मुंबई : राज्यात आणि मुंबई शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न वाढत आहे. अधिकृत बांधकाम प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याचा कायदा आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली कठोरपणे झालेली दिसत नाही. त्या कायद्यान्वे आजपर्यंत एकाही संबंधित अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कारवाई झालेली नाही. परंतु सरकार अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करण्या संबंधी गंभीर असून कायद्यातील पळवाट थांबण्यासाठी उपाययोजना करत असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कायदा झाला मात्र त्याची कठोर अंमलबजावणी होत नाही तसेच मुंबईतील वाढत्या अनधिकृत बांधकामावर सरकारने कारवाई करावी यासाठी विधानपरिषदेत आज आमदार सचिन अहिर, आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील शिंदे यांनी लक्षवेधी मांडली त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ सभागृहात बोलत होतया.
विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, मुंबई शहरात 7 हजार 951 अनधिकृत बांधकामे आहेत पैकी 1 हजार 211 अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली आहेत. तर 2 हजार 115 प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत, तसेच 169 प्रप्रकरणे न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार रिवाईज साठी टाकण्यात आलेली आहेत.
राज्य सरकार कोणत्याही अनधिकृत बांधकामाला किंवा अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही असे सांगत राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, अनधिकृत बांधकाम करण्यासाठी भराव टाकल्या प्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल झालेले आहेत, काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने आपण कारवाई करू शकत नाही, मात्र त्यावर काय उपाययोजना करता येतील का? यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
दरम्यान, रघुवंशी मिल मधील अनधिकृत बांधकामाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील कमिटी नेमण्यात आल्याचे राज्यमंत्री मिसाळ यांनी सुनील शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मुंबई, दि. १९ : नागपूर शहरातील महाल परिसरात १७ मार्च २०२५ रोजी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
जमावातील काही व्यक्तींनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी केली, ही अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, संबंधित आरोपींची तातडीने ओळख पटवून चौकशी करावी. यावेळी अन्य महिला नागरिकांना त्रास झाला का हे देखील तपासले जावे. अशा घटना रोखण्यासाठी भविष्यात विशेष नियोजन करण्याची गरज असून, महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना आखाव्यात आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण व साधनसामग्री पुरवावी, अशीही मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम राबवणे अत्यावश्यक आहे. समाजात पोलीस दलाबद्दल आदर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मतही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. महिलांचे सक्षमीकरण होण्यासाठी पोलिसांनी त्यांना कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यासाठी प्रभावी प्रशिक्षण द्यावे आणि त्यासंबंधी ठोस धोरण तयार करून शासनास प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सूचित केले.
महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले गंभीर आणि असह्य असून, अशा घटना रोखण्यासाठी तातडीने कडक पावले उचलण्यात येतील, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
महावितरण मुख्यालय प्रशारणीय प्रणालीच्या छतावरील सौर उर्जेचे उद्घाटन महावितरणचे अध्यक्ष व प्रशासकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या लाभार्थ नुकतेच आले. महावितरणचे प्रकाशगड मुख्यालय हे आता सौरऊर्जेव्दारे प्रकाशमान आहे. प्रकाशगड मुख्याची दिनदिनी विजेचीालय गरज भाग करण्यासाठी २८० किलो व नेटवर्कची ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यात आली आहे.
महा पर्यावरणपूरक सौर ऊर्जेचा वापर करून प्रोत्साहन दिले जात आहे. शेतीसाठी शेतकरी वीज उपलब्ध व्हावी मा.मुख्यमंत्री या सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी मंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राब सत्ता येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंपामधून विजेसाठी कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पीएम घर मोफत वीज ग्राहकांना छतावर सौरऊर्जा घरातून विजेच्या स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. फक्त १०० गावे सौरग्राम म्हणजे १०० टक्के सौरउर्जेवर आणण्यासाठी सौरग्राम योजना राबत येत आहे. एकंदरीत हरित ऊर्जेचा वापर विकसित करण्यासाठी विविध योजना चालवल्या जात आहेत.
महावितरणच्या मुख्यालय छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे अध्यक्ष संचालक भादिकर (संचालन तथा मानव संसाधन), रप्रसादमे (प्रदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), कार्यकारी अधिकारी (कल्प) धनंजय औंढेकर, प्रादेशिक संचालक परेश भागवत, प्रमुख विभाग स्वच्छता होती. राजधानीदार मध्ये टेक फोर्स सेलिसेस नागाल यांनी या उभारणी केली आहे.
पुणे , 17 2025 : आदित्य बिर्ला मार्चअल इस्टेट लिमिटेड 100% पूर्ण बिर्ची उपकंपनी इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड बिर्ला पुण्य हाटेल त्यांची कंपनी सुरू केली असून अंदाजे गुणवत्ता क्षमता 2700 कोटी रु. आहे. संगमवाडीयेथे कंपनीचा निवासी प्रकल्प आहे. 5.76 एकर क्षेत्रावरील या प्रकल्पात 1.6 दशलक्ष चौरस फूट विक्रीयोग्य क्षेत्र असून त्यामध्ये 1000 विशेष फ्लॅट्स तयार करण्यात आले आहेत. हे फ्लॅट्स प्रशस्त आणि आधुनिकासाठी तयार करण्यात आले आहेत. तुमचा समृद्ध सांस्कृतिक वारसा , स्थानिक जैवविविधता आणि स्थापत्यशैलीची प्रेरणा सुरक्षा या शांततापूर्वक विचारपूर्वक डझनवर्समध्ये 1 बीएचके ते 4 बीएचके पर्यंतच्या आलिशान निवासी बस्स असतील . हा घटक गुणटप्प्याने विकसित केला जाणार आहे आणि पहिल्या महत्त्वाच्या दोन टॉवर्स आणि 50 भागांचा समावेश असेल.
अतुलनीय रमणीय जीवन अनुभवण्यासाठी निसर्ग , संस्कृती आणि वास्तु उत्कृष्ट मिलाफ साधत मध्यवर्ती संगमवाडी येथे वसलेले पुण्य निर्माता कंपनीच्या LifeDesigned® तत्वज्ञानाचे उदाहरण आहे. शिवाजीनगर , कोरेगाव पार्क आणि पुणे ऑलिटरमेंटल या शहराच्या चैतन केंद्रासाठी उत्कृष्ट कनेक्टी जोडून ठेवेलअसा हा प्रकल्प . मुळा-मुठा रिव्हरफ्रंटला आहे , स्थानिक स्थानी सुविधा प्रवेश आणि हिरवाई निसर्गाच्या निसर्ग वातावरण बिर्ला पुण्य शहरात आणि निसर्ग समतोल साधला आहे. शहराचा वारसा आणि आकांक्षांचा सुंदर मिलाफ साधणारा हा सुयोग्य आधुनिक आणि कालीत सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे . त्यायोगे तो सर्वात जास्त जागा असलेल्या निवासी ठिकाणी एक म्हणून स्वतःला प्रस्थापित करत आहे.
याच्या खुलासेच्या बिर्ला इचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के. टी. भेदेंद्र म्हणाले , ” माहिती तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि क्षेत्रभूत सुविधांच्या विकासासाठी मजबूत रिअल इलाकेची पायाभरणी आहे . बिर्ला पुण्यच्या आमच्या समकालीन आधुनिक आलिशान घरे आणि कालातीत मोहकतेचा समतोल साधत उच्च दर्जाणीमानाचा मापदंड स्थापित उद्दिष्ट ठेवले आहे.
आरामदायी आणि सर्वसमावेशक अनुभव निर्माण करून बिर्ला पुण्य मध्ये 50 पेक्षा अधिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील . ॲडला जोडलेल्या रिटेल रिटेलमध्ये अल्फ्रेस्को (खुल्या जागेतील) F&B आणि रिटेल स्पेसेस तसेच एक रिव्हरसाइड प्रोमनेड देखील असेल . सार्वजनिक कार्यक्रम तसेच लोकांना एकत्र येण्यासाठी ते उत्तम ठिकाण असेल. बिर्ला पुण्य हे शाश्वत लोकांसाठी वचनबद्ध आणि पावसाचे पाणी साठवणे , सौरऊर्जेचा वापर करणे अशा पर्यावरणपूरक उपायांचा समावेश यात आहे.
कंपनीने गेल्या वर्षी मांजरी , पुणे येथे १६.५ एकर ( ३.१ दशलक्ष चौरस फूट) आकाराचा भूखंड घेतला . त्याचप्रमाणे , अलीकडेच बिर्ला अमेरिका आणि बिर्ला ईव्हरचा शुभारंभ करणारी कंपनी अनुक्रमे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र ( एनसीआर) आणि बंगळुरूवर लक्ष केंद्रित केले आहे.
बिर्ला इस्टेट्स बद्दल:
बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड ही आदित्य बिर्ला रिअल इस्टेट लिमिटेड (पूर्वी सेंच्युरी टेक्सटाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. अल्पावधीतच बिर्ला इस्टेट्सने रिअल इस्टेट उद्योगात पसंतीचा ब्रँड म्हणून स्वतःची स्थापना केली आहे. बिर्ला इस्टेट्स प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रीमियम निवासी घरे विकसित करते. कंपनी स्वतःच्या जमिनी विकसित करण्याव्यतिरिक्त थेट खरेदी तसेच मालमत्ता हलक्या संयुक्त उपक्रमांद्वारे जमिनीचे पार्सल विकसित करत आहे. दीर्घकाळात, कंपनी जागतिक दर्जाच्या निवासी, व्यावसायिक आणि मिश्र वापराच्या मालमत्ता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि भारतातील शीर्ष रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवते. कंपनीचे लक्ष शाश्वतता, अंमलबजावणी उत्कृष्टता, ग्राहक केंद्रितता आणि विचारशील डिझाइनद्वारे वेगळे करण्यावर आहे.
कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि सध्या तिची एनसीआर, बेंगळुरू आणि पुणे येथे प्रादेशिक कार्यालये आहेत आणि वरळी, मुंबई येथे सुमारे ६ लाख चौरस फूट भाडेपट्ट्यावरील क्षेत्रासह २ ग्रेड-ए व्यावसायिक इमारतींसह एक सुस्थापित व्यावसायिक पोर्टफोलिओ देखील आहे.
दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभा सभागृहात मागणी
पुणे/मुंबई- (दि १९): आज सकाळी हिंजवडी फेज १ येथे मिनी बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली, यामध्ये प्रवास करणाऱ्या व्योमा ग्राफिक्स कंपनीतील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित कंपनीमार्फत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक करण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभा सभागृहात केली. शासनाने संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी आणि कुटुंबीयांना न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून प्रशासनाने सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत तसेच आग लागलेल्या संबंधित वाहनाची देखभाल आणि सुरक्षा तपासणी झाली होती का, याचाही सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.
हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते.
अध्यक्षा ॲड. सुशिबेन शाह यांनी घेतली गंभीर प्रकरणांची दखल
पुणे -महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध बालहक्क प्रकरणांवर दिनांक १७ व १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे दोन दिवसीय सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान बालकांच्या शिक्षण हक्कांशी संबंधित प्रकरणे, मूलभूत हक्कांचे उल्लंघन, तसेच विविध कायद्यांतर्गत प्राप्त तक्रारींवर सखोल चर्चा करण्यात आली.
या सुनावणीत एकूण ६० प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम, २००९ अंतर्गत प्राप्त तक्रारी, POCSO अधिनियम अंतर्गत लैंगिक शोषणासंदर्भातील प्रकरणे, JJ Act (जुवेनाईल जस्टिस कायदा) अंतर्गत प्रकरणे आणि बाल हक्क उल्लंघनासंदर्भातील विविध तक्रारींचा समावेश होता.
सुनावणीदरम्यान विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बालकल्याण समिती, पुणेचे अध्यक्ष आणि सदस्य, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी (पुणे महानगरपालिका), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शिक्षण संचलनालयातील अधिकारी व कर्मचारी या सुनावणीत सहभागी झाले.
या सुनावणीत शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने काही शाळांनी शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने काही शाळांनी सुनावणी दरम्यान आयोगाने दखल दिल्यामुळे पालक व शाळा यांच्यामध्ये सामंजस्याने पालकांना त्यांच्या पाल्याची शाळा सोडल्याचे दाखले दिल्या बाबतचा अहवाल सादर केला. तसेच पोलीस विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये झालेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगासमोर सादर करण्यात आला.
मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच, POCSO आणि JJ Act अंतर्गत प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. बालकांचे हक्क संरक्षित राहावे आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कटिबद्ध आहे, असे यावेळी आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शाह यांनी सांगितले.
सदर सुनावणीस आयोगाचे सदस्य संजय सेंगर, जयश्री पालवे, चैतन्य पुरंदरे, सायली पालखेडकर, प्रज्ञा खोसरे देखील उपस्थित होते.
पुणे- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ औंध गाव येथे कर्तुत्वावान महिलांचा सन्मान करण्यात आला शिवाजी नगर उपविभाग संघटिका सौ.सोनाली ताई जुनवणे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते . सदर कार्यक्रमाला ७० हून अधिक विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या त्यांना ट्रॉफी, शाल आणि फुलांची कुंडी असे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पीएसआय स्नेहल पाटील चतुःशृंगी पोलीस चौकी, शिवसेना विभाग प्रमुख रमेश जुनवणे तसेच महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, ज्योती चांदिरे, रेखा कोंडे, करुणा घाडगे, विजया मोहिते, तसेच अनेक शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या
पुणे- आज विधानसभेत आमदार भीमराव तापकीर यांनी महापालिकेच्या कारभारावर एकूणच आपल्या सौम्य भाषेत ताशेरे ओढले. समाविष्ट गावांच्या प्रश्नानंतर त्यांनी महापालिकेतून गुंठेवारीची कागदपत्रे गहाळ झाल्याचा गौप्यस्फोट केला आणि बोगस गुंठेवारी सुरु असल्याचा देखील आरोप करत या संदर्भात अधिकाऱ्यावर कारवाई ची मागणी केली .
तत्पूर्वी आज समाविष्ट गावातील मिळकत कर , पाणीपुरवठा यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली
: आयुक्तांची गावांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात होणार बैठक
पुणे : पुण्यामध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या ३२ गावांनी पुणे महापालिकेला किती मिळकत कर दिला? आणि महापालिकेने काय सोयी सुविधा उपलब्ध करून दिला? पुणे महापालिका आयुक्तांनी या गावांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही त्यांच्याकडे ती क्षमताच नाही अशी खरमरीत टीका खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसेभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
पुणे शहराच्या चोहू बाजूने असलेल्या ३२ ग्रामंपंचायती पुणे महापालिकेत विसर्जित करून पुणे शहाराचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे या गावांचा महसुली कर ग्रामपंचायत ऐवजी महापिलेकत जमा होत आहे. ३२ गावांतून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे मात्र त्या तुलनेत या गावांमध्ये ना रस्ते, ना ड्रेनेज, ना शुध्द पाणीपुरवठा महापालिकेत पुरवते आहे, त्यामुळे या गावांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून अनेकवेळा आंदोलन केले आयुक्तांना निवेदने दिली आहेत. मात्र आयुक्तांनी त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आमदार भीमराव तापकीर यांनी ३२ गावांचा प्रश्न विधानसभेत विचारला.
आमदार तापकीर म्हणाले की, ३२ गावांनी मिळून महापालिकेला आत्तापर्यंत किती टॅक्स दिला आहे. तो आकडा मंत्रीमहोदयांनी द्यावा तो आता उपलब्ध नसेल तर तातडीने या गावांच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक घ्यावी आणि त्यावेळी या गावातून मिळालेले महसूली उत्पन्न सांगावे. गावनिहाय कराची रक्कम सांगावे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याची सुचना मंत्री उदय सामंत यांना दिली.
कौशल्य विकास केंद्र लवकरच तब्बल १९० कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे कौशल्य विकास केंद्र पुण्यामध्ये लवकरच होणार आहे. उद्योजक रतन टाटा हयात असताना याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी १६० कोटी रुपये टाटा ग्रूपकडून सीएसआर व्दारे मिळणार आहे तर उर्वरित रक्कम पुणे महापालिका देणार आहे. याची बैठक लवकरच होणार असून त्या बैठकीला सर्वांना बोलाविण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
पुणे- नव जागृती मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव डी. जे. ला फाटा देत टाळ मृदुंग च्या भक्ती सुरात व मर्द मराठा मैदानी खेळाच्या गजरात साजरा करण्यात आला. दिनांक 17 मार्च 2025 शिवशके 351 शिवजन्मोत्सव रोजी शिवनिर्णय दिनदर्शिका आमदार सुनील कांबळे,लेखक, व्याख्याते प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते व अध्यक्ष राहुल शर्मा यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक रित्या प्रकाशित करण्यात आले. नागपूर येथे धार्मिक तेढ निर्माण झाली असता पुण्यात मात्र एकते चे सकारात्मक दृश्य दिसले , भक्ती शक्ती संगम च्या अंतर्गत शिवजन्मोत्सव दिनी येथेच मुस्लिम बांधव यांच्या सोबत रोजा इफ्तार करण्यात आले.
हा कार्यक्रम मंगळवार पेठ येथील नव जागृती मित्र मंडळ यांनी आयोजित करण्यात आला बजमे तहा, बजमे रहेबर व युनिटी फ्रेंड सर्कल यांनी संयुत रित्या सहभाग घेतला.अध्यक्ष राहुल भाऊ शर्मा, राकेश यादव, पंकज अगरवाल, अक्षय बारसकर, कुणाल यादव, कपिल अगरवाल, सागर कदम, जुनेद तांबोळी, आयाज खान, राजू शेख, अजहर तांबोळी, समीर पठाण, तारिक शेख, सलीम शेख, इस्माईल यार खान, रफिक शेख, फराज खान, अकबर कुरेशी, इकबाल शेख आदी सहभागी व अनेक रोजदार उपस्थित होते.
मुंबई-बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राध्यापक आणि विद्यार्थी असल्याचे भासवून लंडन येथे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ जणांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी हरियाणातील आहेत. यातील तिघेजण हे अल्पवयीन आहेत. मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन तरुणांनी मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरवर पडताळणीसाठी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा सादर केला. त्यांच्याकडे इंग्लंडचा व्हिजिट व्हिसा होता. हरियाणातील एका विद्यापीठाचे विद्यार्थी असून प्राध्यापकांसह लंडनला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इतर प्रश्न विचारल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्यासह आणखी ६ जण लंडनला जाणार असल्याची माहिती मिळाली. या सर्वांना गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्यावर पारपत्र कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. व्हिसा मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली.
गृहमंत्र्यांना पोलिसांना सुरक्षित ठेवता येत नसेल तर राज्य कसे सुरक्षित ठेवणार?
मुंबई-नागपूरमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसतील तर राज्य सुरक्षित कसे सुरक्षित ठेवणार? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीतेश राणेसारख्या अतिशय भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात 33 पोलfस जखमी झाले. ही दंगल सुरू असताना काही समाजकंटकांनी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आली आहे. यावरुन अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
नागपूर मध्ये झालेल्या दंगलीवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये दंगल नियंत्रण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या दंगली दरम्यान करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्याने आता या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नितेश राणेसारख्या भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे. नागपूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. पोलिसांना सुरक्षित ठेवू शकत नसाल तर राज्य सुरक्षित कसे राहील?
सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, नीतेश राणेसारख्या अतिशय भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का? नागपूरमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसतील तर राज्य सुरक्षित कसे सुरक्षित ठेवणार? विधानसभेत लाडक्या बहिणीची ढाल केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मढी उकराताहेत? विकासाचं गाठोडं काय अरबी समुद्रात बुडवलं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी करण्याची स्पर्धा लागली आहे.अशा वक्तव्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शिवसेना उबाठा पक्ष कदापिही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोरटकर यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देणार असल्याचे सांगितले.
पुणे — हिंजवडी परिसरात एका मिनी बसला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त असून , दोघे जण गंभीर भाजलेत. हिंजवडी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी या भीषण अपघाताची माहिती दिली. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला ही आग लागली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. या बसमध्ये एकूण 12 कामगार होते. मात्र, मागचा दरवाजा न उघडल्याने ही चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
फेज १ रोडवर, व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली होती. सदर आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचार कामी पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने संबंधित भीषण घटना घडली
सुनीता विल्यम्सच्या वडिलांच्या गावी मिरवणूक, दिवाळीसारखा आनंदोत्सव
वाशिंग्टन-तब्बल नऊ महिने अंतराळात अडकून पडलेल्या ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी पहाटे ३.२८ वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात सुखरुप लँड झाली. तिच्यासोबत बेरी विल्मोर, निक हेग व रशियाचे अॅलेक्झांडर गोरबुनोव हेही होते. भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी १०.३५ वाजता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या स्पेसएक्स या ‘ड्रॅगन कॅप्सूल’द्वारे पृथ्वीच्या दिशेने त्या निघाल्या होत्या. त्यांचा हा प्रवास १७ तासांचा होता. टेकऑफपूर्वी जपानचे अंतराळवीर ताकुया ओनिशी यांना कॅप्सूल व स्पेस स्टेशनच्या दरम्यान हॅच सीलवर धुळीचे कण दिसले. सील एअरटाइट होण्यासाठी हे कण हटवणे आवश्यक होते. ओनिशी यांनी हे काम फत्ते केले, यानंतर टेकऑफला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आतापर्यंत ‘ड्रॅगन’ १० वेळा अंतराळ यात्रींना स्पेस स्टेशनला घेऊन गेला. पैकी ९ वेळा सुखरूप परतला. अाता त्यांचा दहावा प्रवासही सुखरुप पार पडला. सुनीता विल्यम्स व विल्मोर यांना अंतराळात फक्त ८ दिवस राहायचे होते, पण तांत्रिक अडचणीमुळे २८६ दिवस त्यांना अडकून पडावे लागले. यादरम्यान त्यांनी ४५०० वेळा पृथ्वीची परिक्रमा केली.
नासाचे अधिकारी रॉब नावियास यांनी सांगितले, ‘अंतराळातील ही सर्वात मोठी मोहीम नसली तरी आव्हानात्मक अाहे.’ सुनीता तीन मिशनमध्ये एकूण ६०९ दिवस अंतराळात राहिली. ती नवव्या क्रमांकावर आहे. रशियाचे ओलेग कोनोनेन्को १११० दिवस राहून पहिल्या स्थानी आहे. टॉप १० मध्ये रशिया/ सोव्हिएत संघाचे ८ व अमेरिकेचे २ अंतराळवीर आहेत. पेगी विटसन (६७५ दिवस) यांच्यानंतर सुनीता सर्वाधिक काळ अंतराळात राहणारी अमेरिकन ठरली आहे.
सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या वडिलांचे गाव झुलासणमध्ये दिवाळीसारखी तयारी केली होती. सुनीता सुखरुप आल्याचे कळताच या गावात जल्लोष साजरा झाला. सुनीता यांचे चुलत भाऊ नवीन पंड्या यांनी सांगितले की, त्यांच्या स्वागतासाठी एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. यात प्रार्थना आणि आतषबाजीसह दिवाळी आणि होळीसारखे वातावरण हाेते. मिरवणुकीत सुनीतांचे छायाचित्र होते. ग्रामस्थ त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत होते. अखंड ज्योतही लावण्यात आली होती. ही ज्योत सुनीता अंतराळात गेल्या तेव्हापासून जळत आहे. ग्रामप्रमुख विशाल पंचाल यांनी सांगितले की, शाळकरी मुलेही १५ दिवसांपासून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी रामधून गात आहेत. सुनीता यांचे वडील दीपक पंड्या यांचे मूळ गाव झुलासण आहे. ते १९५७ मध्ये अमेरिकेत गेले होते. गावातील लोक सुनीता यांच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. भविष्यात त्या गावी आल्यास त्यांचे भव्य स्वागत करण्याचा बेत आखत आहेत. उल्लेखनीय म्हणजे सुनीता यांनी आतापर्यंत ६२ तासांचे नऊ स्पेसवॉक पूर्ण केले आहेत.
ड्रॅगन कॅप्सूल अंतराळ स्थानकातून निघाले ड्रॅगन पृथ्वीवर परतले
३:२३ वा. : पुनर्प्रवेश टप्पा पूर्ण झाल्यानंतर कॅप्सूलशी संपर्क पुन्हा स्थापित.
३:२४ वा. : कॅप्सूल स्पष्ट दिसले, दोन्ही पॅराशूट उघडले. ३:२५ वा. : आणखी दाेन पॅराशूट उघडले ३:२६ वा. : ड्रॅगन कॅप्सूल उतरण्यासाठी तयार ३:२८ वा. : कॅप्सूल समुद्रात उतरली३:३२ वा. : दोन नाैका कॅप्सूलजवळ पाेहाेचल्या ,२५ मिनिटांनी सर्वांना बाहेर काढण्यात आले.
सुनीता यांचे यान समुद्रात लँड होताच २ सुरक्षा बोटींतून आलेल्या अभियंत्यांनी ड्रॅगन कॅप्सुलची तपासणी केली. यानंतर रिकव्हरी शिप आणले. (इन्सेटमध्ये) कॅप्सुलमध्ये सुनीता उजवीकडे, बाजूला क्रूचे कमांडर व पायलट, डावीकडे विल्मोर. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासण येथे प्रार्थना करण्यात आली.केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहिले. त्यांनी ‘भारताच्या कन्येबद्दल’ चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले, ‘हजारो मैल दूर असलात तरी तुम्ही आमच्या हृदयाजवळ आहात. भारतातील लोक तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही परतल्यावर भारतात तुमचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतासाठी आपल्या सर्वात प्रतिष्ठित मुलींपैकी एकीचे आतिथ्य करणे ही अभिमानाची गोष्ट असेल. श्रीमती बोनी पंड्या (सुनीताची आई) तुमच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत असतील. मला खात्री आहे की दिवंगत दीपक (वडील) यांचे आशीर्वादही तुमच्यासोबत आहेत.
सुनीता पृथ्वीवर तेव्हा स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकणार नाहीत, नॉर्मल होण्यास लागेल दीड महिना; पहिल्या टप्प्यात चालण्याचे प्रशिक्षण
सुमारे ९ महिने त्या गुरुत्वाकर्षणाशिवाय अंतराळात राहत आहेत. त्यांना स्ट्रेचरवर रुग्णालयात नेण्यात आले . नासाच्या माहितीनुसार, यानंतर त्यांची रिकव्हरी प्रक्रिया सुरू झाली . डॉक्टरांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात त्यांच्या चालण्यावर, लवचिक होण्यावर व मांसपेशी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सर्वसामान्यांप्रमाणे होण्यासाठी त्यांना ६ आठवडे लागू शकतात. या काळात विशेष व्यायाम, पोषक आहारावर लक्ष दिले जाईल. स्पेस स्टेशनमध्ये नवीन व जुन्या क्रूमध्ये ५ दिवसांचा ‘हस्तांतरणाचा काळ’ असतो. यात नवीन क्रूला संपूर्ण माहिती दिली जाते. पण यंदा नासाने स्पेस स्टेशनवर भोजनाची बचत व्हावी म्हणून ही मुदत २ दिवस केली. अनिश्चित वातावरणात क्रू ९ मधील सदस्यांना परतीसाठी अधिक वेळ मिळावा, हेही कारण होते. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या मोहिमेला गती मिळाली. ट्रम्प यांनी सुनीता व विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी इलॉन मस्कवर सोपवली हाेती.
८ दिवसांच्या मोहिमेवर गेले, पण त्यांना ९ महिन्यांहून अधिक काळ लागला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाची अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता.अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरील त्यांच्या ८ दिवसांच्या कालावधीत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. पण थ्रस्टरमध्ये समस्या आल्यानंतर, त्यांचे ८ दिवसांचे मिशन ९ महिन्यांहून अधिक काळ वाढवण्यात आले. अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तास लागले-ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते समुद्रात उतरेपर्यंत सुमारे १७ तास लागले. १८ मार्च रोजी सकाळी ८:३५ वाजता, अंतराळयानाचा दरवाजा उघडला गेला. १०:३५ वाजता अंतराळयान आयएसएसपासून वेगळे झाले.१९ मार्च रोजी पहाटे २:४१ वाजता डीऑर्बिट जळण्यास सुरुवात झाली. म्हणजेच, अंतराळयानाचे इंजिन कक्षापासून विरुद्ध दिशेने चालवण्यात आले. यामुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकले आणि पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.
पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी २० व २१ मार्च रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे यांनी कळविली आहे.
बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन हे आधुनिक तंत्रज्ञान असून हे किफायतशीर होण्यासाठी टँक उभारल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह शास्रोक्त पद्धतीने माशांच्या आरोग्य व्यवस्थापनाविषयी माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या तंत्राबाबत शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ज्ञ अधिकारी व अनुभवी बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व परभणी या जिल्ह्यांतील बायोफ्लॉक प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (पीएमएमएसवाय) अंतर्गत बायोफ्लॉक कल्चर योजनेतील सर्व बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारकांनी तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ९४२३७५८८२४, ९८८१६००९५१ व ८२०८४१३०११ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. शिखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 0000