पुणे:
भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या (एन.एस.एस) वतीने ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानातंर्गत पुणे शहरातील विविध भागातील प्रमुख ४० सिग्नलच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या पाचशे विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतुक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या १२ हजार शुभेच्छा पत्रांचे आणि चॉकलेटचे वाटप केले.
या अभियानाचा शुभारंभ शनिवारी सकाळी अलका टॉकीज चौक येथे झाला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुगे(वाहतूक विभाग ), डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक ), डॉ. भारतकुमार सांख्ये आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे विद्यार्थी आणि आयएमईडीमधील प्राध्यापक सहभागी झाले होते.
आयएमईडी एनएसएस विभाग प्रमुख डॉ. विजय फाळके, प्रा.स्वाती देसाई यांनी या अभियान उपक्रमाचे संयोजन केले होते.
या अभियानातंर्गत वाटण्यात आलेले ‘पॉकेट शुभेच्छा पत्र’ चार पानी आहे, यामध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश देण्यात आले आहेत. तसेच ‘डिजीटल इंडिया’ आणि ‘स्वच्छ भारत अभियान’ याविषयी देखील संदेशाचा यामध्ये समावेश आहे.
‘रस्ते अपघातांची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे, ३१ डिसेंबर च्या पार्श्वभूमीवर हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात आले’, अशी माहिती डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली.
हे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान शहरातील प्रमुख चौकांमध्ये देखील आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कोथरूड डेपो, परिहार चौक (औंध), श्री दगडूशेठ गणपती, सारसबाग (महालक्ष्मी मंदीर), वारजे पूल, संतोष हॉल (आनंदनगर,सिंहगड रोड), महानगरपालिका (बालगंधर्व), बिग बाजार (हडपसर), कर्वे पुतळा (कोथरूड), कात्रज सिग्नल, गुडलक चौक, खेड शिवापूर टोल प्लाझा, स्वारगेट, शिवाजीनगर, बाणेर सिग्नल, अभिरूची मॉल (सिंहगड रोड), एम.आय.टी. (आनंदनगर), राजाराम पूल, टाटा मोटर्स शो रूम, नळ स्टॉप या चौकांचा समावेश होता.