Home Blog Page 539

डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडचा आयपीओ गुरुवारी, खुला होणार

·         डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडच्या, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी प्राईस बँड २६९ रुपये ते २८३ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

·         अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख – बुधवार, १८ डिसेंबर २०२४

·         बोली/ऑफर खुली होणार – गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४ आणि बोली/ऑफर बंद होणार – सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

·         कमीत कमी ५३ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास ५३ च्या पटीत बोली लावावी लागेल.

·         आरएचपी लिंक:

https://www.damcapital.in/files/investorrelation/638698141609926454_DAM_Capital_Advisors_Limited_-_RHP.pdf

मुंबई, १६ डिसेंबर, २०२४:  डॅम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेडने आपला आयपीओ गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४ रोजी खुला होणार असल्याची घोषणा केली आहे. ही बोली सोमवार २३ डिसेंबर, २०२४ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना कामकाजाचा एक दिवस आधी म्हणजे बुधवारी, १८ डिसेंबर, २०२४ रोजी बोली लावता येतील.

या ऑफरसाठी प्रत्येक इक्विटी शेयरसाठी २६९ रुपये ते २८३ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी ५३ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास ५३ च्या पटीत बोली लावावी लागेल.

या आयपीओमध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले कंपनीचे 29,690,900 इक्विटी शेयर्स आहेत. यामध्ये प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 8,714,400 पर्यंत इक्विटी समभाग मल्टिपल्स अल्टरनेट ऍसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे 7,042,400 पर्यंत इक्विटी समभाग नरोत्तम सत्यनारायण सेखसरियाकडून, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 5,771,000 पर्यंत इक्विटी समभाग आरबीएल बँक लिमिटेडकडून, प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 5,064,250 पर्यंत इक्विटी समभाग ईजीऍक्सेस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडकडून, (हे सर्व समभाग विक्री करू इच्छिणारे गुंतवणूकदार) आणि प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹ [●] मिलियन किमतीचे, 3,098,850 पर्यंत इक्विटी समभाग धर्मेश अनिल मेहताकडून (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर) यांचा समावेश आहे.

या ऑफरमध्ये प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेले, ₹[●] मिलियनपर्यंत, ७०००० पर्यंत इक्विटी समभाग राखून ठेवण्यात आले आहेत. (पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलच्या [●]%, पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्रिप्शनसाठी) हा भाग वगळता उर्वरित ऑफर “नेट ऑफर” आहे. ही ऑफर आणि नेट ऑफर यामध्ये आमच्या कंपनीच्या पोस्ट-ऑफर पेड-अप इक्विटी शेयर कॅपिटलच्या अनुक्रमे [●]% आणि [●]% यांचा समावेश आहे.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी शेयर्स हे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(1) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 50% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 15% पेक्षा कमी असेल तर वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 35% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. इक्विटी समभाग पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येतील, ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या बोली येणे आवश्यक आहे. सर्व बिडर्स (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. बुक बिल्डिंग प्रक्रिया आणि ऑफर प्रक्रिया यांच्याशी संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी कृपया आरएचपीमधील पान क्रमांक 341 वरील “ऑफर प्रोसिजर” हा भाग वाचावा.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे आहेत.

ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडची प्राथमिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO) गुरुवारी सुरू होणार

●       दर्शनी मूल्य २ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी प्राइस बँड ₹ 410.00 to ₹ 432.00 निश्चित करण्यात आला आहे.

●       बोली/ऑफर कालावधी गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल.

●       अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल.

●       बोली किमान 34 समभागांसाठी केली जाऊ शकते आणि त्यानंतर 34 समभागांच्या पटीत केली जाऊ शकते.

●       आरएचपी लिंक : https://ingaventures.com/docs/offer-docs/TLL_RHP.pdf

●       संपूर्ण तपशिलासाठी, कृपया 16 डिसेंबर, 2024 रोजीच्या फायनान्शियल एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या पृष्ठ 24-25 वर प्रकाशित झालेल्या कायदेशीर जाहिराती पाहून घ्याव्या. 

ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेडच्या (“TLL” किंवा “कंपनी”) समभागांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) संदर्भातील बोली/ऑफर गुरुवारी, 19 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी संपेल. अँकर गुंतवणूकदार बोली/ऑफर कालावधी बुधवार, 18 डिसेंबर 2024 रोजी सुरू होईल आणि संपेल.

प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये ₹4,000 मिलियनपर्यंत नव्या समभागांचा समावेश आहे, तसेच कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या अजन्मा होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (“प्रवर्तक विक्री शेअरधारक”) 10,160,000 समभागांच्या “विक्रीचा” समावेश आहे.

कंपनीला यातून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग (i) कंपनीच्या वाढत्या कार्यशील भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, (ii) कंपनीच्या भांडवली खर्चासाठी आणि (iii) सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव आहे.

दर्शनी मूल्य २ रुपये असलेल्या प्रत्येक शेअरसाठी प्राइस बँड ₹ 410.00 to ₹ 432.00 निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 34 समभागांसाठी केली जाऊ शकते आणि त्यानंतर 34 समभागांच्या पटीत केली जाऊ शकते.

कंपनीचे समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) यांसारख्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंज”). ऑफरसाठी, BSE हे नामांकित स्टॉक एक्सचेंज असेल.

इंगा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड हे ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

येथे वापरलेले सर्व संज्ञांकित शब्द, जे परिभाषित केलेले नाहीत, त्यांना रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेल्या अर्थानेच समजले जाईल.

ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे केली जात आहे, जी SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 यांच्याशी संबंधित आहे व SEBI ICDR नियम 6(1) च्या अनुपालनात आहे, ज्यामध्ये नेट ऑफरचा 50% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (“QIBs”) प्रमाणिक पद्धतीने वाटला जाईल (“QIB Portion”), हे मान्य करताना की, कंपनी बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने QIB भागापैकी 60% पर्यंत एंकर गुंतवणूकदारांना, SEBI ICDR नियमांनुसार, एक पर्यायी पद्धतीने वाटू शकते (“अँकर गुंतवणूकदार पोर्शन”), ज्यामध्ये एक तृतीयांश भाग देशी म्युच्युअल फंडसाठी राखीव असेल, याची अट आहे की देशी म्युच्युअल फंडकडून वैध बोली मिळाल्यावरच ते अँकर इन्व्हेस्टरसाठी असलेल्या किमतीत किंवा त्यापेक्षा अधिक किमतीवर दिले जातील. जर अधिक सब्सक्रिप्शन न मिळाल्यास किंवा अँकर गुंतवणूकदार पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास, शिल्लक समभाग QIB पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील (“नेट QIB पोर्शन”).

तद्नंतर, नेट QIB पोर्शनचा 5% भाग केवळ म्युच्युअल फंडसाठी प्रमाणिक पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असेल, याची अट आहे की, वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त होईल आणि नेट QIB पोर्शनचा उर्वरित भाग सर्व QIBs, म्युच्युअल फंडसह, प्रमाणिक पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असेल, याची अट आहे की, वैध बोली ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक प्राप्त होईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकत्रित मागणी नेट QIB पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड पोर्शनसाठी उपलब्ध असलेल्या शिल्लक समभागांना उर्वरित नेट QIB पोर्शनमध्ये समाविष्ट करून, सर्व QIBs साठी प्रमाणिक पद्धतीने वाटप केले जाईल.

तद्नंतर, नेट ऑफरचा किमान 15% भाग गैरसंस्थात्मक बोलीदारांना आणि नेट ऑफरचा किमान 35% भाग किरकोळ व्यक्तिगत बोलीदारांना SEBI ICDR नियमांचे पालन करून, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर उपलब्ध असेल. गैरसंस्थात्मक पोर्शनचा एक तृतीयांश भाग ₹0.20 लाखांपेक्षा जास्त आणि ₹1.00 लाखांपर्यंत बोली आकार असलेल्या गैरसंस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल व दोन तृतीयांश भाग ₹1.00 लाखांपेक्षा जास्त बोली आकार असलेल्या गैरसंस्थात्मक बोलीदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल, हे मान्य करताना की, या दोन्ही उपवर्गांमध्ये कोणत्याही गैरसंस्थात्मक पोर्शनमध्ये अधिक सब्सक्रिप्शन झाल्यास, शिल्लक समभाग त्या उपवर्गात गैरसंस्थात्मक बोलीदारांना दुसऱ्या उपवर्गात, SEBI ICDR नियमांचे पालन करून, ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त होण्याच्या अटीवर वाटप केले जाऊ शकतात.

सर्व संभाव्य बोलीदात्यांना (अँकर गुंतवणूकदार वगळता) ऑफरमध्ये अनुप्रविष्ट होण्यासाठी Application Supported by Blocked Amount (“ASBA”) प्रक्रियेच्या माध्यमातून भाग घेणे अनिवार्य आहे. त्यांना त्यांच्या संबंधित ASBA खात्यांचे तपशील आणि UPI बोलीदात्यांच्या बाबतीत UPI ID प्रदान करणे आवश्यक आहे, जे यथावकाश त्यांच्या संबंधित बोली रकमेची अडथळा Self Certified Syndicate Banks (“SCSBs”) किंवा UPI यंत्रणेत असलेल्या प्रायोजक बँकांद्वारे बोली रकमेच्या प्रमाणात ब्लॉक केली जाईल, तसेच योग्य कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी आरक्षण पोर्शनअंतर्गत बोली देण्यासाठी प्रमाणिक पद्धतीने समभाग वाटप केले जातील, त्यांच्याकडून ऑफर किमतीवर किंवा त्यापेक्षा अधिक वैध बोली प्राप्त झाल्यास. अँकर गुंतवणूकदारांना ASBA प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये भाग घेण्याची परवानगी नाही. तपशिलांसाठी, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या पृष्ठ 401 वर “ऑफर प्रक्रिया” पाहा.

कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री गुरुवार,19 डिसेंबर 2024 पासून सुरू

· प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 665 रुपये ते 701  रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.  

· बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराची बोली सुरू होण्याची आणि बंद होण्याची तारीख बुधवार, 18 डिसेंबर 2024 असणार आहे.

· बोली किमान 21 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 21 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

·  आरएचपी लिंक:  https://www.concordenviro.in/investors.php

· जोखीम घटकांसह संपूर्ण तपशिलासाठी 16 डिसेंबर 2024 रोजीच्या फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये पान क्रमांक 12-13 वर प्रसिद्ध झालेली वैधानिक जाहिरात पाहा.

राष्ट्रीय, 16 डिसेंबर 2024: कॉनकॉर्ड एनव्हीरो सीस्टिम्सलिमिटेड (“CESL”  or “The Company”) ने गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी इक्विटी शेअरची प्राथमिक समभाग विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

प्रमुख गुंतवणूकदाराची बोली सुरू होण्याची आणि बंद होण्याची तारीख बुधवार, 18 डिसेंबर 2024 असणार आहे. बोली/ऑफर गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी खुली होईल आणि सोमवार, 23 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. (“Bid Details”)

प्रति इक्विटी शेअरसाठी 665 रुपये ते 701 रुपयांपर्यंतचा किंमतपट्टा (“Price Band”) निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 21 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 21 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Bid Lot”).

कंपनी निव्वळ उत्पन्नाचा उपयोग पुढील गोष्टींसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते: (i) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, कॉनकॉर्ड एन्व्हायरो FZE (“CEF”)मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी पुरविणे आहे. या प्रकल्पाद्वारे पाणी, सांडपाणी आणि संबंधित मेम्ब्रेन मॉड्युल्सच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा व प्रकल्प एकत्र करण्यासाठी असेंब्ली युनिट विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे 250 दशलक्ष रु. [25.00 कोटी रु.] खर्च अपेक्षित आहे; (ii) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, रॉकेम सेपरेशन सीस्टिम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (“RSSPL”) मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश ब्राउनफिल्ड प्रकल्पासाठी भांडवली खर्चाच्या गरजांसाठी निधी पुरविणे आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादन सुविधा, साठवणूक आणि सहायक क्रिया विस्तारण्यात येणार आहेत. त्यासाठी अंदाजे 105.05 दशलक्ष रु. [10.50 कोटी रु.] खर्च अपेक्षित आहे. (iii) कंपनीच्या भांडवली खर्चाच्या गरजांसाठी, प्रकल्प व यंत्रसामग्री खरेदीसाठी अंदाजे 32.07 दशलक्ष रु. [3.21 कोटी रु.] निधी पुरविणे;
(iv) आपल्या पूर्णत: मालकीच्या उपकंपनी, CEF मध्ये गुंतवणूक. त्याचा उद्देश CEF कडून घेतलेल्या विशिष्ट थकबाकी असलेल्या कर्जांच्या पूर्ण किंवा अंशतः आगाऊ परतफेडीसाठी किंवा परतफेडीसाठी अंदाजे 500 दशलक्ष रु. [50.00 कोटी रु.] निधी पुरविणे;

(v) CEF च्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी अंदाजे 200 दशलक्ष रु. [20.00 कोटी रु.] निधी पुरविण्यासाठी CEF मध्ये गुंतवणूक;

(vi) कंपनीचा पे पर यूज / पे अॅज यू ट्रीट व्यवसाय वाढविण्यासाठी आपली संयुक्त कंपनी Roserve Enviro Private Limited मध्ये अंदाजे 100 दशलक्ष रु. [10.0 कोटी रु.] गुंतवणूक.

(vii) नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी तंत्रज्ञान व अन्य विकास उपक्रमांमध्ये अंदाजे 235 दशलक्ष रु. [23.50 कोटी रु.]ची गुंतवणूक, तसेच उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरणे. (“ऑफरचे उद्देश”).

या ऑफरमध्ये 1,750.00 दशलक्षपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू समाविष्ट आहेत, तसेच विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये AF होल्डिंग्स (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) यांच्याकडून 4,186,368 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रयास गोयल यांच्याकडून 150,600 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, प्रेरक गोयल यांच्याकडून 150,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (प्रयास गोयल यांच्यासह मिळून “प्रवर्तक विक्री समभागधारक”), पुष्पा गोयल यांच्याकडून 92,420 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, निधी गोयल यांच्याकडून 31,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि नम्रता गोयल यांच्याकडून 29,500 पर्यंतचे इक्विटी शेअर्स (पुष्पा गोयल, निधी गोयल यांच्यासह “प्रवर्तक समूह विक्री समभागधारक” आणि गुंतवणूकदार विक्री समभागधारक, प्रवर्तक विक्री समभागधारक मिळून “विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे.

हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या 14 डिसेंबर 2024 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर करण्यात येत असून, महाराष्ट्रामधील मुंबई येथे कंपनी नोंदणी कार्यालय (ROC) येथे दाखल करण्यात आला आहे.

या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केलेले इक्विटी शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव असून, एक्स्चेंजेस BSE लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” together with BSE, the “Stock Exchanges”) आहेत. ऑफरच्या उद्देशासाठी नियुक्त स्टॉक एक्स्चेंज हे BSE असेल. (The “Listing Details”)

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड आणि इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. (The “BRLMs”).

येथे वापरल्या गेलेल्या, परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपीमध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टस (रेग्युलेशन) नियम 1957च्या 19(2)(ब) सुधारित नियमावलीनुसार (the “SCRR”) आणि 2018 च्या (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 च्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या 6(1) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जाहीर करण्यात आली असून, त्या अंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ऑफरच्या 50 % पेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील 60 टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्त्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (“Anchor Investor Portion”)  वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”) राखीव करण्यात आलेल्या वाटप किमतीइतक्या किंवा अधिक किमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. वाटप कमी झाल्यास किंवा मुख्य गुंतवणूकदार भागात नॉन-अलोकेशन भाग असल्यास शिल्लक इक्विटी शेअर्सची नेट QIB भागात भर पडेल (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून). (the “Net QIB Portion”). ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शांपैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

त्याचप्रमाणे, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात, त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उपश्रेणीतील सबस्क्राइब नसलेला भाग दुसऱ्या इतर उपश्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. पुढे सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार, ऑफरच्या 35% पेक्षा कमी नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाउंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार, योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रियेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलासाठी 501 पानावरील “ऑफर प्रोस्युजर” बघा.

झागराम, वाॅल्ट एसेस, मावेरिक्सची बाजी ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉनहार्डवेअर स्पर्धेचा समारोप


पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोवेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर झागराम007 (कोळसा मंत्रालय ), वोल्ट एसेस (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय), मावेरिक्स (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह प्रथम क्रमांकाला गवसणी घातली. तर द ऑलिम्पियन्स,पॅराडॉक्स इनोव्हेटर, रेल मॅनिक्स, निदान 7.0 (सर्व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) यांनी आपापल्या गटात संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला.एसआयएच-2024 या पाच दिवस चाललेल्या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे निवड झालेले महाराष्ट्रातील एकमेव नोडल केंद्र होते. ज्यात, देशातील ३० राज्यांतील जसे की, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, केरळ, जम्मू-काश्मिर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील एकूण २८ संघांची निवड झाली होती. या स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी केंद्रीय कोळसा मंत्रालय, रेल्वे व मेट्रो, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयांसमोर असणाऱ्या विविध समस्यांवर पर्यायी उपाय देण्याचे काम केले. त्यामध्ये अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघाच्या नवकल्पनांचे परिक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून प्रत्येकी एक लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.स्पर्धेचा समारोप समारंभ तथा बक्षीस वितरणासाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार, डसॉल्ट सिस्टिमचे कार्याध्यक्ष सलीम हुझेफा, भारत सरकारच्या इनोवेशन सेलचे संचालक योगेश ब्राम्हणकर, ‘एआयसीटीई’चे उपसंचालक डाॅ.प्रशांत खरात, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डाॅ. मोहित दुबे,  कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल अधिकारी डाॅ.रेखा सुगंधी, इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन, डाॅ.निशांत टिकेकर, प्रा.सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष, विभागीय आयुक्त डाॅ.पुलकुंडवार यावेळी बोलताना म्हणाले, एसआयएच-2024 ही केवळ स्पर्धा नव्हती तर विद्यार्थ्यांच्या इनोवेशनचा एक मेळा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनेतून भारत सरकारच्या विविध मंत्रालयांसमोरील समस्यांवर सुचवलेले उपाय पाहताना, आपण विकसित भारताच्या संकल्पनेपासून आता फार दूर नाहीत याचा प्रत्यय आला. आपल्या देशातील युवा पीढी ही आपल्या विकसित होण्याच्या वाटचालीत अत्यंत महत्वाची भूमिका बजाविणार आहे, आणि अशा या युवकांना त्यांच्या नवकल्पना जगासमोर मांडण्यासाठी एसआयएच-2024 सारखे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकारचे खूप अभिनंदन व आभार. तसेच, या स्पर्धेच्या आयोजनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनतही उल्लेखनिय आहे, असेही ते पुढे म्हणाले.
योगेश ब्राम्हणकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या विविध समस्यांचा आढावा घेताना, भारताला विकसित होण्यासाठी एआय, स्मार्ट अॅटोमेशन सारख्या गोष्टींचे महत्व अधोरेखित केले. तसेच, त्यांनी स्पर्धेच्या अचून आयोजनसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कौतुक आणि आभारही मानले.    विश्वशांती प्रार्थनेने सुरु झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.दुबे यांनी तर आभार इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा.स्नेहा वाघटकर यांनी केले. 
चौकट
स्पर्धेचा निकाल

  • कोळसा मंत्रालय-  झागाराम007 (श्री साईराम इंजिनिअरिंग महाविद्यालय, कांचीपूरम, तामिळनाडू)    
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- वाॅल्ट एसेस (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हमीरपूर) 
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय – मावेरिक्स (राष्ट्रीय इंजिनिअरिंग संस्था, म्हैसूर, कर्नाटक)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय –  द ऑलिम्पियन्स (स्वामी केशवनंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, जयपूर, राजस्थान)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय –  पॅराडॉक्स इनोव्हेटर (हेरिटेज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उत्तर परगणा, पश्चिम बंगाल)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- रेल मॅनिक्स (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर)
  • गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय- निदान 7.0 (मुजफ्फरपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिहार)

टायटनने ४० व्या वर्धापन दिनी ‘युनिटी वॉच’ सादर करून विंग कमांडर राकेश शर्मा यांना केले सन्मानित 


बेंगलोर – उत्कृष्टतेची परंपरा जपत असल्याला ४ दशके पूर्ण करत टायटन वॉचेस आपला ४० वा वर्धापन दिन भारताच्या एका सर्वात अभिमानास्पद टप्प्याचा सन्मान करून साजरा करत आहे. अंतराळात जाणारे पहिले भारतीय, विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक सफारीचा सन्मान टायटन वॉचेस आपल्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त करत आहे. १९८४ साली सोविएत अंतराळयान सोयूझ टी-११ मधून अंतराळात झेप घेऊन श्री शर्मा यांनी भारताच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले, अंतराळातून भारत कसा दिसतो आहे याचे उत्तर देताना त्यांनी उच्चारलेले “सारे जहाँ से अच्छा” हे शब्द म्हणजे जणू देशाच्या शिरपेचावरील मानाचा तुरा आहेत. त्यांचे हे एक उत्तर कोट्यावधी देशवासियांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले, या एका वाक्याने अवघ्या जगाला एकजूट भारताचे दर्शन घडवले. ४० वर्षांनंतर स्वतःचा कारीगरी आणि नाविन्याचा वारसा साजरा करत असताना, टायटन ब्रँडने लॉन्च केले आहे ‘युनिटी वॉच’, सेलेस्टीयलपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला हा लिमिटेड-एडिशन मास्टरपीस भारताची ही अतुलनीय गाथा सन्मानपूर्वक आपल्यासमोर मांडतो. एकता आणि अमर्याद संधी – अंतराळामधून पृथ्वीकडे पाहताना श्री शर्मा यांच्या मनात उमटलेल्या या भावनांपासून प्रेरणा घेऊन टायटनने ‘युनिटी वॉच’ तयार केले आहे. मानवतेची स्वप्ने आणि एकतेने गुंफलेले भविष्य यांनी एकत्र आलेल्या जगाचे व्हिजन या नावामधून दर्शवण्यात आले आहे.

लिमिटेड एडिशन युनिट वॉचचे फक्त ३०० पीस बनवण्यात आले आहेत. लुपा, बंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या, एका विशेष हृदयस्पर्शी सोहळ्यामध्ये टायटनने या कलेक्शनमधील पहिले युनिटी वॉच विंग कमांडर राकेश शर्मा यांना दिले. यावेळी श्री शर्मा यांनी अंतराळवारीच्या थरारक आठवणी सांगितल्या, अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या  विहंगम रूपाचे पुन्हा वर्णन केले. सीमांच्या पलीकडे जाऊन ‘वसुधैव कुटुम्बकम’ या विचाराची आठवण करून देणारा त्यांचा दृष्टिकोन सर्वांना प्रेरित करणारा ठरला. टायटनच्या डिझाईन टीमने हे विशेष घड्याळ तयार करण्यामागची नाजूक, तपशीलवार प्रक्रिया समजावून सांगितली. अंतराळ यात्रा आणि घड्याळ बनवण्याची प्रक्रिया या दोन्हींमध्ये अचूकता व अभियांत्रिकी ज्ञान, कौशल्ये अत्यंत गरजेची असतात. या सर्व चर्चांनी अवघे वातावरण प्रेरणादायी बनले, सुवर्ण आठवणींना उजाळा मिळाला. टायटनचे वॉचमेकिंग आणि अंतराळ संशोधनात भारताने केलेली अचाट प्रगती या दोन्हींमधून “मेक इन इंडिया” अधोरेखित झाल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले.

टायटन वॉचेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि सीएसएमओ श्री राहुल शुक्ला यांनी सांगितले, गेली चार दशके टायटनने तयार केलेल्या प्रत्येक घड्याळामध्ये “भारत” अंतर्भूत आहे. यावर्षी आम्ही विंग कमांडर राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीला ४० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत, एकजूट भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा दर्शवणारी ही घटना देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. आमच्या इन-हाऊस टीमने तयार केलेले युनिटी वॉच नावीन्य आणि ‘मेक इन इंडिया’ ची कलात्मकता दर्शवते. हे घड्याळ अंतराळ, विज्ञान यांचा सन्मान करते, समृद्ध भारतीय परंपरा दर्शवणारी घड्याळे तयार करण्यात उचललेले पुढचे पाऊल म्हणजे हे घड्याळ आहे. हे कलेक्शन लॉन्च करून आम्ही भारताच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षा दर्शवणारी घड्याळे तयार करण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत करत आहोत.”

विंग कमांडर राकेश शर्मा म्हणाले, “अंतराळातून जेव्हा आपण पृथ्वीकडे पाहतो तेव्हा काळाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा वरून पृथ्वीकडे पाहिले तेव्हा मला कोणत्याच सीमा दिसून आल्या नाहीत, दिसली ती एक सुंदर, एकजूट पृथ्वी. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या सुंदर घराचे संरक्षण करण्यासाठी सहकार्याऐवजी संघर्षाला प्राधान्य देणारे सामाजिक मॉडेल कालबाह्य झाले आहे, ते बाजूला सारण्याची वेळ आली आहे. युनिट वॉचेसमध्ये टायटनने हा विचार इतक्या चपखलपणे आणि कुशलतेने मांडला हे पाहून मला खूप आनंद झाला. याच्या सेलेस्टीयल डायलमध्ये मला आपला प्रिय भारत दिसतो, घड्याळावरील कोरीवकाम आठवण करून देते की, आपण वेळ सेकंदांमध्ये मोजतो पण प्रगतीचे मोजमाप हे आपल्याला लाभलेल्या शांततेतून केले पाहिजे. हे घड्याळ अंतराळातील प्रवासाची आठवण करून देते, इतकेच नव्हे तर प्रत्येक भारतीयामध्ये असलेली, ताऱ्यांना कवेत घेण्याची क्षमता देखील दाखवून देते.”

युनिटी वॉचमध्ये टायटनने कलात्मकता आणि नावीन्य यांची नवी व्याख्या रचली आहे, पहिले कन्सील्ड ऑटोमॅटिक घड्याळ म्हणजे अतुलनीय शान आणि क्रांतिकारी डिझाईनचा मास्टरपीस आहे. आकर्षक मिडनाईट ब्ल्यू रंगाची डायल अतिशय बारकाईने चित्रित करण्यात आलेला भारत दर्शवते, विंग कमांडर राकेश शर्मा यांना अंतराळातून दिसलेल्या भारताचे विहंगम दृश्य इथे पाहायला मिळते. देशभक्तीचे तीन रंग केशरी, सफेद आणि हिरवा काट्यांवर ठळकपणे दिसतात. सेकंद काट्याचा आकार रॉकेटसारखा आहे, श्री शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळवारीचे आणि निग्रही शोधाचे हे प्रतीक आहे. या सगळ्याचा मानबिंदू आहे श्री शर्मा यांचे ऐतिहासिक वाक्य “सारे जहाँ से अच्छा” या घड्याळाच्या मागे कोरण्यात आले आहे. त्यासोबतच ती ऐतिहासिक तारीख देखील नमूद करून भारताच्या अमर्याद महत्त्वाकांक्षा व यश यांचा सन्मान करण्यात आला आहे.

निवडक टायटन स्टोर्समध्ये आणि ऑनलाईन खरेदीसाठी हे घड्याळ उपलब्ध असल्याची घोषणा करून टायटनने देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण कायम आपल्यासोबत ठेवण्याची संधी घड्याळप्रेमींना दिली आहे.

रिंगोस्टिक आणि रस्सीखेच स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

मएसो सीनियर कॉलेज, पुणे आणि क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे: मएसो सीनियर कॉलेजमध्ये क्रीडा भारती पुणे महानगर यांच्या सहकार्याने रिंगोस्टिक आणि रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन सुदाम शेळके आणि शंतनु लामधाडे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय भालेराव होते. यावेळी मंचावर क्रीडा भारतीचे शैलेश आपटे, केशव राज चौधरी, विजय पुरंदरे, शकुंतला खटावकर आणि मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात कॉलेजचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक, पंच आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत  १५ महाविद्यालयांमधून एकूण ६० संघांनी भाग घेतला. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अभिजीत गर्ग यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार विजेते जयंत गोखले यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी विजय पुरंदरे, विजय रजपूत, जयसिंग जगताप उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:

रिंगोस्टिक मुली

  • प्रथम क्रमांक – वसंतराव सखाराम सणस ज्युनियर कॉलेज, पुणे
  • द्वितीय क्रमांक – रेणुका स्वरूप मुलींची सैनिकी शाळा
  • तृतीय क्रमांक – रेणुका स्वरूप ज्युनियर कॉलेज, पुणे

रिंगोस्टिक मुले

  • प्रथम क्रमांक – मएसो वाघिरे कॉलेज, पुणे
  • द्वितीय क्रमांक – वसंतराव सखाराम सणस ज्युनियर कॉलेज, पुणे
  • तृतीय क्रमांक – मएसो बॉईज हायस्कूल आणि हायर सेकंडरी स्कूल, पुणे

रस्सीखेच मुली

  • प्रथम क्रमांक – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (संघ ब), पुणे
  • द्वितीय क्रमांक – राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा (संघ अ), पुणे
  • तृतीय क्रमांक – रेणुका स्वरूप मुलींची शाळा, पुणे

रस्सीखेच मुले

  • प्रथम क्रमांक – आबासाहेब गरवारे कॉलेज (संघ ब), पुणे
  • द्वितीय क्रमांक – मामासाहेब मोहोळ कॉलेज, पौड रोड, पुणे
  • तृतीय क्रमांक – मएसो बॉईज हायस्कूल आणि हायर सेकंडरी स्कूल, पुणे

प्रा. नेहा कुलकर्णी आणि रवींद्र गोरे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्या डॉ. पूनम रावत यांनी आभार मानले.

शहिद भीमसैनिक  सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाची निदर्शने….

पुणे : परभणी येथे संविधानाच्या अवमानानंतर घडलेल्या घटने संदर्भात पोलिसांनी केलेल्या कॉबिंग ओपारेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली. रविवारी यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला.  शहिद भीमसैनिक  सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे; दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; कोंबींग ऑपरेशनचे आदेश देणाऱ्या पोलिसांचे निलंबन करा, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि  आंबेडकरी वसाहतीमध्ये वाहनाची तोडफोड करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा, सदर प्रकारणाची सीबीआय चौकशी करा आदी मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने  प्रशासना विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली.   

परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाच्या अवरामध्ये संविधानाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी व त्या मागील कटकारस्थान करणारे यांना कठोर शिक्षा करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या हेतुने मोठे जनअंदोलन केले गेले. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या कॉबिंग ओपारेशन मध्ये आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला यांना घरातून उचलून अटक करण्यात आली. रविवारी यातील मूळचा पुणे जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीत दुर्दैवी  मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने  प्रशासना विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने  करण्यात आली. यावेळी राज्य सचिव बाळासाहेब जानराव, राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर,  माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी शहराध्यक्ष  महेंद्र कांबळे, संगीता आठवले, विशाल शेवाळे, माजी नगरसेविका हिमाली कांबळे, बसवराज गायकवाड,  शाम सदाफुले,  राहुल डंबाळे, निलेश अल्हाट, बापूसाहेब भोसले, यशवंत नडगम, मिना मालटे, संदीप धांडोरे, अविनाश कदम, चांदणी गायकवाड, मिनाज मेनन, माहादेव कांबळे, संतोष खरात, मुन्ना बक्षशेख, मंगल रासगे, राजेश गाडे, एस.  बी. गायकवाड, भारत भोसले, विनोद टोपे, आशीष भोसले, विरेन साठे, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, अमित सोनवणे, सुन्नाबी शेख, संतोष गायकवाड, सुरज गायकवाड, रामभाऊ कर्वे, शंशाक माने, करण सोरटे, रविन्द्र कांबळे, सुशील मंडल, रोहित कांबळे, उमेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.         

परशुराम वाडेकर म्हणाले, परभणी येथे झालेल्या पोलिसांच्या कॉबिंग ऑपरेशन मध्ये पुण्यातील सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी जे कॉबिंग ऑपरेशन केले ते केवळ दलित व बौद्ध वस्ती असलेल्या ठिकाणी ठरवून केलेले आहे. जय भीम लिहिलेल्या गाड्या पोलिसांनी फोडलेल्या आहेत. कॉबिंग ऑपरेशन दरम्यान जखमी झालेल्या लोकांना पोलिसांनी रुग्णालयात न नेता पोलिस ठाण्यात डांबून ठेवले. सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने न होता पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे पोलिस कोठडीतच झाला. मात्र सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे सांगावे. तसेच अशा प्रकारे कायदे हातात घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, सदर प्रकारणाची सीबीआय चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा वाडेकर यांनी दिला.  

शहराध्यक्ष संजय सोनावणे म्हणाले, परभणीतील पोलिसांच्या कोंबीग ऑपरेशन मध्ये पुण्यातील सोमनाथ सुर्यवंशी हा सुशिक्षित तरूण मृत्यूमुखी पडला. पुण्यात त्याला लॉ कॉलेजला प्रवेश  न मिळाल्याने तो परभणी येथे लॉ चे शिक्षण घेत होता. अशा भविष्यात वकील होवू पाहणाऱ्या मुलाचाच कायद्याच्या रक्षकांनी  बळी घेतला आहे. ही शोकांतिका आहे. या कोंबीग ऑपरेशन चे आदेश देणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, संबंधीतावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब बडतर्फ करावे, अशी आमची मागणी आहे. अन्यथा भविष्यात आम्ही महाराष्ट्र बंद करू असा इशारा त्यांनी दिला.

सोमनाथ सूर्यवंशी LLB चा विद्यार्थी होता :पुण्याहून परीक्षेसाठी परभणीला आला अन् जीव गमावला; पोलिस कोठडीत झाला मृत्यू

0

परभणी- शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. प्रारंभी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता. पण आता पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी एक विद्यार्थी होता. त्याने परभणी येथील एका महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. सध्या त्याची परीक्षा सुरू होती. त्यासाठी तो पुण्याहून परभणीत आला होता. यासंबंधीच्या वृत्तानुसार, सोमनाथ हा एलएलबीच्या तिसऱ्या वर्षात होता.

पोलिसांच्या हाती सोमनाथचे आधार कार्डही लागले आहे. त्यावर त्याची जन्मतारीख 23 जुलै 1989 अशी नमूद आहे. तर पत्ता पुण्यातील भोसरी भागातील दाखवण्यात आला आहे. यावरून तो मूळचा पुण्यातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याची आई व भावाने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. तिथे त्यांनी पोलिस कारवाईचा निषेध करत आपल्याला न्याय हवा असल्याचा आकांत केला.

माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता. त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते. त्याचा जन्म 23 जुलै 1989 रोजी झाला होता. तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील भोसरी या भागात राहायचा.

दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. परभणीत संविधानाची विटंबना का करण्यात आली? याविषयी अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई ही समन्वयित होती का? हे ही समजत नाही. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मल्टिपल इंज्युरिज म्हणजे मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आहे. मी परभणीत अंत्यविधी होईपर्यंत थांबणार आहे. हे सर्वकाही शांतेत पार पडण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत.

पोलिस कारवाईत जी घरे फोडण्यात आली, त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी. आरोपींवर कारवाई करावी. पुतळ्याच्या आसपास झालेला लाठीचार्ज पोलिसांनी केला की पोलिसांच्या वेशातील दुसऱ्या कुणी केला? याचा शोध घ्यावा लागेल. ज्यांना मारहाण झाली त्यांच्या केसेस जिल्हा न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना सर्व वकिलांना देण्यात आल्यात, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमार्टेम रिपोर्ट मध्ये मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा स्पष्ट उल्लेख; पोलिस कोठडीत घेतला होता अखेरचा श्वास

0

परभणी -येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट अर्थात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यात त्यांचा मृत्यू मारहाणीमुळेच झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. परिणामी, आंबेडकरी अनुयायांत संतापाची तीव्र लाट उसळली आहे.परभणी शहरात गत आठवड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला. यामुळे आंबेडकरी समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम ऑन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. यामुळे वातावरण अधिकच तापले आहे.दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी परभणीला भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासह त्यांच्या न्यायासाठी लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्थानिक गेस्ट हाऊसमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. त्यात त्यांना पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये झालेल्या अमानुष मारहाणीची माहिती देण्यात आली. त्याचे अनेक व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले.

सोमनाथचे पार्थिव पोलिसांनी अडवले, आंबेडकरांचा हस्तक्षेप

दुसरीकडे, पोलिस प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे नेताना रस्त्यात पाचोड येथे रोखून धरला आहे. अॅडव्होकेट प्रियदर्शी तेलंग यांनी एका ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली. पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून परभणीला घेऊन जात होतो. आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर व आंबेडकरी जनतेची सूर्यवंशी यांच्यावर परभणीत अंत्यसंस्कार व्हावेत अशी इच्छा आहे. पण पोलिस व प्रशासन आम्हाला रस्त्यात अडवून मृतदेह लातूरला नेण्याचे सांगत आहेत, असे तेलंग यांनी सांगितले आहे.

पीआयसीटी महाविद्यालयात iDosT प्रकल्पासाठी सामंजस्य करार

पुणे:पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या E&TCE विभागाने क्रिस्टल इंडिया LLP, पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत iDosT नावाचा वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प विकसित केला जात आहे. हा प्रकल्प डॉ. शिव वर्मा यांच्या अमेरिकन पेटंटवर आधारित असून वैद्यकीय क्षेत्रात मोठा बदल घडविण्याची क्षमता आहे.
नुकतीच, प्रकल्पाचे प्रणेते डॉ. शिव वर्मा,करुणाकर नामपल्ली
यांनी PICT महाविद्यालयाला भेट देत iDosT प्रकल्पाची प्रगती पाहिली. डॉ. वर्मा हे युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना-शॅम्पेन येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीतील PhD पदवीधारक असून, दूरसंचार व तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नावावर 12 पेक्षा जास्त अमेरिकन पेटंट्स असून ते भारत आणि अमेरिकेतील स्टार्टअप कंपन्यांशी संबंधित आहेत.
या प्रकल्पासाठी डॉ. संदीप गायकवाड, प्रा. ललित पाटील, आणि प्रा. सुनील खोत यांचा सक्रिय सहभाग असून, प्रा. एम. व्ही. मुनोत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रकल्पाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी मोठी मेहनत घेतली असून Robotics Club च्या विद्यार्थ्यांनीही आपले योगदान दिले आहे.
पीआयसीटीचे प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे आणि संचालक डॉ. पी. टी. कुलकर्णी यांनी या प्रकल्पाला संपूर्ण पाठबळ दिले आहे. iDosT प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

गुरुवारी‘विश्वगुरू भारत‌’ विषयावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ‌व्याख्यान

पुणे : भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली 75 वर्षे, जगातील सर्वात मोठी सुसूत्र सामाजिक संघटना असा लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे 100व्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्य महोत्सवावकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ‌‘विश्वगुरू भारत‌’ या विषयावर गुरुवारी (दि. 19) जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवर दरवर्षी सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. सहकारनगर येथे आयोजित करण्यात येत असलेली व्याख्यानमाला यंदा 23व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यंदाही नियमित व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. 23व्या वर्षातील व्याख्यानाचे पुष्प डॉ. मोहन भागवत गुंफणार असून व्याख्यान गुरुवार, दि. 19 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता फुलोरा प्ले ग्राऊंड, दशभुजा गणपती जवळ, सहकारनगर क्र. 2 येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत, रवींद्र खरे, विजय ममदापूकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत आयोजित व्याख्यानमालेत अरुण साधू, चंदू बोर्डे, स्वामी स्वरूपानंद सरस्वती, अविनाश धर्माधिकारी, बाबासाहेब पुरंदरे, ले. जनरल डी. व्ही. शेकटकर, चित्तरंजन कोल्हटकर, प्रा. शिवाजीराव भोसले, डॉ. बालाजी तांबे, प्रा. मनोहर जोशी, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, निळू फुले, द. मा. मिरासदार, जगद्गुरू शंकराचार्य (करवीर पीठ), डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. मोहन धारिया, सिंधुताई सपकाळ, हृदयनाथ मंगेशकर, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, तात्याराव लहाने, डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रा. डॉ. स्वानंद पुंड, हभप चारुदत्त आफळे, डॉ. श्रीकांत परांजपे, राज ठाकरे, डॉ. कल्याणी नामजोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज वक्त्यांनी हजेरी लावली असून 125 पेक्षा जास्त व्याख्याने झाली आहेत. सुमारे 47 वर्षांपूर्वी तत्कालिन सरसंघचालक बाळसाहेब देवरस यांचे सहजीवन व्याख्यानमालेत व्याख्यान झाले होते. त्यानंतर सहजीवन व्याख्यानमालेत सरससंघचालकांचे व्याख्यान आयोजित करण्याचा योग दुसऱ्यांदा जुळून आला आहे. गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“मेरी रातें, मेरी सड़कें!”महिला हिंसाचाराच्या विरोधात ‘जागर मोर्चा’ला उत्सफूर्त प्रतिसाद

पुणे: “हम भारत कि नारी है, फुल नही चिंगारी है”, “महिला शक्ती आयी है,  नई रोशनी लायी है” असे म्हणत हातात घुंगराच्या काठ्या घेऊन महिला हिंसाचाराच्या विरोधात घोषणा देत, महिला सक्षमीकरणाची गाणी गात, पुण्यातील महिला-मुली शनिवारी रस्त्यावर उतरल्या. कित्येक वर्षापूर्वी १६ डिसेंबरला दिल्लीतील निर्भया प्रकरण झाले . त्यानिमित्ताने शहरातील महिला जागर समितीच्या वतीने या ‘जागर मोर्चा’चे आयोजन करण्यात आले  होते.

रविवारी संध्याकाळी महात्मा फुले वाड्यातील समाजसुधारक सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाची सुरूवात करण्यात आली होती. प्रमुख उपस्थिती आमदार नितीन राऊत यांची होती. महिला जागर समितीला त्यांनी पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या व सतत त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची हमी दिली. मासे अळी–फडगेट पोलीस चौकी–चिंचेची तालीम–बाजीराव रोड–शनिपार चौक–अप्पा बळवंत चौक–शनिवार वाड्याजवळून हा मोर्चा लाल महालात पोहचला. या दरम्यान रस्त्यात महिला सक्षमीकरणावर, महिला हिंसाचाराच्या विरोधात महिलांनी घोषणा दिल्या, गाणी, कविता सादर केल्या. त्यानंतर लाल महालातील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करून या मोर्चाची सांगता करण्यात आली.
तसेच देशातील ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांच्यासाठी मौन पाळून श्रद्धांजली देण्यात आली व हिंसेच्या विरोधात आम्ही उभे राहू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली. मेणबत्त्या लावून त्या ज्योतीच्या प्रकाशाने अंधारावर मात करत, आम्ही एक दिवस नक्की एक न्यायपूर्ण आणि निर्भय समाज बनवण्याचा प्रयत्न करू, या निर्धाराने ‘हम होंगे कामयाब’ गाणे गाऊन जागर मोर्चाची सांगता झाली.

याप्रसंगी बोलताना महिलांसाठी स्त्री-पुरुष समानतेची व्यवस्था निर्माण करून विकासाची समान संधी निर्माण करणे, त्याचबरोबर समान प्रतिष्ठा, दर्जा, निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे मत सगुणा महिला संघटनेचे शोभा करांडे यांनी व्यक्त केले.  महिलांवर होणारे अत्याचार संपवायचे असतील तर मुलींवर बंधन आणण्यापेक्षा आपल्या घरातील मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवायला पाहिजे, असे प्रतिपादन अभिव्यक्ती संघटनेच्या समन्वयक अलका जोशी यांनी व्यक्त केले. तर महिलांनी स्वतःच स्वतःसाठी उभं राहिल पाहिजे, स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराविषयी स्वतःच आवाज उठवला पाहिजे, असे मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वकील असुंता पारधे (चेतना महिला विकास संस्था) यांनी व्यक्त केले. स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करणे गरजेचे आहे. असे कार्यक्रम महिलांना व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळवून देत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मृणालिनी वाणी म्हणाल्या. आजही स्त्री आर्थिकदृष्ट्या उदासीन, शिक्षणात दुर्लक्षित, कुटुंबात दुय्यम, समाजात उपभोगाची वस्तू बनलेली आहे. देश एकविसाव्या शतकाच्या भौतिक आणि वैज्ञानिक प्रगतीच्या शिखरावर पोहोचला असला, तरी स्त्री-पुरुष समानतेचा प्रश्न अद्यापही तसाच आहे, ही खंत रंजना पासलकर यांनी व्यक्त केली.  महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळते, तेथे तेथे त्या आपल्या संधीचे सोने करत असतात, त्यामुळे महिलांचा प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे मत प्रियंका रणपिसे (ओजस्वी बहुउद्देशीय संस्था) यानी व्यक्त केले. शाळामधून गुड टच-बॅड टच सारखे उपक्रम तर व्हायला पाहिजेत पण घरकामात वडिलांनी जर हातभार लावला तर आपसूकच लहानपणापासून मुल संवेदनशील पध्द्तीने विचार करायला लागतात, असे मत शारदा नितनवरे (कौरंग फाउंडेशन) यांनी मांडले. याप्रसंगी गुलाबो गँगच्या संगीत तिवारी, नीता रजपूत, वारसा सोशल फाउंडेशनच्या प्राची दुधाने मिळून साऱ्याजणीच्या स्मिता शेट्टी, संगीत पटणे आदी उपस्थित होत्या. यावेळी ‘ओय नजर संभाल’, ‘महिलांवरील हिंसाचार आता बस’ असा सामाजिक संदेश देणारे टि-शर्टही बनविण्यात आले होते.

‘महिला जागर समिती’च्यावतीने सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत पुण्यात आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘हे रस्ते रात्रीच्या वेळी जसे पुरूषांचे आहेत, तसेच आमचे (महिलांचे) आहेत’, हे सांगण्यासाठी ‘मेरी रातें, मेरी सड़कें’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध फुटपाथवर महिलांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेतले. महिला हिंसाचाराच्या विरोधात काम करणाऱ्या महिला जागर समितीमध्ये राज्यभरातील 50 हून अधिक संस्था, संघटना सहभागी आहेत.

सहभागी संस्था-संघटना: अभिव्यक्ती, वारसा सोशल फाउंडेशन, हम भारत के लोग, गुलाबो गॅंग, ओजस्वी बहुउद्देशीय संस्था, चेतना महिला विकास संस्था, सगुणा महिला संघटना, संयुक्त स्त्री संस्था, वाचनसाधना ग्रंथालय, अक्षरा केंद्र (मुंबई), पेहेल फाउंडेशन, मिळून सार्‍याजणी, ज्ञानभारती प्रतिष्ठान, रुक्माई भजनी मंडळ, महाराष्ट्र महिला विकास मंच, कौरंग फाउंडेशन, राष्ट्रीय मजदुर संघ महिला आघाडी (RMS), स्व. श्री. सुरेंद्र आनंद मेमोरियल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य भूमाता संघटना, मनस्विनी मंच (वर्धा), महाराष्ट्र महिला परिषद, बोधिसत्व बहुउद्देशीय विकास सोसायटी (बडनेरा), संघर्ष बहुउद्देशीय संस्था (अमरावती), क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन (अमरावती), स्त्री आधार महिला संस्था (मुंबई), युवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (लातूर), आम्ही भारतीय महिला मंच (कोल्हापूर), मनस्विनी महिला विकास सेवाभावी संस्था (अंबाजोगाई), सत्यशोधक महिला आघाडी (नांदेड), स्त्री सोशल फाऊंडेशन, विचारधन, संगम वर्ल्ड सेंटर, सीवायडीए, ग्रीन तारा फाऊंडेशन, महिला कल्याण केंद्र, शांताई संस्था, इंडिया स्पॅान्सरशिप कमिटी, निर्भय युवा प्रतिष्ठान, संकल्प सखी, भटके विमुक्त संघटना, परिवर्तन, निर्भय विद्यार्थी अभियान, एकजुट महीला संस्था (खराडी), वात्सल्य सुरक्षा ऑर्गनायझेशन (केशवनगर), सहेली ग्रामीण बहुउद्देशीय महिला संस्था (नाशिक), विद्यादान व सामाजिक सेवा भाव ट्रस्ट (मुंबई) या संस्थांचा समावेश आहे.

अजूनही रस्ते, गल्ली, कॉलेज, बस, बाजार, घर, कामाचे  ठिकाणी अथवा खेळाच्या मैदान हे महिलांसाठी असुरक्षित आहेत आकडेवारीनुसार देशात आज दर 16 मिनिटाला एक बलात्कार होत आहे. परंतु, ही फक्त नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अधिक गंभीर आहे. दिवसेंदिवस वाढते हिंसाचार पाहून मन सुन्न होतं. या वर्षी निर्भया घटनेला 12 वर्ष पुर्ण होत आहे व बदलापूर घटनेला 1 महिना पुर्ण होत आहे यामुळे महिला हिंसाचाराच्या विरोधात व महिलांना समाजामध्ये सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे म्हणून 21 सप्टेंबरपासून 16 डिसेंबरपर्यंत, 12 रात्री महिलांनी निर्भयपणे रस्त्यावर येऊन जगण्यासाठी व स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी  पुण्यामधील ‘महिला जागर समिती’ मार्फत ‘मेरी रातें, मेरी सड़कें!’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे असं जीविका उथडा यांनी सांगितले.
या अंतर्गत पहिला कार्यक्रम हा 21 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9 ते 11 या वेळेत सावित्रीबाई फुले पुतळासमोरील फुटपाथ, स्वारगेट, पुणे येथे करण्यात आलेला आहे. हे रस्ते जेवढे तुमचे आहेत तेवढेच आमचेही आहेत हे ठणकावून सांगण्यासाठी आम्ही रस्त्यावर सात रात्री उतरलो! त्यात एकमेकींशी मनातलं बोललो, परखडपणे मते मांडली, मुक्तपणे नाचलो-गायलो, स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागी स्त्रियांचा इतिहास सांगितला, चाकोरी तोडणाऱ्या महिलांचा सन्मान केला त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेतली. यातून नक्कीच आधीपेक्षा बिनधास्त झाल्या, स्वतःसाठी काही क्षण जगल्या, तसा हा संघर्ष चालूच राहणार! तर 16 डिसेंबर 2024 च्या 12व्या रात्री महिलांवरील हिंसाचाराच्या विरोधात महिला जागर मोर्चा काढून या कार्यक्रमाचा समारोप होईल.  
हिसेंच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी, स्वतःचे आणि इतर सख्यांचे भय घालवण्यासाठी, रस्त्यावर निर्भयपणे चालण्यासाठी, एकमेकींची सुख-दु:खे समजून घेण्यासाठी, एक निर्भय मनमोकळा श्वास घेण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:ला शोधण्यासाठी मुलीनीं व महिलांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन प्राची दुधाने यांनी केले. तर नीता रजपूत यांनी या अभियानात पुण्यातील विविध बचतगट, विविध शिक्षण संस्थामधील कॉलेज मधील विद्यार्थिनी व कमर्चारी तसेच सोसायटी मधील महिलांना सहभागी करून घेण्याबाबतची माहिती दिली.
या सर्व अभियानात होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देताना नीलिमा राऊत यांनी संगितले कि यात गाणी, नृत्य, चर्चा अशा सर्जनशील पद्धतींचा समावेश असेल. तसेच मुख्य सहभाग हा मुली, महिला आणि त्यांची लहान मुलं यांचा असेल तर यात पुरुषांचे सहकार्य ही स्वागतार्ह असेल.  
या कार्यक्रमाचा आणि महिला जागर समितीचा भाग होण्यासाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करु शकता. या कार्यक्रमाचा आणि महिला जागर समितीचा भाग होण्यासाठी आपण दिलेल्या संपर्कावर संपर्क करु शकता: गुड्डी: 77380 82170  श्रद्धा: 92704 78335

सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांचे पुर्नवसन करा-डॉ.हुलगेश चलवादी

न्यायालयीन कोठाडीतील मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी

पुणे दिनांक १६ डिसेंबर २०२४,

देशाचा पवित्र ग्रंथ ‘संविधान’ प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणीत उसळलेल्या जनक्षोभानंतर अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली होती.मात्र,न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंदोलकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. ही घटना धक्कादायक असून चळवळीसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सुर्यवंशी कुटुंबियांच्या पाठिशी उभी राहण्याची ही वेळ आहे, अशी भावना बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.१६) व्यक्त केली.

“सोमनाथ सुर्यवंशी यांनी चळवळीच्या लढ्यात प्राण अर्पण केले.त्यांच्या त्यागाला वाया जाऊ देणार नाही,” असे ठामपणे सांगत डॉ.चलवादी यांनी सरकारला आवाहन केले की, सुर्यवंशी कुटुंबाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे व त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात यावी तसेच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.”

सोमनाथ यांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की , त्यामागे कुठले षडयंत्र आहे ? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशी अंती दोषीविरोधात कारवाई करावी.या मृत्यूप्रकरणी सरकारने त्यांची बाजू स्पष्ट करण्याची गरज असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.“बहुजन समाज पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सुर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे. आम्ही त्यांना फक्त सांत्वन देणार नाही, तर संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत राहू,” अशी ठाम भूमिका घेत, लवकरच कुटुंबीयांना भेटून पक्षाच्या वतीने मदत करणार असल्याचे आश्वासन डॉ.चलवादी यांनी दिले.

सोमनाथ यांच्या आत्मत्याग हा केवळ एका कुटुंबाचा नाही, तर न्याय आणि अधिकारांसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.त्यांच्या बलिदानाने एक नवा अध्याय सुरू झाला आहे, अशा शब्दात डॉ. चलवादी यांनी श्रद्धांजली अर्पित केली.सोमनाथ यांच्यावर अचानक काळाने घाला घातल्याने त्यांचे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे. या संकटसमयी बहुजन समाज पक्ष सुर्यवंशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. 

सोमनाथ यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने लोकभावना लक्षात घेता घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी बसपची भूमिका असल्याचे डॉ.चलवादींनी स्पष्ट केले.परभणीत आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अटकेतील आंदोलकांची मुक्तता करण्यात यावी तसेच आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणार्या पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचा देखील पुनरोच्चार डॉ.चलवादी यांनी यानिमित्ताने केले.

आता थांबायचं नाय!’झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शन यांची एकत्र निर्मिती!

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका, आशियामधील सर्वात श्रीमंत समजली जाणारी भारतातील मानाची महानगरपालिका, याच बीएमसीच्या सहकार्याने आणि प्रेरणेने तयार होत आहे, ‘झी स्टुडिओज’चा आगामी मराठी चित्रपट, ‘आता थांबायचं नाय’!
‘झी स्टुडिओज’, ‘चॉक अँड चीज’ आणि ‘फिल्म जॅझ’ प्रॉडक्शनची एकत्र निर्मिती असलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे, शिवराज वायचळने.
सोबतच लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकरअशी तगडी स्टारकास्ट सिनेमात आहे. पहिल्यांदाच हे सर्व दिग्गज कलाकार एकत्र आल्याने या चित्रपटाची कथा काय असणार याचं औत्सुक्य प्रेक्षकांमध्ये नक्कीच असणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या अद्वितीय प्रेरणादायी कथेच्या दर्जेदार सादरीकरणासाठी तसेच निर्मितीसाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील लोकप्रिय आणि विश्वसनीय ‘झी स्टुडिओज’ ही संस्था पुढे आली असून त्यांच्यासोबत हिंदी चित्रपट क्षेत्रातील नावाजलेले निर्माते निधी परमार-हिरानंदानी, धरम वालीया ही धुरा उत्तम निभावत आहेत, या निर्मितीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. तसेच “श्रीकांत” फेम तुषार हिरानंदानी हे या सिनेमासाठी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम पाहत आहेत,
आज सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमाचा मुंबई महानगर पालिका आयुक्त माननीय भूषण गगराणी, किरण दिघावकर महापालिका उपायुक्त, झी स्टुडिओजचे चिफ बिझनेस ऑफिसर उमेश के बन्सल, झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर, निर्माते निधी परमार – हिरानंदानी, धरम वालीया, क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी, निवृत्त सनदी मनपा अधिकारी उदयकुमार शिरुरकर या खास मान्यवरांसह चित्रपटातील मुख्य कलाकार तंत्रज्ञाच्या उपस्थितीत ग्रांट रोड येथील गिल्डर टँक महापालिकेच्या शाळेत मुहुर्त संपन्न झाल्यानंतर लगेचच चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. मराठी चित्रपटविश्वात एका कर्तबगार आणि संवेदनशील अधिकाऱ्यासंबंधीची ही सत्यकथा नक्कीच वेगळी ठरेल.

“मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात तेजाचा किरण आणणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मांडण्याची संधी मिळणं, ही गोष्ट ‘झी स्टुडिओज’साठी अत्यंत भाग्याची आहे. मराठीत येणारा एक वेगळा आणि प्रेरणादायी सिनेमा पाहणं, ही एक पर्वणीच ठरणार आहे.”

  • उमेश के बन्सल, चिफ बिझनेस ऑफिसर, झी स्टुडिओज

“मुंबई महानगरपालिकेमधल्या कर्तबगार कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित आहे. मात्र ही घटना अत्यंत प्रेरणादायी असून, मराठीत पहिल्यांदाच अशाप्रकारची मांडणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेने या चित्रपटासाठी जे सहकार्य दिलं आहे, त्यासाठी एक मुंबईकर आणि सिनेव्यवसायिक म्हणून आम्ही नक्कीच आभारी आहोत.”

  • बवेश जानवलेकर, बिझनेस हेड, झी स्टुडिओ

“साधारण शासन असेल किंवा महापालिका असेल नेहमी काय केलं जात नाही या टीकेला आम्हाला दैंनदिन सामोरं जावं लागतं. महापालिकेत म्हणा, शासनात म्हणा अनेक चांगले उपक्रम चालू असतात, चांगले अधिकारी असतात ते चांगली कामे करीत असतात. त्याच्या नोंदी बऱ्याच वेळा घेतल्या जात नाहीत किंवा घेतल्या तर त्यात काही त्रुटी राहतात. म्हणूनच या चित्रपटाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आपल्यासमोर येतोय. अश्या प्रकारे या कामांची नोंद कायमस्वरूपी घेतली जाईल आणि लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. म्हणूनच मला महापालिकेच्या वतीने आनंद व्यक्त करावासा वाटतोय. मी सर्वांचे अभिनंदन करतो.”
*भूषम गगराणी – बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त *

“मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी खरंच काय करू शकतात, याची चुणूक दाखवणारी आमच्या गुणी अधिकाऱ्यांच्या कामाची दखल घेणारी कलाकृती तयार होतेय, याचा आनंद आहे.”

  • किरण दिघावकर – उपायुक्त, मुंबई महापालिका

“प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहताना कायमच नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांचीही प्रगती व्हावी, असा विचार मनात आला आणि त्यावर अंमलबजावणीही केली. हा प्रवास आता चित्रपटातून मांडला जाणार आहे. अधिकारी म्हणून काम करताना जे आनंदाचे आणि समाधानाचे क्षण असतात त्यातला एक क्षण आता या सिनेमाद्वारे कायमचा आठवणीत राहणार आहे.”

  • उदयकुमार शिरुरकर, निवृत्त सनदी अधिकारी

“मुंबई महानगरपालिका क्षेत्रात फुललेली अत्यंत प्रेरणादायी कथा, त्यासाठी झी स्टुडिओ, सहकारी आणि मुंबई महानगर पालिका यांचे योगदान असल्यानेच ‘आता थांबायचं नाय’, शक्य झाले आहे.”

  • क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुषार हिरानंदानी
    चित्रपट – ‘आता थांबायचं नाय’
    दिग्दर्शक – शिवराज वायचळ
    निर्माते :
    झी स्टुडिओज – उमेश के बन्सल आणि बवेश जानवलेकर
    चॉक अँड चीज प्रॉडक्शन – निधी परमार – हिरानंदानी
    क्रिएटिव्ह प्रोड्युसर – तुषार हिरानंदानी
    फिल्म जॅझ – धरम वालीया
    लेखक – शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप
    कलाकार – भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे
    आणि आशुतोष गोवारीकर

एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धा !!

गुजरातच्या टीम-२ संघाला स्पर्धेचे ‘टिम चॅम्पियनशीप’ !!

राजेंद्र, सिनान फ्रान्सीस, वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद, आसिफ अलि सय्यद यांचा गट-विजेतेपद !!

पुणे, १६ डिसेंबरः फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेखाली होणार्‍या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेत गुजरातच्या टीम-२ संघाने राष्ट्रीय सांघिक विजेतेपद संपादन केले. राजेंद्र, सिनान फ्रान्सीस, वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद आणि आसिफ अलि सय्यद यांनी आपापल्या गटामध्ये विजेतेपद संपादन केले.

पुण्याजवळील कामशेत येथील नानोली स्पीड-वे फार्म्स येथे झालेल्या निर्णायक फेरीमध्ये साडेपाच किलोमीटरच्या धावपट्टीमध्ये रॅली-रेसर्सच्या दोन शर्यती घेण्यात आल्या. या दोन्ही शर्यतीं मिळून सरासरीतील सर्वोत्तम वेळची नोंद करण्यात आली. ओपन अपटू ५०० सीसी ग्रुप सी१ क्लास मध्ये राजेंद्र आरई याने पहिला क्रमांक मिळवला. क्लास सी१-ओपन अपटू ५५० सीसी (प्रायव्हेट) मध्ये सिनान फ्रान्सीस याने सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद यांनी आपापल्या गटामध्ये सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. महिला गटामध्ये रेहान बी. हिने, प्रौढ गटामध्ये एम.डी. सईद आणि स् कूटर २१० सीसी क्लास मध्ये आसिफ अलि यांनी विजेतेपद मिळवले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘युरोग्रीप’ टायर उत्पादक कंपनीचे विभागीय व्यवस्थापक फराझ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना उपस्थित होते. सर्व विजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

या फेरीमध्ये देशातील ७० रायडर्सनी सहभाग घेतला होता. चैन्नई, बंगलोर, कोईमतुर, भोपाळ, गुवाहाटी, तामिळनाडूमधील ईरोड, त्रिसुर आणि कुर्ग, आसाम, कर्नाटक, केरळमधील एर्नाकुलम, शिमागोज, जयपुर या राज्यांतुन रायडर्स सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील पुण्यामधून किशोर जाधव, मोहन सेठीया, पुरूषोत्तम मते, कुणाल सिंग, नितीश चौधरी, दानेश जोशी, पंकज ठक्कर, आदित्य राजपुत, बारामतीमधून रोहीत शिंदे, सांगलीमधून अजित पाटील, नाशिक मधून दर्शन चावरे, बादल दोशी (नवी मुंबई) असे अव्वल रायडर्स सहभागी झाले होते.

स्पर्धेचा सविस्तर निकालः (प्रथम, दुसरा, तिसरा क्रमांक; नोंदवलेली वेळ या क्रमानुसार)ः
ग्रुप एः सी१-ओपन अपटू ५५० सीसीः राजेंद्र आर.ई. (१२.४०.७०० मि.); नटराज आर. (१२.५०.३०० मि.); नरेश व्हि.एस. (१३.०६.५०० मि.);
ग्रुप एः सी१-ओपन अपटू ५५० सीसी (प्रायव्हेट)ः सिनान फ्रान्सीस (१२.३१.४०० मि.); नटराज आर. (१२.५८.१०० मि.); नरेश व्हि.एस. (१२.५९.७०० मि.);
ग्रुप बीः सी३-१३१ सीसी अपटू १६५ सीसीः वरूण कुमार (१३.४५.६०० मि.); स्टिफन रॉय (१३.४६.२००); भरथ एल. (१४.१४.४०० मि.);
ग्रुप बीः सी४-१६६ सीसी अपटू २६० सीसीः डी. सचिन (१२.५८.१०० मि.); संजय सोमशेखर (१२.५८.६००); करण कुमार (१३.१३.६०० मि.);
ग्रुप बीः सी५-२६१ सीसी अपटू ४०० सीसीः हेमंत गोड्डा (१३.२५.००० मि.); रोहीत शिंदे (१३.२८.५०० मि.); राजेश स्वामी (१३.३९.१०० मि.);
ग्रुप बीः सी६-बुलेट- सीएल अपटू ५५० सीसीः सुहेल अहमद (१३.१८.७०० मि.), सिनान फ्रान्सीस (१३.२५.००० मि.); सुहास एस.एस. (१४.१३.५०० मि.);
ग्रुप बीः सी७-स्कूटर- अपटू २१० सीसीः आसिफ अलि सय्यद (१३.४५.२०० मि.); शमिम खान (१४.२९.८०० मि.); एन. कार्थिक (१४.५५.१०० मि.);
ग्रुप बीः सी८-महिला- अपटू २६० सीसीः रेहान बी. (१५.४३.४०० मि.); स्नेहा सी.सी. (१७.२९.८०० मि.); तनया सिंग (१७.४०.६०० मि.);
ग्रुप बीः सी९-प्रौढ गट (५० वर्षावरील) अपटू २६० सीसीः एम.डी. सईद (१४.३८.१०० मि.); ए.जे. जोस (१५.०७.८०० मि.); अमरेंद्र साठे (१५.१३.५०० मि.);
ग्रुप डीः सी१०- अपटू २६० सीसीः संजय सोमशेखर (१३.३६.८०० मि.); योगेश पी. (१४.०८.६०० मि.); नावेद खान (१४.३१.८०० मि.);