Home Blog Page 763

सुप्रीम कोर्ट म्हणाले- आरक्षणासाठी धर्म परिवर्तन ही घटनेची फसवणूक- बाप्तिस्मानंतर हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही

0

नवी दिल्ली- केवळ आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी केले जाणारे धर्मांतर म्हणजे संविधानाचा विश्वासघात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने हा निर्णय 26 नोव्हेंबर रोजी एका प्रकरणात दिला ज्यामध्ये एका महिलेने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, परंतु नंतर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ती हिंदू असल्याचा दावा केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याचे अपील फेटाळून लावले आणि ते स्वीकारले जाऊ शकत नाही, असे सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या 3 टिप्पण्या

  1. तुमचा खरोखर विश्वास असेल तेव्हा धर्म परिवर्तन करा

न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांनी मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. खंडपीठाने म्हटले की, “एखाद्याने त्या धर्मातील मूल्ये, कल्पना आणि श्रद्धा यांना खऱ्या अर्थाने प्रेरित केल्यावरच धर्म स्वीकारावा.”

  1. श्रद्धेशिवाय धर्म बदलण्याची परवानगी नाही

न्यायालयाने म्हटले की, “जर धर्मांतराचा उद्देश आरक्षणाचा फायदा घेणे हा असेल, परंतु त्या व्यक्तीची त्या धर्मावर श्रद्धा नसेल, तर त्याला परवानगी देता येणार नाही. अशा स्थितीत आरक्षण धोरण आणि सामाजिक आचारसंहिता यांनाच हानी पोहोचेल.”

  1. बाप्तिस्मानंतर हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही

खंडपीठाने सांगितले की, “आमच्यासमोर ठेवलेल्या पुराव्यांच्या आधारे, खंडपीठाने म्हटले की याचिकाकर्त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे आणि ती नियमितपणे चर्चमध्ये जाते, म्हणजेच ती धर्माचे पालनही करत आहे, परंतु दुसरीकडे ती दावा करत आहे. ती एक हिंदू आहे की ती बाप्तिस्मा घेऊन हिंदू असल्याचा दावा करू शकत नाही.”

8 वकिलांनी याचिकाकर्त्या महिलेची उलटतपासणी घेतली

याचिकाकर्त्या महिला सेलवरानी यांच्या वतीने वकील एनएस नप्पिनाई, व्ही बालाजी, असैथांबी एमएसएम, अतुल शर्मा, सी कन्नन, निजामुद्दीन, बी धनंजय आणि राकेश शर्मा यांची उलटतपासणी झाली. त्याचवेळी वकील अरविंद एस, अक्षय गुप्ता, अब्बास बी आणि थराने एस यांनी तामिळनाडू सरकारची बाजू मांडली.

PM मोदी, अमित शहा यांचा निर्णय आम्हाला मान्य – एकनाथ शिंदे; CM पदावरील दावा सोडला

एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद मोठी घोषणा केली

मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील, तो मला आणि शिवसेनेला मान्य असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.एकनाथ शिंदे म्हणाले, अडीच वर्षांत मी स्वत:ला कधीच मुख्यमंत्री समजलो नाही. मी स्वत:ला कॉमन मॅन समजून जनतेसाठी काम केले. महायुतीने सर्व घटकांसाठी काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे.
शिंदे म्हणाले- लोकांना वाटते की मुख्यमंत्री आपल्यातलाच आहेत. घर असो, मंत्रालय असो, लोक येतात, भेटतात. मी प्रत्येकाला भेटतो. मला जी ओळख मिळाली ती तुमच्यामुळेच. मी लोकप्रियतेसाठी काम केले नाही, महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. अडीच वर्षे केंद्र सरकार पाठीशी उभे राहिले. राज्याला पुढे न्यायचे असेल, तर केंद्र सरकारचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले- निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल आले, आमच्या कामामुळे ऐतिहासिक निकाल लागला. मी सर्वांचा लाडका भाऊ आहे. बहिणींनी मला लक्षात ठेवले आणि माझे रक्षण केले. मला सगळं माहीत आहे. कोणाला राग आला, किंवा कोण कुठे गेला, याबाबत विचारू नका. हा एवढा मोठा विजय ऐतिहासिक आहे. आम्ही एकत्र काम करणारे लोक आहोत, आम्ही खूप मेहनत घेतली. आम्ही जे काही काम केले, ते मनापासून केले. माझे काम महाराष्ट्रातील जनतेसाठी असेल.
एकनाथ शिंदे म्हणाले- राज्याच्या प्रगतीचा स्तर आम्ही वाढवला. यावेळीही राज्याच्या विकासाचा वेग वेगवान आहे. मोदीजी, शाहजींनी खूप साथ दिली. इतके निर्णय कोणत्याही सरकारने घेतलेले नाहीत. आम्ही जनतेसाठी 124 निर्णय घेतले. मागील सरकारच्या काळात राज्य मागे पडले होते ते आम्ही पुन्हा पुढे आणले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला. सरकारचे काम लोकांसाठी काहीतरी करणे आहे. प्रत्येक घटकाला आम्ही काही ना काही दिले. अमित शहा यांचा मला भक्कम पाठिंबा होता. ते माझ्या मागे कायम उभे राहिले. तुम्ही जनतेसाठी काम करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे शहांनी सांगितले. त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. मला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. मी प्रत्येक क्षणी जनतेसाठी काम केले.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. महाविकास आघाडीने थांबवलेली कामे आम्ही पुढे नेली, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. केंद्रातून त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला, असे ते म्हणाले.
एक साधा कार्यकर्ता म्हणून मी करतो. सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्यांना गरिबांच्या वेदना कशा कळणार. त्यामुळे महायुतीने प्रत्येकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्व घटकांसाठी आम्ही काम केले. या अडीच वर्षांच्या काळात मला चांगले काम करता आले, याबद्दल मी आनंदी आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी नाराज नाही, तसेच नाराज होऊन रडणाऱ्यांमधला मी नाही. मी नरेंद्र मोदींना माझ्या भावना कळवल्या आहेत. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, माझ्यामुळे अडचण होईल हे मनात आणू नका, असे मी मोदींशी फोनवर बोलून सांगितल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषद घेण्यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली याचा अर्थ त्यामध्ये निश्चित काहीतरी बातमी असणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार? उपमुख्यमंत्री कोण होणार? केंद्रातून ऑफर कोणाला आली? या सर्व प्रश्नांची उत्तर आज कदाचीत मुख्यमंत्री देतील. एकनाथ शिंदे यांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री जेव्हा त्यांच्या दाढीवरून हात फिरवतात, त्यावेळी निश्चित काही तरी घडते, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कुणाच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजपला एकट्याला बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यात. विशेषतः अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यानंतरही महायुतीने आपला नवा कारभारी घोषित केला नाही. सूत्रांच्या मते, भाजप नेतृत्वाला जातीय समीकरणापासून एनडीएच्या सर्वच सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. यामुळेच गत 4 दिवसांपासून मुंबईपासून दिल्लीपर्यंत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या. तर शिवसेनेला 57 व राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपने या निवडणुकीत आपले 149 उमेदवार दिले होते. तर शिवसेनेने 81 व राष्ट्रवादीने 59 जणांना तिकीट दिले होते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे. एकनाथ शिंदे यांनीही राजीनामा दिला आहे.

’वेंक्या’, ‘भूतपोरी’ आणि ‘आर्टिकल 370’ यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून 55 व्या इफ्फी मध्ये दमदार कथांचे सादरीकरण


#IFFIWood, 26 नोव्‍हेंबर 2024

गोवा येथे आयोजित 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘भारतीय दालन – फिचर फिल्म्स’ विभागात, ’वेंक्या हा कन्नड चित्रपट’, ‘भूतपोरी’ हा बंगाली चित्रपट आणि ‘आर्टिकल 370’ हा हिंदी चित्रपट असे तीन उत्कृष्ट चित्रपट सादर झाले. द्रष्ट्या चित्रपटकर्त्यांनी त्यांच्या या कलाकृतींद्वारे केवळ कथाकथनाच्या पलीकडे जात स्वयंशोध, वचनपूर्ती, देशभक्ती, त्याग आणि प्रेम, जीवन तसेच मृत्यूनंतरच्या स्थितीमधील गुंतागुंतीचा भावनिक प्रवास यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

55व्या इफ्फीमध्ये पत्रसूचना कार्यालयातर्फे आयोजित माध्यम संवाद कार्यक्रमात ‘वेंक्या’ चे दिग्दर्शक सागर पुराणिक यांनी चित्रपट निर्मितीसर्म्यान समोर उभ्या राहिलेल्या आव्हानांची  चर्चा केली. वेंक्या या भूमिकेतील गुंतागुंतीवर अधिक भर देत त्यांनी या पात्राचे वर्णन अंधाराकडून उजेडाकडे उत्क्रांत होत जाणारा असे केले. चित्रीकरणाच्या बाबतीतील वाहतुकीच्या बाबतीत आलेल्या अडचणींबाबत विचारल्यावर पुराणिक म्हणाले की, हा चित्रपट धोकादायक ठिकाणांवर चित्रित झाला आणि त्यात पुराच्या संकटाची भर पडली. मात्र अशा स्थितीत स्थानिक सरकारकडून मिळालेल्या मदतीची त्यांनी प्रशंसा केली. चित्रीकरणासाठी स्थळांची निवड करण्याबाबत ते म्हणाले की वेंक्याच्या शोधामुळे विविध ठिकाणांच्या निवडीसह एक जैविक दृष्टीकोण वापरण्यात आला. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेमध्ये व्यक्तींचे, अगदी गुन्हेगारांचे देखील परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे यावर अधिक भर देत पुराणिक यांनी त्यांच्या संवादाचा समारोप केला.

‘वेंक्या’ चे निर्माते पवन वाडेयार यांनी सांगितले की भारताच्या चैतन्यमय सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवत या चित्रपटाचे चित्रीकरण 12 विविध राज्यांमध्ये करण्यात आले. ही ठिकाणे चित्रपटाच्या अंतःप्रेरणेला अनुसरून असलेल्या त्यांच्या चैतन्याने रसरसलेल्या, रंगीबेरंगी असण्यामुळे आणि त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे निवडली असे त्यांनी स्पष्ट केले.

‘भूतपोरी’चे दिग्दर्शक सौकर्य घोशाल यांनी सांगितले की हा चित्रपट नेहमीच्या साच्यातील भयपटापेक्षा वेगळा आहे. हा चित्रपट मानवी कृतींमुळे खोलवर प्रभावित झालेल्या एका भुताची आत्मकथा सांगतो, आणि तो मृत्यूनंतरच्या स्थितीवर आधारित आहे. अनेक भारतीय भयपट हॉलिवूडच्या चित्रपटांमुळे प्रभावित होत असताना, एक अस्सल भारतीय भूत कथा निर्माण करणे हा या चित्रपटाच्या निर्मितीमागील उद्देश असल्याचे घोशाल यांनी नमूद केले.

‘भूतपोरी’ या चित्रपटाच्या पोशाख रचनाकार पूजा चॅटर्जी यांनी सांगितले की बंगाली साहित्यामध्ये आढळणाऱ्या पोषाखांच्या तपशीलवार वर्णनापासून चित्रपटातील पात्रांच्या पोशाखासाठी प्रेरणा मिळाली. पडद्यावर वास्तववादी पात्रे उभी करण्यासाठी ते संदर्भ वापरल्याची माहिती त्यांनी दिली.

‘आर्टिकल 370’ चे दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांनी त्यांच्या चित्रपटाच्या राजकीय घटनेवरील  कथेबद्दल माहिती दिली.  याविषयावर अगदी विस्तृत संशोधना केल्यानंतरच हा चित्रपट तयार करण्‍यात आला.  प्रेक्षकांना राजकीय व्यवस्थेशी जोडण्‍याबरोबरच  आगामी पिढीला प्रेरणा देण्याचा उद्देश्य  हा चित्रपट तयार करण्‍यामागे   असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जांभळे यांनी  चित्रपटाच्या  संकल्पनेकडे  लक्ष वेधले. ही संकल्पना काही जबरदस्तीने राष्ट्रवादाला प्रोत्साहन देत नाही, परंतु पात्रांचे वास्तववादी पद्धतीने चित्रण करत आहे,असे सुहास जांभळे म्हणाले. तरुण चित्रपट निर्मात्यांना  आपला ठसा उमटवता आला पाहिजे, यासाठी भारतातील सर्व प्रदेशांमध्ये चित्रपट संस्कृती वाढवण्याच्या महत्त्वावर जांभळे यांनी भर दिला.  

‘आर्टिकल 370’ च्या लेखिका मोनल ठाकूर यांनी संशोधन प्रक्रियेतील अंतर्दृष्टी सामायिक केली. आपण या सिनेमसिनेमासाठी माहिती गोळा करण्यासाठी शोध पत्रकारांचा सल्ला घेतल्याचे सांगितले. चित्रपटातील राजकीय आणि संसदीय घटक माहितीपूर्ण आणि मनोरंजक अशा दोन्ही प्रकारे कसे डिझाइन केले आहेत याचे त्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली. ठाकूर यांनी काश्मीरमध्ये  चित्रीकरण करताना आलेल्‍या  आव्हानांबद्दलही सांगितले.  स्थानिक पोलिसांनी दिलेल्या  पाठिंब्याचे  अनुभव  खरोखर जादुई असल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटांविषयी:

वेंक्या: हुब्बळ्ळीसारख्‍या  भरपूर  गोंधळ असलेल्‍या  शहरात, संघर्ष करत असलेला गुंड व्यंक्या मालमत्तेचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी आणि आर्थिकदृष्‍ट्या कंगाल  होण्यापासून वाचण्‍यासाठी आपला परागंदा झालेला भाऊ गन्याला शोधण्याचा प्रयत्न करतो. समाज माध्‍यमाचा वापर करून, वेंक्या भारतभर प्रवासाला निघतो, तेथील वैविध्यपूर्ण संस्कृती, केले जाणारे  घोटाळे आणि अनोळखी लोकांनी दाखवलेला दयाळूपणा  त्याला दिसून येतो.  या प्रवासात त्याचा  वैयक्तिक  विचार प्रक्रियेत विकास होतो.  त्‍याला आलेल्या  अनुभवातून अखेर कुटुंबाविषयी ममत्‍व आणि त्‍याच्या मनातील मानवता जागृत होते.  

भूतपोरी: 

या भयपटात, एका मृत महिलेचा अस्वस्थ आत्मा तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी एका लहान मुलामध्‍ये वास करण्‍यासाठी  येतो. त्यांच्यामध्‍ये  फरक असूनही, ते जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन शोधत भावनिक प्रवास  करत असताना त्यांच्यात एक संभाव्य बंध निर्माण होतात. उत्कंठावर्धक वळणांसह हृदयस्पर्शी क्षणांचे मिश्रण करून, हा चित्रपट जिवंत आणि मृत व्यक्तींच्या अनोख्या अन्वेषणाने मोहित करतो.

आर्टिकल 370: “2016 मधील  काश्मीरातील अशांततेनंतर, तरुण एजंट झूनी हक्सरला राजेश्वरी स्वामीनाथन यांना पंतप्रधान कार्यालयातून दहशतवादाशी लढा देण्यासाठी आणि आर्टिकल  370 रद्द करून प्रदेशातील संघर्षाची अर्थव्यवस्था मोडून काढण्याच्या गुप्त मोहिमेसाठी नियुक्त केले जाते. दहशतवादी लढाईत झुनीला पदावनत व्हावे लागते. तिच्‍यावर टिकेची झोड उठते. यांनतर झूनी काश्मीरला  परत येते.  जिथे तिने ‘नेटवर्क फंडिंग’ मधून दगडफेकीची घटना ती सर्वांसमोर आणते. भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धच्या गुंतागुंतीच्या लढ्यात झूनी लक्षवेधी काम करते.

‘अमेरिकन वॉरियर’ ने 55व्या इफ्फीमध्ये दाखवली चमक


“एका चित्रपटापेक्षाही ती अधिक काही आहे- माझ्या सहनशीलतेची ती कहाणी आहे”- अभिनेता विशी अय्यर

जीवनातील प्रेमाचे आणि दुसऱ्या संधीचे सामर्थ्य दाखवतो ‘अमेरिकन वॉरियर’- अभिनेत्री टेलर ट्रेडवेल

‘अमेरिकन वॉरियर’ घेतो स्थलांतरितांच्या अनुभवाचा; भारतीय अमेरिकन्सचा संघर्ष आणि आकांक्षांचा वेध- निर्मात्य रिशाना

#IFFIWood, 25 नोव्‍हेंबर 2024

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने जागतिक सिने समुदायाचे खुल्या दिलाने स्वागत केले, ज्यामध्ये बहुप्रतिक्षित अमेरिकन वॉरियर प्रकाशाच्या झोतात राहिला. गुस्तावो मार्टिन दिग्दर्शित, अमेरिकेतील या प्रेरणादायी चित्रपटात एका भारतीय अमेरिकी स्थलांतरितांचा परिवर्तनकारी प्रवास दाखवण्यात आला आहे. जय नावाच्या माजी हौशी एमएमए फायटर आणि पूर्वाश्रमीच्या गुन्हेगाराची प्रेरणादायी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळते. एका दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडल्यावर तो प्रायश्चित्ताच्या मार्गावर चालू लागतो. त्याच्या साहसामुळे नकळत तो एक नायक बनतो, ज्यामुळे लोकांच्या नजरेत येतो आणि नव्या आव्हानांना सामोरा जाऊ लागतो. या चित्रपटाने केवळ चाकोरीबद्धपणाच्या चौकटीलाच आव्हान दिलेले नाही तर प्रेक्षक आणि समुदायाच्या हृदयाला भिडणारा एक संदेश देखील दिला आहे. विशी अय्यर या प्रमुख अभिनेत्याचा करिष्मा आणि निर्धार यांना देखील हा चित्रपट अधोरेखित करतो, ज्याने या भूमिकेत एक सच्चेपणा आणला आहे आणि भूमिकेला खोली प्राप्त करून दिली आहे.  

या चित्रपटाच्या वार्ताहर परिषदेत या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेले अभिनेते विशी अय्यर, अभिनेत्री टेलर ट्रेडवेल आणि निर्माते क्रिस्टी कूर्स बिस्ली आणि रशाना यांच्यासह चित्रपटाशी संबंधित असलेल्या प्रतिनिधींची ओळख करून देण्यात आली. हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या प्रतिनिधींनी या कथानकाचा उगम आणि त्याचा प्रभाव याविषयी आपापला दृष्टीकोण मांडला. यावेळी या चित्रपटाचा एक आकर्षक ट्रेलर दाखवण्यात आला, ज्यामुळे प्रेक्षकांना या कथेचा सच्चेपणा जाणवून देणारे, भावनात्मक गहनतेमध्ये घेऊन जाणारे एक रोमांचक वातावरण तयार केले.

या प्रवासाविषयी बोलताना विशी अय्यर यांनी या चित्रपटामागील त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांमध्ये खोलवर रुजलेल्या अतिशय सखोल वैयक्तिक प्रेरणेचा खुलासा केला.  आर्थिक संकटाच्या काळात कोट्यवधी डॉलरचा व्यवसाय गमावल्यावर आणि बहिष्काराला तोंड दिल्यावर अय्यर यांनी आध्यात्मिकता आणि आत्मशोधाचा मार्ग पत्करला.  भग्वदगीतेतील शिकवणीपासून, विशेषतः अर्जुनाच्या कथेपासून धडा घेत त्यांनी दृढसंकल्प आणि मुक्तीची संकल्पना तयार केली.

मेलिसा या एकट्या मातेची भूमिका साकारणाऱ्या टेलर ट्रेडवेल यांनी आपली भूमिका अतिशय खोलवर अर्थ सांगणारी होती असे सांगितले. “अमेरिकन वॉरियर प्रेम आणि दुसऱ्यांदा मिळणाऱ्या संधीचे सामर्थ्य प्रदर्शित करतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या चित्रपटातील ऍक्शन आणि भावनात्मक खोली यामधील संतुलन त्यांनी अधोरेखित केले. हा चित्रपट केवळ शारीरिक लढायांविषयीच नाही तर मानवी दृढतेची व्याख्या करणार्या अंतर्गत संघर्षाविषयी देखील असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रपटाचा सच्चेपणा त्याच्या यथार्थवादाविषयीच्या बांधिलकीमुळे आणखी जास्त वाढतो, याकडे टेलर ट्रेडवेल यांनी लक्ष वेधले. या चित्रपटातील हाणामारीच्या दृश्यांमध्ये वास्तविकता आणण्यासाठी अय्यर यांनी एका यूएफसी फायटरच्या हाताखाली कठोर प्रशिक्षण घेतले. विशी अय्यर यांनी भावनात्मक आणि शारीरिक या दोन्ही प्रकारच्या आव्हानांना निर्धाराने तोंड दिले, ज्यामुळे चित्रपटाच्या दृढसंकल्पाच्या संदेशाला जास्त वजन प्राप्त झाले.  

भारतीय-अमेरिकन लोकांचा संघर्ष आणि आकांक्षा यावर प्रकाश टाकत निर्मात्या राशाना यांनी स्थलांतरितांच्या अनुभवावर या चित्रपटाचा भर दिला. लवचिकता आणि आशा या सार्वत्रिक संकल्पनांना अधोरेखित करत त्यांनी अमेरिकन आणि भारतीय प्रेक्षकांना या चित्रपटातून केलेल्या आवाहनाकडे लक्ष वेधले. आणखी एक निर्माते, क्रिस्टी कूर्स बीसले यांनी, अधिक प्रामाणिक कथा सादर करण्यासाठी ग्लॅमरच्या पलीकडे जाऊन, अमेरिकन जीवनातील गंभीर बाजू प्रदर्शित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

निर्मात्यांच्या चमूने महिला पात्रांना प्रकाशझोतात आणून नेहमीच्या चाकोरीतील कथनाला बदलण्याविषयी अभिमान व्यक्त केला. एका महिलेला फाईट डॉक्टर दाखवण्यापासून ते संतुलित लैंगिक सादरीकरणापर्यंत या चित्रपटाने उद्योगाच्या मानकांना आव्हान दिले आहे आणि महिला पात्रांच्या नव्या शक्यतांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा दिली आहे.

या चित्रपटाला अनेक महोत्सवांमध्ये अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रेक्षक या चित्रपटाच्या विषयामध्ये खोलवर सामावून गेले. या पत्रकार परिषदेदरम्यान, या चमूने स्क्रीनिंगच्या वेळी अनेक प्रेक्षकांकडून त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांसोबत या चित्रपटाची तुलना करून दिलेल्या भावनोत्कट प्रतिसादांची माहिती सामाईक केली.

अनुभवी साहसी दृश्य समन्वयक आणि एमएमए प्रोफेशनल फायटर्स यांच्या योगदानासह या चित्रपटाच्या चमूचे सर्जनशील सहकार्य या चित्रपटाच्या यशातील महत्त्वाचा घटक ठरल्याचे अधोरेखित करण्यात आले. परिवर्तन, साहस आणि सांस्कृतिक सेतू बांधणीचा समावेश असलेले एक प्रभावी कथानक म्हणून अमेरिकन वॉरियर उदयाला आला आहे. चित्रपटाची संकल्पना सर्व सीमा ओलांडून आशा आणि दृढतेच्या सार्वत्रिक संदेशासोबत अतिशय गहनतेने जोडले जाण्याची संधी प्रेक्षकांना प्रदान करत  आहे.

मुख्यमंत्र्यांचे नाव ठरेना…आता भाजप निरीक्षक पाठवणार:आमदारांकडून ओपिनियन पोल घेऊन नावे जाहीर करणार


मुंबई-एकीकडे नव निर्वाचित आमदारांच्या शपथविधीची विधिमंडळात तयारी करण्यात येत आहे. राज्यातील सर्व 288 नवे आमदार विधिमंडळ परिसरात आमदारकीची शपथ घेतील. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने तयारी सुरु करण्यात आली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होऊ शकला नाही. त्यासाठी भाजप निरीक्षक पाठवणार असून, ते आमदारांचे मत जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविली हा दावा शिंदे समर्थकांचा आहे तर भाजपच्या देवेंद्र समर्थकांचा दावा देवेंद्र यांच्या समर्थ आणि चाणाक्ष नेतृत्वाचा आहे. या दोलायमान स्थितीत शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण होतोय आणि अजित पवार सामंजस्य निर्माण करताहेत अशा बातम्या देखील माध्यमातून येत आहेत .

दरम्यान नव्या सरकारचा शपथविधी हा एक डिसेंबर रोजी होणार असल्याचा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. सरकार स्थापन करण्याची कोणतीच घाई नाही. त्यामुळे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता एक डिसेंबरलाच सरकार अस्थित्त्वात येणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही उपस्थित होते. विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरपर्यंत होता. नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख अद्याप ठरलेली नाही. तोपर्यंत शिंदे हेच हंगामी मुख्यमंत्री राहतील. शिंदे 28 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुख्यमंत्री होते.एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत भाजप आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात फडणवीस यांची नेतेपदी निवड होणार आहे. यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेऊ शकतात.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. आजच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास पूर्वीप्रमाणेच नव्या सरकारमध्येही दोन उपमुख्यमंत्री असतील. राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि शिवसेनेकडून शिंदे नव्या आमदाराचे नाव पुढे करू शकतात.

पुण्यात भारतीय जैन संघटनेचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’,देशातील ३००० प्रतिनिधी सहभागी होणार

पुणे : मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक-कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, महिला सक्षमीकरण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन, जलस्त्रोत विकास, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन आदी क्षेत्रांत देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था असलेल्या भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) ‘राष्ट्रीय अधिवेशन’ दि. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे. दर दोन वर्षांनी होणार्‍या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातील मान्यवर राजकीय नेते, प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि बीजेएसचे तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनात उद्घाटन सत्राबरोबरच अनेक सत्र, थेट संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, शपथविधी असा भरगच्च दोन दिवसीय कार्यक्रम असणार आहेत. यात देशभरातून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. बदलती जीवनशैली आणि काळानुसार जैन समाजाचे अनेक गुंतागुंतीचे निर्माण झाले आहेत. कालानुरूप प्रश्न बदलले आहेत, त्यांनी उग्र रूप धारण केले आहे. जैन समाजातील या कौटुंबिक, सामाजिक, वैवाहिक अशा अनेक प्रश्नांवर विचारमंथन आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच नव्या पिढीला समजेल, अशा त्यांच्या भाषेत बीजेएसने तयार केलेल्या खास कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. त्याचबरोबर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शपथविधी, अनेक सहभागी राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरलेली असून संस्थेशी जोडले गेलेले अनेक राज्यात कार्यरत हजारो समर्पित कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.
“बेंगलोर, चेन्नई, उदयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झाल्यानंतर यावर्षी पुणे शहर या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून या अधिवेशनाच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात देशभरातील बीजेएसचे ३००० कार्यकर्ते, प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मागील अधिवेशनांप्रमाणेच हे अधिवेशन ऐतिहासिक होईल, यात शंका नाही.” असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.

घरफोडी करून १२ लाखाचे दागिने विकायला आलेल्या तरुणाला अमरधाम स्मशानभुमीजवळ पकडले

0

पुणे- उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरफोडी करून सुमारे १२ लाखाचे सोने विक्रीला आलेल्या एका २५ वर्षाच्या तरुणाला हडपसर पोलिसांनी रंगेहाथ पकडले . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ .२५/११/२०२४ रोजी हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार तानाजी देशमुख व अमित कांबळे यांच्या बातमीदांरामार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन येथे दिनांक २२/११/२०२४ रोजी मार्वेला आर्को सोसायटी, हडपसर मध्ये झालेल्या घरफोडीमधील आरोपी नामे अनिल मिनर्सिंग खडका सद्या रा. माळवाडी, हडपसर व मुळचा नेपाळ हा चोरीचे सोन्याचे दागिने विकण्याकरीता अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांना कळवुन सापळा रचला
अमरधाम स्मशानभुमी माळवाडी या ठिकाणी आरोपी अनिल मिनसिंग खडका, वय २५ वर्षे, रा. केशव चौक, यश हॉस्पीटलचे शेजारी, माळवाडी, हडपसर, पुणे हा संशयित रित्या आजुबाजुस पाहत स्मशानभुमीच्या दिशेने आल्याने त्यास युनिट ०५ चे पथकाने त्यास शिताफीने पकडले. त्यास पकडल्यापासुन त्याचे पॅन्टच्या खिशामध्ये हात घालुन काहीतरी लपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याबाबत पोलीसांनी त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने मार्वेल आर्को सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सोन्याचे दागिने चोरी केले असुन ते दागिने मी विकण्याकरीता आलो आहे असे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी त्यांची अंगझडती घेवुन त्याचेकडे मिळुन आलेले सोन्याचे एकुण ग्रॅम १७३.५०० वजनाचे एकुण ११,५९,५००/- रु.किं. चे सोन्याचे दागिने असा हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १७८४/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०५ (अ) मधील मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी अनिल मिनर्सिंग खडका याने हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्याला हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात पुढील कार्यवाहीकरीता देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सपोनि विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार, अमित कांबळे, तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, विनोद निंभोरे, विनोद शिवले, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, शुभांगी म्हाळसेकर, अकबर शेख, राहुल ढमढेरे यांचे पथकाने केली आहे.

रुबी मेडिकल सर्व्हिसेस तर्फे भारतातील पहिल्या अनामया एमआरआय मशीनचे अनावरण

पुणे 26 नोव्हेंबर 2024 : रुबी मेडिकल सर्व्हिसेस तर्फे ताजने माळा,नवीन नगर रस्ता,संगमनेर येथील आपल्या सुविधेमध्ये अनामया या भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीचे 1.5 टी एमआरआय मशीन प्रस्थापित करण्यात आले आहे. मेक इन इंडिया पुढाकार अंतर्गत अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानात अग्रणी असलेल्या आणि रेफेक्स समूहाचा भाग असलेल्या थ्रीआय मेडटेक कंपनीने विकसित केलेले हे मशीन म्हणजे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात परिवर्तनीय टप्पा आहे.

आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टणम येथील मेडटेक झोन (एएमटीझेड) येथे निर्मित केलेले अनामया हे भारतातील अभिनवता व उत्कृष्टतेचा पुरावा आहे.अनामया हे आरोग्याशी निगडीत असून इमेजिंग द पाथ टू वेलनेस या तत्त्वासह विश्वास आणि प्रगतीचे प्रतीक आहे.हे अद्यावत व पथदर्शक एमआरआय मशिन प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानासह अचूक निदान प्रदान करते,त्याचबरोबर जलद स्कॅन,रूग्णांसाठी अधिक सुलभता आणि किफायतशीर प्रक्रिया प्रदान करते.या मशिनचे अनावरण म्हणजे दुर्गम भागांमध्ये जागतिक दर्जाच्या निदान सुविधा प्रदान करण्याचे रूबी मेडिकल सर्व्हिसेसच्या ध्येयाशी सुसंगत आहे.

अनावरणाच्या या कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी,कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट व विभागप्रमुख डॉ.प्रणव महादेवकर आणि रूबी हॉल क्लिनिकच्या धोरण व व्यवसाय विकास विभागाच्या सरव्यवस्थापक नताली ग्रांट नंदा यांसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमात दीप प्रज्वलन,अनामया एमआरआय मशिनचे अनावरण करण्यात आले आणि त्यानंतर रूबी हॉल क्लिनिकचा आरोग्य सेवा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा वारसा दर्शविणारी कॉर्पोरेट फिल्म प्रदर्शित करण्यात आली.

रूबी हॉल क्लिनिकचे चीफ कार्डिओलॉजिस्ट,अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.पी.के.ग्रांट यांनी या महत्त्वाच्या टप्प्याबाबत आपला आनंद व्यक्त केला.ते म्हणाले,मेडिकल इमेजिंग तंत्रज्ञानामध्ये पथदर्शक,अभिनव संकल्पना आणि भारतात असेंबल केलेले अनामया 1.5 टेस्ला एमआरआय स्कॅनर आमच्या संगमनेर युनिटमध्ये प्रस्थापित करणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.हे अद्यावत मशिन म्हणजे केवळ प्रगत तंत्रज्ञान नव्हे तर अद्वितीय प्रतिमा गुणवत्ता आणि निदान अचूकता प्रदान करून रेडिओलॉजिस्टच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करते.किफायतशीर दरासह हे मशिन सर्वांसाठी उपलब्ध होऊन आरोग्य सेवा पुरवठादार आणि रूग्णांमधील दरी भरून काढण्यास मदत करेल.आमचे ध्येय हे सहज उपलब्ध असलेले किफायतशीर,विश्वसनीय आणि जागतिक दर्जाच्या मेडिकल इमेजिंग सोल्युशन्स प्रदान करणे हे आहे.भारतातील आरोग्य सेवा परिवर्तनाचा भाग बनणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

महाजन इमेजिंगचे संस्थापक अध्यक्ष व आयआरआयएचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ.हर्ष महाजन यांनी रूबी मेडिकल सर्व्हिसेस आणि थ्री आय मेडटेकच्या प्रयत्नांचे कौतुक केले.ते म्हणाले की,अनामया एमआरआय मशिनसाठीचे सहकार्य हे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील नवा अध्याय आहे.केवळ अद्ययावतच नव्हे तर किफायतशीर आणि सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेल,अशा तंत्रज्ञानाची निर्मिती भारत करू शकतो हे यातून दिसून येते.हा पुढाकार आरोग्य सेवेमधील भविष्यातील अभिनव कल्पनांसाठी एक प्रारूप ठरेल.

पुणे शहरात ७५ वी संविधान रॅली संपन्न

पुणे, दि.२६: सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत ७५ वी संविधान रॅली आयोजित करण्यात आली.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. दिवसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली. नवीन जिल्हा परिषद – ब्ल्यू नाईल हॉटेल चौक – पोलीस आयुक्त कार्यालय चौक – समाजकल्याण आयुक्तालय – एसबीआय बँक चौक – बंडगार्डन पोलीस ठाणे चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर यामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी मोठे बॅनर्स, घोषवाक्य फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले. बार्टी कार्यालयामार्फत चित्ररथाची व्यवस्था करण्यात आली. येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा परिधान करुन समाजाला समानता-बंधुता व एकात्मतेचे दर्शन घडविले.

यावेळी बार्टीच्या उपायुक्त वृषाली शिंदे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राधाकिसन देवडे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता डॉ. आम्रपाली मोहिते आदी उपस्थित होते.

या संविधान रॅलीमध्ये समाजकल्याण, बार्टी तसेच विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह सुमारे ३ हजार नागरि

डॉ.आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा संकल्प महत्वाचा – दीपक मानकर

पुणे- “सामाजिक जीवनाला गतिमान करण्याचे काम हे संविधानाच्या माध्यमातून होत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचा संकल्प करूयात तो अधिक महत्वाचा आहे असे प्रतिपादन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केले आहे.

“२६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. २६ नोव्हेंबर या दिवशी भारतीय संविधान व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ “भारतीय संविधान दिन” देशभरात साजरा होत आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राज्यभर २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ना. श्री. अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पुणे स्टेशन रोड, ससून हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले, तसेच पुतळ्याच्या आवारामध्ये शहराध्यक्ष दीपक मानकर व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत भारतीय संविधान दिन साजरा केला.
यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी विचार मांडताना म्हणाले, भारतीय संविधानास आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वाने भारतीय लोकशाहीला मूर्तिमंत स्वरूप देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. या संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीला मजबूत करण्याचे काम होत असून आपणही समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे. क्रांतिसूर्य, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष मा. दीपक मानकर, माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष दत्ता सागरे, उपाध्यक्ष मुनीर सय्यद, सरचिटणीस महेश कुंभार, धनंजय पायगुडे, अमित जावीर, व्यापारी अध्यक्ष वीरेंद्र किराड, फार्मसी सेल अध्यक्ष विनोद काळोखे, आयटी सेल अध्यक्ष मोहन मोरे, विद्यार्थी सेल अध्यक्ष शुभम माताळे, पुणे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष राहुल तांबे, सांस्कृतिक सेल कार्याध्यक्ष अशोक जाधव, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, कोथरूड महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, योगेश वराडे, उपाध्यक्ष डिंपल इंगळे, संघटक सचिव करुणा अंथानी, प्रवीण पवार, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, व्यापारी सेल उपाध्यक्ष विशाल आगरवाल, कोथरूड उपाध्यक्ष निलेश शिंदे, संघटक सचिव मुस्ताक शेख, महिला उपाध्यक्ष सुनिता चव्हाण, चिटणीस सुनिता बडेकर, पुणे कॅन्टोन्मेंट ओबीसी अध्यक्ष अतुल जाधव, पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्ष अर्चना वाघमारे, फार्मसी सेल उपाध्यक्ष सनी किरवे, नवनाथ खिलारे, संदीप गाडे, शिवाजीनगर विद्यार्थी अध्यक्ष कार्तिक थोटे, चिटणीस भारत पंजाबी, हनीफ शेख, विद्यार्थी कार्याध्यक्ष सत्यम पासलकर, खडकवासला उपाध्यक्ष रोहिदास जोरी, चिटणीस शाम शेळके, संतोष हत्ते आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त टिळक भवनमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन.

0

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२४
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. २६ जानेवारी १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील मुख्यालय टिळक भवनमध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन वाचन करण्यात आले.
यावेळी प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष डॉ. अमरजितसिंह मनहास, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, सोनू शुक्ला, सुभाष पाखरे, दत्ता नांदे, नामदेव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
संविधान साकारणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी ‘संविधान दिन’ साजरा केला जातो. काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी कटीबद्ध असून लोकशाही व संविधान टिकले तरच आपले स्वातंत्र्य अबाधित राहील, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या

हिंदुराष्ट्र ही संकल्पना संविधान विरोधी – निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचे मत

विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त आयोजित भारतीय संविधान विचार संमेलनाचे उद्घाटन

पुणे : महाराष्ट्रात नुकत्याच  विधानसभा निवडणुका पार पडल्या, यामध्ये संविधान हा शब्द सत्ताधारी आणि विरिधाक या दोघांच्याही प्रचाराचा प्रमुख भाग होता. मात्र संविधान – संविधान करणाऱ्या या दोन्ही बाजूच्या लोकांनी खरेच संविधान जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का?  पूर्वीच्या काळी भेदाभेद करणारी संस्कृती चांगली कशी असेल ? असे सवाल उपस्थित करत हिंदुराष्ट्र ही संकल्पना भारतीय संविधान विरोधी असल्याचे मत निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केले. 

विश्वभुषण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने संविधान दिना निमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित  ‘भारतीय संविधान विचार संमेलन’ च्या उद्घाटन प्रसंगी न्या. ठिपसे बोलत होते. याप्रसंगी  निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते,  डॉ. सुरेंद्र जोंधळे (मुंबई) ,इरफान इंजिनिअर ( मुंबई), समाजवादी जन परिषदेच्या अखिल भारतीय अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर, ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोनार, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, संमेलनाचे मुख्य आयोजक परशुराम वाडेकर, संमेलनाच्या निमंत्रक, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, दीपक म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते.  ‘भारतीय संविधानाचे ७५ वर्षे .. विकास व वाटचाल’ हा या संमेलनाचा विषय आहे. 

पुढे बोलताना न्या. ठिपसे म्हणाले, भारतीय संविधान आपला देश  धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे म्हणते याचा अर्थ कोणत्याही धर्माला इथे संविधाना पेक्षा जास्त महत्व नाही. आज हिंदुराष्ट्र ही संकल्पना मांडणारे जुनी संस्कृती चांगली असल्याचे सांगत आहेत परंतु त्याकाळी असलेली विषमता, भेदाभेद याचे समर्थन होऊ शकत नाही हे वास्तव आहे. आज हिदूराष्ट्र चा नारा देणारे सुद्धा संविधान – संविधान चा उदो उदो करताना दिसत  आहेत याचाच अर्थ ज्यांना ते नकोय किंवा बदलायचे आहे ते संविधान प्रेम असल्याचा आव आणत आहेत अशी टीका त्यांनी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणारे, चळवळीतील काही नेते, कार्यकर्तेही हिदूराष्ट्रवाल्यांच्या पोस्टरवर झळकत असल्याची खंत न्या. ठिपसे यांनी व्यक्त केली.  

आपल्या देशात लोकशाही आहे, लोकशाहीचा अर्थ फक्त बहुमत असा होत नसल्याचे सांगत न्या. ठिपसे म्हणाले, हुकूमशहाला सुद्धा बहुमत लागते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हिटलर आहे. फक्त बहुमत म्हणजे न्याय, समता,  बंधुता आणि स्वातंत्र्य नाही. लोकशाही मध्ये या चार गोष्टी असतात तसेच तिथे अल्पसंख्यांकांचे संरक्षण सुद्धा आवश्यक असते. फक्त बाबसाहेबांचा जयजयकार आणि संविधानाचा उदो उदो न करता संविधानातील विचार रुजविण्याचा, अंगिकारण्याचा प्रयत्न गरजेचे असल्याचे न्या. ठिपसे यांनी नमूद केले. 

ह.भ.प . श्यामसुंदर महाराज सोन्नर म्हणाले, भारतीय संविधान हे संताच्या विचारांवर आधारलेले आहे. आज काही महाराज देशाला हिंदूराष्ट्र करण्याची मागणी करत आहेत,  हे महाराज देशाच्या आणि संतांच्या विरोधात आहेत, कारण  स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता ही संतांची शिकवण आहे आणि भारतीय संविधान सुद्धा आपल्याला हेच शिकवते. यामुळे संविधान संरक्षण विषयी जागरूकता करण्यासाठी मी पत्रकारिता सोडून वारकरी मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. 

इरफान इंजिनिअर म्हणाले, आपल्याकडे पूर्वी राजेशाही होती पण संविधानाने ती व्यवस्था पूर्णपणे पलटवली. मात्र आता जाती धर्मांमध्ये भीती पसरवली जात आहे. अल्पसंख्यांक विरोधी वातावरण तयार केले जात आहे. आजचे मनुवादी सरकार कायद्याचे हत्यार करून जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे.

जोंधळे म्हणाले, आज आपल्या हाती असलेले संविधान हे परिपूर्ण आहे. मात्र ज्या ज्या वेळी यातील मुद्दे हे अव्यवहार्य वाटले त्या त्या वेळी  घटनेच्या चौकटीत राहून या संविधानामध्ये बदल करण्यात आले. त्यामुळे आजची भारतीय राज्यघटना ही काळसंवादी आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद यामध्ये आहे. तर उद्देशीका ही भारतीय राज्यघटनेचे  नैतिक बलस्थान आहे.

संविधानातील मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची टीका  ॲड. निशा शिवूरकर यांनी केली. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी ही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. 

अध्यक्षीय भाषणात निवृत्त पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर म्हणाले, आज संविधान धोक्यात आहे याचा अर्थ आपले अधिकार धोक्यात आहेत, मात्र याची आपल्याला जाणीव नाही. संविधानाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलिस आणि न्यायपालिकेला त्यांची कर्तव्य करायला भाग पाडा. आज आपली जी वाटचाल सुरू आहे ती पोलीसराज कडे आहे. जे आपल्या देशाला घातक आहे. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर तो कायदेशीर मार्गानेच ठेवला पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांच्या शिकवणी प्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना परशुराम वाडेकर म्हणाले, लोकसभा – विधानसभा निवडणूकीत संविधान – संविधान बोलणारे राजकीय पक्ष आज संविधान दिनाला मात्र झोपलेले आहेत. भारतीय संविधान म्हणजेच विकास आहे हे लक्षात घेऊन आपल्या राज्यकर्त्यांनी वागायला पाहिजे मात्र दुर्दैवाने असे झाले नाही आता होतानाही दिसत नाही. आजही आंबेडकरी चळवळीतील लोक संविधानवर काम करत आहेत, बोलत आहेत इतरांनीही यावर काम केले पाहिजे त्याशिवाय संविधान खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार नाही. 

संमेलनाची सुरुवात सुप्रसिद्ध गायक विजय कावळे आणि पार्टी यांच्या  ‘संविधानाचा जलसा’ या गाण्यांच्या कार्यक्रमाणे झाली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

न्यायालये,सरकार, EC जनतेसाठी ..त्यांनी जनतेवर EVM लादू नये ..

0

अमेरिकेतही मतदान बॅलेटपेपरद्वारेच होते. एलन मस्क यांनीही EVM छेडछाडबद्दल चिंता व्यक्त केली आहे.भारतातच का EVM लादले जाते? मतदान EVM वर करायचे कि बॅलेटपेपर वर याचे स्वातंत्र्य भारतीयांपासून कोणी का हिरावून घ्यावे ?-शरद लोणकर (पुणे )

मुंबई-न्यायालये जनतेसाठी आहेत ..त्यांनी जनतेवर EVM लादू नये ..ज्यांचा विश्वास नाही त्यांनी का म्हणून EVM स्वीकारावे ? ज्यांना कागदी मतपत्रिकेवर आपले मत नोंदवायचे आहे त्यांना ते नोंदविता का येऊ नये .. न्यायालयांनी जनतेवर EVM नेच मतदान करा असा आदेश लादू नये अशी जनमानसात प्रतिक्रिया उमटत असताना त्याबाबतची दखल घेऊनच महाविकास आघाडीने आता ‘मिशन EVM’ सुरु करण्याचे ठरविले आहे आणि त्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत .आणि कॉंग्रेसने देखील आता EVM विरोधात आवाज उठविला आहे. कॉंग्रेस अध्यक्ष खर्गे स्वतः या EVM विरोधातील मोहिमेत सहभागी होणार आहेत .

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. मात्र आता महाविकास आघाडीच्या वतीने यासाठी ईव्हीएम मशीनला दोष देण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून भारतीय जनता पक्षाने हा विजय मिळवला असल्याचा दावा काही नेते करत आहेत. त्यातच आता शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील ईव्हीएम विरोधात मिशन उघडण्याच्या तयारीत आहेत.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्यभरातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ईव्हीएम संदर्भातील माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी वकिलाची एक फौज उभी करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. या माध्यमातून कायदेशीर लढाई देखील लढली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पराभूत उमेदवारांनी रोष व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने देखील राज्यभरातील पराभूत उमेदवारांची एक बैठक बोलण्यात आली होती. या बैठकीत देखील ईव्हीएम मशीनच्या आकडेवारी बद्दल आपापल्या मतदारसंघातून अपडेट माहिती गोळा करण्याचे आदेश पराभूत उमेदवारांना देण्यात आले आहे. आगामी काळात ईव्हीएम मशीन विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने राज्यामध्ये जन आंदोलन उभे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.

ईव्हीएम मशीनच्या गडबडीच्या माध्यमातूनच महाविकास आघाडीचा पराभव झाला असल्याचा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन विरोधात आम्ही आजच नाही तर या आधी पासूनच बोलत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गडबड नक्कीच असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान आजच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. ईव्हीएममधील गडबडीमुळे मतमोजणीत घोळ झाल्याचा दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशा मागणीची के.ए. पॉल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असे कसे होऊ शकते? असा शब्दांत सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली.

मोदींच्या दौऱ्यापूर्वी लॉरेन्सकडून चंदीगडमध्ये 2 बॉम्बस्फोट

0

चंडीगड -3 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंदीगड दौऱ्यापूर्वी मंगळवारी सकाळी सेक्टर-26 मधील दोन क्लबबाहेर स्फोट झाले. लॉरेन्स गँगने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे. याबाबत गोल्डी ब्रारने सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. प्रोटेक्शन मनी न देणे हे स्फोटाचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.सेव्हिल बार अँड लाउंज आणि डीओरा क्लबच्या बाहेर झालेल्या स्फोटामुळे क्लबच्या बाहेरील काचा फुटल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध रॅपर बादशाह देखील सेव्हिल बार आणि लाउंज क्लबच्या मालकांमध्ये भागीदार आहे.चंदीगडचा ज्या भागात स्फोट झाले ते पॉश क्षेत्र आहे. जवळच भाजी मंडई आहे. अनेक केंद्रीय संस्था जवळपास आहेत. पोलिस लाईन आणि सेक्टर-26 पोलिस स्टेशनही आहे.मुखवटा घातलेले आरोपी सेक्टर-26 पोलीस ठाण्यातून आले होते. आरोपींनी दुचाकी स्लिप रोडवर उभी केली. प्रथम त्याने सेव्हिल बार आणि लाउंजच्या बाहेर क्रूड बॉम्ब फेकला. यानंतर ते डीओरा क्लबबाहेर बॉम्ब फेकण्यासाठी आले. या दोन क्लबमध्ये सुमारे 30 मीटरचे अंतर आहे

सोशल मीडिया पोस्टमध्ये गोल्डी ब्रारचा हवाला देत लिहिले आहे – ‘गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स गँगचे रोहित गोदारा 2 स्फोटांची जबाबदारी घेत आहेत. या दोन्ही क्लबच्या मालकांना प्रोटेक्शन मनी साठी मेसेज करण्यात आला होता. पण त्यांना आमची कॉल बेल ऐकू येत नव्हती. त्यांचे कान उघडण्यासाठी हे स्फोट घडवले. जो कोणी आमच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करत आहे, त्याने हे समजून घेतले पाहिजे की यापेक्षा मोठे काहीतरी होऊ शकते.
बॉम्ब फेकणारा तरुण दुचाकीवरून आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. घटनेत वापरण्यात आलेल्या बॉम्बमध्ये खिळे आणि ज्वलनशील पदार्थ भरलेले होते. घटनास्थळावरून संबंधित वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. देशी बॉम्ब (सुतळी बॉम्ब) फुटले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिस खंडणीच्या कोनातूनही तपास करत आहेत.या घटनेचा सीसीटीव्हीही समोर आला आहे. पहाटे 3.15 वाजता एका युवकाने क्लबच्या दिशेने बॉम्बसदृश वस्तू फेकली. त्यानंतर मोठा स्फोट झाला. धुराचे लोट उठताच तरुणाने तेथून पळ काढला.

डीएसपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, पहाटे 3.25 वाजता आम्हाला नियंत्रण कक्षात वैयक्तिक समस्येची माहिती मिळाली होती. आमचे तपास अधिकारी घटनास्थळी गेले. एसएसपी कंवरदीप कौर यांनी ऑपरेशन सेल, गुन्हे शाखा, जिल्हा सेल आणि इतर पोलिस ठाण्यांना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री बसवणार: नाना पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीत घेतली मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींची भेट.

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२४
महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर नेमला जाईल, त्यामुळे उशीर होत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार प्रा. रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे खासदारही उपस्थित होते.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमच्या भेटीत पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे. हा निकाल अनपेक्षित आहेच पण तो जनतेलाही मान्य नाही. जनभावना वेगळ्या आहेत, त्या भावनांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच आदर केला आहे. ईव्हीएममध्ये गडबड असल्याची चर्चा सुरु आहे, मत एकाला टाकले तर ते दुसऱ्याला जाते असे मतदार सांगत आहेत तर सुप्रीम कोर्ट सिद्ध करून दाखवा असे म्हणत आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधात एखादे जनआंदोलन उभारले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.