Home Blog Page 610

आदित्य ठाकरे म्हणाले कामराचे गाणे योग्यच ..

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा करत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची पाठराखण केली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ मिंधे यांच्यावर केलेले गाणे योग्यच आहे. आता मिंधे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कमकूवत केले आहे, असे ते म्हणालेत.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणे सादर केले, त्या कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने फोडला. कुणाल कामराचे गाणे 100 टक्के खरे होते. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित घाबरट व्यक्तीच अशी प्रतिक्रिया देईल. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना कमकुवत करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे.

कॉमेडी करण्याचा सर्वांना अधिकार, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही -फडणवीस

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉमेडियन कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या सर्वांना अधिकार. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या निवडणुकीत कोण गद्दार व कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले आहे. कुणाकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाला मिळाला आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुम्ही जरूर व्यंग व कॉमेडी करा. पण कुणालाही कुणाचा अपमान करण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणालेत.
कुणाल कामराला नाक घासायला लावणार
तुम्ही तुमचा वेळ मोजण्यास सुरुवात करा. माझे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही जिथे सापडाल, तिथे तुम्हाला मारहाण केली जाईल. कुणाल कामरा, तुम्ही कुणाच्याही तालावर नाचा, मी तुम्हाला नाक घासायला लावले नाही तर मी ही कुणाल हे नाव सांगणार नाही. शिवसेना स्टाईलमध्ये तुला उत्तर मिळेल हे लक्षात ठेवा, असा इशारा शिंदे गटाचे पदाधिकारी कुणाल सरमणकर यांनी कुणाल कामराला दिला आहे.

एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले :कॉमेडियन कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड.

मुंबई -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी एफआयआर दाखल करण्यात आला.तर शिंदे यांच्सया शिवसेनेच्या समर्थकांनी कामराच्या शोच्या स्टुडिओ आणि हॉटेलमध्ये तोडफोड केल्याबद्दल ४० शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 353(1)(b) (सार्वजनिक अराजकता निर्माण करणारी विधाने) आणि 356(2) (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

खरंतर, महाराष्ट्राच्या राजकारणावर कामराचा व्हिडिओ वादात सापडला आहे. व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती.रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. रात्री उशिरा, मोठ्या संख्येने समर्थक मुंबईतील खार येथील द युनिकॉन्टिनेंटल कार्यालयात पोहोचले. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ येथे शूट करण्यात आला आहे.

यानंतर तो तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. कुणाल कामराला तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे.

कुणाल कामराच्या गाण्याचे बोल, ज्यामुळे वाद निर्माण झाला…

शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले- शिवसेना स्टाईलने धडा शिकवू
शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे म्हणाले – मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला तत्काळ अटक करावी. उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध अशा शब्दांचा वापर अजिबात सहन केला जाणार नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने धडा शिकवू.

शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, कुणाल कामरा तुला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रवास करू देणार नाही. यूबीटी ग्रुप आणि संजय राऊत यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर तू एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत आहेस. आम्ही बाळ ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, जर आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुम्हाला भारतातून पळून जावे लागेल.

आंतरराष्टीय सहकार वर्षानिमित्त सहकार सोसायटीच्या महामेळाव्याचा समारोप 

महाराष्ट्र हौसिंग फेडरेशन आणि पुणे जिल्हा फेडरेशन आयोजित

पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्थाना सहकारात स्थान नव्हते, त्यावेळी २०१९ साली त्याकरिता स्वतंत्र चॅप्टर आम्ही केला. त्यामुळे कायद्याने आधार मिळाला. येत्या १० ते १२ दिवसात  उर्वरित नियम देखील आम्ही प्रसिद्ध करू, तसेच अपार्टमेंट कायद्यात देखील येत्या महिन्याभरात आवश्यक पूर्तता करू. सहकारातून समृद्धीकडे नेण्याचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे धोरण हे स्वयंपूनर्विकासातून साध्य करण्याचा विचार आहे. स्वयंपुर्नविकास हा आणखी सोप्या पद्धतीने व्हायला हवा. त्यामध्ये सहकारातून समृद्धीकडे नेण्याचे धोरण आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी पुण्यात महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते.

समारोपप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, आमदार हेमंत रासने, धीरज घाटे, दीपक मिसाळ, संघटनेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सीताराम राणे, मुंबई गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव मनिषा कोष्टी, नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक आशिष त्रिवेदी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक ऑनलाईन सेवा व स्मरणिका, विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, क्लस्टर पद्धतीने स्वयंपुर्ण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गृहनिर्माण संस्थाना टँकरमुक्त आम्ही करू. मात्र, सोलरयुक्त संस्था हा उपक्रम सर्वत्र राबविणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रधानमंत्री सूर्य धन योजनेचा संस्थानी लाभ घ्यायला हवा. पुढील ३ महिन्यात संस्थाशी निगडित ऑनलाईन प्रणाली सुरु होत असून पुढील सहा महिन्यात व्हाट्स अँप वर सुविधा उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश असल्याने ४० टक्के  पेक्षा अधिक लोकसंख्या सहकाराशी जोडली गेली आहे. देशात ८ लक्ष तर राज्यात २.२५ लक्ष सहकारी संस्था असून त्यातील १.२५ लक्ष गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे ही चळवळ मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. आज ३० वेगवेगळ्या क्षेत्रात अशा पद्धतीचे काम सुरु आहे.

आशिष शेलार म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाशिवाय सहकार चळवळ चालू शकत नाही. कोविड काळात गृहनिर्माण संस्थाच्या सभा या ऑनलाईन पद्धतीनेच होत होत्या. त्यामुळे यामध्ये माहिती तंत्रज्ञानाला महत्व आहे. व्यवसायिकीकरण आणि स्वायत्तता या दोन गोष्टी सहकारी संस्थांमध्ये असायला हव्या. संस्थांच्या कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर म्हणाले, आज स्वयंपुर्नविकास मोठी गती घेत आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये याकरिता खूप मोठा वाव आहे. बिल्डर शिवाय पुर्नविकास करण्याबाबत आपण आत्मनिर्भर होत आहोत. याबाबत मुंबई मध्ये केलेले प्रकल्प यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी पुर्नविकास चळवळीत मागे राहू नये.

विद्याधर अनास्कर म्हणाले, गृहनिर्माण संस्थांमध्ये सहकार संस्कृती विकसित होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गृहनिर्माण संस्था म्हणजे भांडण हे सगळ्यांचे असलेले मत आपण दुरुस्त करायला हवे. अनेक संस्थांमध्ये चांगली संस्कृती आहे. एकमेकांना मदत देखील केली जाते. एकी हेच बळ हे सहकाराचे तत्व असून सहकाराची शिस्त आपल्यामध्ये सहकार टिकवण्यासाठी हवी.

सुहास पटवर्धन म्हणाले, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास २०१९ च्या आदेशानुसार अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच २०१९ च्या सहकार कायद्याच्या नियमावलीची देखील अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मानीव हस्तांतरण ऑनलाईन पद्धतीने, एका खिडकी योजना, बिगरशेती कर आकारणी कायम स्वरूपात रद्द व्हावी. जिल्हा आणि राज्य महासंघास कार्यालय आणि सहकार संवाद ऑनलाईन पोर्टलचा विकास आवश्यक असल्याच्या मागण्या त्यांनी केल्या.

पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांची अनोखी आदरांजली

बंगळुरूच्या निरुपमा आणि राजेंद्र यांच्या नृत्याविष्कार ठरला नृत्य महोत्सवाचे प्रमुख आकर्षण

नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित दुसऱ्या पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाची उत्साहात सांगता

तिसऱ्या रोहिणी भाटे नृत्य महोत्सवात राज्याचा सांस्कृतिक विभाग सहभागी होणार!

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र यांचा डौलदार पदन्यास, समर्थ अभिनय आणि आकर्षक हस्तमुद्रा यांचा मेळ जमलेला नृत्याविष्कार हे नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने प्रस्तुत पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले.

श्रीकृष्णाच्या रासलिलेवर आधारित कथाभागातून सादर केलेल्या नृत्याविष्कारातून संवेदनशील अभिनयाचे, सुंदर देहबोलीचे दर्शन रसिकांना घडले. तर मनिषा नृत्यालयाने कथ्थकच्या माध्यमातून शिवभूषण सादर केले. या कलाकृतीस रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय कलासक्त नृत्य संस्थेने सादर केलेल्या योगिनी या ओडिसी नृत्याविष्कारास आणि उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

आजच्या कार्यक्रमात मुद्रा कथक नृत्य संस्थेने ‘गणेश ध्रुपद’ (कथ्थक), स्वरदा नृत्य संस्था ‘चरिष्णू’ (भरतनाट्यम्), आरोहिणी नृत्य संस्थेने ‘शिव ध्रुपद’ (कथ्थक), स्नेहललितने ‘तिल्लान’ (भरतनाट्यम्), रुपक नृत्यालयने ‘चतरंग’ (कथ्थक), शिल्पा नृत्यालयाने एक श्लोकी रामायण (कथ्थक), नृत्यांजली संस्थेचे श्री गणेश (भरतनाट्यम्), नृत्यभारती संस्थेचे राग सागर (कथ्थक), कलासाधनम् नृत्य संस्थेचे डमरु (भरतनाट्यम्), अर्चना नृत्यालयाचे ठुमरी (कथ्थक), रुपक कलासदनने अंजनेय स्तुती (भरतनाट्यम्) आदी नृत्याविष्कार सादर केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवातील नृत्याविष्कार पाहून थक्क झालो. वास्तविक अशाप्रकारचा शास्त्रीय नृत्यासाठी समर्पित महोत्सव हा पुण्यातच होऊ शकतो, हे आजच्या महोत्सवाने दाखवून दिले आहे. रोहिणी ताईंच्या नावाने होणारा हा महोत्सव म्हणजे एकप्रकारे महादेव शंकरांची उपासना आहे. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था नृत्य संकुल उभारण्यासाठी प्रयत्सांनशील आहे. स्कृतिक विभाग त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.

ते पुढे म्हणाले की, रोहिणी भाटे नृत्य महोत्सव हा खरंच अविस्मरणीय आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्य महोत्सवाचा प्रतिसाद पाहून; पुढील वर्षीचा तिसरा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य करण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देखील सहभागी होईल. त्यासोबतच  सांस्कृतिक विभागाच्या वतीने आगामी ३६५ दिवस १२०० कार्यक्रम राज्यभर राबविणार असल्याची माहिती देखील मंत्री शेलार यांनी यावेळी दिली.

समारोप प्रसंगी पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात अनोखी आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, नृत्य गुरु शमाताई भाटे, मनिषा साठे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी, आयोजक अजय धोंगडे, संयोजक तथा भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

जनसुरक्षा विधेयक म्हणजे हुकूमशाहीची सनद:विरोधी पक्ष-संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने

पुणे दिनांक २३- जनसुरक्षा विधेयक रद्द करा रद्द करा… ! जनसुरक्षा नाही.. ही तर उघड दडपशाही ! मोदी-शहा-फडणवीस सरकारसे संविधान बचाव,संविधान बचाव !! अशा तीव्र संतप्त घोषणांच्या गजरात आज लोकमान्य टिळक चौक, अलका टॉकीज, येथे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात विविध पक्ष संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.त्यामध्ये सुमारे ५०० कार्यकर्ते-नेते आणि नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

महाराष्ट्र सरकारने नुकतेच जनसुरक्षा विधेयक २०२४ या नावाने एका कायद्याचा मसुदा विधानसभेसमोर ठेवला आहे. त्या कायद्याचे उद्दिष्ट शहरी नक्षलवादी संघटनांचा बिमोड करणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायद्याच्या मसुद्य़ातच्या प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. परंतु प्रत्यक्ष कायद्यात नक्षलवादाचा एका शब्दाने किंवा सूचकपणेदेखील उल्लेख नाही. उलट बेकायदेशीर कृत्य याची अत्यंत व्यापक अशी व्याख्या केल्याने, कोणतेही जनआंदोलन किंवा संघटना ही बेकायदेशीर ठरवून तिची सर्व मालमत्ता जप्त करणे, तिच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सहानुभूतीदारांनादेखील २ ते ७ वर्षांपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.असे आक्षेप यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नोंदविले .

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौताम्याचा आजचा दिवस असल्याने सर्वप्रथम या हुताम्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या नावाच्या आणि कार्याच्या घोषणा देण्यात आल्या.

या विधेयकाच्या विरोधात झालेल्या या निदर्शनांच्या कार्यक्रमात आज ऱाष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार,) शिवसेना(उबाठा),मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी,सुराज्य संघर्ष समिती, जबाब दो आंदोलन, अंगमेहनती संघर्ष समिती, क्रांतिकारी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, नव समाजवादी पर्याय, सिटू इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेथे झालेल्या सभेत मोहन जोशी,अभय छाजेड (काँग्रेस), प्रशांत जगताप, विकास लवांडे,(राष्ट्रवादी काँग्रेस(शप), रेखा मुंडे, गजानन थऱकुडे (शिवसेना (उबाठा), अजित अभ्यंकर (माकप), सिद्धार्थ धेंडे (रिपब्लिकन पार्टी आय्)दत्ता पाकिरे (समाजवादी पार्टी), विजय कुंभार, डॉ. अभिजीत मोरे (आम आदमी पार्टी )सुरेश खोपडे(निवृत्त पोलीस अधिकारी),सारंग यादवाडकर(पर्यावरण तज्ञ),अब्राहम आढाव(माहिती अधिकार समूह), परमेश्वर जाधव(क्रांतिकारी कामगार पक्ष) दत्ता गायकवाड (रिपाई युवामोर्चा) इत्यादी नेत्यांनी आपले विचार मांडले. ऍडव्होकेट संदीप ताम्हनकर यांनी सूत्रसंचालन केले.

“मोदी-शहा-फडणवीस यांनी देशात आणू घातलेल्या धार्मिक द्वेषावर आधारित राजवटीच्या विरोधात जनतेचा असंतोष व्यक्त होऊ नये, यासाठी लोकांचा आवाज, त्यांना नक्षलवादी ठरवून दाबण्याचे हा कारस्थान उधळून लावले पाहिजे. जोपर्यंत सरकार हे विधेयक संपूर्णतः मागे घेत नाही, तो पर्यंत हे आंदोलन तीव्रपणे असेच चालू राहिल”  असे विचार सर्व वक्त्यांनी मांडले. तसेच सरकारच्या या भीषण दडपशाहीची आणि अन्यायाची कित्येक उदाहरणे वक्त्यांनी दिली.हे आंदोलन हे विधेयक मागे घेईपर्यंत चालविण्याचा निर्धार व्यक्त केला.

जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या नवव्या आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली, २३ मार्च २०२५ : संसद सदस्यांसाठी प्रतिष्ठित जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या ९ व्या आवृत्तीला आज नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) परिसरातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ,संसदीय कार्य मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, सन्माननीय पाहुणे, जेके टायर अँड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अंशुमन सिंघानिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

२०१० मध्ये स्थापन झाल्यापासून, सीसीआय रॅलीने रस्ते सुरक्षेला प्रोत्साहन देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. जबाबदार ड्रायव्हिंगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या अनोख्या उपक्रमामुळे धोरणकर्त्यांना एकत्रितपणे एकत्र आणले जाते. या वर्षी, ५० हून अधिक संसद सदस्य, ज्यामध्ये श्री. अनुराग ठाकूर, श्री. निशिकांत दुबे आणि श्री. राजीव प्रताप रुडी आणि इतर संसद सदस्यांसह आमंत्रित नोकरशहा, वरिष्ठ पत्रकार आणि सशस्त्र दलांच्या तुकड्या त्यांच्या वैयक्तिक गाड्यांमध्ये रॅलीत सहभागी झाल्या होत्या, त्यांनी सुरक्षित रस्त्यांप्रती त्यांच्या समर्पणाची पुष्टी केली आणि रस्ते अपघातात दुःखदपणे प्राण गमावलेल्या संसद सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रयत्नाला आणखी पाठिंबा देण्यासाठी, रॅलीच्या मार्गावर ट्रॅफिक पार्क येथे थांबा होता, जिथे सहभागींनी ड्रायव्हिंगच्या मूलभूत नियमांची पुनरावृत्ती केली आणि रस्ता सुरक्षा चिन्हांबद्दलचे त्यांचे ज्ञान तपासले. या परस्परसंवादी उपक्रमाने एकूण अनुभव वाढवला आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्त्व अधोरेखित केले. क्लासिक आणि व्हिंटेज कारच्या आश्चर्यकारक प्रदर्शनाने कार्यक्रमाची भव्यता आणखी वाढवली, ज्यांनी उपस्थितांना त्यांच्या शाश्वत आकर्षणाने मोहित केले.

या कार रॅलीचे ब्रीदवाक्य “रस्ते सुरक्षा” आहे. या प्रसंगी आपण रस्ते अपघातात गमावलेल्या संसदेतील आपल्या प्रतिष्ठित सदस्यांचे स्मरण करतो. काही प्रमुख नावांमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग, केंद्रीय मंत्री राजेश पायलट, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा, केंद्रीय मंत्री येरननैडू, खासदार एस.पी. मुथुकुमारन, खासदार श्रीकांत जिचकर, खासदार महेंद्र सिंग भाटी आणि खासदार दयानंद सहाय, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, खासदार नंदमुरी हरिकृष्ण, खासदार एस. राजेंद्रन आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे, ज्यामध्ये बहुतेक आधुनिक महामार्गांपासून ते अरुंद, कच्च्या रस्त्यांपर्यंतचा समावेश आहे. रस्ते हा देशाच्या कोणत्याही भागात पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. महत्त्वाचे म्हणजे, आपले राजकारणी त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग निवडणूक प्रचारासाठी प्रवास करण्यात, त्यांच्या संबंधित मतदारसंघातील लोकांना भेटण्यात किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात घालवतात. तथापि, वेळेचा ताण, कामाचे तास आणि सकाळी लवकर ते रात्री उशिरापर्यंत प्रवास केल्याने त्यांना रस्त्यावर होणाऱ्या मृत्यूंचा धोका अधिक असतो. रस्ते अपघातात आपण अनेक खासदार आणि मंत्री गमावले आहेत.

मंत्री किरेन रिजिजू यांनी रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांचे मत मांडले की अशा प्रकारच्या रॅली केवळ सदस्यांसाठीच नव्हे तर देशातील सामान्य लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहेत.

 जेके टायरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अंशुमन सिंघानिया म्हणाले, “ जेके टायर-सीसीआय रॅली सुरक्षित आणि जबाबदार ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे उदाहरण देते. रस्ता सुरक्षा म्हणजे केवळ नियमांचे पालन करणे नाही तर ते जीव वाचवणे आहे. भारतीय रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारत्या जाळ्यासह, रस्ता सुरक्षेचा संदेश अधिक बळकट करण्याची गरज आणखी गंभीर बनली आहे आणि जेके टायरमध्ये आम्ही तीन दशकांहून अधिक काळ या कारणासाठी समर्पित आहोत. जागरूकता मोहिमा आणि उत्पादन नवोपक्रमांद्वारे, आम्ही आमचे रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि जबाबदार नागरिक आणि उद्योग नेते म्हणून रस्ते शिस्तीचे समर्थन करण्यासाठी समर्पित आहोत.”

सीसीआयचे सचिव श्री राजीव प्रताप रुडी यांनीही रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि माननीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या दृष्टीकोनातून मंत्रालयाने ऑटोमोबाईल सुरक्षा मानके मजबूत करण्यासाठी, रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इतर प्रमुख उपक्रमांसाठी बहुआयामी प्रयत्न केले आहेत.

काही सामान्य कारणे म्हणजे जास्त वेगाने गाडी चालवणे, मोबाईल फोनचा वापर करणे, हेल्मेटशिवाय गाडी चालवणे आणि सीटबेल्टशिवाय गाडी चालवणे आणि अनधिकृत ठिकाणी, रस्ते आणि पादचाऱ्यांच्या क्रॉसिंगवर महामार्गावर जाणे इत्यादी आढळून येतात.

श्री रुडी यांनी पंतप्रधानांनी “मन की बात” मध्ये रस्ते अपघातांवरील दिलेल्या संदेशाची आठवण करून दिली, जिथे पंतप्रधानांनी रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या दुःखद घटनेचा गंभीरपणे उल्लेख केला होता.

रस्ते अपघात आणि मृतांच्या या चिंताजनक प्रवृत्तीमुळे त्यांची तीव्रता वाढली आहे आणि रस्ते अपघातांची वाढती संख्या या देशातील जनतेमध्ये जागरूकता वाढवण्याची निकड आणि गरज समोर आणते.

याच कारणास्तव, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाने जेके टायरच्या भागीदारीत जीव वाचवण्याची मोहीम सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे जेणेकरून देशाला त्याचा आर्थिक लाभ देखील मिळू शकेल.

जेके टायर-सीसीआय रॅलीने राजधानीच्या प्रतिष्ठित ठिकाणांमधून काळजीपूर्वक नियोजित मार्गाचा अवलंब केला, ज्यामुळे रस्ता सुरक्षेचा महत्त्वाचा संदेश अधिक स्पष्ट झाला. सहभागींनी टीएसडी (वेळ, वेग, अंतर) स्वरूपात स्पर्धा केली, जी शिस्तबद्ध ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी वेगापेक्षा अचूकतेवर लक्ष केंद्रित करते. प्रत्येक संघात एक ड्रायव्हर आणि एक नेव्हिगेटर होता, नेव्हिगेटर मार्ग सूचनांचे पालन करण्यासाठी, सरासरी वेग मोजण्यासाठी आणि कोणत्याही विचलनामुळे दंड गुण मिळत असल्याने टीम वेळापत्रकानुसार राहील याची खात्री करण्यासाठी जबाबदार होता. कायदेशीर मर्यादेत निर्दिष्ट वेळा आणि वेग निश्चित करून, एफएमएससीआय-अनुपालन रॅलीने सहभागींच्या नेव्हिगेशन कौशल्याची चाचणी घेतली आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित केले.

रस्ता सुरक्षेच्या या उदात्त कार्याला जेके टायर, आयओसीएल, गेल, युनियन बँक ऑफ इंडिया, पतंजली आयुर्वेद लिमिटेड, पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड, एनबीसीसी, बीपीसीएल आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी पाठिंबा दिला.

संध्याकाळी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे एका भव्य पारितोषिक वितरण समारंभाने या कार्यक्रमाचा समारोप होईल, जिथे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि अंशुमन सिंघानिया यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला जाईल.

जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल

जेके ऑर्गनायझेशनची प्रमुख कंपनी, जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातील टॉप २० टायर उत्पादकांपैकी एक आहे. त्यांच्याकडे ११ जागतिक स्तरावर बेंचमार्क केलेल्या ‘शाश्वत’ उत्पादन सुविधा आहेत – ९ भारतात आणि २ मेक्सिकोमध्ये – ज्या एकत्रितपणे दरवर्षी सुमारे ३५ दशलक्ष टायर्सचे उत्पादन करतात. भारतात रेडियल तंत्रज्ञानाचा पाया रचत, कंपनीने १९७७ मध्ये पहिले रेडियल टायर तयार केले.

जेके टायरची नावीन्यपूर्णतेप्रती अटल वचनबद्धता म्हैसूरमधील त्यांच्या अत्याधुनिक जागतिक संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र “रघुपती सिंघानिया सेंटर ऑफ एक्सलन्स” द्वारे दिसून येते, ज्यामध्ये अत्याधुनिक चाचणी आणि प्रमाणीकरण उपकरणे आहेत.

जेके टायरने त्यांच्या उत्कृष्ट पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) पद्धतींना मान्यता देऊन ESG कामगिरीमध्ये ‘बेस्ट इन क्लास’ रेटिंग मिळवले.

जेके टायरला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल, यूके कडून त्यांच्या सर्व प्लांट्समध्ये सुरक्षिततेसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित सुरक्षा पुरस्कार – ‘सन्मानाची तलवार’ प्रदान करण्यात आली आहे. बिझनेस वर्ल्डने जेके टायरला भारतातील टॉप 30 मोस्ट सस्टेनेबल कंपन्यांमध्ये देखील मान्यता दिली आहे आणि जेके टायर ही RE100 मध्ये सामील होणारी भारतातील पहिली टायर कंपनी आहे.

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवाला लोकसंस्कृतीचा कलाविष्कार – आ. उमा खापरे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,भारत सरकार, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय लोकोत्सवाचा समारोप

पुणे (दि. २३ मार्च २०२५) लोकोत्सवामुळे पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्र व ओरिसा मधील आदिवासी लोक संस्कृतीचा कलाविष्कार पाहण्याची संधी मिळाली. हा ठेवा अनुभवणे म्हणजे सामाजिक परंपरा, संस्कृतीचे जतन करणे देशाच्या ऐक्यासाठी नितांत गरजेचे आहे हे स्पष्ट झाले. यासाठी पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशने समन्वयाची भूमिका महत्त्वाची होती, असे मत विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत – लोकोत्सव हा महाराष्ट्र व ओरिसा राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा तीन दिवसीय उत्सवाचा शनिवारी (२२ मार्च) प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे समारोप झाला. या लोकोत्सवाचे संयोजन पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनने केले केले होते. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या पुणे विभागीय अधिक्षक जान्हवी जानकर, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालिंदे, मलाप्पा कस्तुरे आदी उपस्थित होते.


समारोप समारंभात मुंबई येथील रूद्राक्ष कला विष्कारच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र सोहळा संस्कृतीचा’ यामध्ये गण, गवळण, लावणी, वासुदेव, गोंधळ, शेतकरी नृत्य, पोतराज, कोळी नृत्य असे विविध प्रकार सादर करून रसिकांची मने जिंकली. नृत्य दिग्दर्शन उमेश देसाई व राजेश शिर्के आणि सूत्रसंचालन संतोष पेटकर यांनी केले. त्यानंतर ओरिसा येथील कौशल फोक ग्रुप मधील कलाकारांनी थापा नृत्य, दालखाई नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी उमेश देसाई, नवगंध दास आणि कलाकारांचा आ. उमा खापरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन चिंचवडे, सुनील पोटे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन अभिजित कोळपकर यांनी केले. आभार अविनाश आवटे यांनी मानले.

राजकुमार ठाकूर यांनी मिळविला सहस्रबुद्धे चषक कॅरम स्पर्धेत विजय आणि ठरले चषकाचे मानकरी


पुणे
पटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या जी पी सहस्रबुद्धे एकेरी कॅरम स्पर्धेचा काल अंतिम सामना झाला.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात क्षणा क्षणाला उत्कंठा वाढवित रंगतदार खेळ करत राजकुमार ठाकूर याने रझाक शेख यांचा २२-७,२२- २० अशा गुणांनी दीड तास सलग सामना खेळून पराभव केला व विजेता ठरले .व जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेत अपराजित राहून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व रोख रुपये तीन हजाराचे बक्षिस ही मिळविले.रझाक शेख यांनी याच बरोबर राजकुमार ठाकूर यांच्या बरोबर चुरशीची लढत देऊन उप विजेते पद मिळवले.रझाक शेख यांनी द्वितीय पारितोषिक रुपये दोन हजार व चषक मिळविले.

स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी व मुख्य पंच अभय अटकेकर यांनी घोषित केलेले स्पर्धेतील प्रथम आठ विजेते या प्रमाणे
१) राजकुमार ठाकूर – प्रथम पारितोषिक रुपये तीन हजार व चषक.
२) रझाक शेख – द्वितीय पारितोषिक रुपये दोन हजार व चषक
३) रवी श्रीगादी – तृतीय पारितोषिक रुपये एक हजार व चषक.
४) सुनील वाघ – चतुर्थ रुपये एक हजार व चषक.
५) माधव तिळगुळकर – पाचवे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह.
६) दत्तात्रय सलागरे – सहावे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह
७) श्रीकांत बाबर – सातवे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह
८) पंकज कुलकर्णी – आठवे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह.

एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात अंतिम सामना बघण्यास खूप मोठी गर्दी झाली होती.या नंतर लगेचच कॅरम स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष अजित गोखले यांनी केले.स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी यांनी वीस तारखेपासून चाललेल्या ह्या स्पर्धेविषयीचा अहवाल सादर केला.प्रमुख पाहुणे दीपक पोटे,संदीप खर्डेकर,जयंत भावे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे व स्मृतिचिन्ह प्रदान करेण्यात आली.
कार्यक्रमास कॅरम प्रेमी, शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित गोखले,सचिव उर्मिला शेजवलकर,कार्याध्यक्ष प्राजक्ता मोघे,पंच अभय अटकेकर,सतीश सहस्रबुद्धे,पंकज कुलकर्णी,माधव तिळगुळकर, विनय फाटक,जयंत मुळ्ये यांनी परिश्रम घेतले.

मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र…

पुणे-मोगलमर्दिनी छत्रपती महाराणी ताराबाई साहेबांच्या समाधी संवर्धन करावे यासाठी मुख्यमंत्री यांना पत्र दिल्याची माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी समाज माध्यमातून दिली आहे . त्यांनी याअसे म्हटले आहे कि,’

शिवस्नुषा श्री छत्रपती महाराणी ताराबाई साहेब यांच्या समाधी स्थळाची झालेली दुरवस्था अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पराक्रम आणि धैर्याचा अमूल्य ठेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई महाराणींची स्मृती कायम राखणे, ही आपली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जबाबदारी आहे.

याच भावनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. महाराणी ताराराणी साहेबांच्या समाधीचे त्वरित संवर्धन आणि जिर्णोद्धार करण्यात यावा, अशी सर्व शिवभक्तांच्या वतीने मागणी केली आहे.

मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार महाराणी ताराबाई साहेबांच्या गौरवशाली स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या समाधीस्थळाच्या पुनरुज्जीवनासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करेल.

छत्रपती राजाराम महाराज सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न

पुणे-शिवपुत्र श्री राजाराम छत्रपती महाराजांच्या ३२५ व्या पुण्यतिथी निमित्त आज सिंहगड येथे महाराजांच्या समाधीस युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अभिवादन केले.आणि त्यांनी यावेळी छत्रपती राजाराम महाराज सृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजनही केले. आमदार भीमराव तापकीर, वारकरी मंडळी, राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आदी प्रशासकीय अधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी असे म्हटले कि,’ श्री राजाराम छत्रपती महाराजांनी १६८९ ते १७०० या अकरा वर्षांत अत्यंत निकराने औरंगजेबापासून स्वराज्याचे रक्षण केले. तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर आठ वर्षे राजधानी हलवून स्वराज्याचे अस्तित्व जिवंत ठेवले व आपल्या राजनीती कौशल्याने मुघल सेनेला दुर्बल बनविले. आपल्या हयातीत दिल्ली जिंकून श्री शिवछत्रपती महाराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय श्री राजाराम महाराजांनी बाळगले होते, मात्र १७०० साली वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी महाराजांचे सिंहगड मुक्कामी अकाली निधन झाले. याचठिकाणी महाराजांची समाधी आहे.

गडावरील या समाधीस्थळी छत्रपती राजाराम महाराज पुण्यतिथी सोहळा समिती, सिंहगड यांच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात सहभागी झालो. भारतीय सैन्य दलाची महार रेजिमेंट पाईप बँड पथक व पुणे ग्रामीण पोलीस बँड पथक यांच्या वतीने श्री राजाराम छत्रपती महाराजांस मानवंदना देण्यात आली. तसेच पुणे पोलिसांच्या वतीने बंदुकांच्या तीन फैरी झाडून महाराजांस मानवंदना देण्यात आली. वारकरी मंडळींनी टाळ मृदंगाच्या गजरात महाराजांस अभिवादन केले.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे घोर प्रतारणा-युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे सीएम ना पत्र ..हटवा ते…

मुंबई- श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे घोर प्रतारणा असून हे अतिक्रमण ३१ मी पूर्वी हटवावे असे पत्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती सोशल मिडिया वरील आपल्या आकाउंट वरून प्रसारित केली आहे .

काय म्हटले आहे नेमके -युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी…

हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही.

भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली…

भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.

शिवनेरी, लेण्याद्रीसह चार ठिकाणी रोपवे प्रकल्प साकारणार…

पुणे- :- शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रोपवे प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी शिवनेरी, लेण्याद्री, भीमाशंकर आदी ठिकाणी उभारण्याची मागणी रोपवे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी राज्य शासनाकडून प्रस्ताव आल्यास ‘पर्वतमाला योजनेंतर्गत” रोपवे बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याचे मान्य केले होते.
त्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवनेरीसह विविध रोपवेचे प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवण्याबाबत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्य शासनाने परिशिष्ट-अ नुसार पुणे जिल्ह्यातील श्री निमगाव खंडोबा, सिंहगड व जेजुरीसह एकूण १६ आणि परिशिष्ट-ब नुसार शिवनेरी किल्ला, अष्टविनायक लेण्याद्री, भीमाशंकर ज्योतिर्लिंग व दाऱ्याघाट यासह एकूण २९ ठिकाणी रोपवे बांधण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला होता.
राज्यातील विविध ठिकाणी रोपवे बांधण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. आणि राज्य सरकार यांच्यात ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार राज्य पर्यटनस्थळांचा विकास झाल्यास अर्थकारणाला गती मिळेल, असेही कोल्हे म्हणाले .
सरकारने रोपवे बांधण्यासाठी जागा उपलब्धता, आर्थिक सहभाग देणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने राज्य मंत्रिमंडळाने पर्वतमाला योजनेंतर्गत शिवनेरी, लेण्याद्रीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४ रोपवे प्रकल्पांना जागा उपलब्धता, आर्थिक सहभागासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिवनेरी, लेण्याद्रीसह राज्यातील सर्वच रोपवे बांधण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.
रोपवे प्रकल्पांबरोबरच राज्य शासनाने शिवनेरी, अष्टविनायक गणपती देवस्थान, वढु-तुळापूरचे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक यांना जोडणारा ‘शिव-शंभू कॉरिडॉर’ रस्ते प्रकल्पही हाती घ्यावा यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने रोपवे प्रकल्पाला गती देतानाच ‘शिव-शंभू कॉरिडॉर’लाही मंजुरी द्यावी.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार

इज ऑफ लिविंगच्या अनुषंगाने पीएमआरडीएतर्फे चर्चासत्र संपन्न

पुणे-: शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ग.दि. मांडगूळकर सभागृहात आर्किटेक, इंजिनियर, बांधकाम संघटनांच्या पदाधिकारी आण‍ि सदस्यासाठी चर्चासत्र घेण्यात आले. यात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी पीएमआरडीएच्या अधिकाधिक सेवा या ऑनलाइन करण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी उपस्थ‍ित मान्यवरांचे पीएमआरडीएची रचना, कार्यप्रणालीचा समावेश असलेली उपयुक्त दिनदर्शिका देत स्वागत करण्यात आले.

प्रशासकीय स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, प्रकल्प आणि सेवाबाबत अध‍िकाध‍िक पारदर्शकता आणण्यासाठी शासनाकडून शंभर दिवसाच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगानेपीएमआरडीएतर्फे ग.दि. मांडगूळकर सभागृहात इज ऑफ लिविंगच्या अनुषंगाने आर्किटेक, इंजिनियर्स आणि बांधकाम व्यवसायिक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांसाठी चर्चासत्र घेण्यात आले. पीएमआरडीएच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन देण्याच्या दृष्टीने झालेल्या या चर्चासत्रात संबंधितांकडून सूचना घेत घेत त्याची आवश्यकतेनुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएचा कारभार अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी बीपीएमएस प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. यासंबंधी येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी या चर्चासत्रात आर्किटेक, इंजिनियर्स आण‍ि बांधकाम व्यवसाय‍िकांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या अडचणींच्या अनुषंगाने बीपीएमएस प्रणालीबाबत सचिन देवरे यांनी संबंध‍ितांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, विकास परवानगी विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अभियंता र‍िनाज पठाण, प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, अग्निशमन विभागाचे देवेंद्र पोटफोडे यांच्यासह क्रेडाईचे रणजीत नाईकनवरे, मराठी बांधकाम व्यावसाय‍िक संघटनेचे अंकुश असबे, नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपर्स कौन्सिलचे भरत अग्रवाल, भारतीय वास्तुव‍िशारद संस्थेचे व‍िकास अचलकर, ऐसाचे म‍िलींद पांचाळ, मिडीचे मिलिंद पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

 उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रयागराजच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

नाशिक, दि. २३ : देशातील बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर विकासासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातील. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर परिसराच्या धार्मिक, सामाजिक, पर्यावरणीय विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी घेऊन सुरूवात करावी. ही सर्व कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी. राज्य शासनातर्फे या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे आगामी  च्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर विकासासाठी तयार केलेल्या आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, त्र्यंबकेश्वर परिसराची नैसर्गिक रचना सुंदर आहे. या परिसराच्या विकासासठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल. उच्चाधिकार समिती आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून आराखड्याला मंजुरी देण्यात येईल. याअंतर्गत त्र्यंबकेश्वर परिसरात विविध विकासकामे केली जातील.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील कामे कालबद्धरितीने पूर्ण करावीत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामे करताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अधिकाधिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग होईल, विद्युत वाहने उपयोगात येतील, असे नियोजन करावे. त्यासोबत स्थानिक नागरिकांना अधिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतागृहाची उत्तम व्यवस्था करावी, अशा सूचनाही श्री.फडणवीस यांनी दिल्या.

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच करण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यामुळे कुंभामेळ्यासंबंधी कामांना कायदेशीर चौकट प्राप्त होईल आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता येईल. आयोजनादरम्यान विविध सुविधांचे उत्तम व्यवस्थापन होण्यासाठी हे गरजेचे आहे.

गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत. त्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. तसेच दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांना त्वरीत सुरुवात करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा ११०० कोटी रुपयांचा असून त्या अंतर्गत या स्थानाचे अध्यात्मिक  व पर्यटनाच्यादृष्टीने महत्व लक्षात घेवून विकासकामे प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.