्मा, राष्ट्रीय संयोजक वाय. माधव रेड्डी, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, आर्ट आॅफ लिव्हिंगचे चंद्रकांत राठी, लक्ष्मणसिंग लोपोडीया, डॉ. अशोक ठाकूर, उमाशंकर पांडे, गोपाल सुतारिया, संतोष फड, रवींद्र धारिया, प्रमोद देशमुख, प्रमोद कुलकर्णी, माधव देशपांडे, मनीष कटके, डॉ. आराधना कटके, डॉ. अनिता तिवळे, महादेव गोमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप रविवार, दिनांक ८ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. यामध्ये भारत विकास संगमचे संस्थापक के.एन. गोविंदाचार्य व माजी खासदार बसवराज पाटील मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रातून विविध जिल्हयांतून सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाकरीता पुण्यामध्ये येणार आहेत. शेखर मुंदडा यांच्यासह अशोक टांकसाळे, विलास देशपांडे, विजय वरुडकर, गणेश बाकले, मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, राहुल पाटील, शशांक ओंभासे, ह.भ.प.अक्षय महाराज भोसले आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.