Home Blog Page 612

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावली २० वर्षाची शिक्षा

पुणे- हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीस वीस वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले कि,’सदर घटना ही डिसेंबर २०१७ मध्ये वाकवस्ती, झोरेवस्ती, पांडवदंड, फुरसुंगी, पुणे येथे फियादी यांचे राहते घरी घडली आहे. यातील आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे, वय २७ वर्षे, रा. पुयना समाज मंदिराशेजारी, पाण्याचे हापश्यासमारे पास्ट साडं स, ता. कळमनरु जि. हिंगाली याने यातील अल्पवयीन पिडीत निभर्या ही घरामध्ये एकटी असल्याचा व घरामध्ये अंधार असल्याचा गैरफायदा घेऊन तसेच ती अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणिव असताना घरामध्ये घुसुन तिचेशी जबरदस्तीने संभोग करुन तिला गर्भवती केले व हाताने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादी / अल्पवयीन पिडीत निर्भया हिने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक २७६/२०१८ भा.दं.वि. कलम ३७६, ३२३, ५०४, ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे, यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा स्पे. (चाईल्ड प्रोट.) केस क्र. ३२९/२०१८ असा आहे.या प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती विशेष न्यायाधीश (पोक्सो), जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक २१/०३/२०२५ ०२५ रोजी आरोपी भिमराव मुकिंदा कांबळे यास २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी वकील विलास घोगरे-पाटील, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार संभाजी म्हांगरे व ए.जे. गोसावी यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार म्हांगरे, गोसावी व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

 ‘घुमंतु २५’ प्रवास आणि फोटोंचा अनोखा संगम असलेले प्रदर्शन

ब्बल ३५ फोटोग्राफर्सच्या १०० हून अधिक फोटोंचा समावेश ; प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश

पुणे : प्रवासात टिपलेले सुंदर क्षण मोबाईलमध्ये कैद करून त्याचा आस्वाद घेणे आणि इतरांसोबत शेअर करणे हा प्रत्येक भटक्याचा आनंदाचा भाग असतो. अशाच ३५ निवडक फोटोग्राफर्सच्या अप्रतिम फोटोंचा समावेश असलेल्या घुमंतु  २५ – स्वान्तसुखाय छायाचित्रणाय च… या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २५ ते २७ मार्च दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे होणार असून सकाळी ११ ते ८ यावेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे, अशी माहिती डॉ. रामदास महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनातील सहभागी फोटोग्राफर्सच्या हस्ते होणार आहे. प्रवास हा अनुभव समृद्ध करणारा असतो. कधी भव्य डोंगररांगा, कधी निळ्याशार समुद्राचे क्षितिज, तर कधी शहराच्या गजबजाटातले रंग प्रत्येक ठिकाण वेगळे दिसतात आणि त्याच्या अनमोल आठवणी. अशाच आठवणींना उजाळा देणारे आणि जगभरातील फोटोग्राफर्सच्या मोबाईलमध्ये टिपलेले अद्वितीय क्षण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

डॉ. महाजन म्हणाले,  या प्रदर्शनात ३५ निवडक फोटोग्राफर्सनी टिपलेले १०० आकर्षक फोटो प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हे फोटोग्राफर्स विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर, इंजिनिअर्स, गृहिणी, आयटी तज्ञ, विद्यार्थी आणि वैमानिक देखील आहेत. वयवर्षे २०  ते ७७  या वयोगटातील या कलाकारांनी अमेरिका ते न्यूझिलंडपर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील आठवणी मोबाईल मधून टिपल्या आहेत.

घुमंतु मालिकेतील हे तिसरे पुष्प आहे. याआधी सन २०२२ आणि २०२३ मध्येही अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन अशा अनेक शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तरी पुणेकरांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चुरशीच्या तयारीतचा सुहास घोडके ठरला महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी

पुणे , दि.२२ मार्च: पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डूवाडी चा प्रमोद सुळ यांच्या चुरशीच्या शैलीत सुहास घोडके ने ५-० अंकाने महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातल्या किताबांविला. सव्वा लाख रुपये , चांदीची गदा , सुवर्णपदक व प्रशस्ती पत्रक त्याचा सत्कार करण्यात आला.
शांती केंद्र (आळंदी) , माईर्स एमआयटी , पुणे , महाराष्ट्र राज्य यज्ञ रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादार कराड स्मृती राज्य महाराष्ट्र कुस्ती महा-वीर पाक रामेश्वर (रुई) येथे आयोजित कार्यक्रम. या गेल्या १८ वर्षापासून भरत येत आहेत.
प्रमोद सुने यांनी उपविजेते पदळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये १ लाखाचे लोकषिक देण्यात आले. जामखेड येथील सागर मोहोळकर या तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५० हजार व कांस्य पदक देण्यात आले. चतुर्थ क्रमांक सोलापूर येथील कालीचरण सोलन याला २५ हजार रूपयेकर व पदक देण्यात आले. या एकूण २०० पेक्षा अधिक मल्लांनी भाग दाखल केला होता.
हिंद केसरी दीनानाथ सिंग , विश्वशांती केंद्र (आळंदी) , माईर्स एमआयटी , पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड , रामेश्वरचे सरपंच श्री. तुळशीराम दा.करड , श्री. काशीराम दा. कराड , आमदार श्री. रमेशअप्पा कराड , श्री राजेश कराड , श्री ऋषिकेश कराड , प्रा. विलास कथुरे फायदा विजेत्यां मल्लांना त्यांच्यासाठी देण्यात आले. चौक वस्ताद पै. निखिल वणवे उपस्थित होते.

वजन गटात विजेते पुढीलप्रमाणे

( प्रथम क्रमांक – सुवर्णपदक , द्वितीय क्रमांक – रौप्य पदक , तृतीय क्रमांक – अंक चिन्ह अंक्य पदक)

वजन गट    प्रथम क्रमांक         दुसरा क्रमांक        तृतीय क्रमांक      चतुर्थ क्रमांक

८६ किलो  ( कौतुक डाफळे-क्लिक) , ( सोनबा लवटे , पुणे) , ( फिरोज शेख-पुणे) ,  ( अर्जुन काळे -सोलापूर)

रक्कम     रु. ५०,०००/-               रु. ४०,००० /-     रु. ३० , ०००/- रु.२० , ०००/-

७४ किलो (आदर्श पाटील-कोल्हापूर) (विष्णू तापूरे- लातूर) , ( शुभम सावंत – लातूर ) , ( विकारे – पुणे)
रक्कम     रु.३०,००० /-         रु.२०,००० /-       रु.१५,००० /-   रु.१०,००० /-

७० किलो ( विपुल थोरात-पुणे) , ( भालचंद्र कुंभार -पुणे) ,  ( रविराज निंबाळकर – पुणे) ,  ( सोमनाथ गोरड – पुणे)
रक्कम   रु.२०,००० /-   रु.१५,००० /-     रु.१०,००० /-           रु.८,००० /-

६५ किलो ( बाळासाहेब चौरे-बीड ) , ( सार्थक विकास -धाराशिव ) , ( किरण सत्रे – पुणे ) (सौरभ कडवकर-धाराशिव ) ,
अमुक रु.१५ , ०००/-        रु.१०,००० /-         रु.८,००० /-    रु.५,००० /-

६१ किलो ( अविनाश माने-खुडूस) , ( चिंतामणी भंडारे-सोलापूर) , ( अनिकेत पाटील-कोल्हापूर) , ( निनाद बडे- सांगली)
रक्कम    रु.१०,००० /-       रु.७,००० /-        रु.५ , ०००/- रु.३ , ०००/-

५७ किलो ( विशाल सुरवसे-खुडूस , ( स्वप्निल जाधव – रामेश्वर) , ( आकाश गुट्टे-रामेश्वर) , ( मनोहर मुंडे-खुडूस) ,
रक्कम     रु.१० , ०००/- रु.७ , ०००/-          रु.५ , ०००/- रु.३ , ०००/-


७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी होते. यापैकी तात्यात्याराव नलावडे हे विजेते ठरले तर विष्णू हे उपविजेते ठरले. या पैलवानांचा योग महर्षी महिला सेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ ​​शेलार मामा स्मृती सुवर्ण , रौप्य व कांस्य पदके सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड ,” रामेश्वराच्या मातीतून आज ना उदया राष्ट्रीय व कुस्तीपटू निर्माण करणार होती. भारताच्या कस्तीक्षेत्राला आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या प्रकारात आपले आणि मनगट मजबूत होते. आज तरुणांनी कुस्तीकडे वळणे आवश्यक आहे.”
यापल्ला जालना येथील मंठा गावातील पैलवान वैष्णवी रामकिस सोळंके हि १५ मिनीटात अद्वितीय योगनाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जायली.

श्री. बाबा निम्हण यांनी सूत्रसंचालन व धावते वर्णन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

वाघोलीतील एका घरावर छापा चार पिस्टल व आठ काडतुसांसह चौघांना पकडले

पुणे- वाघोलीतील एका घरावर छापा मारून गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना चार पिस्टल व आठ काडतुसांसह पुणे पोलिसांनी चतुर्भुज केले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’खंडणी विरोधी पथकास नेमणुकीस असलेले पोलीस उप-निरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे राजेश्वरी नगरी, आलोवेरी सोसायटी, वाघोली पुणे, येथे एकाच घरात तडीपार आरोपी अगन दस्तगीर पटेल, रा. बाकोरी फाटा, वाघोली पुणे, इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, रा. गोकुळ पार्क, बकोरी फाटा, वाघोली, पुणे गोपाळ संजय यादव, राहत असुन ते दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने त्याचेकडे पिस्टल जवळ बाळगुन आहेत. सदर बातमीची खात्री करुन सापळा रचुन ते रहात असलेल्या फ्लॅट मध्ये छापा टाकुन चौकशी करुन घराची झडती घेवुन आरोपीतांकडुन ४ पिस्टल व ८ काडतुसे असा एकुण १,६४,०००/-रू. चा जप्त केला आहे.
यातील आरोपी गोपाळ संजय यादव वय २४ वर्षे रा. वाघोली पुणे याचेवर दरोडा, खुनाचा प्रयत्न राईट असे एकुण २ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल वय २३ वर्षे रा. वाघोली पुणे यांचेवर अहमदनगर येथे तसेच लोणीकंद पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट व तडीपार याप्रमाणे ३ गुन्हे दाखल आहेत. इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी, वय २४ वर्षे रा. वाघोली पुणे यांचेवर मोक्का, दरोडा, आर्म अॅक्ट, तडीपार, असे एकुण गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत या सह देवानंद शिवाजी चव्हाण वय २३ वर्षे रा मारुती आळी शिरुर पुणे.यास हि अटक करण्यात आली
सदरची उल्लेखनिय कामगीरी पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२. श्री. राजेंद्र मुळीक, खंडणी विरोधी पथक -२ पोलीस निरीक्षक छगन कापसे (अति. कार्यभार) पोलीस उप-निरीक्षक गौरव देव. स.पो. फौज. सुनिल पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, चेतन आपटे, अजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राउत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केली.

‘जय श्रीराम’, उद्या तुझ्या घरी येतो आणि दाखवतो:संभाजी भिडेंच्या धारकऱ्याची पवार गटाच्या प्रवक्त्याला धमकी

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पोलिसात तक्रार पण कारवाई शून्य …

मुंबई-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या धारकऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. धमकी देणाऱ्यांनी थांब, उद्या तुझ्या घरी येतो असे म्हणत त्यांना दिवसातून एक-दोनदा नव्हे तर तब्बल 100 वेळा फोन केला आहे. कहर म्हणजे या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पण त्यावरही शून्य कारवाई करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा आरोप केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामाजिक कार्यकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणून अशा पद्धतीने झुंडशाहीने दहशत माजवू पाहणाऱ्या व बेकायदा कृत्य करणाऱ्या लोकांचा तात्काळ बंदोबस्त होणे आवश्यक आहे. सोबत विकास लवांडे यांचा 3 मार्च 2025 रोजीचा लोणीकंद पोलिसांनी घेतलेला जबाब; पण दोषींवर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे या प्रकाराची माहिती देताना म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी म्हणवनाऱ्यांकडून शेकडोच्या संख्येने फोनवरून व सोशल माध्यमातून जाहीरपणे जीवे मारण्याच्या व घात अपघात करू अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पुणे शहर पोलिसांना सविस्तर पुराव्यासह तक्रार देऊनही अद्याप पर्यंत कुणावरही काहीही कारवाई केलेली नाही.

1 मार्च 2025 रोजी सायंकाळी विकास लवांडे यांच्या हवेली तालुक्यातील शिंदेवाडी गावात 250 ते 300 बाहेरील तरुणांचा बेकायदा जमाव त्यांच्या घरावर दहशत माजवण्याच्या हेतूने गेलेला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांना कळवले व गावात पोलिस बंदोबस्त मिळाला म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र तक्रार देऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्यानंतरही धमक्या सुरूच आहेत. कालही ७६६६२३७९०९ या मोबाईल नंबरहून अज्ञात व्यक्तीने ” जय श्रीराम ” म्हणत उद्या तुझ्या घरी येतो आणि दाखवतो अशी धमकी विकास लवांडे यांना दिली आहे.

गडचिरोलीतील वाघांचे मानवी हल्ले रोखण्यासाठी ३ महिन्यात आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणे, अतिरिक्त वाघांचे स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल ३ महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघांच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी तेथील नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन यावर उपाय योजना सुचविण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोली वन वृत्ताचे मुख्य वन संरक्षक एस. रमेशकुमार आदी उपस्थित होते.

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात सुमारे 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील परिस्थितीचा अभ्यास करून गडचिरोलीतील अतिरिक्त वाघांचे स्थलांतर तीन महिन्यात करण्यात यावे. तसेच गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्या वारसांना विशेष नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

यासंदर्भात परिस्थितीचे अवलोकन करून आराखडा तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा व प्राणहिता अभयारण्यात सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांस भक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटलाच्या धर्तीवर वन पाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाईनद्वारे CBG गॅस पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले. वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी ई पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील 6 गावांच्या स्थलांतरासाठी तेथील स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन करणे, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे आदी उपाय योजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच यासंबंधीच्या उपाय योजना करण्याबाबत या विषयावर काम करणाऱ्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. धोकादायक व संवेदनशील क्षेत्राचे सौम्यीकरण (मिटीगेशन) आराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. अशा वाघाच्या स्थलांतरासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !

भारतासह जगभरात दि. 8 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची रेलचेल आढळली. महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक देण्याबद्दलच्या आणाभाका,शपथा, निर्धार जाहीर करण्यात आले. मात्र त्याचवेळी महिलांवर आर्थिक अन्याय करणाऱ्या ‘गुलाबी करा’ बद्दल मात्र कोणी चकार शब्द काढलेला दिसला नाही. हा गुलाबी कर नष्ट करण्यासाठी सर्व पातळ्यांवर जागरूकता, संवेदनशीलता निर्माण होण्याची नितांत गरज आहे. या वेगळ्या पण महत्वाच्या विषयाचा घेतलेला वेध.

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये ‘ गुलाबी कर’ अस्तित्वात आहे. हा कर ‘पिंक टॅक्स’ म्हणून जगभर ओळखला जातो. अगदी थोडक्या शब्दात सांगावयाचे झाले तर पुरुष व महिला या दोघांसाठी अनेक उत्पादने,वस्तू किंवा सेवा समान वापरल्या जातात. मात्र बाजारामध्ये अशा उत्पादनांच्या किंमती किंवा सेवांचे शुल्क पुरुषांसाठी जेवढ्या असतात त्यापेक्षा काही टक्के जास्त किंमती, शुल्क महिलांकडून वसूल केल्या जातात. पुरुष व महिला या दोघांकडून वापरल्या जाणाऱ्या सारख्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये लिंगभेद केला जातो. समानतेच्या दृष्टिकोनातून महिला वर्गाच्या बाबतीत हा कर अन्यायकारक ठरतो. महिला वर्गाला त्यासाठी द्यावी लागणारी जादा किंमत किंवा शुल्क म्हणजे एक प्रकारचा ‘गुलाबी कर’ आहे असे मानले जाते. आपली लोकसंख्या 146 कोटींच्या घरात आहे व त्यापैकी 70 कोटी महिला आहेत, हे लक्षात घेता हा ‘गुलाबी कर’ अर्थकारणावर परिणाम करणारा आहे.

‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली ‘या अर्थविषयक साप्ताहिकामध्ये दोहा – कतार येथील श्री साईबाल घोष यांनी याबाबतचा संशोधनात्मक प्रबंध प्रसिद्ध केला असून हा गुलाबी कर नष्ट व्हावा अशी मांडणी केली आहे. यासाठी त्यांनी विविध देशातील कुटुंबांचा व त्यांनी केलेल्या खर्चाबाबत संशोधन केले. २०१५ ते २०२२ या सात वर्षाच्या काळात त्यांनी कुटुंब स्तरावरील खर्चाचा अभ्यास केला. या अभ्यासावरून जगात सर्वत्र हा ‘पिंक टॅक्स’ अस्तित्वात असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.

‘गुलाबी करा’च्या संदर्भात भारताचा विचार करता ही कर पद्धती किंवा अशी यंत्रणा आपल्याला नवीन किंवा अद्वितीय नाही. आपल्याकडील सर्वसाधारण सामाजिक नियम व बाजारातील गतिशीलता यामुळे आपल्या देशात गेली अनेक वर्षे गुलाबी कर अस्तित्वात आहे. या ‘ गुलाबी करा’ मध्ये कोणती उत्पादने व सेवा यांचा समावेश केला जातो याचा अभ्यास केला असता विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने, दुर्गंधीनाशक उत्पादने व वस्तरे (रेझर, डिओडोरंट्स), किंवा शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरले जाणारे साबण, बॉडी वॉश यांसारखी वैयक्तिक काळजी उत्पादने, टी-शर्ट, जीन्स आणि जॅकेट यांसारख्या कपड्यांच्या वस्तू, हेअर कट आणि केस रंगवण्यासारख्या सारख्या सलून सेवा, खेळणी व महिला स्वच्छता उत्पादने यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

पुरुष व महिलांना सर्वत्र समान दर्जा व वागणूक दिली जावी ही संकल्पना सर्व प्रगतिशील देशांमध्ये अस्तित्वात आहे. या पार्श्वभूमीवर पुरुष व महिलांमध्ये लिंगभेद केला जाऊ नये एवढेच नाही तर लिंग समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचा ‘कर’ वसूल केला जाऊ नये हा महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने निर्माण होतो. अशा प्रकारचा गुलाबी कर काढून टाकला तर महिलांवरील आर्थिक भार निश्चितपणे कमी होईल अशी यामागे अपेक्षा आहे. त्याचबरोबर लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून भारताचे एक पाऊल पुढे जाऊ शकते. एवढेच नाही तर त्यामुळे बाजारातील पारदर्शकता निश्चितपणे वाढणार असून सर्व उत्पादने व सेवांच्या किमती जास्तीत जास्त पारदर्शक राहून ग्राहकांना चांगल्या किमती व सेवांचा फायदा होऊ शकतो. बाजारातील उचित स्पर्धा प्रथांना यामुळे प्रोत्साहन दिले जाऊन भेदभावपूर्ण किंमती पूर्णपणे नष्ट होतील अशी अपेक्षा आहे. कोणत्याही व्यवसायात निष्पक्ष स्पर्धा असणे व ग्राहकांना चांगल्या किमती व सेवांचा लाभ होणे हे समाजाच्या दृष्टिकोनातून निश्चितच हितकारक आहे.

या गुलाबी कराचे काही निश्चित तोटे आहेत. त्यांचा अभ्यास केला असता महिलांवरील आर्थिक ताणामध्ये गुलाबी कराची भर पडत आहे. एका पाहणीनुसार महिला व पुरुषांची कमाई व वेतन लक्षात घेतले तर भारतामध्ये महिलांची कमाई पुरुषांपेक्षा सुमारे 30 ते 35 टक्के कमी आहे. महिलांच्या गरजा आणि त्यांना दिले जाणारे प्राधान्य हे पुरुषांपेक्षा जास्त असते व त्यासाठी होणारा खर्च पुरुषांपेक्षा जास्त होत असतो अशी धारणा समाजामध्ये निर्माण होताना दिसत आहे. गुलाबी करामुळे किंमती स्वाभाविकपणे वाढतात. त्यामुळे अनेक उत्पादनांच्या बाबतीत खरेदी करणाऱ्या महिलांचा प्रवेश आपोआप मर्यादित होतो. साहजिकच अशी अत्यावश्यक उत्पादने व सेवा वापरण्याच्या बाबतीत महिला वर्गाला प्रतिबंध होऊ शकतो अशी बाजारातील परिस्थिती आहे.

याबाबत देशातील विविध राज्यांमधील उत्पादने व सेवांचा अभ्यास केला असता साधारणपणे असे लक्षात आले आहे की महिलांसाठी असलेल्या उत्पादनांच्या किमती या दोन ते सहा पट जास्त आहेत. त्यामुळे दरवर्षी साधारणपणे 300 डॉलर किंवा वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च जास्त केला जातो असे लक्षात आले आहे. बायोकॉन कंपनीच्या अध्यक्ष श्रीमती किरण मुजुमदार शॉ यांनी गुलाबी करामुळे निर्माण झालेल्या लिंग असमानतेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. महिला व पुरुष वर्ग जी उत्पादने, सेवा समानरित्या वापरतात त्याबाबत समान किंमत असण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली होती.

जागतिक पातळीवर केलेल्या अभ्यासामध्ये महिला-पुरुषांच्या वस्त्र प्रावरणाच्या बाबतीत महिलांच्या वस्त्रांच्या सरासरी किमती ०.७ टक्के जास्त आहेत असे आढळले होते. अमेरिकेत याबाबत शंभर ब्रँड्सचा अभ्यास करण्यात आला होता. त्यात महिलांच्या उत्पादनांसाठी असलेल्या किमती 12 ते 13 टक्के जास्त असल्याचे आढळले होते. इंग्लंडमध्ये अशा प्रकारची पाहणी केली तेव्हा महिलांना अशा उत्पादनांसाठी दहा टक्के किंमत जास्त द्यावी लागत असल्याचे आढळले होते. भारतामध्ये अशा प्रकारच्या गुलाबी करायच्या बाबत संशोधन करण्यात आले. त्यामध्ये व्यक्तिगत पातळीवरील खर्चाचा अभ्यास न करता कौटुंबिक पातळीवर त्याचा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे एक प्रकारे दुय्यम प्रकारची माहिती यामध्ये संकलित करण्यात आलेली आहे. विविध राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त कुटुंबांमध्ये ही पाहणी या कालावधीत करण्यात आली होती. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी ( सीएमआयई) संस्थेने याबाबतचे संशोधन केलेले होते. त्यामध्ये महिला ग्राहकांकडून अनेक वेळा जास्त किमती किंवा शुल्क वसूल केल्याचे सकृत दर्शनी आढळलेले आहे.

जागतिक पातळीवर या गुलाबी कराच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने व मोहीम राबवण्यात आली. २०१५ मध्ये कॅनडाने महिलांच्या सर्व उत्पादनावरील कर पूर्णपणे रद्द केलेला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाने याबाबतचे पाऊल पुढे टाकून महिलांच्या उत्पादनांवरील कर रद्द केला. जर्मनीमध्ये महिलांसाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर चैनीची वस्तू म्हणून 19 टक्के कर लावण्यात आला होता. २०२० मध्ये तो कमी करून केवळ 6 टक्के करण्यात आला. इटली व स्पेन या दोन्ही देशांमध्ये अगदी अलीकडे हा कर कमी करण्यात आलेला आहे. स्कॉटलंडमध्येही कमी उत्पन्न गटातील महिलांसाठी ही सर्व उत्पादने मोफत देण्याबाबतचा कायदा संमत करण्यात आलेला आहे. काही विकसनशील देशांचा अभ्यास केला असता केनयासारख्या देशाने 2004 मध्ये या उत्पादनावरील कर लक्षणीय रित्या कमी केला. त्याचप्रमाणे कोलंबियांमध्ये अशा प्रकारचा लिंगभेद करणारा कर हा घटनाबाह्य ठरवण्यात येऊन २०१८ मध्ये तो नष्ट करण्यात आला. नामीबिया मेक्सिको, इक्वाडोर व श्रीलंका या देशातही याबाबत काही सवलती देण्यात आल्या आहेत.

वास्तविक पाहता भारतामध्ये गुलाबी करावर बंधने घालणारा किंवा प्रतिबंध करणारा कोणताही अधिकृत कायदा अस्तित्वात नाही. परंतु लिंगभेद टाळण्याच्या दृष्टिकोनातून व महिला व पुरुष यांच्यात आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी करणे आवश्यक आहे. किमान सध्याच्या प्रगतिशील समाजामध्ये त्याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. देशाच्या पहिल्या नागरिक म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत. तसेच गेली अनेक वर्षे देशाच्या अर्थमंत्री पदावर निर्मला सीतारामन यांच्यासारखी महिला अत्यंत निष्ठेने काम करीत आहे. असे असूनही आर्थिक पातळीवर काहीशी असमानता निर्माण करणाऱ्या या ‘गुलाबी कराचे ‘अस्तित्व नष्ट व्हावे अशी अपेक्षा केली तर ती गैर ठरणार नाही. अर्थमंत्र्यांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये मासिक पाळीच्या संबंधित उत्पादनावरील 12 टक्के जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मधून पूर्णपणे सवलत दिलेली होती. एक प्रकारे याबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यमान सरकारने एक पाऊल टाकलेले होते. परंतु वास्तवामध्ये आजही अशा प्रकारचा लिंगभेद करणारा गुलाबी कर व्यापक प्रमाणात आढळत आहे. विविध कंपन्यांनी याबाबतची सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा उत्पादनाच्या किमती कमी करण्याची गरज आहे. भारतातील महिला संघटनांनी याबाबत एकत्र येऊन नजीकच्या भविष्यकाळात नष्ट होण्यासाठी सकारात्मक मोहिमेद्वारे संवेदनशीलता व जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

लेखक :प्रा. नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणे स्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

क्षय रोग निर्मूलनासाठी नव्या आशेचा किरण

२४ मार्च २०२५ जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विशेष लेख….

संपूर्ण जगातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्र क्षयरोगाच्या (TB) विरोधातील संघर्षात झालेल्या प्रगतीचा आढावा घेत आहे. क्षयरोग हा केवळ एक संसर्गजन्य आजार नसून तो सामाजिक विषमता देखील दर्शवतो. गरीब आणि वंचित समुदाय, स्थलांतरित, निर्वासित आणि आदिवासी लोकसंख्या यांच्यात हा आजार अधिक प्रमाणात आढळतो. दरवर्षी जवळपास १२.५ लाख लोकांचा बळी घेणारा हा आजार, योग्य निदान आणि उपचारांमुळे पूर्णपणे बरा होऊ शकतो.
क्षयरोग (TB) हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium tuberculosis) नावाच्या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करणारा हा आजार शरीरातील इतर अवयवांमध्येही पसरू शकतो. भारतात हा आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि त्यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येतो आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक क्षयरोगग्रस्त लोकसंख्या असलेला देश आहे. जागतिक क्षयरोग अहवाल २०२३ नुसार, जगातील एकूण TB रुग्णांपैकी २५-२८% रुग्ण भारतात आढळतात. भारतात दरवर्षी सुमारे २६-२७ लाख नवीन क्षयरोग रुग्णांची नोंद होते. देशात दरवर्षी सुमारे ५ लाखांहून अधिक लोक TB मुळे मृत्यू पावतात.
भारतात क्षयरोग नियंत्रणासाठी १९६२ मध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (NTCP) सुरू करण्यात आला. २०१९ मध्ये या कार्यक्रमाचे नाव बदलून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP – National TB Elimination Programme) करण्यात आले.केंद्र सरकारने २०१८ मध्ये घोषित केलेल्या योजनेनुसार, भारताने जागतिक उद्दिष्टाच्या (२०३०) आधीच २०२५ पर्यंत TB निर्मूलनाचा संकल्प केला आहे.
मोफत TB निदान आणि उपचार: सरकारी आरोग्य केंद्रांवर सर्व TB रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे पुरविली जातात.
प्रगत निदान आणि उपचार पद्धती: TB निदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की Xpert MTB/RIF, TrueNat, आणि Line Probe Assay यांसारख्या प्रयोगशाळा चाचण्या उपलब्ध आहेत.
प्रभावी औषधोपचार:
संवेदनशील TB साठी ६ महिन्यांचा पूर्ण उपचारक्रम (HRZE – Isoniazid, Rifampicin, Pyrazinamide, आणि Ethambutol)
औषध-प्रतिरोधक TB (MDR-TB/XDR-TB) साठी ९-१२ महिन्यांचे अद्ययावत उपचार
निक्षय पोषण योजना: TB रुग्णांसाठी दरमहा ₹५०० पोषण भत्ता देण्यात येतो, जेणेकरून त्यांच्या आहारात सुधारणा होईल आणि उपचाराचा परिणाम चांगला मिळेल.
समुदाय आधारित TB रुग्णांसाठी उपक्रम:
“निक्षय मित्र” योजना: समाजातील व्यक्ती आणि संस्था TB रुग्णांना पोषण आहार, औषधे, आणि भावनिक आधार देऊ शकतात.
खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांचे सहकार्य: खाजगी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टरांना सरकारी TB कार्यक्रमात सामील करून सर्वांना उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.भारतातील खाजगी आरोग्य सेवा क्षेत्रात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आणि योग (AYUSH) यांसारख्या पारंपरिक वैद्यकीय प्रणाली मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात AYUSH वैद्यक तज्ज्ञांचा सहभाग वाढविल्यास, क्षयरोगाच्या उपचारांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल.
क्षयरोगाच्या वेगवेगळ्या प्रकारांसाठी विशेष धोरणे
औषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB, XDR-TB):
औषध-प्रतिरोधक क्षयरोग (MDR-TB) हा TB चा एक प्रकार आहे, ज्यावर सामान्य TB औषधांचा परिणाम होत नाही.
या साठी सरकारने Bedaquiline आणि Delamanid ही आधुनिक औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत.
बालक आणि गर्भवती महिलांसाठी विशेष उपाययोजना:
बालरुग्णांसाठी अनुकूलित औषधे
गर्भवती महिलांना सुरक्षित उपचार पद्धती
TB निर्मूलनासाठी पुढील दिशा
TB प्रतिबंधासाठी लसीकरण: BCG लस ही बालकांसाठी TB प्रतिबंधक म्हणून दिली जाते. याशिवाय, क्षयरोगाच्या बाबतीत प्रौढ बीसीजी लसीकरणाचा परिणाम पाहण्यासाठी भारत सरकारने विविध भागात प्रौढ बीसीजी लसीकरण हा पायलट अभ्यास सुरू केला आहे.
नवीन M72/AS01E आणि VPM1002 यांसारख्या संशोधित लसींवर संशोधन सुरू आहे.
जनजागृती आणि शिक्षण: TB संदर्भात समाजामध्ये गैरसमज कमी करण्यासाठी विविध प्रचार मोहिमा राबवल्या जात आहेत.
पोषण आणि आरोग्य सुधारणा: TB रुग्णांच्या आहारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी निक्षय पोषण योजना आणि इतर सरकारी मदतीच्या योजनांचा प्रभाव वाढविला जात आहे
निष्कर्ष
TB हा पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार असून, वेळेत निदान आणि योग्य उपचार घेतल्यास तो नियंत्रित करता येतो. २०२५ पर्यंत TB निर्मूलनाचे भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे.
“होय! आपण क्षयरोग संपवू शकतो!”
डॉ. मृदुला होळकर
M.Sc. (Public Health),
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे जिल्हा

उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी मूल्यमापन चाचणी

पुणे : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

राज्यात ६ लाख ६६ हजार १२८ इतक्या असाक्षरांची चाचणी घेण्याबाबत जिल्ह्यांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण १५० गुणांची असणार आहे. यामध्ये अनुक्रमे वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. परीक्षेस जाताना एक आयकार्ड आकाराचे छायाचित्र, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक आदींपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

ही चाचणी परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तेलगू, तामीळ, बंगाली इत्यादी माध्यमातून होणार आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी काळ्या अथवा निळ्या शाईचा पेन वापरावा. असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर २३ मार्च रोजी ओळखपत्रासह उपस्थित रहावे. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) तथा राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

महिला सुरक्षेसाठी एकत्रित प्रयत्नांची गरज-न्यायाधीश महेंद्र महाजन

पुणे, : महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भविष्य निर्मितीकरीता समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करुया, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि अलीमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे बुधवारी (१९ मार्च) आयोजित कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. कॅरोलीन मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी शकील शेख आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन महिला सुरक्षेसाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पोलीस प्रशासनास कायदेशीर मदतीची गरज लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यांना नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर आहे. महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन करत असलेल्या कार्य चांगले आहे.

यावेळी न्यायाधीश श्री. महाजन यांच्या हस्ते पोलीस दलातील ४१ महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या सखी सुरक्षा आणि इतर उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि संकटातील महिलांचे संरक्षण करण्यासाठी ‘सखी सुरक्षा’ पुस्तिका अत्यंत उपयुक्त आहे, सर्व महिला अधिकाऱ्यांनी या संसाधनाचा प्रभावीपणे उपयोग करावा, असेही श्री. महाजन म्हणाले.

महिला सशक्तीकरणासाठी ‘सखी सुरक्षा’ पुस्तिका महत्त्वाची – सोनल पाटील

‘सखी सुरक्षा’ पुस्तिका महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. संकटात असलेल्या महिलांसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक तसेच तपास अधिकाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्जांचे क्युआर कोड या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्वांनी या पुस्तिकेचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी एकत्र यावे, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले.

शिवरायांचा अपमान करणाऱ्याला शोधा:त्याला मदत करणाऱ्यांचा बुरखा फाडा, इंद्रजित सावंतांची मागणी

पुणे-छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा बुरखा फाडा, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. त्यांनी पोलिसाकंडे कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याचीही मागणी केली आहे.प्रशांत कोरटकरवर इंद्रजित सावंत यांना धमकी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचा आरोप आहे. त्यातच तो दुबईला पळून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा. कोणतीतरी यंत्रणा आहे, जी कोरटकरसारख्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात अशी शंका आहे. यामुळेच त्याला आतापर्यंत अटक होत नाही.

शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काही प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांचा बुरखा फाडून टाकला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. हे शासनाचे विशेषतः गृहमंत्र्यांचे काम आहे. इंद्रजित सावंत यांनी यावेळी कोरटकरला आपला मोबाईल नंबर कुठून मिळाला? असा सवालही उपस्थित केला.ते म्हणाले, मी कोल्हापुरात राहतो. माझा व त्या कोरटकरचा आयुष्यात केव्हाच संबंध आला नाही. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल क्रमांक त्याला कुणी दिला? या गोष्टीचाही सोक्षमोक्ष लागला पाहिजे. त्याच्या मोबाईलमधून जे कम्युनिकेशन झाले ते समोर आले पाहिजे. धमकी देऊन एक महिना लोटला तरी तपास पुढे सरकला नाही. त्यामु्ळे माझा भ्रमनिरास होत आहे.पोलिसांशी माझे थेट बोलणे झाले नाही. माझे वकील त्यांना भेटून आलेत. आम्ही पोलिसांकडे कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. शिवरायांच्या अवमानामुळे शिवप्रेमींची मने व्यथित झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूरचे आहेत. त्यामु्ळे हे सर्व प्रकरण चिल्लर निश्चितच नाही. हा अतिशय गांभिर्याने घेण्याचा मुद्दा आहे. कारण, हा मुद्दा केवळ मला धमकी मिळाली किंवा शिवीगाळ झाल्याचा नाही. तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या शिवाजी महाराजांविषयी काय भावना आहेत? त्याचा आहे. त्यामुळे एक संवेदनशील मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांनी हा मुद्दा हाताळावा.इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्याकडे एका अर्जाद्वारे प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. आजपर्यंत प्रशांत कोरटकर इंदूर, चंद्रपूर व कोलकाता आदी ठिकाणी लपल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता तो थेट दुबईला पळून गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांना फरार आरोपीची चौकशी करण्यासाठी सगळ्या कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा अधिकार आहे. माझी विनंती आहे की, आरोपी प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट पोलिस स्टेशनला आणून दाखवणे व पासपोर्ट जमा करण्याविषयी त्याच्या पत्नीला समन्स बजावण्यात यावा. तसेच त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी केली जावी, असे सावंत यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

मुंबई, दि. 22 मार्च 2025 – महावितरणला शनिवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरविण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते.

महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आभार मानले तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

महावितरण मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करते. महावितरणचे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी असे ३ कोटी ११ लाख ग्राहक आहेत. महावितरण देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.

महावितरणने ग्राहक सेवेसाठी तसेच वीज वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा केलेला वापर, ऊर्जा परिवर्तन आराखडा राबवून नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर दिलेला भर, वीज खरेदी खर्चात कपात करून ग्राहकांसाठीचा वीजदर कमी करण्यासाठी आयोगासमोर मांडलेला प्रस्ताव, शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० सह राबविलेल्या विविध योजना आदी बाबींचा विचार करून महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले.

वीज उपकेंद्रांची संख्या वाढविणे, त्यांची क्षमता वाढविणे, नव्या वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे, वितरण रोहित्रांची उभारणी तसेच वीज वितरण व्यवस्थेत केलेली सुधारणा यांचाही विचार महावितरणचा सन्मान करताना करण्यात आला.

कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही गेम चेंजर योजना आहे. हा देशातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक दशकांची कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे. योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आगामी वर्षामध्ये राज्यातील सर्व कृषी पंपांना शंभर टक्के सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल. या योजनेत किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे महावितरणचा वीज खरेदी खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप बसविण्यात महावितरणने देशात प्रथम स्थान मिळविले आहे. उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठीच्या राज्य सरकारच्या योजनेसाठी महावितरणला नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

गावाची संपूर्ण विजेची गरज स्थानिक पातळीवर तयार झालेल्या सौर ऊर्जेवर भागवून गावाला ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी महावितरणने सौर ग्राम योजना सुरू केली आहे. त्यामुळे गावकरी वीजबिलमुक्तही होतात. राज्यात १०० गावे महावितरणतर्फे सौर ग्राम विकसित करण्यात येणार असून त्यापैकी १० गावे सौर ग्राम झाली आहेत. 

महावितरणने स्वतःची कार्यालये, वीज उपकेंद्रे, ग्राहक सेवा केंद्रे आणि अतिथी गृहे सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या मुख्यालयाच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले.

महावितरणने राज्यात विद्युत वाहनांसाठी ६३ चार्जिंग स्टेशन्स राज्यात उभारली आहेत. पुणे येथे उभारलेल्या विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाला जोडून महावितरणने अक्षय्य ऊर्जेच्या आधारे वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी पाऊल टाकले आहे.

विदुषी सावनी शेंडे गायनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न

पुणे – हृद्य स्पर्श – हॅव अ हार्ट फौंडेशनच्या वतीने किराणा घराण्याच्या प्रख्यात गयिका विदुषी सावनी शेंडे यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम पीवायसी जिमखाना येथील सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी डॉ.सुधीर भाटे(संस्थापक हृद्य स्पर्श), डॉ.समीर भाटे,कॅप्टन डॉ.अजय बदामीकर, विवेक देशपांडे, कर्नल निखिलेश पराडकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी सावनी शेंडे यांनी मारू बिहार रागातील “रतिया मै तो “ने सुरुवात केली, बसंत बहार व अन्य रागातील विविध गाणी सुरेलपणे सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी बोलतांना डॉ.सुधीर भाटे यांनी हृदयाच्या आरोग्यासाठी जनजागृती व्हावी या साठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नमूद केले.

सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी रोटरीने पुढाकार घ्यावा-डॉ. दीपक शिकारपूर यांचे आवाहन : व्यावसायिक गुणवत्ता, सेवा पुरस्कारांचे वितरण

पुणे : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण समाजात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) सतत कार्यरत असणारी तरुण पिढी सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरते आहे. तरुण पिढी गुन्ह्यांमध्ये कशी ओढली जाते हे त्यांनाही समजत नाही. मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा याविषयी पालक मुलांना सजग करत नसल्यानेही मुलांच्या हातून चुका घडत आहेत. समाजातील ही परिस्थिती पाहता रोटरी क्लबने सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमतर्फे व्यावसायिक सेवा आणि गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण डॉ. शिकारपूर आणि जिल्हा व्यावसायिक संचालिका मधुमिता बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी डॉ. शिकारपूर बोलत होते. कोथरूड येथील गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात आयजीपी, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीचे संचालक डॉ. राजेंद्र डहाळे यांचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने तर हेल्दी फूड बँकेची स्थापना करणाऱ्या डॉ. प्रतिभा कोलते यांचा व्यावसायिक सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमचे अध्यक्ष निलेश धोपाडे, सचिव पूजा वाडेकर मंचावर होते.
समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमतर्फे गौरव करण्यात येत आहे, याबद्दल मधुमिता बर्वे यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सायबर गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी डॉ. दीपक शिकारपूर यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे सांगून डॉ. राजेंद्र डहाळे म्हणाले, बँकेसंदर्भातील माहिती अनेकजण मोबाईलमध्ये ठेवतात. अनावश्यक फोन कॉल्सला प्रतिसाद दिल्यामुळे गोपनिय माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते, त्यामुळे मोबाईल वापरताना सजग राहून योग्य तऱ्हेने हाताळावा. सेवानिवृत्तीनंतर समाजकार्यात स्वत:ला वाहून घ्यायचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आहार, विहार आणि व्यवहारात सुधारणा झाली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. प्रतिभा कोलते यांनी व्यक्त केली.

‘महाराजांचा अपमान करा आणि पळून जा, फडणवीसांची नवी योजना’, हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

पुणे-काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात होणाऱ्या महाराजांच्या अपमानाच्या पा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते म्हणाले की, ‘कोरटकर सारखा निर्लज्ज माणूस देश सोडून पळून जातो. यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक योजना सुरु केली आहे की काय ? कि महाराजांचा अपमान करा आणि पळून जा. या विकृत माणसाला सरकारने सुरक्षा पुरवली. इंग्रज देखील औरंगजेब एवढे जुलमी आणि क्रूर होते. अपमान करा आणि पुरस्कार मिळवा असचं सुरु आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार तुघलकी आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही. एकनाथ शिंदे हे मला माफी मागा नाही तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणत धमकावत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री रमेश बागवे, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे,प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,अनंत विठ्ठलराव गाडगीळ, दिप्ती चौधरी,युवक कॉंग्रेसचे सौरभ बाळासाहेब अमराळे पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप, संजय बालगुडे, आदी उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेस प्रांताध्यक्ष यांनी पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी, पिंपरी चिंचवड पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले.


सपकाळ पुढे म्हणाले की, कोरटकर पळून जातो सरकार काय करत आहेत? तुमचा, देशाचा गृह विभाग झोपला होता का? कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करण्यासाठी पोलिसांना देवेंद्र फडणवीस यांनी भाग पाडले आहे का? असा सवाल देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे. दुसरीकडे माजी मंत्र्याचा लाडका मुलगा न सांगता पळून जातो त्याच विमान मागे बोलावून परत आणले जाते आणि महाराजांचा अपमान करणारा आरोपी पळून जातो. असं देखील सपकाळ म्हणाले आहेत.हर्षवर्धन सपकाळ पुढे बोलताना म्हणाले की, मी कोणाबद्दल एकेरी बोललो नाही, अपमानजनक बोललो नाही. मग माफी का मागावी. सरकारकडून प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही त्याबाबत बोलले जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.सपकाळ म्हणाले की, पुण्याची सभ्य, सुसंस्कृत मुल्य आहे. मतभेद असले तरी चालेल पण मनभेद नको. राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात असावे, टीका केली जावी पण एकमेकांनी व्यवस्थित राजकारण केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह व्यक्त्व्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर हा परदेशात पळून गेला. गृहमंत्री आणि तो नागपूर मधील असल्याने त्यांचे परिचय आहे. सपकाळ म्हणाले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या सोबत त्याचे सलगीचे संबंध आहे. त्यावर कारवाई न करता औरंगजेब कबर उखडून टाकणे प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. राज्यातील कारभार पाहता तो क्रूर पद्धतीचा आहे म्हणून औरंगजेबाचा कारभार व फडणवीसांचा कारभार सारखाच आहे असे मी म्हणालो असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी असे म्हणून माझ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची शिंदेंनी मागणी केली पण मी माझ्या विधानावर आजही ठाम आहे, माफी मागण्याचा प्रश्नच नाही. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले. माझ्या विधानावर कारवाईचा इशारा देणारे दोन्ही उपमुख्यमंत्री राहुल सोलापुरकरच्या विधानावर गप्प का आहेत? प्रशांत कोरटकर कसा पळून गेला? त्याच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न सपकाळ यांनी केला. पुणे शहरात राज्यभरातून शिक्षणासाठी मुले मुली येतात, पण या शहरात आता ड्रग्जची खुलेआम विक्री होते, गुजरातच्या कांडला बंदरातून ड्रग्ज येतात त्याचा तपास केला जात नाही. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का, असा प्रश्न जनतेला पडला असून राज्यातील गृहविभागाचा कारभार पाहता राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्र्याची गरज आहे असेही सपकाळ म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विकृत बोलणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत नाहीत तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काडला जात आहे. कबर उखडून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेब जसा क्रूर होता तसेच इंग्रजसुद्धा क्रूर व जुलमी होते, त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड केले, भगतसिंग सारख्या अनेक क्रांतीकारकांना फाशी दिली, त्या इंग्रजांचे हस्तक म्हणून ज्या लोकांनी काम केले, ज्यांनी इंग्रजांची पेन्शन घेतली यांची स्मारके, पुतळे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल उखडून टाकणार का, याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

कोरटकर देश बाहेर पळून जाताना त्याला कोणी मदत केली, गृह खाते झोपले होते का? पोलिस यांनी त्याला संरक्षण होते का? पोलिसांची त्याला पाळून जाण्यास फूस होती का ? याबाबत गृहमंत्री यांनी उत्तर द्यावे. सपकाळ म्हणाले की, लाडका मंत्री, ठेकेदार, मुलगा अशा योजना सरकारने सुरू केल्या असून माजी मंत्री यांचा मुलगा देशा बाहेर जाताना त्याला संरक्षण दिले जाते. क्रांतिकारक, महापुरुष यांच्यावर टीका करून पोलिस संरक्षण दिले जात आहे. अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर कोणती कारवाई केली गेली नाही. बीडमध्ये संतोष देशमुख याच्या हत्या प्रकरणात तपासात हलगर्जीपणा झाला. पोलिस धाक नसल्याने स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीवर बलात्कार झाला. केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीची छेड काढून आरोपींवर कारवाई होत नाही. परभणी मध्ये पोलिस कोठडीत अमानुष मारहाणमध्ये मृत्यू झाला. या सर्व घटनेतून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याची लक्तरे काढणारे आहे.