पुणे -आपल्या जीवनातील संकटाला संधी बनवून जीवनाची वाटचाल करणारा लेखक म्हणजे अण्णा भाऊ साठे,अण्णा भाऊ साठे यांचे मराठी साहित्य तील योगदान पाहता, 1 ऑगस्ट हा मराठी दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी आम्ही वारंवार करतो आहोत सरकारने ती मान्य करावी असे आग्रही प्रतिपादन येथे श्रीमंत कोकाटे यांनी केले.
मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्त रविवार दि. १७/७/२०२२ रोजी स्व. ठाकरे कलादालन, सारसबाग, पुणे या ठिकाणी पूर्वसंधेला साय ४ वा. श्रीमंत कोकाटे यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे ,माजी नगरसेवक अविनाश बागवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
कोकाटे पुढे बोलताना ते म्हणाले की, खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना साता समुद्रा पार कोणी नेले असेल तर अण्णा भाऊ नी , रशिया च्या स्टलींगौर्ड मध्ये शिवाजी महाराजांचा शौर्य सादर करणारा पोवाडा गायला व त्याची महानता तिथे सांगितली हा इतिहास आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
या कार्यक्रमामध्ये १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थाचा ज्यांनी प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षण घेऊन चांगले गुण मिळविले त्यांचा माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी सत्कार केला. यावेळी बोलताना ,’अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी समाज कार्य केले पाहिजे व जीवनात कितीही कठीण प्रतिकूल परिस्थिती असली तरीही संघर्ष करून पुढे जाण्याचे सामर्थ्य अण्णाभाऊ साठेच्या लेखनातून घ्यावे असे आव्हान रमेश बागवे यांनी सर्व विद्यार्थांना केले.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नगरसेवक अविनाश बागवे, या कार्यकमाचे प्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले तर सूत्र संचालन अरुण गायकवाड यांनी केले. या प्रसंगी मातंग समाज चे ज्येष्ठ नेते यादवराव सोनावणे , डॉ सुहास नाईक, विठ्ठल गायकवाड, महिला आघडीच्या अध्यक्षा ॲड. राजश्री ताई अडसूळ, सौ सुरेखा खंडाळे , संजय साठे , दयानंद अडागळे, सुनील बावकर, हुसैन शेख, रोहित अवचीते, यांनी विशेष परिश्रम घेतले.