Home Blog Page 74

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात. ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे. उष्णता, अति उष्णता, उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांची माहिती या लेखात देण्यात आली आहे.

उष्णतेचा आरोग्यावर परिणाम

सामान्य लक्षणे
सामान्य मानवी शरीराचे तापमान ३६.४ °C ते ३७.२ °C (९७.५°F ते ९८.९°F) दरम्यान असते. सामान्यतः उष्णतेशी संबंधित (सौम्य ते गंभीर) आजारांमध्ये अंगावर पुरळ (अंगाला टोचणारी उष्णता), सूज (उष्णतेमुळे हात, पाय आणि घोट्याला सूज येणे), पेटके (उष्णतेमुळे स्नायूंमध्ये पेटके), उष्माघात, गोंधळल्यासारखे वागणे, काहीही न सुचणे, उष्णतेमुळे थकवा यांचा समावेश होतो. उष्णतेमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी, श्वसन, किडनी रोगांसारख्या जुनाट आजारांवरील ताण देखील वाढू शकतो.

अति उष्णतेमुळे शरीरावर परिणाम करणारी लक्षणे: चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे, डोकेदुखी, मळमळ किंवा उलट्या, अति तहान लागणे, अतिशय गडद पिवळ्या लघवीसह लघवीचे प्रमाण कमी होणे, जलद श्वासोच्छवास आणि हृदयाचे वाढलेले ठोके

उष्माघाताची लक्षणे
डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे यासह प्रौढ व्यक्तिंमध्ये दिशाभूल, गोंधळासह बदललेली मानसिक संवेदना आणि चिडचिड, अॅटॅक्सिया, फेफरे किंवा कोमामध्ये जाणे, गरम, लाल आणि कोरडी त्वचा, शरीराचे तापमान 40°C किंवा १०४°F, धडधडणारी डोकेदुखी ही उष्माघाताची लक्षणे आढळतात. तर मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, अति चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा आणि अश्रू न येणे / खोल गेलेले डोळे, सुस्ती/बदललेल्या संवेदना, चिंता, चक्कर येणे, मूर्च्छा येणे आणि डोके हलके होणे, जखडणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव, स्रायू कमकुवत होणे किंवा पेटके येणे, मळमळ आणि उलटी, जलद हृदयाचे ठोके / श्वास घेण्यास त्रास ही लक्षणे आढळतात.

उपाय
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करत असताना या गोष्टींचा अवलंब करावा
संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.

उष्माघाताची लक्षणे आढळल्यास ही काळजी घ्या

व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवावे. व्यक्तीचे कपडे सैल करावेत. त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजावे. तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे आणि वैद्यकीय सल्ला घ्या.

उष्माघाताचा त्रास झाल्यास करावयाचे प्रथमोपचार
त्रास झालेल्या मुला-मुलीला लगेच घरात,सावलीत आणावे. संवेदनशील राहून त्यांचे कपडे सैल,ढिले करावेत. नळाच्या पाण्याने ओल्या केलेल्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात. उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत. हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा. पायांखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून त्यांना आडवे पडायला सांगावे. मूल जागे असल्यास वारंवार साफ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत. मूल बेशुद्ध असल्यास त्यांना खायला ,प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये.

उष्माघातापासून बचाव

काय करावे ?

अतिउष्णतेच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेने हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. त्यासाठी तहान लागली नसली तरीही जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्यावे. तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.भरपूर ताजे व हलके अन्न खाल्ल्यानंतरच घरातून बाहेर पडावे. फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे. पातळ, सैल, सुती, आरामदायी शक्यतो फिकट रंगाचे कपडे परिधान करावेत. उन्हात बाहेर जाताना डोके झाकावे. टोपी/कपडा/छत्रीचा वापर करावा. भरपूर पाणी, ओ. आर. एस. पाण्याचे द्रावण, ताक किंवा लस्सी, लिंबूपाणी, कैरीचे पन्हे इत्यादी घरगुती पेय घ्यावे. थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्यावा. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर, इतर स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात. सूर्यप्रकाशात उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालावी.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या https://mausam.imd.gov.in/ संकेतस्थळावर हवामानाची अद्ययावत माहिती मिळवावी. शक्य तितके चांगल्या हवेशीर आणि थंड ठिकाणी, घरामध्ये, सावलीत राहावे. थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या लाटांना अडथळा निर्माण करावा. शक्यतो तुमच्या घराच्या ऊन येणाऱ्या बाजूच्या खिडक्या आणि पडदे दिवसा बंद ठेवा, रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडाव्यात. घराबाहेर जात असल्यास, तुमची बाहेरील कामे दिवसाच्या थंड वेळेपर्यंत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मर्यादित करा. दिवसाच्या थंड वेळेमध्ये बाहेरच्या कामांचे वेळापत्रक किंवा नियोजन करावे.

उष्णतेचा त्रास आणि उष्णतेशी संबंधित आजाराचा अति धोका असतो, अशा जोखमीच्या लोकांकडे अतिरीक्त लक्ष दिले पाहिजे. यामध्ये लहान मुले आणि बालके, घराबाहेर काम करणारे लोक, शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब, गर्भवती महिला, ज्या लोकांना मानसिक आजार आहे अशा व्यक्तिंचा समावेश होतो.

थंड हवामानापासून उष्ण हवामानापर्यंतच्या भागात प्रवास करणाऱ्यांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा. उष्ण वातावरणात एक्सपोजर/शारीरिक क्रिया हळूहळू वाढल्याने (१०-१५ दिवसांपेक्षा जास्त) अनुकूलता प्राप्त होते.

काय करू नये?

रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडू नये. उन्हात अधिक वेळ राहू नये. तिखट मसालेदार आणि शिळे अन्न खाऊ नये. शरीरात पाण्याची कमतरता पडू देऊ नये. ताप आल्यास थंड पाण्याची पट्टी ठेवावी. कूलर किंवा एअर कंडिशनर्समधून थेट उन्हात बाहेर पडू नये. उन्हात विशेषतः दुपारी 12:00 ते 03:00 दरम्यान बाहेर पडणे टाळावे. दुपारच्या वेळी बाहेर पडताना अति परिश्रमाची कामे टाळावीत. अनवाणी बाहेर जाऊ नये. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेली पेये टाळावीत, कारण यामुळे शरीरातील द्रवपदार्थ जास्त प्रमाणात कमी होतात किंवा पोटात पेटके येऊ शकतात. पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना एकटे सोडू नये. वाहनातील तापमान धोकादायक ठरु शकते. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेले आदि व्यक्ती आपल्या नजरेस आल्यास १०८/१०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक: उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना पिण्याचे पाणी, ज्यूस सोबत ठेवा आणि शरीर हायड्रेटेड राहील याबाबत दक्षता घ्या. पातळ, सैल सुती कपडे परिधान करा. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री,टोपी आदींनी आपले डोके झाका.अनवाणी बाहेर जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या. अधिक माहितीसाठी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.

स्त्रोत:-सार्वजनिक आरोग्य विभाग

शबरी महामंडळाच्या कर्ज योजनांसाठी 15 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १० – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत एन.एस.टी.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्या सहकार्याने राज्य शासन पुरस्कृत स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.
शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड व लातूर या जिल्ह्यांतील आदिवासी लाभार्थ्यांसाठी महिला सबलीकरण योजना, स्वयंसहायता बचत गट, कृषी व संलग्न व्यवसाय, हॉटेल-ढाबा व्यवसाय, ऑटो वर्कशॉप, स्पेअर पार्ट्स, वाहन व्यवसाय, ऑटो रिक्षा, मालवाहू रिक्षा तसेच लघुउद्योग आदी योजनांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यांतील आदिवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in⁠ या संकेतस्थळावर १५ मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., शाखा कार्यालय जुन्नर येथील शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.

‘माझे पुणे, माझे बजेट’ उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन

पुणे : पुणे महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या वार्षिक अंदाजपत्रकाचे काम सुरू असून, त्यामध्ये पुणेकरांनाही सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी महापालिकेने ‘माझे पुणे, माझे बजेट’ हा विशेष उपक्रम सुरू केला असून, त्यामध्ये जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभाग घेत आपल्या परिसरातील आवश्यक विकासकामांच्या सूचना महापालिका प्रशासनाकडे नोंदविण्याचे आवाहन स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे.
पुण्याच्या विकासात पुणेकरांचा थेट सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास श्रीनाथ भिमाले यांनी व्यक्त केला. ‘नागरिकांच्या सहभागातून शहराची प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, उद्याने, सार्वजनिक सुविधा आदी संदर्भातील महत्त्वाच्या कामांची माहिती महापालिका प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू असून, त्यामध्ये पुणेकरांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब उमटण्यासाठी हा नागरिक सहभाग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील विकासकामांसाठी सूचना देऊन शहराच्या नियोजन प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सूचना नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना अर्ज भरता येणार असून, त्याद्वारे आपल्या परिसरातील आवश्यक कामांची माहिती थेट महानगरपालिकेकडे सादर करता येईल.
महानगरपालिकेच्या पीएमसी केअर या अधिकृत सिटिझन एंगेजमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सजग नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन, शहराच्या विकासाला हातभार लावण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘खंजिरीचे बोल’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (Film City) यांच्या अंतर्गत साकारण्यात येत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पहिल्या फीचर फिल्म ‘खंजिरीचे बोल’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप आज मुंबई येथे उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडताच चित्रपटाच्या शूटिंगलाही अधिकृत सुरुवात झाली. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच कोल्हापूर येथे सुरू होणार आहे.

एकेकाळी समाज प्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रभक्ती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी कीर्तन हे प्रभावी माध्यम मानले जात होते. संतांच्या कीर्तनातून समाजाला सकारात्मक दिशा मिळत असे. मात्र आधुनिक काळात ही परंपरा हळूहळू मागे पडताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारा, कार्यपद्धती आणि समाजासाठी केलेले कार्य व्यापक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा आणि समाजप्रबोधनाची परंपरा महाराष्ट्रासह देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत असून लेखन श्रीकांत बोजेवार यांनी केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण हिमांशु दुबे यांचे असून संगीत कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर चित्रपटाचे कला दिग्दर्शक संतोष फुटाणे आहेत.

महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (फिल्म सिटी) निर्मित, इन असोसिएशन विथ कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शन च्या सहयोगाने हा चित्रपट निर्मित करण्यात येत आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली असून, हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे. त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा, कीर्तन परंपरेचा आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेल्या विचारांचा प्रभावी पट या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.

यावेळी बोलताना सांस्कृतिक कार्यमंत्रीअॅड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून मानवी मूल्ये, राष्ट्रभक्ती, महान व्यक्तिमत्त्वे आणि त्यांच्या कार्यावर आधारित चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘खंजिरीचे बोल’ हा चित्रपट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित असून त्यांच्या ग्रामसेवा, परोपकार आणि भक्तीमार्गाच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोठे माध्यम ठरेल. अनंत महादेवन यांचे दिग्दर्शन आणि प्रसाद ओक यांचा प्रभावी अभिनय यामुळे हा विषय अधिक ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा मला विश्वास आहे. या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.

‘कम अर्ली-गो अर्ली’महिला कर्मचाऱ्यांसाठी सवलत–उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विधान परिषदेत घोषणा

महिलांना सन्मान, योग्य संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करावा
-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, दि. 10 :- मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत प्रस्तावावर झालेल्या विशेष चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्या म्हणाल्या, महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर “कम अर्ली-गो अर्ली” या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9.15 ते 9.45 या दरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची, म्हणजेच सुमारे 30 मिनिटांची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सभागृहात झालेल्या चर्चेत अनेक सदस्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. शासन या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती पावले उचलेल, असे त्यांनी आश्वासन दिले. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेअंतर्गत जुलै 2015 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत 14 मोहिमा राबवून 42 हजार 594 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेतून 5 हजार 66 महिला आणि 2 हजार 771 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून महिलांच्या समस्यांसाठी 51 ‘भरोसा सेल’ कार्यान्वित करण्यात आले आहेत.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे सांगताना त्यांनी ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजनांचा उल्लेख केला. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबविण्यात येत असून बचत गटांची उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाबाबत आणि पायाभूत सुविधांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राज्यातील 17 हजार 254 अंगणवाडी केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असल्याचे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्याची माहिती दिली.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली असून प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावे यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणे आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, बचत गटांचे बळकटीकरण, महिला शेतकरी व कामगारांसाठी विशेष उपाययोजना तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कायदे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी यावर राज्य सरकारचा विशेष भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. महिलांचे सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक सक्षमीकरणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे:महापलिकेच्या मुख्यसभेसमोर अहवाल ठेवा:निलेश निकम

पुणे- PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे याबाबतचा अहवाल तातडीने महापालिकेच्या मुख्य सभेसमोर आणावा अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज महापालिका आयुक्त यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात निकम यांनी म्हटले आहे कि , सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात PMPML प्रशासनाने, विशेषतः CMD यांनी संचालक मंडळाची पूर्वमान्यता न घेता अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याचे आणि आर्थिक अनियमितता केल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत.
या संदर्भात खालील मुद्यांवर तातडीने चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करावा.
१. बस खरेदी आणि कंत्राट प्रक्रियेतील अनियमितता
नियमबाह्य वर्क ऑर्डरः ४ ठेकेदारांकडून ८४ रुपये प्रति किमी दराने ४०० CNG बसेस घेण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रिया किंवा संचालक मंडळाची मान्यता न घेता त्याच ठेकेदारांना प्रत्येकी २० जादा बसेसची वर्क ऑर्डर कोणत्या आधारावर देण्यात आली?
आचारसंहितेचा भंगः डिसेंबर-जानेवारी २०२५-२६ मध्ये महापालिका निवडणूक आचारसंहिता लागू असताना, ९१ रुपये प्रति किमी या वाढीव दराने ५०० बसेस घेण्याची घाई का करण्यात आली? यामुळे होणाऱ्या कोट्यवधींच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार धरून संबंधित कंत्राट रद्द करावे,
निविदा प्रक्रिया पारदर्शकता: PMRDA, PMC आणि PCMC च्या निधीतून खरेदी होणाऱ्या १००० बसेसच्या
खरेदी प्रक्रियेचा (L1 ते L4 दर, पोर्टलवरील दर आणि खरेदी प्रक्रिया) संपूर्ण ‘A to Z’ अहवाल सादर करावा.
२. तांत्रिक आणि सुरक्षा त्रुटी
RTO पासिंग आणि सुरक्षाः
नवीन बसेसमध्ये ‘पॅनिक बटन’ आणि ITMS (Intelligent Transport Management System) नसल्याने RTO पासिंग रखडले आहे. जनतेच्या पैशातून घेतलेल्या या बसेस अशा अर्धवट स्थितीत का आहेत? या निष्काळजीपणाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

३. बेकायदेशीर पदोन्नती आणि नोकरभरती
प्रमोशन घोटाळाः
सेवाज्येष्ठता यादी आणि मंजूर सेवा नियमांना बगल देऊन, पात्र कर्मचाऱ्यांना संधी न देता CMD आणि प्रशासनातील ठराविक अधिकाऱ्यानी ‘अंतर्गत पदोन्नती (Internal Promotion) राबवली आहे आर्थिक व्यवहार करून नियमबाह्य दिलेले प्रमोशन्स त्वरित रद्द करून याची सखोल चौकशी व्हावी.
४. स्टोअर विभाग आणि साहित्य खरेदी
MRP पेक्षा जास्त दराने खरेदी: PMPML स्टोअरमध्ये सुटे भाग (Spare Parts) MRP पेक्षा जास्त दराने आणि निकृष्ट दर्जाचे खरेदी केले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे बसेसचे ब्रेकडाऊन आणि अपघात वाढत आहेत. मागील वर्षाच्या सर्व खरेदी फाईल्सची समितीमार्फत तपासणी व्हावी.
५. कर्मचारी कल्याण आणि देणी
सेवानिवृत्त सेवकांवर अन्यायः १/४/२०१७ ते ३१/१२/२०२२ दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाचा फरक आणि वाढीव ग्रॅच्युइटी का देण्यात आली नाही? १/१/२०२३ नंतरच्या सेवकांना लाभदेणे आणि जुन्या सेवकांना वंचित ठेवणे हा दुजाभाव थांबवून त्यांना तातडीने देणी अदा करावीत. वैद्यकीय सुविधाः कर्मचाऱ्यांच्या पगारातून २% रक्कम कपात केली जात असतानाही त्यांना वैद्यकीय सुविधा आणि हॉस्पिटल बिल का मिळत नाहीत? यातील टक्केवारी प्रकरणाची चौकशी व्हावी.
६. लेखा अधिकारी आणि बस स्टॉप उत्पन्न
लेखा अधिकाऱ्यांनी या नियमबाह्य खर्चावर आक्षेप का नोंदवला नाही? त्यांच्या नियुक्तीची आणि पगाराची कायदेशीरता तपासावी. तसेच शहरातील सर्व बस स्टॉप आणि BRT स्टॉपपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील सादर करावा.
वरील सर्व मुद्दे पुणेकरांच्या हक्काच्या पैशाशी आणि सार्वजनिक सेवेशी निगडित आहेत. तरी, या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि याचा सविस्तर अहवाल आगामी ‘मुख्य सभे समोर ‘ (General Body) सादर करावा. जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६

: किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील.

श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे.

जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली.

संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले.

कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे.

श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.

श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतोया भूमिकेत पाऊल ठेवतानाअतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहेकंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड  राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा- २०२६चे उद्घाटन

पुणे, दि. १० मार्च: जगामध्ये संपूर्ण जीव सृष्टीला विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवेल अशी  भयंकर युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. आज गरज आहे ती परस्परांबद्दल जिव्हाळा, आत्मियता, प्रेम, संघ भावनेची आणि हे केवळ खेळाच्या भावनेतूच शक्य होऊ शकते. युद्धाच्या जागी खेळ आणि विनाशाच्या जागी विकास हा संदेशच कुस्तीच्या माध्यामातून दिला जाईल. हे मैदान जागतिक शांततेचा एक आखाडा आहे. येथे स्वराज्य आणि स्वराष्ट्राच्या मातीतील कुस्तीचा विजयी नाद घुमणार आहे. असे विचार  विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रुई) च्या पवित्र यज्ञ भूमीवर विश्वातील एकमेव मानवतातीर्थ भवनाच्या विशाल प्रांगणात अभूतपूर्व  राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलते होते.

यावेळी हिंद केसरी पै. दिनानाथ सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच  महाराष्ट्र केसरी पै. आप्पासाहेब कदम,  श्री.बंडातात्या पाटिल, श्री.बापूसाहेब मोरे, श्री.विष्णू जोशीलकर, रामेश्वर (रुई)चे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, आमदार रमेशअप्पा कराड,  डॉ. हनुमंत कराड, श्री. राजेश कराड, श्री. ऋषिकेश कराड, प्रा.तेजस कराड, श्री. बाळासाहेब बडवे, श्री. सरकार निंबाळकर, डॉ. एस.एन. पठाण, डॉ. रत्नदीप जोशी , डॉ. महेश थोरवे  व प्रा.विलास कथुरे उपस्थित होते.

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदू ऐसे अशी परंपरा असलेल्या या गावात जागतिक स्तरावरील पैलवान येत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. खेळ परंपरेचा असून लोकांना जोडणारा असून भावी जीवनाला दिशा देणारा आहे. ही स्पर्धा १९ वर्षापासून सुरू आहे.

दिनानाथ सिंग म्हणाले, आधुनिक काळातही लाल मातीवर प्रेम करणारे डॉ. विश्वनाथ कराड हे खर्‍या अर्थाने कुस्ती जगविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. डॉ. कराड हे पुनम का चाँद आहे. त्यांनी पैलवानांना जो आधार दिला त्यातून त्यांचे खेळाप्रती प्रेम दिसून येते. ही स्पर्धा सतत अशीच चालत राहावी यासाठी पुढची पिढी तयार आहे.

हभप बापूसाहेब मोरे म्हणाले, जीवनातील प्रत्येक गोष्टीतून आनंद घ्यावा हे डॉ. कराड यांच्याकडून शिकले पाहिजे. प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ उभे केले आहे.

बाळासाहेब बडवे म्हणाले, महाराष्ट्राच्या कुस्तीचे हे वैभव अजरामर रहाण्यासाठी डॉ. विश्वनाथ कराड यांनी अद्वितीय कार्य केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले २५० पैलवान लाल मातीत उतरणार आहेत. उद्घाटनाची कुस्ती रामेश्वर येथील प्रसाद शिंदे व कोल्हापूर येथील प्रणव राख यांच्यात झाली.

कुस्ती स्पर्धेचे धावते वर्णन समालोचन बाबा निम्हण यांनी केले.
प्रा. विलास कथुरे यांनी प्रास्ताविकेत कुस्ती संदर्भातील माहिती दिली व आभार मानले.

14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध उपाययोजना

17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 8.73 कोटी महिलांची तपासणी : राष्ट्रीय NCD पोर्टल

नवी दिल्ली, 10 मार्च 2026

नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मॅटिक्स अँड रिसर्च (एनसीडीआयआर) – नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम (एनसीआरपी) यांच्या माहितीनुसार, 2021 ते 2025 या कालावधीत देशातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या अंदाजित रुग्णसंख्या आणि मृत्यूंची राज्य व केंद्रशासि सीएचसी त प्रदेशनिहाय माहिती अनुक्रमे परिशिष्ट I आणि II मध्ये देण्यात आली आहे.

राष्ट्रीय एनसीडी पोर्टलच्या माहितीनुसार, 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत देशात 8.73 कोटी महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे.

14 वर्षे वयोगटातील पात्र मुलींसाठी देशभरात एचपीव्ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर (एएएम), प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), समुदाय आरोग्य केंद्रे (CHCs), उपजिल्हा रुग्णालये (एसडीएच), जिल्हा रुग्णालये (डीएच) तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये (जीएमसीएच) या सरकारी आरोग्य संस्थांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure-I

Estimated Incidence of cancer cases in India by different State/UT wise (2021-2025) – Cervix  Uteri (C53)
State20212022202320242025
Jammu & Kashmir7071727273
Ladakh11111
Himachal Pradesh301303304306307
Punjab12791288129613051314
Chandigarh3636363737
Uttarakhand460465469474479
Haryana11481163117811931208
Delhi793767741716692
Rajasthan38523898394539914038
Uttar Pradesh1105411173112921141111530
Bihar77737892801281318250
Sikkim2323232424
Arunachal Pradesh3535363636
Nagaland158160161163164
Manipur102105108111114
Mizoram134138141144147
Tripura192195198201204
Meghalaya8788899090
Assam17501767178418021819
West Bengal63006334636864036437
Jharkhand24682501253425672600
Orissa29782998301830383057
Chhattisgarh14701487150415221539
Madhya Pradesh40934145419742494300
Gujarat24832436239023452372
Daman1111111112
Dadra & Nagar Haveli1919202021
Maharashtra48484752465845664600
Telangana31693185320132173233
Andhra Pradesh44604476449345094526
Karnataka55725607564256775712
Goa5856555354
Lakshadweep66666
Kerala16421649165516621668
Tamilnadu79028021814282648389
Puducherry139143147150154
Andaman & Nicobar Islands3232323232
Total7689877426779597849979239

Annexure-II

Estimated Mortality of cancer cases in India by different State/UT wise (2021-2025) – Cervix Uteri (C53)
State20212022202320242025
Jammu & Kashmir3838393939
Ladakh11111
Himachal Pradesh163164164165166
Punjab691696700705710
Chandigarh1919192020
Uttarakhand248251253256259
Haryana620628636644652
Delhi428414400387374
Rajasthan20802105213021552181
Uttar Pradesh59696033609861626226
Bihar41974262432643914455
Sikkim1212121313
Arunachal Pradesh1919191919
Nagaland8586878889
Manipur5557586062
Mizoram7275767879
Tripura104105107109110
Meghalaya4748484949
Assam945954963973982
West Bengal34023420343934583476
Jharkhand13331351136813861404
Orissa16081619163016411651
Chhattisgarh794803812822831
Madhya Pradesh22102238226622942322
Gujarat13411315129112661281
Daman66666
Dadra & Nagar Haveli1010111111
Maharashtra26182566251524662484
Telangana17111720172917371746
Andhra Pradesh24082417242624352444
Karnataka30093028304730663084
Goa3130302929
Lakshadweep33333
Kerala887890894897901
Tamilnadu42674331439744634530
Puducherry7577798183
Andaman & Nicobar Islands1717171717
Total4152341808420964239242789

****

ग्राहकांच्या तक्रारी प्राधान्याने सोडावाव्यात-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि.१० : ग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेवून त्या प्राधान्याने सोडाव्यात, ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन होणार नाही यादृष्टीने सर्व संबंधित विभागाने कार्यवाही करावी, जिल्ह्यात १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्राहकांचे हक्क व कर्तव्याविषयी जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय तसेच अशासकीय सदस्य, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सचिव महेश सुधाळकर, परिवहन अधिकारी, पोलीस, महावितरण आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत मांडलेल्या सूचना विचारात घेता सकारात्क विचार करुन कार्यवाही करण्यात येईल. या सूचनांचा बैठकीच्या इतिवृत्तात समावेश करुन सर्व संबंधित विभाग तसेच सदस्यांना इतिवृत्त उपलब्ध करुन द्यावे. या इतिवृत्तानुसार संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करुन आगामी बैठकीपूर्वी अनुपालन अहवाल सादर करावा. अनुपालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.

यावेळी परिषदेच्या सदस्यांनी ग्राहकांच्या सेवांबाबत सूचना केल्या.

युगांडा सरकारच्या शिष्टमंडळाची ‘मिनी सरस सावित्री जत्रा २०२६’ ला भेट

पुणे, दि. १० – पुणे जिल्हा परिषद आयोजित “मिनी सरस सावित्री जत्रा २०२६” या जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंसहाय्यता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या विविध दर्जेदार उत्पादनांना या माध्यमातून व्यापक बाजारपेठ उपलब्ध होत असून महिला सक्षमीकरणाला चालना मिळत आहे.
जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्या नेतृत्वाखाली या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या जत्रेला काल युगांडा सरकारच्या शिष्टमंडळाने विशेष भेट दिली. इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन सेंटर तसेच सार्वजनिक सेवा मंत्रालय आणि विज्ञान, तंत्रज्ञान व नवोपक्रम मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी स्वयंसहाय्यता समूहांच्या विविध स्टॉलना भेट देत महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांची पाहणी केली. काही वस्तूंची खरेदी करून त्यांनी ग्रामीण महिलांच्या कौशल्याचे व उद्योजकतेचे कौतुक केले. यावेळी Intreden Exim Private Limited चे मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते.
जत्रेनिमित्त आयोजित खरेदीदार–विक्रेता मेळाव्यालाही विविध कंपन्या व खरेदीदार गटांनी भेट दिली. त्यांनी स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांची पाहणी करून अनेक उत्पादनांसाठी ऑर्डर्स नोंदविल्या. तसेच महिलांना व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने उत्पादनांचे प्रभावी मार्केटिंग कसे करावे याविषयी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी जत्रेला रंगत आणली. आंबेगाव तालुक्यातील तिरपाड ग्रामपंचायतीच्या महिलांनी पारंपरिक लेझीम नृत्य सादर केले, तर बारामती येथील महिलांनी स्वयंसहाय्यता समूहांच्या कार्यावर आधारित पथनाट्य सादर केले.
लोकप्रिय युट्यूब चॅनल ‘सरिताज किचन्स’च्या सरिता पद्मन यांनी उपस्थित राहून व्हेज बिर्याणीचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच अन्नपदार्थ व्यवसायातील संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच ‘चांडाळ चौकडी’ मालिकेच्या टीमने मनोरंजनात्मक सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.
या उपक्रमाचे जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पुणे यांच्या टीमने नियोजनबद्ध व समन्वयपूर्ण पद्धतीने आयोजन केले आहे. ग्रामीण संस्कृतीचा वसा आणि महिलांच्या उद्योजकतेचा वारसा जपणारी ही “मिनी सरस सावित्री जत्रा २०२६” पुणेकरांसाठी १० व ११ मार्च रोजीही खुली राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

इराणने म्हटले- एक लिटर तेलही बाहेर जाऊ देणार नाही:इस्रायल-अमेरिकेच्या राजदूतांना काढा, तरच होर्मुझ स्ट्रेटमधून त्या देशांच्या जहाजांना जाण्याची परवानगी देऊ

तेहरान हल्ल्यात ४६० जण ठार, ४,००० जखमी

इराणची राजधानी तेहरानमध्ये झालेल्या हल्ल्यांनंतर ४६० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि ४,३०९ जण जखमी झाले आहेत. तेहरानच्या आपत्कालीन आरोग्य विभागाच्या उपप्रमुखांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इराणमध्ये झालेल्या या हल्ल्यांमध्ये १,२०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि १०,००० हून अधिक जखमी झाले आहेत.

आज इराणने जाहीर केले आहे की ते एक लिटरही तेल निर्यात करू देणार नाही. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या जाण्यावर एक नवीन अट घातली आहे.इस्रायली मीडिया विनीतच्या वृत्तानुसार, इराणचे सैन्य, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने म्हटले आहे की काही देशांच्या जहाजांना या मार्गाने जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते, परंतु त्यासाठी त्या देशांना प्रथम इस्रायल आणि अमेरिकेच्या राजदूतांना त्यांच्या देशातून हाकलून लावावे लागेल.होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, जो दरवर्षी जगातील सुमारे २०% तेल पुरवठ्याची वाहतूक करतो. अमेरिकन चॅनेल सीएनएनने म्हटले आहे की इराण या मार्गावरून जाणाऱ्या तेल टँकर आणि व्यापारी जहाजांवर, विशेषतः अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांवर सुरक्षा कर लादण्याची योजना आखत आहे.अमिराती मीडिया ऑफिसनुसार, अबू धाबीमधील एकात्मिक रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स असलेल्या रुवैस औद्योगिक क्षेत्रात ड्रोन हल्ल्यानंतर आग लागली.

अधिकाऱ्यांच्या मते, ड्रोन हल्ल्यामुळे औद्योगिक सुविधेत आग लागली, ज्यामुळे आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या.बचाव पथके आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
युद्धामुळे कोणत्या देशाचे काय नुकसान झाले?
ऊर्जा संकट-

भारत: कतार आणि युएईमधून ५९% एलएनजी खरेदी करतो. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे, महागाईचा धोका वाढला आहे.
पाकिस्तान: कतार आणि युएईवरील अवलंबित्वामुळे तीव्र ऊर्जा संकट. मंत्र्यांना परदेश प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे, शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या आहेत आणि घरून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बांगलादेश: पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत, विद्यापीठे बंद आहेत.
व्हिएतनाम: इंधन वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
इजिप्त: इंधनाच्या किमती ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
थायलंड: लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर.
सौदी अरेबिया:
जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कारखाना, रास तनुरा रिफायनरी हल्ल्यामुळे बंद आहे.
स्थलांतरित संकट-

भारत: आखाती देशांमध्ये अडकलेले सुमारे ५२,००० भारतीय परतले आहेत.
अफगाणिस्तान:
इराणमधून सुमारे ८०,००० अफगाण परतले आहेत. दररोज २००० अफगाणी सीमा ओलांडत आहेत.
सीरिया: २ मार्चपासून ८०,००० हून अधिक सीरियन लेबनॉनमधून परतले आहेत.
लेबनॉन: ५००,००० लोकांनी देश सोडला आहे.
हवाई वाहतूक संकट –

इराण आणि इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले.
यूएई, कतार आणि कुवेतने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले, हजारो उड्डाणे रद्द केली.
इराकने त्यांचे हवाई क्षेत्र ७२ तासांसाठी बंद केले.
पाकिस्ताननेही त्यांच्या हवाई क्षेत्राचे काही भाग बंद केले.

महिलांसाठी खास सॅलरी अकाऊंट सुरू करून येस बँकेने साजरा केला महिला दिन

मुंबईआंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या येस बँकने येस एसेन्स महिला सॅलरी अकाऊंट लाँच करण्याची घोषणा केली आहे. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या आर्थिक तसेच लाइफस्टाइलशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला  एक व्यापक उपाय आहे. आर्थिक संरक्षण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, लाइफस्टाइलशी संबंधित गोष्टी आणि संपत्ती निर्मिती या सर्व फायद्यांचा समावेश असलेल्या विशेष सेवा या नवीन ऑफरमधून मिळतील.

भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अहवालानुसार, 201718 आणि 202324 दरम्यान महिला रोजगारात लक्षणीय वाढ झाली आहेग्रामीण भारतात 96% तर शहरी भागातील महिला रोजगारात 43% वाढ झाली आहे. गेल्या सात वर्षांत 1.56 कोटींहून अधिक महिला नोकरी करू लागल्या आहेत. यामुळे अर्थातच एकूण आर्थिक वाढीमध्ये त्यांचा मजबूत सहभाग दिसतो.

ही सातत्यपूर्ण वाढ आरोग्य लाभांसह आर्थिक उपायांची गरज अधोरेखित करते. सातत्याने वाढ होत असलेल्या कार्यबलाशी सुसंगत राहूनयेस एसेन्स महिला सॅलरी अकाउंट तीन महत्त्वाच्या सर्वसमावेशक स्तंभांवर लक्ष केंद्रित करेल:

·         आर्थिक उपाय

o   पहिल्या वर्षासाठी विशेष मोफत लॉकर सुविधा

o   3-इन-1 खात्यावर पहिल्या वर्षासाठी 100% डीमॅट एएमसी सूट

o   पहिल्या वर्षी 34,000 येस रिवॉर्ड्ज मिळवण्याची आणि रिडीम करण्याची संधी

·         आरोग्य सुरक्षा आणि निरोगीपणा  

o   वर्षासाठी 5 लाख रुपये सुपर टॉप-अप आरोग्य कव्हर मोफत

o   वर्षातून एकदा वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी (घरी येऊन तसेच प्रयोगशाळेतही चाचणीची सुविधा)

o   आमच्या भागीदाराने दिलेले 1 वर्षाचे मोफत सदस्यत्वजे पालकत्व टूलकिटस्त्रीरोगतज्ज्ञबालरोगतज्ज्ञमानसशास्त्रज्ञपोषणतज्ज्ञ आणि इतर तज्ज्ञांशी  सल्लामसलत अशा आरोग्य सेवांची सुविधा देते.

·         लाइफस्टाइल खास सुविधा

o   युटिलिटीजकिराणा सामानप्रवास आणि अन्य यासारख्या निवडक श्रेणींवर वार्षिक INR 6,000 पर्यंतच्या 5% कॅशबॅकसह पूरक एलिगन्स डेबिट कार्ड.

या लाँचबद्दल येस बँकेचे रिटेल लायबिलिटीजफी आणि बिझनेस बँकिंगचे कंट्री हेड श्री. धीरज सांघी म्हणाले, “येस एसेन्स महिला सॅलरी अकाउंटद्वारेआम्ही घराबाहेर पडून काम करणाऱ्या महिलांना पाठिंबा देतो. औपचारिक कामकाजात महिलांचा वाढता सहभाग हा भारताच्या विकासाच्या मार्गात एक गतिमान बदल दर्शवतो. व्यावसायिक आणि आर्थिक निर्णय घेण्यामध्ये अधिकाधिक महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यानेएकात्मिकसंरक्षण-नेतृत्वाखालील बँकिंग उपायांची आवश्यकता अत्यंत गरजेची ठरते. हा क्युरेटेड सॅलरी अकाउंट म्हणजे महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देऊन त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याला सक्षम बनवणारा सर्वसमावेशक आर्थिक पर्याय तयार करण्याची आमची वचनबद्धता आहे.

या नवीन योजनेसह, येस बँक सर्व ग्राहक वर्गासाठी अधिक समावेशक आर्थिक परिसंस्था तयार करण्यासाठी ग्राहक प्रथम दृष्टिकोन आणि डिजिटल सक्षम सेवांवर लक्ष केंद्रित करते.

राज्यसभा निवडणुक- 26 नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश

दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील 26 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले नाहीत, त्यामुळे हे नेते मतदानाशिवायच राज्यसभेत पोहोचले. मात्र, बिहार, ओडिशा आणि हरियाणातील 11 जागांवर लढत निश्चित आहे. या राज्यांमध्ये अतिरिक्त उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक घेतली जाईल.
महाराष्ट्र (7)

शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
रामदास आठवले (आरपीआय-आठवले)
विनोद तावडे (भाजप)
रामराव वडकुते (भाजप)
माया इवनाते (भाजप)
ज्योती वाघमारे (शिवसेना -शिंदे)
पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
तमिळनाडू (6)

तिरुची शिवा (डीएमके)
जे कॉन्स्टंटाईन रविंद्रन (डीएमके)
एम थंबीदुरई (एआयएडीएमके)
अंबुमणी रामदास (पीएमके)
एम क्रिस्टोफर टिळक (काँग्रेस)
एल के सुधीश (डीएमडीके)
पश्चिम बंगाल (5)

राहुल सिन्हा (भाजप)
बाबुल सुप्रियो (टीएमसी)
माजी डीजीपी राजीव कुमार (टीएमसी)
ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी (टीएमसी)
कोएल मलिक (टीएमसी)
आसाम (3)

जोगेन मोहन (भाजप)
तेरोस गोवाला (भाजप)
प्रमोद बोरो (यूपीपीएल)
तेलंगणा (2)

अभिषेक मनु सिंघवी (काँग्रेस)
वेम नरेंद्र रेड्डी (काँग्रेस)
छत्तीसगड (2)

लक्ष्मी वर्मा (भाजप)
फूलो देवी नेताम (काँग्रेस)
हिमाचल प्रदेश (1)

अनुराग शर्मा (काँग्रेस)

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी विमानवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक विविध देशांमध्ये अडकून पडले होते. अशाच परिस्थितीत मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सुभेदार कुवेतमध्ये अडकला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करून मुलाला सुरक्षित भारतात आणण्याची विनंती केली होती. या आवाहनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत संबंधित यंत्रणांना हालचाली करण्याचे निर्देश दिले. अखेर सर्वांच्या प्रयत्नांमुळे विशाखा सुभेदार यांचा मुलगा सुखरूप मुंबईत परतला आहे.

अभिनय सुभेदार लंडनला जाण्यासाठी प्रवास करत होता. या प्रवासादरम्यान कुवेत येथे त्याचा ट्रान्झिट थांबा होता. मात्र त्याचवेळी इराणकडून कुवेतवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले सुरू झाल्याने परिस्थिती अचानक तणावपूर्ण बनली. सुरक्षेच्या कारणास्तव कुवेतचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि विमान कंपन्यांनी अनेक उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द केली. त्यामुळे अभिनय सुभेदार आणि त्याच्यासह इतर काही मराठी नागरिक कुवेतमध्ये अडकून पडले. पुढे प्रवास करणे किंवा भारतात परत येणे शक्य नसल्याने सर्वजण युद्धजन्य वातावरणामुळे भीतीच्या छायेत होते. कुवेतच्या आकाशात ड्रोन इंटरसेप्शनसारख्या घटना दिसत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर वाटत होती.

या पार्श्वभूमीवर विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करून मदतीची आर्त विनंती केली. त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज ठाकरे यांच्याकडे मुलाला सुरक्षित भारतात आणण्यासाठी मदत मागितली. या व्हिडीओनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशाखा सुभेदार यांना फोन करून मुलाला सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तातडीने कारवाई सुरू केली. मुख्यमंत्री कार्यालयाने वेगाने हालचाली करत विदेश मंत्रालयाशी संपर्क साधला आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले.

या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या यंत्रणांनीही मदत केली. फडणवीस यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास सांगितले. दरम्यान कुवेतमध्ये अडकलेल्या नागरिकांना थेट भारतात आणणे शक्य नसल्याने त्यांना सौदी अरेबियातील रियाध मार्गे परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यासाठी व्हिसाचा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी विदेश मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असीम महाजन यांनी पुढाकार घेत संबंधितांना सौदी अरेबियाचा व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यामुळे अभिनय सुभेदारसह सुमारे 30 महाराष्ट्रीयन नागरिकांना कुवेतहून रियाधकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

यानंतर या सर्वांनी सुमारे 700 किलोमीटरचा जवळपास दहा तासांचा रस्ते प्रवास करून रियाध गाठले. तेथून भारतात परतण्यासाठी विमानप्रवासाची व्यवस्था करण्यात आली. नियोजनानुसार 9 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी रियाधहून मुंबईकडे जाणारे विमान उड्डाण केले. हे विमान 10 मार्चच्या पहाटे सुमारे 3 वाजता मुंबईत उतरले. या विमानातून अभिनय सुभेदारसह महाराष्ट्रातील जवळपास 30 नागरिक सुरक्षितपणे मायदेशी परतले. या संपूर्ण प्रक्रियेत कुवेतमधील भारतीय दूतावासानेही महत्त्वाची मदत केल्याची माहिती देण्यात आली आहे.