Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ब्राम्हण समाजाला आरक्षण नको संरक्षण द्या

Date:

पुणे : राजकीय पक्षांनी राममंदिर उभारणीचा मुद्दा पुढे केला आहे, मात्र सत्तेत आल्यानंतरही राममंदिराची उभारणी होऊ शकली नाही त्यामुळे हा प्रश्न सामोपचाराने सोडवून सरकारने लवकरात लवकर अयोध्येत राममंदिर उभारावे. ब्राम्हण समाजाला आरक्षण नको, ब्राम्हण समाज स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सक्षम आहे. त्यामुळे आरक्षण ऐवजी संरक्षणाला प्राधान्य द्यावे तसेच भारतीय संस्कृती जतनासाठी शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देऊ नये व आरक्षण बाबत पुनर्मूल्यांकन करून वंचित घटकांना न्याय द्यावा असे महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी दिली.
 
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे आयोजित ब्रम्होद्योग २०१८  या पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सवाच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू पंडित वसंतराव  गाडगीळ, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष उदय महा , सरचिटणीस शाम जोशी, प्रदेशाध्यक्षा मोहिनी पत्की , उद्योजक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद झालटे, वकील आघाडीचे राजेंद्र पोतदार, प्रदेश सरचिटणीस विलास कौसाडीकर प्रदेश सरचिटणीस नीता कुलकर्णी , सरचिटणीस माधुरी देशमुख, आनंद दवे आदी उपस्थित होते. 
 
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “अखिल भारतीय ब्राम्हण महासंघातर्फे २५ ते २९ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत ब्रम्होद्योग २०१८ पाच दिवसीय राष्ट्रीय महोत्सव आयोजिला होता. या महोत्सवात प्रदर्शनामध्ये १५० उद्योजकांनी व संमेलनामध्ये एकूण ४५० उद्योजकांनी सहभाग घेतला असून जवळपास एक लाख लोकांनी या महोत्सवाला सदिच्छा भेट दिली आहे. यावेळी यामहोत्सवामध्ये देशाच्या प्रगतीसाठी व ब्राम्हण समाजाच्या उन्नतीसाठी काही महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले व ब्राम्हण समाजाची  ध्येयधोरणे ठरवण्यात आली. देशभरातील ब्राह्मण संघटनांच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन, राज्यस्तरीय महिला मेळावा, वकील आघाडी मेळावा, ब्राम्हण उद्योजकांचे संमेलन, राज्यस्तरीय ब्राम्हण एकत्रीकरण मेळावायांचे आयोजन करण्यात आले होते.
 
या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने नवीन उद्योग कसा स्थापन करावा याविषयावर हर्षद बेळे, उद्योग विस्तार आणि जागतिक या विषयावर विवेक कोल्हटकर (दुबई)-, ट्रेडमार्क, ब्रॅण्डिंग एन्ड पेटंट याविषयावर जानकी भिडे, रचनात्मक संशोधनाचे महत्व या विषयावर दीपक घैसास, कार्पोरेट ट्रेनिंग व सायकॉलॉजि या विषयावर मिलिंद आपटे, संघटनांचे फायदे- मिलिंद कांबळे स्टार्ट अप इंडिया या विषयावर श्रीवर्धन गाडगीळ, बडवे ग्रुपचे चेअरमन श्रीकांत बडवे तसेच संजय कांडपाल, गिरीश चितळे, प्रसन्ना देशपांडे, अरालू मल्लिगे पार्थसारथी, किशनजी वाटनी यांचा समावेश आहे.
 
गोविंद कुलकर्णी म्हणाले, “या राष्ट्रीय संमेलनात पाच प्रमुख ठराव पारित करण्यात आले. त्यामध्ये राममंदिराचा प्रश्नसामोपचाराने सोडवून सरकारने अयोध्येत भव्य राममंदिर उभारावे. हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी शबरीमाला मंदिरातमहिलांना प्रवेश देऊ नये, काश्मिरी पंडितांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन त्यांच्या मूळ ठिकाणी केले जावे. ब्राम्हण समाजालाआरक्षणापेक्षाही संरक्षण प्राधान्याने द्यावे आणि आरक्षणाच्या बाबतीत विचारपूर्वक पुनर्वमूल्यांकन होऊन त्यात कालानुरूपआवश्यक बदल करावेत.” 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...