Home Blog Page 96

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश भागवत यांचे आवाहन ; दुसऱ्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन

पुणे : शासकीय साहित्य संमेलन होत आहे, त्याचा खूप आनंद आहे. खरंतर शासकीय अधिकारी हे सर्वाधिक माणसांशी रोज भेटत असतात. त्यांची कामे करत असतात. लोकांच्या अडचणी, समस्यांवर फुंकर घालत असतात. अधिकाऱ्यांकडे सहवेदना, कार्यक्षमता असते आणि त्यामुळे त्यांनी आपले काम चोख करायला हवे. भ्रष्टाचार होऊ नये हे लोकांना अभिप्रेत असते. कारण आता समाजाची सहनशक्तीची मर्यादा संपली आहे. म्हणून चांगली कामे करा, चांगले लिहा, लोकाभिमुखता जपा असा संदेश दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व तेलंगणा राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत यांनी दिला. शासकीय भाषा समजण्यास अतिशय किचकट असते. अधिकाऱ्यांनाही ती कधीकधी कळत नाही. शासकीय भाषेत सुधारणा करण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
पुणे महापालिका, यशदा व संवाद पुणे यांच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी भागवत यांनी अधिकारी वर्गाशी संवाद साधला. उपमहापौर परशुराम वाडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, जीएसटी गुजरातचे प्रधान आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, ओडिसा राज्यात काम करणारे मराठी सनदी अधिकारी विजय कुलंगे, मराठी भाषा विभागाचे प्रमुख किरण कुलकर्णी, संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन मंचावर होते.

भागवत म्हणाले, पुणे विचारांचे ऊर्जेचे केंद्र आहे. येथे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवताना आनंद होत आहे. ही निवड प्रशासनातील प्रशासकीय संवेदनाशीलतेची आहे. अधिकाऱ्यांना पुस्तके वाचण्यापेक्षा माणसांना अधिक वाचण्याची संधी मिळते. अधिकाऱ्यांना माणसे भेटायला येतात आणि त्यांना खूप काही शिकवतात. अधिकारी तेच साहित्यात उतरवतात. त्यामुळे ते साहित्य अस्सल वास्तववादी ठरते. अधिकाऱ्यांच्या लिखाणाचा फायदा समाजाला होतो.
मराठी तरुणांनी आयएएसमध्ये जावे यासाठी काम करत आहोत. मराठी विद्यार्थी आयएएस परिक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने उत्तीण होत नाही याची खंत आहे. मराठी मुलांना स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीचे बाळकडू द्यायला हवे. त्यासाठी आम्ही वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करत आहोत, असेही भागवत म्हणाले.

एआयचा मराठी साहित्यावर काय परिणाम होणार या विषयी भागवत म्हणाले, एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील, असा धोका आहे. पण एआयमध्ये संवेदना नाहीत. त्यांची भाषा तांत्रिक आहे. बोली भाषेचा त्यात वापर होणार नाही. पण एआयचा वापर करून आपण जुने ग्रंथ, पोथ्या जतन करू शकतो. एआयला देखील स्वीकारून उपयोगात आणले पाहिजे. धोका ओळखून आपणच त्यात पारंगत व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
आज पालक आपल्या मुलांना रिल्स बनविण्यात मदत करतात आणि तेच इतरत्र पाठवतात. रिल्स बनविण्यासाठी मदत न करता मुलांना रिअल हिरो बनविण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे, असेही भागवत यांनी सांगितले.
भारत सासणे म्हणाले, आपण या संमेलनामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. कारण शासकीय अधिकारी हा बुध्दीमान वर्ग आहे. त्यांना दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा सर्व प्रश्नांची जाण असते. त्यावर ते काम करू शकतात. त्यामुळे त्यांनी हे सर्व अनुभव पुस्तकरूपाने समोर आणावेत. साहित्याला त्यांचे मोठे योगदान होऊ शकते. शासकीय अधिकारी हे लेखक होतात, याला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. लेखकांना साहित्यनिर्मितीसाठी फिरावे लागते तेवढे अधिकाऱ्यांना फिरावे लागत नाही. त्यांना खुर्चीत बसून सर्व काही मिळते.

सुरेंद्रकुमार मानकोस्कर म्हणाले, आज आपण मोबाईलमुळे वाचन कमी करत आहोत. पण अशा संमेलनामुळे पुन्हा पुस्तकांकडे वळता येते. म्हणून अशी संमेले होणे अत्यंत गरजेचे आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, सध्या अनेक अधिकारी चांगले लेखन करत आहेत. त्यामुळे त्यांनी लेखनात सातत्य ठेवून समाजासाठी योगदान द्यावे. सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे व्यथा मांडत असतात, त्यामुळे त्यांना चांगले साहित्य निर्माण करण्यास वाव आहे.

शेखर गायकवाड म्हणाले, साहित्यात अधिकाऱ्यांचा खूप प्रभाव आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये अधिकाऱ्यांचे साहित्य पहायला मिळते. पु. ल. देशपांडे आकाशवाणीवर होते, तसेच वि. स. खांडेकर हे शिक्षक होते. त्यामुळे त्यांचे लेखन तर सर्वांना माहिती आहे. अधिकाऱ्यांना बेरकी, इरसाल माणसे भेटतात. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. त्यातूनच साहित्य निर्मिती होऊ शकते. सरकारी जीआरची किचकट भाषा बदलायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राजीव नंदकर यांनी प्रास्ताविक केले. राजस्विनी थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.
फोटो ओळ : शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी (डावीकडून) विजय कुलंगे, सुनील महाजन, शेखर गायकवाड, महेश भागवत, भारत सासणे, परशुराम वाडेकर, सुरेंद्रकुमार मानकोसकर, राजीव नंदकर.

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

0

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा समारोप एआय इम्पॅक्टवरील नवी दिल्ली जाहीरनामा स्वीकारून झाला, जो कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक सहकार्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या जाहीरनाम्याला 88 देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिली आहे, जी आर्थिक वाढ आणि सामाजिक हितासाठी एआयचा वापर करण्याबाबतची व्यापक जागतिक सहमतीची निदर्शक आहे.

एआयसाठी सामायिक जागतिक दृष्टीकोन

“सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” (सर्वांसाठी कल्याण, सर्वांसाठी आनंद) या तत्त्वानुसार, जाहीरनाम्यात असे अधोरेखित केले आहे की एआयचे फायदे संपूर्ण मानवजातीमध्ये समान रीतीने वाटले पाहिजेत.

ते यावर भर देते:

  • आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहु-भागधारकांच्या सहभागाला बळकटी देणे
  • राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आदर करणे
  • सुलभ आणि विश्वासार्ह चौकटींद्वारे एआयला पुढे नेणे

कृतीचे सात स्तंभ (चक्र)

  • एआय संसाधनांचे लोकशाहीकरण
  • आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याण
  • सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय
  • विज्ञानासाठी एआय
  • सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रवेश
  • मानवी भांडवल विकास
  • लवचिक, कार्यक्षम आणि नाविन्यपूर्ण एआय प्रणाली
  • प्रमुख जागतिक कामगिरीची घोषणा

या शिखर परिषदेने स्वयंसेवी, सहयोगी जागतिक उपक्रमांची मालिका सादर केली, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:

1. एआयच्या लोकशाही प्रसारासाठी सनद

  • मूलभूत एआय संसाधनांमध्ये परवडणाऱ्या प्रवेशास प्रोत्साहन देते
  • स्थानिकदृष्ट्या संबंधित नवोन्मेष परिसंस्थांना समर्थन देते

2. ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्स

  • जागतिक स्तरावर एआय वापराच्या केसेसचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी एक व्यासपीठ
  • विकासाच्या परिणामासाठी देशांतर्गत सहकार्य सक्षम करते

3. ट्रस्टेड एआय कॉमन्स

  • साधने, बेंचमार्क आणि सर्वोत्तम पद्धतींचे भांडार
  • सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय प्रणालींच्या विकासास समर्थन देते

4. विज्ञान संस्थांसाठी एआयचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क

  • जागतिक वैज्ञानिक सहकार्य सुलभ करते
  • एआय-चालित संशोधन क्षमता वाढवते

5. सामाजिक सक्षमीकरणासाठी एआय प्लॅटफॉर्म

  • ज्ञानाची देवाणघेवाण आणि प्रमाणशीर उपाय सक्षम करते
  • न्याय्य एआय अवलंबण्यावर लक्ष केंद्रित करते

6. एआय वर्कफोर्स डेव्हलपमेंट प्लेबुक आणि रीस्किलिंग प्रिन्सिपल्स

  • एआय कौशल्य, पुनर्कौशल्य आणि साक्षरतेला समर्थन देते
  • एआय-चालित अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रांना तयार करते

7. लवचिक आणि कार्यक्षम एआय बद्दल मार्गदर्शक तत्त्वे

  • ऊर्जा-कार्यक्षम एआय प्रणालींवर लक्ष केंद्रित करते
  • एआय इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्सवरील प्लेबुकद्वारे समर्थित
  • आर्थिक वाढ आणि कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करते

जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे:

  • आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यात एआयची भूमिका
  • मुक्त-स्रोत आणि सुलभ एआय परिसंस्थांचे महत्त्व
  • ऊर्जा-कार्यक्षम एआय पायाभूत सुविधांची आवश्यकता
  • विज्ञान, प्रशासन आणि सार्वजनिक सेवा वितरणात एआयची भूमिका वाढवणे
  • जागतिक सहकार्य मजबूत करणे

सहभागी सदस्यांनी खालील वचनबद्धतांचा पुनरुच्चार केला

  • एआय प्रशासनातील सामायिक जागतिक प्राधान्यक्रमांचा विकास
  • स्वयंस्फूर्त, चाकोरीबद्ध नसलेल्या आराखड्यांना प्रोत्साहन
  • सततच्या सहकार्यातून कल्पना प्रत्यक्षात आणणे

या शिखर परिषदेद्वारे दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय भागीदारीला चालना मिळेल आणि एआयला आर्थिक विकासाचा प्रमुख घटक बनेल अशी अपेक्षा आहे. 

88 देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी मंजूर केलेला शिखर परिषदेतील ठराव खालीलप्रमाणे

परिशिष्ट

एआय इम्पॅक्ट शिखर परिषद जाहीरनामा

नवी दिल्ली, 18-19 फेब्रुवारी 2026

प्रस्तावना

सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय (सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या सुखासाठी) या प्रेरणादायीतत्त्वाला अनुसरुन आमचा असा विश्वास आहे की, एआयचे फायदे जेव्हा मानवतेसाठी होतील तेव्हाच त्याचा खरा उपयोग होईल.

आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांचे व देशांचे सहभागी नवी दिल्लीत 19 फेब्रुवारी 2026 रोजी एआय इम्पॅक्ट शिकर परिषदेसाठी एकत्र आलो आहोत. एआयचे आगमन हा तंत्रज्ञान क्रांतीच्या आलेखावरील सर्वोच्च बिंदू आहे. आज आम्ही निवडलेले पर्याय एआय सक्षम विश्वाला आकार देतील. हा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी वारसा ठरेल.

आमच्या देशांमधील भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सर्व संबंधितांचा सहभाग एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या सात चक्रांभोवती केंद्रित ठेवण्याचा हा निर्धार आहे. मानवी भांडवलाचा विकास, सामाजिक सक्षमीकरणाच्या कक्षा रुंदावणे, एआय प्रणालींची विश्वासार्हता, एआय प्रणालींची उर्जा कार्यक्षमता, एआयचा विज्ञानात उपयोग, एआय संसाधनांचे लोकशाहीकरण आणि आर्थिक विकास व समाजकल्याणासाठी एआयचा उपयोग ही ती सात तत्त्वे आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय व अन्य उपक्रमांना पूरक म्हणून आम्ही राष्ट्रीय सार्वभौमतेचा मान राखत शिखर परिषदेतील सात चक्रांच्या आधारे एआयचा मानवतेच्या सेवेसाठी कसा वापर करता येईल याची माहिती एकमेकांसोबत सामायिक करू.

एआय संसाधनांचे लोकशाहीकरण

एआयच्या अंमलबजावणीसाठी आणि त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी गतिमान डिजिटल पायाभूत सुविधा आणि अर्थपूर्ण तसेच वाजवी दरातील इंटरनेट सुविधा ही प्राथमिक गरज आहे. वसुधैव कुटुम्बकम (हे विश्व एक कुटुंब आहे) या भावनेतून एआय संसाधनांचे रास्त दर आणि उपलब्धता यांच्या महत्त्वाची आम्हाला जाणीव आहे. सर्व देशांना नागरिकांच्या फायद्यासाठी एआयचा विकास, स्वीकार व अंमलबजावणी यासाठी सक्षम बनवणे महत्त्वाचे आहे.

या परिणामासाठी एआयच्या लोकशाहीकरणाच्या प्रसाराची सनद म्हणून आम्ही स्वयंस्फूर्त व चाकोरीबद्ध नसलेल्या आराखड्याची नोंद घेतली आहे. राष्ट्रीय कायद्यांचा आदर राखत मूलभूत एआय संसाधनांच्या उपलब्धतेला चालना, स्थानिक संदर्भातील नवोन्मेषाला पाठिंबा आणि लवचिक एआय परिसंस्था बळकटीकरण  ही या सनदेची वैशिष्ट्ये आहेत. 

आर्थिक वाढ आणि सामाजिक हित

एआय आणि एआय-आधारित अ‍ॅप्लिकेशन्सचा वाढता आवलंब यामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्याची अभूतपूर्व क्षमता आहे. ओपन-सोर्स एआय अ‍ॅप्लिकेशन्स आणि जिथे योग्य असेल तिथे इतर उपलब्ध होण्यायोग्य एआय दृष्टिकोन आणि एआय वापर प्रकरणांचा व्यापक प्रसार, क्षेत्रांत सर्वत्र एआय प्रणालींची स्केलेबिलिटी, पुनरावृत्तीक्षमता आणि अनुकूलनामध्ये योगदान देऊ शकतो.

आम्ही ग्लोबल एआय इम्पॅक्ट कॉमन्सची नोंद घेतो, हा स्वयंसेवी उपक्रम असून तो सर्व भागांमध्ये यशस्वी एआय वापर प्रकरणांचा अवलंब, अनुकरण आणि स्केलिंगला प्रोत्साहन आणि अवलंब शक्य करण्यासाठी व्यावहारिक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

सुरक्षित आणि विश्वासार्ह एआय

विश्वास निर्माण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त प्रमाणात सामाजिक आणि आर्थिक फायदे मिळण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि भक्कम एआयला प्रोत्साहन देणे ही मूलभूत बाब आहे. संभाव्य सुरक्षा पैलूंबद्दल आपली समज वाढवणे महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन आम्ही एआयच्या संपूर्ण जीवनचक्रात सार्वजनिक हिताला प्रोत्साहन देण्यासोबतच नवोन्मेषास वाव मिळण्यासाठी एआय प्रणालींमध्ये सुरक्षिततेचे महत्त्व, उद्योगांच्या-नेतृत्वाखाली स्वेच्छेने केलेल्या उपाययोजना आणि तांत्रिक उपायांचा अवलंब आणि योग्य धोरणात्मक चौकटींना मान्यता देत आहोत.

आम्ही तांत्रिक संसाधने, साधने, बेंचमार्क आणि सर्वोत्तम पद्धती एकत्रित करणाऱ्या, ज्याचा कोणालाही वापर करता येऊ शकेल आणि त्यांचे संदर्भ आत्मसात करता  येऊ शकतील अशा स्वयंसेवी आणि बंधनकारक नसलेल्या विश्वासार्ह एआय कॉमन्स या सहयोगी व्यासपीठ विकासाला; तसेच त्याच्या स्वयंसेवी मार्गदर्शक नोटला मान्यता देतो.

विज्ञान

सर्व देशांमध्ये एआय संशोधन पायाभूत सुविधांमधील संरचनात्मक अडथळे दूर करून आणि त्यांची उपलब्धता वाढवून वैज्ञानिक संशोधन आणि विकासात एआयचा वापर वाढवण्यास मदत होऊ शकेल हे आम्ही मान्य करतो. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहकार्यांमुळे अद्वितीय कौशल्य, दृष्टीकोन आणि संसाधने एकत्र आणून संशोधन आणि विकासात एआयची क्षमता खुली करता येऊ शकेल.

एआयच्या परिणामकारक अवलंबास गती देण्यासाठी, वैज्ञानिक समुदायांना जोडण्यासाठी आणि सर्व प्रदेशांतील सहभागी संस्थांमधील एआय संशोधन क्षमतांचा संचय करण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून विज्ञान संस्थांसाठी एआयच्या स्वयंसेवी आणि सहकार्यात्मक आंतरराष्ट्रीय नेटवर्कची आम्ही दखल घेतो.

सामाजिक सक्षमीकरणासाठी वापरासयोग्य

व्यक्तींना ज्ञान, परदेशी एआय सोल्यूशन्स, माहिती, सेवा आणि संधी उपलब्ध करून देऊन तसेच सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांमध्ये सहभाग वाढवून समाजाच्या सर्व घटकांची उन्नती करण्याची एआयमध्ये क्षमता आहे. सामाजिक सक्षमीकरणासाठी एआयचा अवलंब सुलभ करणाऱ्या सहकार्याचे महत्त्व आम्ही मान्य करतो.

सामाजिक सक्षमीकरणाकरिता एआयचा अवलंबात आणखी पुढे जाण्याच्यादृष्टीने  शिक्षण, ज्ञान आणि स्केलेबल पद्धतींचे आदानप्रदान करणे शक्य होऊ शकेल यासाठी स्वयंसेवी आणि सहकार्यात्मक व्यासपीठ विकसित होण्याची गरज आम्ही लक्षात घेत आहोत.

मानवी संपदा

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पूर्ण क्षमतेची पूर्तता करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील मानव संसाधन विकासाचा विस्तार, शिक्षण क्षेत्रातील विशिष्ट उपक्रम, एआय कार्यबल विकास, सार्वजनिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, एआय क्षमतांबद्दल जनजागृती वाढवणे, एआय साक्षरता वाढवणे तसेच व्यावसायिक आणि प्रशिक्षण परिसंस्थाचे उन्नतीकरण करून व्यक्तींना संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे.

एआय संदर्भात कौशल्य विकास आणि पुन:कौशल्य विकास उपक्रमांमध्ये अर्थपूर्ण आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देताना एआयच्या युगातील पुनर्कौशल्य विकासासाठी स्वैच्छिक मार्गदर्शक तत्त्वे आणि एआय कार्यबल विकासावरील प्लेबुकची नोंद घेतली जात आहे. हे उपक्रम सहभागींना एआय आधारित भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी तयारी करण्यात मदत करतील.

लवचिकता, नवोन्मेष आणि कार्यक्षमता

ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक संसाधनांवर एआयच्या वाढत्या मागण्यांची दखल घेत, आम्ही ऊर्जा कार्यक्षम एआय प्रणाली विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो. परवडणाऱ्या एआय प्रणालीमुळे एआयमध्ये व्यापक प्रवेश मिळू शकतो आणि स्थानिक नवोन्मेषाला गती मिळून सामायिक विकासात्मक उद्दिष्टांची पूर्ती करता येते येईल.

लवचिक, नवोन्मेषी आणि कार्यक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेवरील स्वयंसेवी मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला लवचिक आणि कार्यक्षम एआय प्रणालींच्या विकासासाठी मार्गदर्शन करतील, यांची आम्ही दखल घेतो. तसेच, लवचिक ए आय पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्लेबुकची ज्ञानसंपदा म्हणून नोंद घेतो, जे लवचिक एआय विकासाला पाठबळ देणारे संदर्भ साधन आहे.

निष्कर्ष

एआय इम्पॅक्ट शिखर परिषद आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि बहु-भागधारक दृष्टिकोन मजबूत करण्यास योगदान देईल, जेणेकरून सामायिक प्राधान्ये तसेच स्वैच्छिक आणि बंधनकारक नसलेल्या मार्गदर्शक सूचना आणि तत्त्वे पुढे नेली जातील, ज्या मानवतेकरिता समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी एआयला प्रोत्साहन देऊ शकतील, याची आम्ही दखल घेतो.

एआयचे लाभ साकार करण्यासाठी आमच्या सामायिक आकांक्षा पुढे नेण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत आणि इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 च्या तीन सूत्रांसाठी या आकांक्षांचे ठोस कृतींमध्ये रूपांतर करण्याकरिता सतत सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो.

पत्रकार विक्रांत आढाव यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध क्रीडा पत्रकार विक्रांत आढाव (वय ५२) यांचे आज (ता. २१) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, बहिण असा परिवार आहे.
त्यांच्यावर उद्या (ता. २२) दुपारी १२ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.एवढ्या कमी वयात झालेल्या त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. विक्रांत आढाव हे पुणे श्रमिक पत्रकार संघाचे भूतपूर्व कार्यकारणी सदस्य होते. त्यांनी स्पोर्ट्स आणि पॉलिटिकल रिपोर्टिंग केली. दै. केसरी, दै पुढारी, दै. संध्या येथे काम केले होते.
विक्रांत आढाव हे राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू तसेच वेटलिफ्टिंग चे खेळाडू होते. त्यांनी पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते.ते स्वतः नामांकित जलतरण प्रशिक्षक होते. त्यांनी अनेक उत्तम जलतरणपटू तयार केले
स प महाविद्यालय क्रीडा विभाग तसेच महाविद्यालय जलतरण तलाव चे आजीव सदस्य म्हणून ते कार्यरत होते.सलाम पुणे आणि mymarathi.net च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ..

विधिमंडळासाठी ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’ हवा 

दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांचे मत; १५ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन

पुणे, दि.२१ फेब्रुवारी: “ संसदेत जातांना कुठल्याही पक्षाचे नाही तर जनसामन्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे संसदेचे पावित्र्य राखावे. या ठिकाणी विवेक, संयम, तर्क-वितर्क, समस्यांच्या मुद्यांवर चर्चा असावी व ती खेळ भावना असावी. विधिमंडळासाठी एक ‘राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक’ असावा. ज्यामुळे प्रत्येक राज्यातील कामगिरी पारदर्शकपणे जनतेसमोर येईल. ज्यांचे मूल्यांकन ही ठोस निष्कर्षावर व्हावे.,” असे मत दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांनी व्यक्त केले. संसदेत संवाद, संस्कृती बळकट करण्यासाठी विधायक चर्चा आणि परस्पर आदर सन्मान आवश्यक असावे, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय १५व्या ‘भारतीय छात्र संसदेच्या’ उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह, वरिष्ठ पत्रकार व लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि जर्मनीच्या हॅम्बुर्ग येथील हवामान बदल व्यवस्थापनाचे प्रा. वॉल्टर लील फिल्हो हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, विद्यार्थी प्रतिनिधी सुमित खैरे, पायल झा, निखिल मिश्रा आणि अक्षिता सक्सेना उपस्थित होते.

यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात ’बेल ऑफ डेमोक्रसी’चा घंटानाद केला.

विजेंदर गुप्ता म्हणाले,“राजकारण आणि खेळ हे एकाच नाण्याचे दोन पैलू आहेत. संसदेमध्ये देशाचा विकास, परंपरा आणि भविष्य निर्मितीवर चर्चा व्हावी. खेळा मध्ये जसे देशाच्या झेंड्यासाठी खेळले जाते तसेच, राजकारणांनी यासाठीच कार्य करावे. लोकशाही हे पवित्र मंदिर आहे. येथे झालेले समाधान संपूर्ण समाजासाठी असते. दुर्देवाने आज राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. माध्यमांचीही जबाबदारी आहे की त्यांनी केवळ गोंधळ दाखवण्याऐवजी मुद्यांवरील चर्चेला प्राधान्य द्यावे.”

दिग्विजय सिंह म्हणाले, “राजकारणात ५६ इंच छाती नाही तर गरीब, पिडीत लोकांची सेवा करणे अत्यंत महत्वाचे आहे. राष्ट्रवाद म्हणजे द्वेष नव्हे, मी मुख्यमंत्री असतांना कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी द्वेषाचे राजकारण केले नाही. आताचे राजकारण हे द्वेषाचे आणि शत्रुत्वाचे आहे. राजकारणात खेळाडू वृत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत, धर्म जात नंतर आहे, कोणालाही देशद्रोही किंवा देशभक्त ठरवण्याचा अधिकार नाही. लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्याला संविधान वाचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.”

पद्मश्री राजदीप सरदेसाई म्हणाले,“ राजकारणात स्पर्धा असली तर ती खेळातील स्पर्धेसारखी असावी नियमबद्ध, सन्मानपूर्वक आणि पराभव स्वीकारण्याची तयारी असावी. देशातील सर्वात मोठी समस्या निर्माण झाल्यावर जो समोर येतो तोच खरा नेता असतो. निष्ठा आणि कष्ट केल्यानेच नव भारत निर्माण होऊ शकतो. राजकारण आणि खेळात शिस्त महत्वाची असून स्पोर्टस ऑफ स्पिरिट अत्यंत गरजेचे आहे. ”

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “जगात भरपूर तणाव आणि अशांतता आहे. अशावेळी जगातील देशांचे लक्ष आपल्या भारताकडे लागले आहे. भारताला विश्वगुरू होण्यासाठी आपल्याला जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. वसुधैव कुुटुंम्बकम च्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतता निर्माण होऊ शकते.”

डॉ. राहुल कराड म्हणाले,“ या संसदेच्या माध्यमातून लोकशाहीचे बळकटीकरण होत असून, समाजामध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. राजकारण दिसते तेवढे सोपे नाही. त्यामध्ये राजकारणी लोकांना खूप कष्ट घ्यावे लागतात. राजकारणात उच्च शिक्षित युवा प्रतिनिधी यायला हवे, या उद्देशाने छात्र संसदेची सुरुवात झाली आहे.”
यानंतर प्रा. वाल्टर लील फिल्हो यांनी शाश्वत विकासावर विचार व्यक्त केले.

तसेच पूर्व केंद्रीय मंत्री शिवराज पाटील आणि पद्मश्री मार्क टुली यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.

डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.

डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रसाद खांडेकर यांनी आभार मानले.

.

‘माझी वसुंधरा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

0

पर्यावरणविषयक मोहिमेची कृषि क्षेत्राशी सांगड घालावी
राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आवाहन : माझी वसुंधरा हे ईश्वरीय कार्य

मुंबई, दि. २१ : पर्यावरण रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माझी वसुंधरा अभियानाला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे. भावी पिढीच्या निरोगी आयुष्यासाठी जनसामान्यांच्या मदतीने हाती घेतलेले हे ईश्वरीय कार्य आहे, असे उद्गार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काढले. रासायनिक शेती, पर्यावरणीय बदल आरोग्यासाठी घातक असून या अभियानाची कृषि क्षेत्राशी सांगड घालण्याची गरज अधोरेखित करून नैसर्गिक शेतीचा पुरस्कार करण्याचे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यावेळी केले.

वरळी एनएससीआय डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आयोजित माझी वसुंधरा राज्यस्तरीय सन्मान सोहळा राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी माझी वसुंधरा मिशन 4.0 आणि 5.0 अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यावरणासाठी शासन स्तरावर पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणात आणि प्रभावी पद्धतीने मोहिम राबविल्याबद्दल पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचे राज्यपाल श्री. देवव्रत यांनी अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, पर्यावरण रक्षण हे संपूर्ण जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढू लागले आहे. नैसर्गिक संकटं ओढावण्याची भिती जागतिक पातळीवर व्यक्त केली जात आहेत. निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करणे हे जीवसृष्टीसाठी महत्वाचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य हे ईश्वरीय सेवा आहे असेही राज्यपाल यांनी सांगितले.

पर्यावरण रक्षणासाठी राज्यपालांनी यावेळी पंचसूत्री मांडली. पर्यावरणाचे संवर्धन विकास धोरणाच्या केंद्रस्थानी ठेवून, प्रत्येक विकास प्रकल्पात “ग्रीन ऑडिट” अनिवार्य करावे. स्थानिक पातळीवर हरित अर्थव्यवस्थेला चालना देऊन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी “ग्रीन बजेट” तयार करावे आणि कचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचे संकलन तसेच नैसर्गिक शेतीला आर्थिक प्रोत्साहन द्यावे. पर्यावरण शिक्षणास प्रोत्साहन देवून, माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून जनसहभागाला चळवळीचे स्वरूप द्यावे आणि प्रत्येक नागरिक “क्लायमेट वॉरियर” बनावावा. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वृक्षारोपण, जलसंधारण आणि प्रदूषण नियंत्रणाची रिअल-टाइम पाहणी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित होईल. “माझी वसुंधरा” अभियान हे सर्वांनी ध्येय म्हणून स्वीकारल्यास नक्कीच अपेक्षित बदल घडेल, असा विश्वासही राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

माझी वसुंधरा’ अभियान लोकचळवळ व्हावी
– उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

पृथ्वी, वायू, जल, अग्नि आणि आकाश या पंचतत्त्वांचं जतन करणं आपली संस्कृती आणि कर्तव्य आहे. हवामान बदलाचं संकट आपल्यासमोर उभं असताना ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून केलेली वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाची कामे कौतुकास्पद आहेत. ‘माझी वसुंधरा’ हे अभियान नाही तर लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा विचार करत असताना आपल्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. निसर्गाच्या बाबतीत त्यांच्या मनात असलेलं हळवेपण आपण सर्वांनी अनेकदा बघितलं आहे. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. विकास केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित न ठेवता, शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भावी पिढ्यांचा विचार करणारा असावा, हे दिवंगत अजित दादांचं स्वप्न होतं.

महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य आहे. शेतीची निर्भरता निसर्गावर अवलंबून आहे. जमीन,पाणी, हवा या नैसर्गिक घटकांवर शेती अवलंबून असते. त्यामुळे वातावरण बदलामुळे सर्वात जास्त नुकसान शेतीच होतं. याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत, वैज्ञानिक नियोजन आणि लोकसहभागातून वातावरण अनुकूल महाराष्ट्र घडवावा आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित, हरित आणि सक्षम महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करुन माझी वसुंधरा अभियानमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व पुरस्कारप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांचं उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी अभिनंदन केले.

शाश्वत विकासातुन सक्षम महाराष्ट्र घडविण्यास कटिबद्ध
– पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्राचा विकास पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असला पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध कृती, संस्थात्मक बळकटी आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून आपण शाश्वत विकासातून सक्षम महाराष्ट्र घडविण्यास कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

आज “माझी वसुंधरा” अभियानामुळे पर्यावरण संरक्षण हा विषय प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे राज्यात शाश्वततेची मजबूत पायाभरणी होत आहे. राज्य शासनाने पर्यावरणीय प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान या राज्यव्यापी उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. जैविक शेती ही अभियान पुढच्या टप्यात राबविण्यात येणार असून नैसर्गिक शेतीचा अवलंब करून सुपीक जमीन, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवेसाठी पर्यावरणरक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम’ या सिद्धांतावर भारताचा दृढ विश्वास आहे. पर्यावरण रक्षण या सिद्धांताचाच एक भाग असून, या अभियानास स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळत असलेला प्रतिसाद नक्कीच कौतुकास्पद आहे. निसर्ग संपत्ती ही आपणास वारसा पद्धतीने पूर्वजांकडून ऋण स्वरूपात मिळाली आहे. ती सुस्थितीत पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरीकांची असून या पर्यावरण संवंर्धन मोहिमेत प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. नार्वेकर यांनी केले.

या प्रसंगी माझी वसुंधरा अभियानावर आधारित माहितीपट सादर करण्यात आला. तसेच अभियानातील यशोगाथांवर आधारित “कॉफी टेबल बुक” आणि “द क्लायमेट चेंज लेक्सिकॉन” (मराठी-इंग्रजी पर्यावरण शब्दकोश) यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पुरस्कार – ग्रामपंचायत (एकूण 18 स्थानिक संस्था), राज्यस्तरीय द्वितीय, तृतीय, उंच उडी आणि उत्तेजनार्थ पुरस्कार (एकूण ४५), राज्यस्तरीय द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार (एकूण 34 स्थानिक स्वराज्य संस्था) नगर परिषद व नगर पंचायत गट यांना पुरस्कारांनी संस्थां आणि अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
000

भाजप कार्यालयासमोर फुले उधळून राहुल गांधींना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा केला निषेध

दादर येथे भाजप कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोषणाबाजी

मुंबई, दि. २१ फेब्रुवारी २०२६
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दादर येथील वसंत स्मृती या भाजपा कार्यालयासमोर पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून प्रचंड घोषणाबाजी करत भाजपच्या आंदोलनाला चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी युवक कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणा-यांचा भाजप कार्यालयासमोर फुले उधळून निषेध केला.

आज सायंकाळच्या सुमारास मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस आंदोलन करणार असल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. पोलिसांची दडपशाही मोडून काढत झीनत शबरीनं यांच्या नेतत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयसमोर पोहोचून तीव्र घोषणाबाजी केली आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या प्रकाराचा भाजपच्या कार्यालयासमोर फुले उधळून अनोख्या पद्धतीने निषेध केला. पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन भोईवाडा पोलीस स्थानकात नेले.

यावेळी बोलताना झीनत शबरीनं म्हणाल्या की, आंदोलनादरम्यान आम्ही भाजपा कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून “द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला महाराष्ट्रात स्थान नाही,” असा स्पष्ट संदेश दिला. लोकशाहीत वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र हिंसेच्या धमक्या देणे हे लोकशाहीच्या मूल्यांवर आघात आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली पाहिजे. युवक काँग्रेस लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने लढा देत राहील.”
पोलीस भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन करायला मोकळी सूट देतात मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करतात. आंदोलन करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतात, घरातून पोलीस घेऊन जातात. पण राहुल गांधी विरोधात भाजप जेव्हा आंदोलन करते तेव्हा पोलीस गायब असतात. पोलिसांनी युवक काँग्रेसवर दडपशाही करण्यापेक्षा राहुल गांधींना गोळ्या घालून जीवे मारण्याच्या धमक्या देणा-यांवर कारवाई केली पाहिजे असे शबरीनं म्हणाल्या.

गुलटेकडीत अल्पवयीन मुलांनी रेग्युलर खंडणीसाठी केला हवेत गोळीबार, म्हणाले, आम्हीच इथले भाई …

पुणे: गुलटेकडी परिसरात अल्पवयीन मुलांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करत दहशत माजवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात २० फेब्रुवारी रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास चार अल्पवयीन दुचाकीवरून आले. त्यांनी नागरिकांना ‘आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल,’ असे धमकावले.

यावेळी त्यांनी त्यांच्याकडील पिस्तूल उगारून दहशत निर्माण केली. नागरिकांना शिवीगाळ करत त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला आणि शस्त्राचा धाक दाखवला. या घटनेनंतर अल्पवयीन मुले दुचाकीवरून पसार झाली.

गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आणि पसार झालेल्या चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आमदारांकडून विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी अभ्यास दौरा मार्गदर्शक – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा वेल्स अभ्यास दौरा यशस्वी;

सहभागी सदस्यांना सर्टिफिकेटचे वितरण

मुंबई दि.२१: राष्ट्रकुल संसद परिषद (CPA) आणि वेल्स विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांसाठी आयोजित अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण झाला. या दौऱ्यात सहभागी सदस्यांना त्यांचे प्रमाणपत्र नॅशनल लिबरल क्लब येथे वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला CPA चे उपसचिव जनरल जार्विस मटिया, जोनाथन ग्रे, अध्यक्ष, राष्ट्रकुल नेतृत्व संस्था .आयन बॅसेट,जागतिक नातेसंबंध , युडब्लुएसटीडी , ईडब्ल्यूएसटीडी चे प्रो. जेरेमी स्मिथ यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन चैतन्य मारपकवार यांनी केले होते.

विधानपरिषद सभापती राम शिंदे व ऊपसभापती नीलम गोर्हे यांची या समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. यासमारंभात मंत्री आदिती तटकरे, आमदार बाबासाहेब देशमुख, विश्वजीत कदम, नमिता मुंदडा, स्नेहा दुबे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम पाचपुते, विक्रांत पाटील, सुमित वानखेडे, मनीषा कायंदे, निरंजन डावखरे, वरुण सरदेसाई, परिणय फुके, विक्रम काळे आदी विधिमंडळ सदस्यांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुभारंभ विचार (ओपनिंग रिमार्क ) केले. त्या म्हणाल्या, “विधिमंडळाचे दैनंदिन कामकाज करताना जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविला जातो. त्यामागे सदस्यांची पार्श्वभूमी असते. परंतु जागतिक दृष्टिकोन वाढवणे आणि विविध प्रश्नांसाठी व्यासपीठ मिळणे यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात सर्व सदस्यांचा शंभर टक्के सहभाग होता.
वेल्स अभ्यास दौर्‍यामुळे विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्यास निश्चितच मदत होईल.”

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “येणाऱ्या काळात राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या च्या वतीने असे उपक्रम राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राबविले जावेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सहकार्य लाभले. तसेच सांस्कृतिक मंत्री आणि राष्ट्रकुल संसदिय मंडळ खजिनदार ना. आशिष शेलार यांचेही विशेष सहकार्य मिळाले.”

सहभागी आमदारांनी या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवांचा अहवाल तयार करून विधिमंडळ कार्यालयात सादर करावा, असे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले. यामुळे भविष्यातील अशा दौर्‍यांमध्ये सुधारणा करणे शक्य होईल.

हा दौरा शाश्वत विकासासाठी नेतृत्व, जागतिक नागरिकत्व आणि संसदीय कार्यपद्धती यासंदर्भात ज्ञानवृद्धी करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. सदस्यांनी वेल्श संसद यांसह विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि अनुभव घेतले.

पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसचे आंदोलन

अनेक पदाधिकारी डिटेन

पुणे, दि. २१ फेब्रुवारी :

AI Summit दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील व इतर करार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे डेक्कन येथील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. “PM is Compromised” हा मुद्दा घेऊन युवक काँग्रेस देशभर आंदोलन करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Epstein फाइल्समधील कथित खुलासे, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख, तसेच संसदेत या विषयांवर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार देशहिताचे प्रश्न टाळत असून अमेरिकेसोबतच्या ट्रेड करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, AI Summit दरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेकांना ताब्यात (डिटेन) घेण्यात आले आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीब यांनाही अटक करून कोणतीही स्पष्ट कारणे न देता डिटेन केल्याचा आरोप करण्यात आला. अद्याप काही पदाधिकाऱ्यांची सुटका झालेली नसल्याचेही सांगण्यात आले.

हे आंदोलन महाराष्ट्राचे प्रभारी अजय चीकारा व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यानंतर सहप्रभारी शांभवी शुक्ला यांनी “PM कॉम्प्रमाईज आहेत हे देशाला कळण्यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण देशभर आंदोलन करेल,” असे सांगितले.

यावेळी सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलनाच्या समयी युवक कॉंग्रेस विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

 प्रथमेश आबनावे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस) :

“देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून देशहिताला तिलांजली दिल्याचा गंभीर प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे. संसदेत चर्चा न करता मुद्दे दडपले जात आहेत.”

“जनतेच्या हितासाठी आम्ही आंदोलन केले; मात्र शांततेत आंदोलन करूनही आमच्या पदाधिकाऱ्यांना डिटेन करणे हे लोकशाहीविरोधी आहे.”

 सौरभ आमराळे (शहराध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेस) :

“लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे. सरकार उत्तर देण्याऐवजी दडपशाही करत आहे.”

“सत्य बाहेर येईपर्यंत युवक काँग्रेस आंदोलन सुरू ठेवेल.”

 उमेश पवार (अध्यक्ष, पुणे जिल्हा युवक काँग्रेस)

“देशहिताच्या गंभीर मुद्द्यांवर संसदेत चर्चा टाळली जात आहे, म्हणून युवक रस्त्यावर उतरले आहेत.”

“शांततापूर्ण आंदोलनावर कारवाई म्हणजे लोकशाहीचा गळा घोटणे आहे.”

 कौस्तुभ नवले (अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस)

“सरकारने पारदर्शक भूमिका जाहीर करावी; आंदोलन दडपून प्रश्न संपणार नाहीत.”

“युवक काँग्रेस देशहितासाठी लढा सुरूच ठेवणार आहे.”

आंदोलनादरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आंदोलनात सहभागी कार्यकर्ते

विवेक कडू, कुणाल काळे, यश कोलते, अक्षय नवगिरे, ऋषिकेश थोरात, सागर धाडवे, आनंद दुबे, सद्दाम शेख, निखिल मलके, रमेश सातपोते, निखिल मलके, मेघशाम धर्मावत, प्रदीप मेहकरे, विकास सुपणर, चैतन्य जयभाये, स्वप्नील बनसोडे, रोहित पाटोळे, स्वरूप केदारी, वीरधवल गाडे, गणेश सहाणे, औदुंबर आगलावे, स्वप्नील शेलार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाच्या २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देणारे भाषण सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या राज आमेरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होते.यावेळी निषेध व्यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी संसदेत देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न उपस्थित केल्याने भाजप अस्वस्थ झाली आहे. संसदेत निशिकांत दुबे यांनी वापरलेली भाषा पूर्णपणे चुकीची असून, ती कायद्याचे उल्लंघन आणि संविधानविरोधी भाजपची भूमिका दर्शवते, असे शिंदे यांनी म्हटले.

शिंदे यांनी आरोप केला की, याच पार्श्वभूमीवर लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांचा हस्तक राज आमेरा राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देऊ शकतो. ते म्हणाले, ‘महात्मा गांधींना मारणारी विचारधारा हीच होती. नथुराम गोडसे तेव्हाही होता आणि आजही आहे, पण राहुल गांधी कोणालाही घाबरत नाहीत.’

देशहितासाठी आणि लोकहितासाठी राहुल गांधी सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या बाजूने उभे आहेत, त्यामुळेच भाजप आणि त्यांची विचारधारा द्वेष पसरवत आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता राहुल गांधींचे संरक्षण करण्यास सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले. या पसरवल्या जाणाऱ्या द्वेषातून राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागल्यास हा देश पेटल्याशिवाय राहणार नाही, याची भाजपने नोंद घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, खजिनदार ॲड. अभय छाजेड आणि पुणे शहर उपाध्यक्ष प्राची दुधाने यांनीही निषेधपर भाषणे केली. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, वीरेंद्र किराड, सुनील मलके, मेहबूब नदाफ, अमीर शेख, सुनील शिंदे, राज अंबिके, नगरसेवक साहिल केदारी, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, द. स. पोळेकर, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सीमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्हाळ, प्रियंका मधाळे, अनिता धिमधिमे, कांचन बालनायक आदी उपस्थित होते.

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

0

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ् असून या करिता महाराष्ट्रात एप्रिल पासून मतदार याद्यांच्या विशेष व्यापक पुनरावलोकनाच्या (एसआयआर) गणना करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल मतदार पुनरीक्षण होणार आहे. 2002 – 2004 नंतर समाविष्ट मतदारांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणार असून निष्पन्न बोगस मतदारांना वगळण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय गणिते बदलणार आहे. ज्या राजकीय पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी बोगस मतदारांना पाठीशी घातले आहे त्यांचे भविष्यातील राजकारण संपुष्टात येणार असल्याने त्याचा खरा लाभ कोणाला होणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. 

सन 2002 टे 2004 मधील मतदारयादीतील मतदारांची संख्या महाराष्ट्रात 6 कोटी 59 लाख 65 हजार 792 इतकी होती. आणि सन 2024 मध्ये 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 इतकी झालेली होती. त्यामुळे 3 कोटी 1लाख 59 हजार 327 मतदारांची सखोल पडताळणी होऊन त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तर 6 कोटी 59 लाख 65 हजार 792 मतदारांची सत्यता तपासून त्यामधील मृत व स्थलांतरित नावे हटविण्यात येणार आहेत. तर पुणे जिल्ह्यामध्ये 88 लाख 49 हजार 590 मतदारांची सखोल पडताळणी करण्यात येणार आहेत. सन 2002 टे 2004 मध्ये मुळ मतदारयादीत पुणे जिल्ह्यामध्ये 51 लाख 57 हजार 666 इतके मतदार होते. यामधील तदनंतरच्या काळात समाविष्ट झालेले सुमारे 36 लाख 91 हजार 924 मतदारांची सखोल पडताळणी होऊन त्यांना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर सन 2002 मधील मतदार यादी उपलब्ध करुन दिलेली असून सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली अद्यावत मतदार यादीशी तुलना करुन सखोल पडताळणी केली जाणार आहे. मतदार यादीशी तुलना करणे अतिशय अवघड कार्य आहे कारण 2009 मध्ये मंतदारसंघांची पुनर्रचना झालेली असून नावे व रचना बदललेली आहे. मतदार यादीशी तुलना करणारे अवघड काम पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे अर्थात प्राब संस्थेने केलेले असून मतदारसंघ व मतदान केंद्र निहाय तुलनात्मक यादी तयार केलेली आहे जेणेकरुन राजकीय पक्षांच्या बीएलए आणि शासन नियुक्त बीएलओ यांच्यासाठी उपयुक्त आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने गुरुवारी दिल्लीसह २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष सघन सुधारणा (एसआयआर) संबंधित तयारीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले. ‘एसआयआर’ची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना समाविष्ट केले जाईल. दिल्ली, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओदिशा, पंजाब, सिक्कीम, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदिगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव येथे ‘एसआयआर’ची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

विरोधी पक्ष काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपांना तोंड देत, निवडणूक आयोगाने यावर्षी १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार यादीचा ‘एसआयआर’ आणि आसाममध्ये विशेष सुधारणा आयोजित केली. निवडणूक आयोगातर्फे राबवली जाणारी ही प्रक्रिया बिहारमध्ये पूर्ण झाली असली तरी, जवळपास ६० कोटी मतदारांसह १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ती सुरू आहे. उर्वरित ४० कोटी मतदारांना या १७ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांमध्ये समाविष्ट केले जाईल. आसाममध्ये ‘एसआयआर’ऐवजी ‘विशेष सुधारणा’ १० फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आली. विविध कारणांमुळे, नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एसआयआर’ वेळापत्रकात वारंवार बदल करण्यात आले आहेत.

बिहारप्रमाणेच, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांनी ‘एसआयआर’ला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अलिकडेच, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यातील मतदार यादी स्वच्छतेच्या मोहिमेविरुद्ध भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर वैयक्तिकरित्या बाजू मांडली. बिहारमध्ये निवडणूक आयोग ‘एसआयआर’ची तयारी करत असताना, त्यांच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता की बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमधील अनेक नागरिक त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना सापडले. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या दाव्यांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांशी जुळवून न घेणाऱ्या मतदारांना लक्ष्य करण्यासाठी ‘एसआयआर’राबवण्याचा डाव असल्याचे म्हटले होते.

बनावट मतदार याद्या रोखण्यासाठी आणि बनावट मतदारांची नावे वगळण्यासाठी, निवडणूक आयोगाने आता देशभरात विशेष सघन पुनरावृत्ती ‘एसआयआर’करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी ही घोषणा करण्यात आली असून निवडणूक आयोगाचे सचिव पवन दिवाण यांनी २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून ‘एसआयआर’ची तयारी लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे की, दिल्ली आणि कर्नाटकसह २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एसआयआर’प्रक्रिया एप्रिलमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये एसआयआर आयोजित केला. त्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर सुरू आहे, जो २८ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होईल. काही राज्यांसाठी अंतिम मसुदे प्रसिद्ध झाले आहेत, तर काहींमध्ये सुधारणा सुरू आहेत. यामध्ये मतदार यादीत नवीन मतदार जोडणे आणि मृत मतदारांना वगळणे समाविष्ट आहे. एसआयआर नियोजित असलेल्या राज्यांमध्ये, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तेलंगणामध्ये २०२८ मध्ये विधानसभा निवडणुका होतील.

आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश चंदीगड दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर झारखंड कर्नाटक लडाख महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड दिल्ली ओडिशा पंजाब सिक्कीम त्रिपुरा तेलंगणा उत्तराखंड या २२ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 

स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे काय?

मतदार यादीतून नावे जोडण्याच्या आणि काढून टाकण्याच्या प्रक्रियेला विशेष सघन पुनरावृत्ती म्हणतात. ही निवडणूक आयोगाकडून कधी लहान प्रमाणात तर कधी मोठ्या प्रमाणात केली जाते. या प्रक्रियेत १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नवीन मतदारांची भर पडते. मृत मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जातात. याव्यतिरिक्त, ही प्रक्रिया मतदारांची नावे, फोटो, पत्ते इत्यादींमधील चुका दुरुस्त करते. निवडणूक आयोगाने १९५१ ते २००४ दरम्यान सुमारे आठ वेळा एसआयआर केले. शेवटचा एसआयआर २१ वर्षांपूर्वी, २००२ ते २००४ दरम्यान पूर्ण झाला होता.

२२ राज्यांमध्ये‘एसआयआर’कधी लागू होईल?

निवडणूक आयोगाने अद्याप या २२ राज्यांमध्ये एसआयआर सुरू होण्याची तारीख जाहीर केलेली नाही. सध्या, सर्व राज्यांमधील अधिकाऱ्यांना तयारी सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा की राज्य अधिकारी एसआयआर आयोजित करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ), मतदान केंद्रे इत्यादींना अंतिम स्वरूप देतील. त्यानंतर एक अधिसूचना जारी केली जाईल. या अधिसूचनेत एसआयआर सुरू करण्याच्या, मसुदा प्रसिद्ध करण्याच्या, हरकती स्वीकारण्याच्या आणि अंतिम यादी प्रसिद्ध करण्याच्या तारखा नमूद केल्या जातील.

देशात ‘एसआयआर’चा काय फायदा होईल?

एसआयआरचा प्राथमिक उद्देश परदेशी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या जन्मस्थळाची पडताळणी करणे आणि त्यांना बाहेर काढणे आहे. बांगलादेश आणि म्यानमारसह विविध राज्यांमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई सुरू असल्याने हे पाऊल महत्त्वाचे आहे. बिहारनंतर इतर राज्यांमध्ये एसआयआर आयोजित केल्याने बनावट मतदार आणि फसव्या कारवाया उघड होण्यास मदत होईल. यामुळे प्रणालीमध्ये पारदर्शकता येईल. निवडणूक आयोगाने एसआयआरसाठी बिहारच्या २००३ च्या मतदार यादीचा वापर केला त्याप्रमाणे अंतिम एसआयआर कट-ऑफ डेट म्हणून काम करेल. बहुतेक राज्यांनी २००२ ते २००४ दरम्यान शेवटचे एसआयआर केले होते. दिल्लीने २००८ मध्ये आणि उत्तराखंडने २००६ मध्ये एसआयआर केले होते.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, एसआयआरसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर १ हजार मतदार नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) असेल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अनेक मतदान केंद्रे स्थापन केली जातील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) असेल. ईआरओ हा मूलतः उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) दर्जाचा अधिकारी असेल. याव्यतिरिक्त, प्रत्येक तहसीलमध्ये सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी असतील. ईआरओच्या निर्णयाविरुद्धचे पहिले अपील जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर ऐकले जाईल, तर दुसरे अपील राज्य/केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऐकतील.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

एसआयआर दरम्यान, तुम्हाला तुमची ओळख आणि निवासी पत्ता यांचा पुरावा द्यावा लागेल. वैध कागदपत्रांमध्ये तुमचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र, वीज, पाणी किंवा गॅस बिल, बँक पासबुक, मनरेगा जॉब कार्ड आणि २००२ च्या मतदार यादीची प्रत समाविष्ट आहे. तुमची ओळख आणि कायमचा पत्ता पडताळण्यासाठी हे कागदपत्रे आवश्यक आहेत.

नागरिकत्व पडताळणीसाठी कोणते कागदपत्रे वैध आहेत?

१. जन्म प्रमाणपत्र: मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असलेले हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. जन्म प्रमाणपत्र हे सिद्ध करते की तुमचा जन्म भारतात झाला आहे आणि तुम्ही भारताचे नागरिक आहात. जन्म प्रमाणपत्र महानगरपालिका, पंचायत किंवा मान्यताप्राप्त सरकारी संस्थेने जारी केले पाहिजे.

२. पासपोर्ट: ओळखपत्र म्हणून भारत सरकारने जारी केलेला वैध पासपोर्ट आवश्यक आहे. मतदार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही हे ओळखपत्र म्हणून सादर करू शकता.

३. हायस्कूल मार्कशीट किंवा प्रमाणपत्र: हे तुमचे ओळखपत्र म्हणून देखील काम करू शकते. त्यात तुमची जन्मतारीख असते. तुमचे हायस्कूल मार्कशीट किंवा प्रमाणपत्र मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाने जारी केलेले असणे आवश्यक आहे.

४. सरकारी सेवा ओळखपत्र किंवा पेन्शन ऑर्डर: जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला किंवा पेन्शनधारकाला मतदार कार्ड बनवायचे असेल तर हे कागदपत्र त्यांच्यासाठी आहे.

५. कायमस्वरूपी रहिवासी पुरावा: हा जिल्हा दंडाधिकारी (डीएम) किंवा अशा अधिकाऱ्याने जारी केला पाहिजे.

६. वन हक्क प्रमाणपत्र: आदिवासी किंवा वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

७. जात प्रमाणपत्र: हे दस्तऐवज समाज कल्याण विभाग किंवा अशा अधिकाऱ्याने जारी केले पाहिजे.

८. एनआरसी दस्तऐवज: हा राष्ट्रीय नागरिक नोंदणी अंतर्गत जारी केलेला दस्तऐवज आहे.

९. कुटुंब नोंदणी: तुम्ही ते महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतसारख्या सार्वजनिक संस्थेकडून बनवू शकता.

१०. जमीन किंवा घर वाटप पत्र: हे कोणत्याही सरकारी विभागाने जारी केलेले दस्तऐवज आहे.

११. पीएसयू कार्ड: हे १९८७ पूर्वी सरकारी विभागात किंवा सार्वजनिक क्षेत्रातील युनिटमध्ये (पीएसयू) नोकरी करणाऱ्यांना दिले जात होते.

१२. आधार कार्ड: आतापर्यंत मतदार यादीत नावे जोडण्यासाठी फक्त वर सूचीबद्ध केलेली कागदपत्रे वैध होती, परंतु अलीकडील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, आधार कार्ड देखील वैध कागदपत्रांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ते यादीत १२ व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे.

कागदपत्रे दाखवण्यापासून कोणाला सूट दिली जाईल?

ज्यांची नावे २००२ च्या यादीत आहेत त्यांना फक्त फॉर्म आणि २००२ च्या यादीची प्रिंटआउट सादर करावी लागेल. इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. जर एखाद्या मतदाराचे नाव २००२ च्या मतदार यादीत नसेल, परंतु त्यांच्या पालकांची नावे यादीत असतील, तर त्यांना ओळखपत्र आणि त्यांच्या पालकांची नावे २००२ च्या यादीत असल्याची पुष्टी करणारे प्रमाणपत्र मतमोजणी फॉर्मसोबत सादर करावे लागेल.

फक्त कागदपत्रे न दिल्याने मतदार यादीतून नाव वगळले जाणार नाही. बीएलओ मतदाराशी संपर्क साधेल. जर व्यक्तीची ओळख आणि कायमचे निवासस्थान पडताळता आले नाही तरच नियमांनुसार पुढील कारवाई केली जाईल. आयोगाच्या मते, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे आणि प्रत्येक मतदाराला संधी दिली जाईल. जर तुमचे नाव मतदार यादीतून काढून टाकले गेले असेल, तर तुम्ही प्रथम ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता. हे करण्यासाठी, राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) ला भेट द्या आणि ‘तक्रार नोंदवा’ किंवा ‘सूचना शेअर करा’ विभागात लॉग इन करा. एकदा लॉग इन केल्यानंतर, तुमची तक्रार सबमिट करा. जर तुमचे आधीच खाते नसेल, तर तुम्हाला वेबसाइटवर एक खाते तयार करावे लागेल.

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा चौथा टप्पा

पुणे : जेव्हा सेवा हीच साधना ठरते आणि निसर्गाविषयी संवेदनशीलता जीवनाचा मूलमंत्र बनते, तेव्हा समाजाला नवी दिशा देणारे पवित्र संकल्प जन्माला येतात. मानवसेवा व लोककल्याणाच्या या दिव्य भावनेला साकार रूप देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा भव्य शुभारंभ रविवार, 22 फेब्रुवारी 2026, सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत, परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी करण्यात येणार आहे.

या अभियाना अंतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, हा विशाल उपक्रम देशभरातील 1500 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाईल. या महामोहिमेचे हे अभूतपूर्व प्रमाण या मोहिमेला ऐतिहासिक स्वरूप देईल, ज्यामुळे जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल.

पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे हि जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन 2023 मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता, तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल — जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.

नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने आपल्या पहिल्या तीन टप्प्यांत सेवा, समर्पण व सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. याच यशामुळे प्रेरित होऊन हा चौथा टप्पा अधिक व्यापक, संघटित व दूरदृष्टीपूर्ण स्वरूपात राबविला जात आहे, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकात निसर्गाबद्दल जागरूकता व सहभागाची सशक्त भावना निर्माण होईल.

मधुर समूह गायन, जनजागृती चर्चासत्रे आणि सोशल मीडिया मोहिमेद्वारे जलजन्य आजार आणि स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे.जेव्हा मन निर्मळ असते तेव्हाच निसर्ग स्वच्छ राहतो, आणि जेव्हा सेवेत समर्पण असते तेव्हा समाजाचे नवनिर्माण होते हे अभियान त्याच संकल्पनेला बळ देणारे आहे .

सतगुरु माताजींचा संदेश सदैव हाच राहिला आहे की, आपण ही पृथ्वी पुढील पिढ्यांसाठी अधिक सुंदर, स्वच्छ आणि संतुलित स्वरूपात जपून ठेवली पाहिजे. ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान त्या पवित्र संकल्पाचे मूर्त स्वरूप आहे, जे समाजाला निसर्ग, समाज व आत्म्याशी जोडून करुणा, समतोल आणि सौहार्दपूर्ण भविष्याच्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल.

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी:

भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात बंडखोरी करणा-या नारायण चौधरी आणि त्यांच्याबरोबरच्या नगरसेवकांवर कारवाई केली जाणार असल्याची घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केली. भाजपाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, महापौरपदासाठी भिवंडीच्या स्थानिक समितीकडून बहुमताने नारायण चौधरी यांचे नाव पाठविण्यात आले होते. त्यानुसार पक्षाकडून श्री. चौधरी यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र ब-याच चर्चेअंती अखेर स्थानिक पातळीवर कुठल्याही स्वरुपाचे वाद टाळण्यासाठी भाजपा प्रदेश स्तरावर स्नेहा पाटील यांना पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. श्री.चौधरी यांचे कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्यासोबतचे स्थानिक पातळीवरचे मतभेद लक्षात घेता वाद टाळण्यासाठी महापौर पदाचा उमेदवार बदलण्याचा निर्णय प्रदेश स्तरावर पक्षहितासाठी घेण्यात आला. त्यानंतरही नाराज असलेल्या श्री. चौधरी आणि त्यांच्या बरोबरच्या नगरसेवकांनी बंडखोरी करू नये यासाठी अखेरपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्या प्रयत्नांना यश आले नाही असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. बंडखोरी करणाऱ्या सर्व नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

अपघाताने दिव्यांगत्व आलेल्या अनेक चेहऱ्यांवर ना. पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा उमलले हासू

पुणे: समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे कोथरुडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकारामुळे पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी ना. पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, फ्युप्रो, मिशेलिन आणि समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात एक विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना आज फूट आणि आधुनिक कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले.

कधी काळी दुसऱ्याच्या आधाराशिवाय एक पाऊलही टाकू न शकणारे बांधव जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत दाटलेले आनंदाश्रू चंद्रकांतदादांच्या संवेदनशीलतेची पावती देत होते.

यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” हा समतेचा आणि सेवेचा मंत्र दिला आहे. समाजाचे काम हे स्वतःच्या पोटाला झळ पोहोचल्याशिवाय उभे राहत नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची व्याप्ती वाढवून स्वयंसेवी संस्थांना बळ दिले पाहिजे. तसेच, स्वयंसेवी संस्थांनी आपले काम हे ‘मिशन मोड’वर केले पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, चंद्रकांतदादा पाटील हे केवळ विकासकामांसाठीच आग्रही असतात असे नाही, तर ते देश आणि संस्कृती संवर्धनासाठीही नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याशिवाय गरजू लोकांसाठी ते सदैव कार्यतत्पर असतात, अशा शब्दांत आयुक्तांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. सामाजिक कार्यासाठी महापालिका नेहमीच आपल्या पाठीशी असेल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. 

मोनिका मोहोळ म्हणाल्या की, चंद्रकांतदादा हे समाजाचे पालनकर्ते आहेत. शंभर टक्के समाजकारणावरच त्यांचा भर असतो. त्यांनी आपल्या कामातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम फ्यूप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमिष मेहरा, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, राजेंद्र जोग, विश्वस्त आणि दिव्यांग केंद्र प्रमुख विनय खटावकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांच्यासह कोथरुड मधील नगरसेवक भाजपचे सर्व पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

विजेच्या धक्क्याने दिव्यांगत्व आलेली तृप्ती धावू लागली

पुण्यातील कासारसाई मध्ये राहणारी तृप्ती स्वामी (वय ९) हिला १८ मे २०२५ रोजी विजेचा तीव्र धक्का लागून अपघात झाला होता. या अपघातात तिला आपला पाय गमवावा लागला होता. तिचे वडील बांधकाम कामगार आहेत. त्यामुळे कुटुंबावर देखील मोठा आघात झाला होता. अपघाताने दिव्यांगत्व आल्याने तृप्तीच्या भविष्याबाबत चिंता निर्माण झाली होती. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या फिटमेंट कॅम्पमुळे आज तृप्ती पुन्हा आपल्या पायावर उभी राहू शकली आहे. कृत्रिम पाय बसवल्यानंतर चक्क ती धावू लागली.

मेट्रो च्या विस्ताराला गती द्या..विकास मठकरींनी घातली साद

0

हिंजेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट —मेट्रो कधी धावणार ??
पुणेकर नागरीकांना खरोखर येत्या ६ महिन्यात तरी ही सेवा मिळणार काय ??असे प्रश्न उपस्थित करत माजी नगरसेवक, भाजपचे ज्येष्ठ नेते विकास मठकरी यांनी सध्याच्या प्रशासनाला साद घालून हलविण्याचा प्रयत्न केला आहे.

ते म्हणतात,मेट्रोचा सर्वांगीण विस्तार एक मोठ्ठ प्रश्र्न चिन्हचं आहे. PMRDA हे या प्रकल्पाचे जबाबदार असले तरी खांद्यावर बंदुक शेवटी TATA वरतीच आहे.
₹ आठ हजार कोटींचा [ २० % राज्य , २० % केंद्र आणि उर्वरित ६० % टाटा ] हा प्रकल्प वेळेत पुर्ण करणे तसं फार मोठं आव्हान होतं यांची जाणीव पुणेकराना आहे. पणं मुदत संपली आहे , आणि ती मुदत आता सरकारला पुन्हा वाढवावी लागणार. पण किती ?? किती वाढवत रहाणार??पुणं हे बेफाम वेगाने चौफेर वाढणारे शहर आहे. त्यामुळे मेट्रोची गरज आणखी , आणखी वाढत जाते. ज्या वेगाने शहर वाढतेय त्या वेगाने सुविधा वाढत नाहीत ही खंत आहे,
मनुष्यबळ घ्या, पैश्यांची व्यवस्था करा , पणं प्रकल्प लवकर पुर्ण करा. आता मेट्रोच्या मार्गांवर सुरक्षित पणे मेट्रो धावली, [ विशेष करून मुलूंड मेट्रो अपघात १ ठार हे लक्षात ठेवून..] ही चांगली गोष्ट आहे, पण तरी बाकी काम ?? २३ मेट्रो स्टेशन उभी करणं ? आणि त दनुषंगिक अक्षरशः असंख्य कामं आहेत , आणि सगळेच पुणेकर रोज रस्त्यावर बघत असतातच ,आणि प्रचंड हाल निमुटमार्गानें सोसत असतांत. म्हणूनच मेट्रो लवकर करा हो अशी साद प्रा. विकास मठकरी यांनी घातली आहे.